Month: January 2025

नवीन पनवेलमध्ये वेळेवर बस सोडण्यासाठी प्रवाशांचे आंदोलन   

पनवेल : प्रवाशांना असाच त्रास होत राहिला तर, यापुढेही असेच आंदोलन होत राहील व त्यास गंभीर स्वरूप येईपर्यंत प्रशासनाने वाट पाहू नये, बस संघटनेच्या सभासद या आंदोलनात सहभागी झाले होते.…

दोन वेळा गुलाब देणार; तिसऱ्यांदा थेट रिकामे हंडे फेकणार – मर्जिया पठाण

अनिल ठाणेकर ठाणे : पाण्यासाठी अनेकवेळा आंदोलने करूनही ठामपा प्रशासनाकडून मुंब्र्यावर अन्याय केला जात आहे. मुंब्रा – कौसाच्या वाट्याचे 17 लाख लिटर्स पाणी चोरले जात आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी ठामपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, आता आम्ही केवळ गुलाब दिले आहे. आणखी दोनवेळा गुलाब देऊ नंतर रिकामे हंडे फेकू, असा इशारा पठाण यांनी दिला. गेल्या अनेक दिवसांपासून मुंब्रा,  कौसा परिसरात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य आहे. पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा, यासाठी मुंब्रा परिसरातील नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली असून पालिकेकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. पाण्याचा पुरवठा नियमित होत नसल्याने नागरिकांना चक्क पाणी माफियांकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्या निषेधार्थ मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मर्जिया पठाण आणि सुमारे 25 ते 30 महिलांनी ठामपा आयुक्त सौरव राव यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंते विनोद पवार यांनी मर्जिया पठाण यांची भेट घेतली. पाणी वितरण व्यवस्थेच्या रिमोल्डींगचे काम अंतिम टप्प्यात असून ते पूर्ण झाल्यावर पाणी पुरवठा सुरळीत होईल,  असे आश्वासन पवार यांनी दिले. त्यावर मर्जिया पठाण या चांगल्याच संतापल्या. ठाणे पालिकेकडून वारंवार अशीच उत्तरे दिली जात आहेत. एकीकडे १७ लाख लिटर्स पाण्याची दररोज चोरी होत आहे. या चोरीमागे पाणी माफिया की व्हाॅल्वमॅन आहेत, याचा शोध पालिकेने घ्यायला हवा. पण, तो घेतला जात नाही. सामान्य नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत असताना पाणी माफिया गब्बर होत आहेत. आज हे शांततेत आंदोलन झाले आहे. पुन्हा दोन वेळा आम्ही ठामपा अधिकाऱ्यांना गुलाबाची फुले देऊ त्यानंतरही जर पाण्याची टंचाई संपली नाही तर रिकामे हंडे आणि कळश्या अधिकाऱ्यांना देऊ, असा इशारा मर्जिया पठाण यांनी दिला. 0000

विशाळगड परिसरातील सामान्य जीवन पूर्ववत करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पुढाकार

अनिल ठाणेकर विशाळगड आणि परिसरातील सामान्य जीवन पूर्ववत करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि समविचारी पक्ष व संघटना पुढे सरसावल्या आहेत. जुलै २०२४ मध्ये विशाळगड आणि परिसरात जाणिवपूर्वक घडवून आणलेल्या संघटित हिंसाचाराने या परिसरातील समाजजीवन उध्वस्त झाले आहे. या परिसरातील नागरिकांचा काहीही गुन्हा नसताना गेले सहा महिने त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने बहिष्कार टाकण्यात आला आहे. इतके महिने ते जणू कैदेची शिक्षा भोगत आहेत. सर्व जातिधर्माच्या नागरिकांना देण्यात येणारी ही शिक्षा त्वरित थांबवली पाहिजे. या शिक्षेतून सुटका करून घेण्यासाठी कित्येक निरपराध नागरिकांना वडिलोपार्जित घरदार सोडून जावे लागत आहे. दैनंदिन गरजा भागविणे दुरापास्त झाले आहे. शिवप्रेमी आणि भाविकांचे पर्यटन हे आणि एकमेव हेच या परिसरातील काही हजार नागरिकांच्या उपजीविकेचे साधन आहे. या नागरिकांची जीवन वाहिनी असलेल्या पर्यटनावर बंदी घालून स्वतः शासनानेच या भारतीय नागरिकांचा संविधानाने दिलेला जगण्याचा मूलभूत अधिकार काढून घेतला आहे. हा संविधानाने दिलेला अधिकार पुन्हा प्रस्थापित करण्याची पहिली पावले म्हणून शासनाने नागरिकांच्या खालील मागण्या त्वरित मान्य कराव्यात अशी मागणी माकप आणि समविचारी पक्ष, संघटना यांनी केली आहे. विलंब न करता विशाळगड पर्यटन सुरु करण्यात यावे. या परिसरातील दैनंदिन समाजजीवन पूर्ववत होण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत  विशाळगडावर साजऱ्या होणाऱ्या सर्व समाजांच्या सण समारंभ उत्सवांत सर्वांना सहभागीहोण्याची मुभा असावी. १२-१३-१४ जानेवारी रोजी येणाऱ्या वार्षिक उरुसात सर्व भाविकांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात यावी. या उरुसात जिल्ह्यातील खासदार, मंत्री आणि सर्व आमदारांनी सहभागी होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने खास प्रयत्न करण्यात यावेत. राज्य परिवहन महामंडळाची बससेवा पूर्ववत सुरु करावी. शालेय सहलींना त्वरित परवानगी देण्यात यावी. विशाळगडावर घालण्यात आलेली मांसाहार बंदी त्वरित उठवण्यात यावी.विशाळगड येथील प्राथमिक शाळेत सात इयतांसाठी फक्त तीन खोल्या आहेत. त्यातील एक खोली पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतली आहे. त्याऐवजी पोलीस प्रशासनाने वेगळी व्यवस्था करावी, अश्या मागण्या मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. 00000

ठाण्यात रविवारी वैश्य समाजबांधवांचा भव्य स्नेहमेळावा

ठाणे : वैश्य समाज बांधवांचा भव्य स्नेह मेळावा `लक्ष्य 2025′ रविवार, 12 जानेवारीला वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुपच्या प्रथम वर्धापनदिनाचे औचित्य साधून वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुप च्या वतीने आयोजित करण्यात आला…

अतिक्रमण विभागामार्फत कोपरखैरणे व वाशी विभागात निष्कासनाची कारवाई

नवी मुंबई : मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने कोपरखैरणे व वाशी विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभाग अंतर्गत 1)  वसीम अकबर अली खान, रूम नं. 23, सेक्टर-15, कोपरखैरणे, नवी मुंबई, व 2)  अंकुश नाना जगताप/ योगेश नाना जगताप, एस.एस. टाईप, रूम नं. 678, सेक्टर-15, कोपरखैरणे, नवी मुंबई. यांच्या बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. सदर बांधकामावर  तोडक कार्यवाही करण्यात आली. त्यापैकी  वसीम अकबर अली खान यांचेकडून अनधिकृत बांधकाम हटविणेपोटी दंडात्मक शुल्क रू.10,000/- पावती क्र.248395, दि.06/01/2025 अन्वये वसूल करण्यात आलेले आहे. सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त सुनिल काठोळे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत धोत्रे व  इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. तसेच सदर कारवाईसाठी 7 मजूर, इलेक्ट्रॉनिक हॅमर – 02, गॅस कटर – 01, पिकअप व्हॅन – 01 वापर करण्यात आले. ठाणे बेलापूर रोड कोपरखैरणे ब्रीज खालील 19 बेघर लोकांचे सामान जप्त करून डपिंग येथे जमा करण्यात आले. तसेच सेक्टर-19,20 व कोपरखैरणे गाव येथील शाळा परिसराच्या 100 मीटरच्या आत तंबाखू/पानविक्री/गुटखा विक्री करणा-या 03 टप-यांचे सामान जप्त करून डपिंग येथे जमा करण्यात आलेले आहे. या माहिमेकरीता वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोपरखैरणे, औदूंबर पाटील, त्यांचे विभागाकडील पोलिस उपस्थित होते. नवी  मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सी  विभाग वाशी अंतर्गत  अफताब जाकारीया जानवेकर व परवेज जाकारीया जानवेकर, युनिट क्र. एस.एस/3-227, सेक्टर- 02, वाशी, नवी मुंबई यांचे इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु होते. सदर अनधिकृत बांधकामास वाशी  विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 53 1(अ) अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हुन हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले असल्यामुळे दि. 12/12/2024 रोजी सदर अनधिकृत बांधकामावर वाशी विभागामार्फत तोडक मोहिमच आयोजन करुन करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम अंशत: निष्कासित करण्यात आले. तसेच संबंधितांनकडून रु.25,000/- दंड ही वसुल करण्यात आलेला आहे. तदनंतर संबंधितांनी पुन्हा काम सुरु ठेवल्यामुळे दि. 06/01/2025 रोजी सदर अनधिकृत बांधकामावर वाशी विभागामार्फत पुन्ह:श्च तोडक मोहिमच आयोजन करुन करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम अंशत: निष्कासित करण्यात आले. तसेच संबंधितांनकडून रु.10,000/- दंड ही वसुल करण्यात आलेला आहे.  या धडक मोहिमेसाठी सी विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त  सागर मोरे तसेच अतिक्रमण विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थ‍ित होते. या धडक मोहिमेसाठी एकूण 10 मजुर, 1 इलेक्ट्रिकल हॅमर, 1 गॅस कटर व पोकलन यांचा वापर करण्यात आला. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

शाहरुख खानची ‘मन्नत’ पूर्ण

  दोन मजले वाढवण्यास पर्यावरण विभागाची मंजुरी   मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यावर आणखी दोन मजले वाढणार आहेत. राज्याच्या पर्यावरण विभागाने नुकतीच याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बंगल्याच्या विस्तारिकरणाची शाहरुखची ‘मन्नत’ अखेर पूर्ण होणार आहे. बॉलिवूडचा स्टार असलेल्या शाहरुख खानचा वांद्रे येथील बंगला नेहमीच चर्चेत असतो. माउंट मेरी कडे जाणाऱ्या रस्त्यावरचा हा बंगला शाहरुखच्या चाहत्यासाठीही आकर्षणाचा विषय आहे. सध्या सहा मजल्यांचा असलेला हा बंगला आता लवकरच आणखी उंच होणार आहे. या बंगल्याच्या वर आणखी दोन मजले वाढण्यासाठी महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए) नुकतीच परवानगी दिली आहे. शाहरुखची पत्नी गौरी खान हिने या परवानगीकरिता संबंधित विभागाकडे अर्ज केला होता. वांद्रे पश्चिम येथील पालिकेच्या एच पश्चिम विभागाच्या अखत्यारीत येणारा मन्नत या बंगल्याचे आता आणखी विस्तारिकरण करून त्यात काही बदल करण्यात येणार आहेत. या सहा मजली बंगल्याला २००२ मध्ये आयओडी तसेच २००६ मध्यवं भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले आहे. त्यानंतर बंगल्यामध्ये तळघरात दोन मजले आणि जलतरण तलाव बांधण्यात आला व त्यालाही भोगवटा प्रमाणपत्र व सीआरझेड परवानगी मिळालेली आहे. ०००००

नवी पहाट

  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आणखी दीड वर्षांत देश नक्षलवादमुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी ते वारंवार नक्षलवादीग्रस्त भागातील मुख्यमंत्र्यांच्या आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर या…

रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंददायी निवृत्ती वेतन योजनेत १३ कर्मचार्यांचा सन्मान

ठाणे : जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान…

टिटवाळा येथे कॅन्सरविरोधात मॅरेथॉनमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची प्रमुख उपस्थिती कल्याण : कॅन्सरविरोधात जनजागृती करण्यासाठी आयोजित ‘रन फॉर फाईट अगेन्स्ट कॅन्सर’ मॅरेथॉन टिटवाळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. रेड स्वस्तिक सोसायटी, स्पर्श फाउंडेशन, स्पंदन…