भिवंडी:  राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेच्या मानहानी प्रकरणी भिवंडी न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणी साठी लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी येत्या शनिवार २१ फेब्रुवारी रोजी भिवंडी न्यायालयात हजर होणार आहेत.२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकी काळात भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे आयोजित प्रचार सभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक या संघटनेचा हात असल्याचे विधान केले होते.त्याविरोधात  संघटनेचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात आर एस एस संघटनेची बदनामी झाल्याबद्दल भा.दं.सं.कलम ५०० प्रमाणे खाजगी फिर्याद दाखल केली होती.या प्रकरणात राहुल गांधी यांनी दिलेले जमीनदार माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाल्याने न्यायालयात नवीन जामीनदार सादर करण्यात येणार आहे.त्या साठी राहुल गांधी न्यायालयात येत असल्याची माहिती त्यांचे वकील अँड.नारायण अय्यर यांनी दिली आहे.या प्रकरणात राजेश कुंटे यांची सरतपासणी आणि उलटतपणी झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *