Month: January 2025

‘एसटीची भाडेवाढ दरवर्षी होणे गरजेचे’

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती ठाणे : गेल्या अनेक वर्षांपासून एसटीची भाडेवाढ झाली नव्हती ती भाडेवाढ गुरुवारी प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर करण्यात आली. याबैठकीत लोकप्रतिनिधींचा सहभाग नसल्यामुळे अद्याप माझ्याकडे एसटी भाडेवाढीची अधिकृत फाईल आलेली नाही. परंतू, १४.९७ टक्के भाडेवाढ करण्यात आली अशी माहिती परिवहन खात्याचे प्रधान सचिव यांच्याकडून मिळाली. एसटीची भाडेवाढ ही दरवर्षी होणे गरजेचे आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगतिले. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशन च्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंमेलनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः एसटीच्या जमीन विकासाच्या आराखड्याचे सादरीकरण केले. या कार्यक्रमा दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, एसटी महामंडळाला दररोज तीन कोटी तर, महिन्याला ९० कोटीचा तोटा सहन करावा लागतो आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भाडेवाढ शिवाय पर्याय नाही. मी प्रधान सचिवांना सांगितले आहे की, भाडेवाढ करत असताना वार्षिक गुणवत्तेवर आधारित भाडेवाढ करावी, असेही ते म्हणाले. तसेच येत्या १ फेब्रुवारी पासून टॅक्सी आणि रिक्षाची भाडेवाढ होणार असून टॅक्सी आणि रिक्षाचे प्रति किलो मीटर प्रमाणे तीन रुपयांनी वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील एसटी आगारांचा विकास होणार राज्यातील एसटी आगारांचा विकास होणे गरजेचे आहे. अनेक वर्षांपासून प्रवाशांची मागणी होती की, अत्याधुनिक बस स्थानक मिळावं तेथे विविध सोयी सुविधा असाव्यात यासाठी सरकारने सर्व एसटी आगारांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू, यासाठी राज्यशासनाकडे तेवढा निधी उपलब्ध नसल्याने हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर किंवा बीओपी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे, असे सरनाईक म्हणाले.

मिलिंदनगर येथे आरोग्य आणि रक्तदान शिबिराचे आयोजन

कल्याण : श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित -गौरीपाडा, कल्याण .प व स्फूर्ती फाउंडेशन संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी रोजी  सकाळी १० ते ५ वा. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, कौस्तुभ बिल्डिंगच्या बाजूला, श्रीराम कॉलनीच्या मागे, मिलिंदनगर येथे भव्य रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीर आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य शिबीर मध्ये नेत्र तपासणी, चॅरिटेबल दरात चष्मे, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, हृदय विकार उपचार,मोफत बॉल्स पेसमेकर सर्जरी, कॅन्सर सर्जरी, अॅजोप्लेस्टी, डायलेसिस, हाडांची सर्जरी, बायपास सर्जरी, किडनी स्टोन सर्जरी, मधुमेह, रक्तदाब, ईसीजी तपासणी करण्यात येणार आहे. नागरीकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा तसेच रक्तदान शिबीर मध्ये रक्तदान करून एखादा व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक रक्तदान नक्की करा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व स्फूर्ती फाउंडेशन वतीने करण्यात आले आहे.

ठाणे महानगरपालिकेत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

ठाणे : पंधराव्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे मतदान शपथ घेण्यात आली. त्याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, विधी अधिकारी मकरंद काळे, महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. यावेळी, भारत निवडणूक आयोगाने ‘मतदानासारखे दुसरे काही नाही, मी मतदान करणारच’ अशी संकल्पना निश्चित केली आहे. त्याची माहिती अधिकारी आणि कर्मचारी यांना देण्यात आली. त्यानंतर, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मतदान करण्याबाबतची शपथ घेतली.

७ कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबविण्याचे केडीएमसी आयुक्तांचे निर्देश

कल्याण  :  मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार १०० दिवसांमध्ये ७ कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबविण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी नियोजनबध्द कार्यवाही करून अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व अधिकारी वर्गास दिले…

ठाण्यातील समारोह बॅक्वेट्स येथे दि.25 जानेवारी रोजी

15 व्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन ठाणे :25 जानेवारी 2025 रोजी 15 वा राष्ट्रीय मतदार दिवस राज्यस्तर, जिल्हास्तर व मतदान केंद्र स्तरावर साजरा करावयाचा आहे. या 15 व्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी “Nothing like voting. I Vote for sure” हा विषय  आयोगाकडून देण्यात आला आहे. मा.भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार दि.25 जानेवारी 2025 हा कामकाजाचा दिवस नसल्याने दि.24 जानेवारी 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व कार्यालयामध्ये मतदान शपथ (मराठी, इंग्रजी व हिंदी मधील शपथेचा नमुना सोबत जोडला आहे) घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने ठाणे जिल्ह्याचा जिल्हास्तरीय कार्यक्रम दि.25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता समारोह बॅंक्वेट्स, तिसरा मजला, सी.के.पी. हॉल, एन.के.टी. कॉलेजच्या बाजूला, खारकर आळी, ठाणे पश्चिम येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे हे असतील तर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बित्तंबातमी वृत्तपत्राचे संपादक तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, ठाणे भूषण तथा सरस्वती विद्या प्रसारक ट्रस्ट, ठाणेच्या अध्यक्ष श्रीमती एम.एस. कोरडे, चित्रपट दिग्दर्शक नितीन कांबळे हे तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणेचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमात ठाणे जिल्हा को.ऑप.हौ.सो. फेडरेशनचे सिताराम राणे, अपंग विकास महासंघ, कल्याणचे अध्यक्ष अशोक भोईर, किन्नर अस्मिता नीता केणे व ठाणे सिटिझन्स फाऊंडेशनचे अध्यक्ष कॅस्बर ऑगस्टीन हे निवडणूक दूत म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये नवमतदारांना निवडणूक ओळखपत्राचे वाटप व उत्कृष्ट काम केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे. तरी या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमास दि.25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता समारोह बॅंक्वेट्स, तिसरा मजला, सी.के.पी. हॉल, एन.के.टी. कॉलेजच्या बाजूला, खारकर आळी, ठाणे पश्चिम येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी उर्मिला पाटील, 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी इब्राहिम चौधरी, 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी विठ्ठल इनामदार आणि 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी सर्जेराव मस्केपाटील यांनी केले आहे.

‘भारतीय ज्ञान परंपरोत्सव’ संकल्पनेवर ठाणे येथे ‘युवातरंग’ स्पर्धेचे जल्लोषपूर्ण आयोजन

ठाणे : कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या ‘युवातरंग’ आंतर महाविद्यालयीन स्पर्धेने विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला आणि कलागुणांना प्रोत्साहन दिले. या वर्षीच्या स्पर्धेची संकल्पना होती ‘भारतीय ज्ञान परंपरोत्सव,’ ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती, विज्ञान आणि परंपरांचा अभूतपूर्व वेध घेतला. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या विश्वस्त सौ. श्रद्धा मोरे, प्राचार्य संतोष गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना भारतीय परंपरेतील ज्ञानाचा वारसा आणि त्याचे आधुनिक जीवनातील महत्त्व यावर मार्गदर्शन केले. `युवातरंग’ स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. अशा उपक्रमांमुळे नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळते आणि त्यांचे व्यक्तिमत्व घडते, असे मत अध्यक्ष सचिन मोरे यांनी  मांडले. ‘युवातरंग’ अंतर्गत विविध सांस्कृतिक आणि बौद्धिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यात नृत्य, गायन, वक्तृत्व, पोस्टर तयार करणे, प्रश्नमंजूषा यांसारख्या एकूण सोळा स्पर्धांचा समावेश होता. यातील सांस्कृतिक नृत्य स्पर्धेत विविध राज्यांच्या पारंपरिक नृत्यप्रकारांद्वारे भारताच्या सांस्कृतिक वैविध्याला विद्यार्थ्यांनी वंदन केले. याशिवाय पोस्टर तयार करण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पर्यावरण, विज्ञान, आणि भारतीय परंपरांवर आधारित उत्तम कलाकृती सादर केल्या. सलग तीन दिवस सुरू असलेल्या स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा थाटामाटात पार पडला. या वर्षीचा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून डोंबिवलीचे प्रगती महाविद्यालय कर्मवीर चषकाचे मानकरी ठरले. त्यांना कर्मवीर चषक व रोख रक्कम रुपये ११,१११/- देऊन गौरविण्यात आले. स्पर्धांतील इतर विजेत्यांना प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभास पाहुणे म्हणून महादेव जगताप, संस्थेच्या विश्वस्त संगीता बी. मोरे, सौ. अश्विनी सुर्वे, सुधाकर शिंदे, अशोक पालांडे, विकास घांग्रेकर, संस्थेच्या शाळांचे मुख्याध्यापक सौ. शिवांगी भोसले, स्नेहा मेस्त्री, युगंधरा पाटील, व महाविद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रशांत काळुंद्रेकर, समीर दळवी, ओमकार चिक्षे,  सचिन गजमल, सतीश आगाशे, धनश्री राक्षे, प्रा. गुलाबराव काटे, प्रा. जयश्री बालुगडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संतोष गावडे यांनी केले तर प्रा. योगिता कुंभार यांनी सूत्रसंचाल व प्रा. हर्षदा राजपुरे यांनी आभार प्रदर्शन केले. भारतीय ज्ञान परंपरांचा गौरव आणि त्यांची आधुनिक जीवनाशी सांगड घालणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते आणि त्यांना त्यांच्या कलेच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करता येते, असे मत प्राचार्य संतोष गावडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केबीपी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी केलेल्या कष्टामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या कोअर टीमने संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. सांस्कृतिक विभागप्रमुख  प्रा. हर्षदा राजपुरे व  प्रा. प्रियांका लाड यांनी संपूर्ण कोअर टीमचे प्रमुख म्हणून काम पहिले. प्रा. मंदार टिल्लू यांनी सांस्कृतिक समितीस मार्गदर्शन केले. प्रा. योगिता कुंभार यांना महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५, प्रा. विजया राणे यांना वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच प्रा. हर्षदा राजपुरे व प्रा. काजल डाकरे यांना सी.एस. इन्स्टिट्यूटचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा महाविद्यालयाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. काजल डाकरे यांना तसेच भरीव योगदानाबद्दल क्रीडा संचालक डॉ. एकनाथ पवळे व ग्रंथपाल प्रा. अपर्णा साने यांना सन्मानित करण्यात आले. ‘युवातरंग २०२५’ च्या या यशस्वी अध्यायामुळे ठाण्यातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी परंपरा प्रस्थापित झाली आहे. युवातरंग २०२४-२५ विजेते १. मॉडेल मेकिंग – प्रथम क्र. – खुशाल पुरडकर (सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय) २. मेहेंदी – प्रथम क्र. – नंदिता गायकवाड (प्रगती महाविद्यालय) द्वितीय क्र. – भक्ती तळेकर (एनकेटीटी कॉलेज), तृतीय क्र. – निशा विश्वकर्मा (केबीपी महाविद्यालय), उत्तेजनार्थ – प्रिया चौहान (प्रगती महाविद्यालय), समिक्षा साळवी (VSM कॉलेज) ३. डिजिटल पोस्टर बनवणे – प्रथम क्र. – नम्रता पवार (प्रगती महाविद्यालय), द्वितीय क्र. – प्रिया सिंग (के.व्ही. पेंढारकर महाविद्यालय), तृतीय क्र. – शिवम तिवारी (के. व्ही. पेंढारकर महाविद्यालय), उत्तेजनार्थ – रेश्मा राठोड (ओ.डी.एम. कॉलेज) ४. श्लोक पठण – प्रथम क्र. – वैभवी पालव (जय हिंद कॉलेज), द्वितीय क्र. – नाझिया शेख (केबीपी महाविद्यालय), तृतीय क्र. – तेजस्विनी गवळी (प्रगती महाविद्यालय) ५. PPT सादरीकरण – प्रथम क्र. – नम्रता पवार (प्रगती महाविद्यालय), द्वितीय क्र. – शिवम तिवारी (के. व्ही. पेंढारकर महाविद्यालय), तृतीय क्र. – प्रवेश कुमार (ज्ञानसाधना महाविद्यालय), उत्तेजनार्थ – निशांत यादव (KBP महाविद्यालय), वैभवी पालव (जय हिंद कॉलेज)…

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त, मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त  संजय श्रीपतराव काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य ग्रंथदिंडी आणि ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

म्हाडा व पोलीस गृहनिर्माण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस वसाहतींचा पुनर्विकास

गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली माहिती मुंबई :मुंबई शहर व उपनगरातील पोलीस वसाहतींची दुरावस्था झाली असून त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी सुचना खासदार रविंद्र वायकर यांनी करताच, पोलीस गृहनिर्माण मंडळ व म्हाडा यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा पुनर्विकास करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी बैठकीत उपस्थिताना दिली. २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील गृह खात्याशी निगडीत प्रश्नान बाबत बैठक लावण्यात यावी असे पत्र खासदार रविंद्र वायकर यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना दिले होते. त्यानुसार आज एम.आय.डी.सी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पश्चिम उपनगराचे अतिरिक्त आयुक्त परमजीत दहिया, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, मितेश गट्टे, सह्यायक पोलीस आयुक्त विविध पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मनीषा वायकर, माजी नगरसेवक सदानंद परब, एकनाथ हुंडारे, आत्माराम चाचे, कमलेश राय, सुभाष सावंत, अभिजित सावंत, प्रतिभा खोपडे, चंद्रावती मौर्या, वृंदा मोघे, ज्ञानेश्वर सावंत, वैभव भराडकर, दीपिका तावडे, मनीष नायर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी नितीन पगारे, संदेश लोणारे, म्हाडाचे अधिकारी अनिकेत मोझे आदी विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. गृह निर्माण राज्यमंत्री असताना पोलिसांच्या वसाहतीबाबत तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याशी याप्रश्नी सविस्तर चर्चा झाली असून या प्रश्नी धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे खासदार रविंद्र यांची बैठकीत स्पष्ट करताच, पोलिसांच्या जेवढ्या वसाहती आहेत त्या एकत्र करून त्यांचा विकास करण्यात येणार आहे. पोलीस गृहनिर्माण मंडळ व म्हाडा यांच्या मार्फत पोलीस वसाहतींचा पुर्नार्विकास करण्याचे निश्चित झाले असून याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती योगेश कदम यांनी दिली. त्याचप्रमाणे जुनी पोलीस ठाणे जे मोडकळीस आले आहे (जसे आरे, मेघवाडी, जोगेश्वरी) तसेच अन्य पोलीस स्थानकाच्या दुरुस्तीचा अथवा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठवण्यात यावा. गृह विभागाकडे निधी प्राप्त झाला असल्याने ही कामे करण्यात येतील. अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. काल बाह्य गाड्या रस्त्याच्या कुठेही ठेवण्यात येतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. ही समस्या दूर करण्यासाठी मुंबईत परिवहन विभागातर्फे स्क्रॅपिंग सुविधा तयार करण्यात येत असून, वर्षभरात याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन कदम यांनी दिले. रस्त्यावरील अनधिकृत पार्किग, गॅरेजेस, फेरीवले, यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावे, अशा सुचना ही कदम यांनी संबंधित अधिकारी याना यावेळी दिल्या. मुंबईच्या तसेच मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील तक्षशीला, आरे, दुर्गानगर, जोगेश्वरी व अंधेरी गुंफा,  सात बंगला, कुरार आदी ज्या ज्या भागात ड्रग विक्री करण्यात येथे त्या सर्व ठिकाणी कडक कारवाई करण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळि दिल्या. वाहतुकीवर नियंत्रण करण्यासाठी आवश्यक तेथे सीसी कॅमेरा बसवण्यात यावा. विविध ठिकाणावरील सिंग्नलवरील भिकारी व तृतीयपंथी यांच्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, श्यामनगर येथे आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या पोलीस बीट चौकीचा म्हणावा तसा वापर करण्यात येत नसल्याने, या बीट चौकीवरील खोली महिला सक्षमी कारणासाठी वापरण्यात यावी अश्या मागण्याही वायकर यांनी या बैठकीत केल्या. या बीट चौकीवरील त्यांचा आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या या चौकीवरील त्यांचा नावाचा बोर्ड काढण्यात आल्याने वायकर यांनी नाराजी व्यक्त केली. जोगेश्वरी व आरे भुयारी मार्गाच्या कामासाठी आवश्यक परवानगी देण्यात यावी, गोरेगाव-(पूर्व) नेस्को सेंटर येथे प्रदर्शनावेळी येथे येणाऱ्या गाड्या रस्त्यावर उभ्या ठेवण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अनधिकृत बार यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वायकर यांनी यावेळी केली.

वाढत्या नागरीकरणामुळे पाण्याचा पुर्नवापर करण्यावर भर द्यावा लागणार –  सौरभ राव

ठाणे : शाश्वत नागरी विकासासाठी पाण्याचा पुनर्वापर करण्याचे नियोजन करून जल व्यवस्थापनाच्या क्षेत्रात ठाणे महानगरपालिकेने अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या आराखड्याची अंमलबजावणी कालबद्ध रीतीने करण्यात येणार आहे. वाढत्या नागरीकरणामुळे…