निसर्गाचा नियमच आहे, की कोणत्याही पुरूष किंवा स्त्रीशिवाय मूल जन्माला येऊ शकतच नाही; मात्र जर तुम्हाला असं सांगण्यात आलं, की या दोघांशिवाय मुलं जन्माला येऊ शकतात? तर कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही; परंतु आता ते शक्य आहे. कारण शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे, की पुढील दहा वर्षांमध्ये स्त्री आणि पुरुषांशिवाय मुलं जन्माला येऊ शकतात; मात्र ते पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी सिद्ध करण्यासाठी अजून संशोधन आणि चाचणी आवश्यक आहे.
ब्रिटनच्या ‌‘ह्युमन फर्टिलायझेशन अँड एम्ब्ब्रियोलॉजी अथॉरिटी‌’ने (एचएफईए) नुकताच एक अभूतपूर्व खुलासा केला आहे. त्यामुळे जगाला धक्का बसला आहे. जाणून घेऊया सविस्तर विज्ञानाचे निसर्गाला आव्हान?तुम्ही कधी अशा जगाची कल्पना केली आहे का? जिथे पुरुष किंवा स्त्रिया यांच्याशिवाय मुल जन्माला येऊ शकते? हे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटातील कथेसारखे वाटत असले, तरी विज्ञान ते प्रत्यक्षात आणण्याच्या मार्गावर आहे.
अंडी व शुक्राणूचे तंत्रज्ञान
ब्रिटनच्या ‌‘ह्युमन फर्टिलायझेशन अँड एम्ब्ब्रियोलॉजी अथॉरिटी‌’ने (एचएफईए) नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे जगाला धक्का बसला आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार, शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत अंडी आणि शुक्राणू वाढवण्याचे तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणण्याच्या अगदी जवळ आले आहेत. ‌‘इन विट्रो गेमेटस्‌‍?‌’ (आयव्हीजी) म्हणून ओळखले जाणारे हे तंत्रज्ञान भविष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकते.
काय आहे हे ‌‘आयव्हीजी‌’ तंत्रज्ञान?
‌‘आयव्हीजी‌’ हे एक तंत्र आहे. त्यात प्रयोगशाळेत मानवी अंडी आणि शुक्राणू तयार करण्यासाठी अनुवांशिकरित्या त्वचा किंवा स्टेम पेशींचे पुनर्प्रोग्रामिंग केले जातो. ‌‘एचएफईए‌’चे ‌‘सीईओ‌’ पीटर थॉम्पसन यांनी एका मीडिया स्टेटमेंटमध्ये या तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवी मूल निर्माण करण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, की या तंत्रज्ञानामुळे मानवी अंडी आणि शुक्राणूंची उपलब्धता लक्षणीयरीत्या वाढू शकते.
अनेक लोकांसाठी वरदान ठरणार?
शास्त्रज्ञांच्या मते, जर हे तंत्रज्ञान यशस्वी झाले, यासोबतच ते सुरक्षित, प्रभावी आणि सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह झाले, तर ते अनेक लोकांसाठी वरदान ठरू शकते. ज्या जोडप्यांना विविध कारणांमुळे मूल होऊ शकत नाही, त्यांना हे मदत करू शकते. शिवाय, समलिंगी जोडप्यांचे जैविक मूल जन्माला घालण्याचे स्वप्न पूर्ण करू शकते.
‌‘आयव्हीजी‌’तंत्रज्ञानाचे तोटे
शास्त्रज्ञांच्या मते, या अभूतपूर्व वैद्यकीय पद्धतीमुळे अनेक नैतिक जोखमींचा धोकाही निर्माण होऊ शकतो. आत्तापर्यंतच्या संशोधनातून असे समोर आले आहे, की या नवीन तंत्रज्ञानाला बाळंतपणाशी संबंधित कायद्यांमध्ये मान्यता नाही. हे नवीन तंत्रज्ञान यशस्वी झाल्यास नियमांमध्ये बदल करण्याची गरज भासणार आहे. याशिवाय या प्रक्रियेमुळे समाजातील कुटुंबाची पारंपरिक संकल्पना बदलणार का? असा प्रश्न उपस्थित होतो. यामुळे अनुवांशिक विकारांचा धोकादेखील वाढू शकतो. कारण प्रत्येकामध्ये काही दोषपूर्ण गुणसूत्रे असतात. साधारणपणे, यामुळे समस्या उद्भवत नाहीत, कारण आई आणि वडिलांकडून आपल्याला प्रत्येक गुणसूत्रांच्या दोन प्रती वारशाने मिळतात. ‌‘सोलो पेरेंटिंग‌’मध्ये, दोन्ही प्रती एकाच व्यक्तीकडून येतात. त्यामुळे अनुवांशिक समस्या अधिक संभवतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *