Month: December 2024

महाराष्ट्र खो-खो संघाच्या यशामागे तांत्रिक कौशल्य आणि  संघटित प्रयत्न – प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव

मुंबई : ४३व्या कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने सलग दहाव्यांदा दुहेरी सुवर्ण मुकुट पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मुलांनी सलग १९वे आणि मुलींनी सलग १०वे विजेतेपद पटकावून खो-खोच्या…

मुंबई महापालिकेच्या पेन्शनर्स असोसिएशनचा सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ संपन्न

 गुणवंतांनाही केले सन्मानित   ठाणे :   बृहन्मुंबई  महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने नुकताच  स्नेहसंमेलनाचा दिमाखदार सोहळा ठाणे शाखेच्या वतीने ज्ञानराज सभागृह ठाणे (पश्चिम) येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास  असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकर क्षीरसागर, कार्यवाह डॉ. मारुती नलावडे, ठाणे जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शिरीष नागले, संमेलनाध्यक्षा ज्योत्स्ना फडके, तुषार पारखी, भास्कर देशपांडे व्यासपीठावर  उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सेवानिवृत्त गुणवंत स्मिता पाटील, चंद्रकांत खामकर, माया सावंत, प्रिया खरबंदा, सुनीती सिन्नरकर यांना  याप्रसंगी गौरविण्यात आले. तसेच सुषमा भागवत दिग्दर्शित “वाह ! गुरू” नाटकातील एक प्रवेश सादर करण्यात आला. दिपाली केळकर यांच्या “गप्पांच्या गावा जावे” या रंगतदार कार्यक्रमाने उपस्थितांची  मने जिंकली. रवी मोरे, मिलिंद भागवत, विकास कुंटे  शिरीष सराफ, प्रताप जाधव, प्रकाश मोरये यांच्या बहारदार गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना शिर्के, अलका जोशी, घनश्याम दीक्षित यांनी केले. 00000

आजपासून रंगणार पाचवी अर्जुन मढवी स्मृती महिला क्रिकेट स्पर्धा

ठाणे :  डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी महिलांच्या क्रिकेट स्पर्धेला आजपासून (सोमवार) सुरुवात होत आहे. यंदा प्रथमच स्पर्धेतील सामने मर्यादित ४० षटकांचे खेळवले…

ठाण्याच्या सुभेदारीसाठी शतप्रतीशतचा नारा

भाजपनंतर आता शिवसेना शिंदे गटाची मोर्चेबांधणी   ठाणे : राज्यात महायुतीला रेकॉर्डब्रेक यश मिळाले असले तरी सध्या मुख्यमंत्रिपदावरून जोरदार संघर्ष सुरू आहे. या संघर्षाचे पडसाद आगामी महापालिका निवडणुकांमध्ये उमटण्याचे स्पष्ट संकेत आतापासूनच मिळत आहेत. एकीकडे भाजपची ताकद वाढवण्यासाठी सदस्य मोहीम सुरू झाली आहे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानेही ‘युवासेना एकसाथ, महापालिकेतही एकनाथ’ असा नारा देत आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीची शक्यता धूसर आहे. ठाण्याची शतप्रतिशत सुभेदारी मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्येच प्रमुख लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा धुरळा शांत झाला आहे. ठाणे जिल्ह्यात महायुतीने १८ पैकी १६ जागांवर आपला झेंडा फडकवला आहे. जिल्ह्यात भाजपचे नऊ, तर शिवसेना शिंदे गटाचे सहा आमदार निवडून आले आहेत. महायुतीसाठी हे मोठे यश असले तरी निवडणुकांदरम्यान शिवसेना आणि भाजपमध्ये स्थानिक पातळीवर मोठा बेबनावही पाहायला मिळाला होता. जागावाटपावरून ते प्रचारापर्यंत हा तणाव होता, पण विधानसभेच्या ऐन निवडणुकीत या दोन्ही पक्षाने सर्व हेवेदावे बाजूला ठेवून एकदिलाने काम केले. त्या यशाचे फलीत त्यांना मिळाले आहे, पण सध्या राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्रिपदावरून जे सुरू आहे, त्यामुळे ठाण्यातील शिवसेना शिंदे गटात कमालीची नाराजी पसरली आहे. याचा वचपा आगामी महापालिका निवडणुकीत काढण्याचा एकप्रकारे संकल्प केल्याचे समजते. ठाणे महापालिकेची अखेरची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. त्यानंतर २०२२ मध्ये कार्यकाळ संपल्यामुळे ती विसर्जित झाली. कोव्हिडमुळे आधी निवडणूक लांबणीवर पडली, तर नंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्याने गेल्या तीन वर्षांपासून पालिकेची निवडणूक खोळंबली आहे. आता सत्तास्थापनेनंतर पालिका निवडणुका होतील, या आशेने लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये झोकून दिल्याने सर्व माजी नगरसेवकांसमोर आशेचा किरण दिसू लागला आहे, पण त्याचवेळी जर पॅनलपद्धतीने निवडणुका झाल्या आणि त्यातही महायुती-आघाडी अशी शक्यता निर्माण झाल्यास आपल्या वाट्याला काय येणार, याची चिंताही सतावू लागली आहे. वास्तविक ठाणे महापालिकेवर गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेने सत्तेचे पहिले यश ठाण्यातून मिळवले होते. त्यामुळे ठाण्यावर शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले आहे. राज्यात भाजपसोबत युती असली तरी ठाण्यात शिवसेनेचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे सत्तेत शिंदे गटाला भाजपची भागीदारी नको असल्याचीही चर्चा सुरू आहे. 0000

ठाणे सिव्हीलमध्ये एकच दिवशी १०० बालकांवर हर्निया, डोळे, रक्ताची गाठ, चिकटलेल्या बोटांवर शस्त्रक्रीया!

ठाणे: महागड्या रूग्णालयत लाखो रूपये खर्च करून लहान शस्त्रक्रिया करायची ऐपत सर्वांची नसते. पण त्यावर मात करण्यासाठी लहान मुलांवर जोखमीची शस्त्रक्रिया करायची झाल्यास गरजू सध्या ठाणे सिव्हील रुग्णालय गोठत आहेत.…

एचआयव्ही बाधितांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक

मुंबई : एचआयव्ही रुग्णांच्या संख्येत मागील पाच वर्षांत सातत्याने घट होत आहे. २०१९-२० च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये एचआयव्ही रुग्णांच्या संख्येत ०.२ टक्क्यांनी घट झाली आहे. रुग्णांच्या संख्येत घट झाली असली…

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे सौरभ काडगावकर यांचे गायन

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने सुमति गायतोंडे चॅरिटेबल ट्रस्टच्या सहयोगाने सौरभ काडगावकर यांच्या गायनाचा कार्यक्रम ८ डिसेंबर २०२४ या दिवशी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी…

सिंधुदुर्ग पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तोरसकर यांची बिनविरोध निवड..!

सिंधुदूर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर व सचिव पदी बाळ खडपकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड शुक्रवारी झालेल्या जिल्हा पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या प्रतिनिधीपदी गणेश जेठे यांचीही बिनविरोध निवड झाली. संघाची नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे:…

 एनआरएमयुचा ‘एक उद्योग, एक युनियन’ संकल्पना

भारतीय रेल्वे युनियन मान्यता निवडणुकीसाठी  जाहीरनामा   अनिल ठाणेकर एनआरएमयुने ‘एक उद्योग, एक युनियन’ या संकल्पनेसह भारतीय रेल्वेमध्ये २०२४ च्या युनियन मान्यता निवडणुकांसाठी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. जनरल सेक्रेटरी वेणू पी. नायर यांनी मुंबई, नागपूर, पुणे, भुसावळ आणि सोलापूर विभागातील मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांना एनआरएमयु (मध्य रेल्वे/कोंकण रेल्वे) सोबत एकत्र येण्याचे आवाहन केले. वेणू पी. नायर, सरचिटणीस, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एन आर एम यु मध्य रेल्वे कोंकण रेल्वे ), यांनी नुकतेच दादर रेल्वे इन्स्टिट्यूट येथे आयोजित कार्यक्रमात एन आर एम यु च्या ‘निवडणूक जाहीरनामा’ किंवा ‘संकल्प पत्र’ चे अनावरण केले. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आणि विशेषतः मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे कागदोपत्री वचन आहे.  हे मागण्या पूर्ण करण्यासाठी एक व्यापक रोडमॅप देखील तयार करते आणि ते “एक उद्योग, एक संघ” दर्जा प्राप्त करून सर्व कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे आणि कल्याणाचे समर्थन करते. दस्तऐवजात ६२-पॉइंट मागण्यांचा एक चार्टर सादर केला आहे, ज्यात मुख्य चिंता, आकांक्षा आणि सुधारणांचा उद्देश आहे ज्याचा उद्देश रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या परिस्थितीचे रक्षण करणे आणि त्यात सुधारणा करणे, ज्यामुळे सुरक्षित आणि कार्यक्षम रेल्वे नेटवर्क सुनिश्चित करणे. जुनी पेन्शन योजना (ओ पी एस) पुनर्संचयित करणे: ८ व्या वेतन आयोगाची निर्मिती:उत्पादकता लिंक्ड बोनस (पी एल बी) साठी कमाल मर्यादा काढून टाकणे:एम ए सी पी एस साठी सेवा पात्रता कालावधी १० वर्षांवरून ७ वर्षांपर्यंत कमी करणे.पाच वर्षांच्या पुनरावलोकनासह सेवानिवृत्तांसाठी वैद्यकीय भत्त्यात वाढ.अंदाधुंद आउटसोर्सिंगला विरोध करणे आणि सर्व सुरक्षा आणि गैर-सुरक्षा श्रेणीतील रिक्त पदे भरणे सुनिश्चित करणे. नवीन मालमत्ता, विद्युतीकरण प्रकल्प आणि गाड्यांचे विस्तारित ऑपरेशन यासाठी भरती.महिला कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण: कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, मासिक पाळीची रजा आणि चांगल्या बाल संगोपन सुविधांसाठी वचनबद्धता. बाल संगोपन रजा दरम्यान वेतन पूर्ण पुनर्संचयित.रनिंग स्टाफसाठी उत्तम वैशिष्ट्ये: जसे की ८ तास ड्युटी रोस्टरची अंमलबजावणी आणि विश्रांतीचा कालावधी वाढवला. क्रू लॉबी आणि रनिंग रूममध्ये राहण्याची उत्तम परिस्थिती व सुविधा देणे. करिअर विकासावर लक्ष केंद्रित करणे.वेळेवर पदोन्नतीसाठी नियमित जी डी सी इ आणि एल डी सी इ परीक्षा आयोजित करणे.विविध श्रेणींमध्ये वेतन संरचना सुधारण्यासाठी तरतुदी.रेल्वे वसाहती, क्वार्टर आणि वैद्यकीय सुविधा सुधारण्यासाठी पुरेसा निधी.कारखान्यांमधील यार्ड आणि कर्मचारी सुविधांमध्ये सुरक्षा-अपग्रेड करणे. सर्व सुरक्षा श्रेणीतील फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांसाठी जोखीम आणि त्रास भत्ते. पर्यवेक्षक, ट्रॅक मेंटेनर आणि फॅक्टरी कामगारांसाठी करिअरच्या प्रगतीसाठी आणि कामाच्या चांगल्या परिस्थितीसाठी तरतूद. चौकट लॉन्च इव्हेंटमध्ये बोलताना वेणू पी. नायर यांनी खाजगीकरण आणि आउटसोर्सिंगच्या वाढत्या आव्हानांवर प्रकाश टाकला आणि एकतेच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले, “आमचे कर्मचारी, आमचे रेल्वे उद्योग आणि आमचे हक्क सुरक्षित ठेवण्याची वेळ आली आहे.”  “एक उद्योग, एक युनियन” च्या माध्यमातून सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना एकसंध आवाज देणे, सन्मान, सुरक्षितता आणि समृद्धी सुनिश्चित करणे, ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे भारताच्या वाढीची जीवनरेखा असल्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

सामाजिक कार्यकर्ते रणवीर पाटील यांच्या सहकाऱ्यांना डायरी वाटप

नवी मुंबई : नवी मुंबई सानपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते, अनेक पुरस्कार विजेते व गार्डन ग्रुप ७ :‌५० समूहाचे खजिनदार श्री. रणवीर धनराज पाटील  यांनी २९ नोव्हेंबर  २०२४ रोजी गार्डन ग्रुप मधील आपल्या…