Month: January 2025

‘ई-कॅबिनेट’ संदर्भात लवकरच निर्णय घेणार-मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : मंत्रिमंडळ समन्वय राखण्यासाठी १ प्लॅटफॉर्म तयार करण्याचे काम सुरू आहे. हळूहळू पेपर कॅबिनेट बंद करून ई कॅबिनेट प्रणाली राबवली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  प्रत्येकाला मंत्रालयात प्रवेश…

माहिती अधिकाराचा वापर अर्थातच भारतीय संविधानाची अंमलबजावणी !

रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्ष ११ महिने १७ दिवसात ३९५ कलमे व ९ परिशिष्ट्ये असणारी जगातील सर्वांत मोठे संविधान लिहिले आणि २६ जानेवारी १९५० पासून या देशात संविधान…

सायकल मोहिमेतून कॅन्सरविषयी जनजागृती आणि केशदान मोहीम

ठाणे : हिंदायान फाउंडेशनच्यावतीने दिल्ली – ठाणे – मुंबई – पुणे या मार्गे सायकल मोहीम आयोजित करण्यात आली असून या मोहिमेत हजारो सायकल प्रेमी सहभागी होणार आहेत.  यावर्षी या मोहिमेची थीम…

राज्य क्रीडा दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यात विविध क्रीडा उपक्रम राबविण्याचे आवाहन

ठाणे : ऑलिम्पिकमधील पहिले पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्म दिन 15 जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांनी…

मर्दानी स्पोर्ट्स राष्ट्रीय स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंचे शानदार यश

मुंबई : जळगाव येथे झालेल्या तिसऱ्या मर्दानी स्पोर्ट्स राष्ट्रीय स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना एकुण १७ पदकांची कमाई केली. त्यात १० सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कास्य पदकांचा समावेश…

असुरक्षित मुलांच्या परिवर्तनासाठी आशेचा  किरण

रमेश औताडे मुंबई : गेल्या  २९ वर्षांमध्ये ११ हजारहून  अधिक गरजू मुलांचे पालनपोषण करत त्यांना फक्त निवराच नाही तर ,  दर्जेदार शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या संधी देऊन त्यांच्या परिवर्तनासाठी आशेचा  किरण ठरलेल्या  संपर्क   या सामाजिक संस्थेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. असे  कौतुक  नुसी  चे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी केले. संपर्क संस्थेचे लोणावळ्यातील बाल ग्राम पाहून मी भारावून गेले. २९ वर्षापासून (सोशल ऍक्शन फॉर मॅनपॉवर क्रिएशन) SAMPARC  संपर्क   हि संस्था संपूर्ण भारतातील अनाथ, वंचित, आदिवासी आणि उपेक्षित मुलांसाठी काम करते. संपर्क चे संस्थापक आणि संचालक अमितकुमार बॅनर्जी यांच्यासोबत या भेटी दरम्यान दोन तास घालविण्याचा बहुमान मला मिळाला याचा मला आनंद आहे असे कांदळगावकर म्हणाले. संपर्क मधील पाच मुलींचे पुनर्वसन करून त्यांना स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यासाठी आम्ही नूसी NUSI च्या (नॅशनल युनियन ऑफ सीफेअरर्स ऑफ इंडिया) च्या माध्यमातून मदत करणार आहे. गोव्यातील प्रतिष्ठित   नुसी  मेरीटाईम अकादमी  मध्ये जी पी रेटिंग प्रशिक्षणासाठी संपर्क संस्थेच्या  पाच तरुणींची निवड केली असल्याचे कांदळगावकर यांनी यावेळी जाहीर केले. त्यांच्या  शिक्षणाचा प्रत्येकी दोन लाख रुपये खर्च   नुसी  संस्था करणार असून  नोकरीची शाश्वती देखील दिली आहे. आता सागरी क्षेत्रात अनेक करिअरच्या आशादायक संधी उपलब्ध झाल्या आहेत.  वंचित मुलांच्या यशस्वी करिअरसाठी दोन्ही संस्था एकत्रितपणे कसे कार्य करू शकतात याचे  हे चांगले उदाहरण आहे. अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली. 0000

करम फाऊंडेशन कडून गरीब,आणि विधवांना मदतीचा हात….

सलमान पठाण मुंबई : 2 जानेवरी रोजी माहीम येथे करम फाउंडेशन कडून गरीब आणि विधवा महिलांना मुफ्त राशन, गरीब मुलांना शाळेसाठी फीस, आजरी रुग्णांना औषधे व त्या साठी आर्थिक मदत , गरीब मुलीच्या लग्नासाठी लागणारे साहित्य व विविध योजनांचा लाभ देण्यात आला. करम फाऊंडेशन हे महाराष्ट्रातील अधिकृत संस्था असून यांच्यामार्फत माहीम विभागातील व तसेच मुंबई उपनगरातील गरीब आणि विधवा महिलांना गेल्या चार वर्षापासून विविध स्तरावर मदत करत आहे त्यांच्याकडून गरीब मुलींचे लग्नासाठी लागणारे साहित्य आजारी रुग्णांसाठी दवाखान्यामध्ये लागणारा खर्च व त्याचबरोबर गरिबांना राशन वाटप इत्यादी प्रकारचे काम वारंवार केले जात आहे या करम फाउंडेशनचे अध्यक्ष फारुख सय्यद यांच्यामार्फत हे काम केले जाते आत्तापर्यंत करम फाउंडेशन यांच्यामार्फत 5 हजारच्या वर कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात आली आहे त्याचबरोबर याच्याकडून 15 जोडप्यांचे लग्न लावण्यास मदत करण्यात आली आहे. कोव्हिड महामारीच्या काळात यांनी 1 हजारच्या च्या जवळपास रुग्णांना ऑक्सीजान पुरवठा केलेला आहे, त्याचबरोबर आत्तापर्यंत 400 गरीब आणि होतकरू शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय शैक्षणिक साहित्य व शालेय फी साठी मदत करण्यात आली आहे. करम फाउंडेशन कधीही हे बघत नाही की मदत घेणारी गरीब व्यक्ती हिंदू आहे की मुस्लिम आहे जातीय भेदभाव न करता करम फाउंडेशन मदत करते आणि पुढेही भविष्यात करत राहू असे आम्हाला करम फाउंडेशनचे अध्यक्ष सय्यद फारुख यांनी सांगितले ०००००

 ह्युमॅनिटी स्टील लाईव्हच्या मार्फत अनोखा थर्टी फर्स्ट साजरा

 गोरगरीब गरजूंना केले जेवण व ब्लँकेट वाटप   कल्याण :  ह्युमॅनिटी स्टील लाईव्ह च्या मार्फत तेजस सांगळे व त्यांचे सहकारी मुकुल सोनटक्के, आदित्य लासुरे, सुधीर शेट्टी, शुभम शुक्ला, श्रीराम अय्यर व अन्य सहकारी यांच्या मार्फत थर्टी फर्स्ट च्या पार्ट्या झुगारत गोरगरीब गरजूंना मोफत जेवण व ब्लँकेट वाटप करण्यात आले. हा उपक्रम गेले पंधरा वर्षे झाले करण्यात येत आहे.  सरत्या वर्षाला 2024 ला गुड बाय करत 2025 मध्ये वेलकम करत कोणत्यातरी गोरगरिबांचे एक दिवसाचा पोट भरून व त्यांच्या अंगावर वस्त्र देण्यात आले. आपल्याला देवाने अन्न वस्त्र निवारा या सर्व गोष्टी दिल्या आहेत. तरीही आपण आपल्यापासून वंचित असलेल्या लोकांना या सर्व गोष्टी पुरवाव्यात आणि पुढच्या वर्षी या उपक्रमाला कल्याणातल्या नागरिकांनी भरभरून  प्रतिसाद द्यावा अशी प्रतिक्रिया तेजस सांगळे यांनी दिली. ०००००

वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

नवी मुंबई : महानगरपालिकेमार्फत दरवर्षी 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिन नानाविध उपक्रम राबवून उत्साहाने साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला व मुलींकरिता…

काळा तलाव येथे शिवसेना फलकाचे अनावरण

कल्याण : कल्याण पश्चिमेतील  प्रभाग क्रमांक 28 काळा तलाव येथे मुख्य रस्त्यावर शिवसेनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. आमदार विश्वनाथ भोईर यांचे पुत्र तथा कल्याण जिल्हा युवासेना सचिव  वैभव भोईर यांच्या हस्ते व शिवसेना उपशहर प्रमुख माजी नगरसेवक मोहन उगले, महिला आघाडी शहर संघटक नेत्रा उगले, विभाग प्रमुख अनंता पगार, उपविभाग प्रमुख दिगंबर ठाणगे, स्वप्नील मोरे, शाखा प्रमुख धर्मेंद्र भदोरीया, नितीन कदम, रितेश पावले यांच्या उपस्थितीत श्रीराम नगर व शक्ती चौक बेतुरकर पाडा येथे शिवसेना फलकाचे अनावरण  करण्यात आले. तसेच सर्व शाखाप्रमुख, महिला आघाडी युवासेना, ज्येष्ठ नागरिक व शिवसैनिक यांच्या  उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडला. 0000