Author: bittambatami.com

शिवाजी महाराजांचे राज्य आजही आदर्शवत – प्रा. डॉ. काशिलिंग गावडे

शिवाजी महाराजांचे राज्य आजही आदर्शवत – प्रा. डॉ. काशिलिंग गावडे ठाणे : शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव केला नाही. सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे स्वराज्य हे केवळ एका जातीचे, घराण्याचे नव्हते तर ते जनसामान्यांचे राज्य होते असे मत प्रा. डॉ. काशीलिंग गावडे यांनी व्यक्त केले. ते पाडळी येथे अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सिद्धार्थ युवा फाउंडेशन व शेतकरी मोफत वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी पाडळी च्या सरपंच मीना कांबळे उपस्थित होत्या. गावडे पुढे म्हणाले की शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षाची गुलामगिरी नष्ट केली. त्यांनी रयतेत धैर्य, शौर्य व आत्मविश्वास निर्माण केला. त्यांच्या राज्यात शेतकरी, बारा बलुतेदार, स्थानिक उद्योगधंदे यांच्या हिताची भूमिका घेतली गेली. रयतेच्या भाजीच्या देटाला, स्त्रीच्या केसाला आणि प्रार्थना स्थळांना धक्का लागता कामा नये ही त्यांची भूमिका होती. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची ध्येयधोरणे ही आजही आदर्शवत आहेत अध्यक्षा मीना कांबळे म्हणाल्या की शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यात स्त्रियांचा केलेला आदर व रयतेची घेतलेली काळजी खूप महत्वपूर्ण आहे. या कार्यक्रमात मध्ये आदिती पाटील हिने शिवचरित्राविषयी प्रभावी भाषण केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता कांबळे यांनी केले. तर आभार मा.समाधान कांबळे व सूत्रसंचालन आणि संयोजन डॉ. सुनील पाटील यांनी केले. या शिवजयंतीसाठी पाडळी गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 शहापूरातील वन्यप्राण्यांचे अधिवास धोक्यात

शहापूरातील वन्यप्राण्यांचे अधिवास धोक्यात शेत, माळरानावर नीलगायींचे कळप वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी चिंताग्रस्त अविनाश उबाळे ठाणे:  शहापूर तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील बहुतांश जंगल हे समृद्धी महामार्ग व विविध धरण व रस्ते प्रकल्पांसाठी भुईसपाट झाले आहेत.काही वर्षांपासून प्रकल्पांसाठी प्रचंड जंगल तोड झाल्याने येथील दाट,हिरवीगर्द जंगल ही नामशेष झाली आहेत.परिणामी वन्यजीवांचे अधिवास आता धोक्यात सापडले आहेत. दुसरीकडे अन्न व पाण्याच्या शोधात मोठ्या प्रमाणावर वन्यजीव जंगल सोडून आता जंगला शेजारील गाव वस्त्यांकडे कुच करीत आहेत.अशाच प्रकारे जंगलातील नीलगायींचे कळप हे गाव वस्ती लगत माळरानावर स्थलांतरित झालेले दिसत आहेत.हे वन्यजीव नीलगायींचे तांडे शेतकऱ्यांच्या रोज नजरेस पडत आहेत.शिकार आणि पाण्याच्या शोधात भटकंती करत असलेल्या निलगायींचे कळप हे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करताना दिसत आहेत.निलगायी या भाजीपाला,व कडधान्य फस्त करीत आहेत.निलगायींच्या या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी कमालीचे चिंतेत सापडले आहेत.शहापूर तालुक्यातील प्रादेशिक विभागाच्या जंगलातील शेणवा मळेगाव,कुडशेत,मुसई बेडीसगाव,परटोली,उंब्रई,कानवे,चेरवली,आष्टा,आदिवासी,लवले,ठुणे,व किन्हवली परिसरातील शेत माळरानावर सध्या मोठ्या प्रमाणावर निलगायी आढळून येत आहेत.या निलगायी शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या रब्बी हंगामातील हरभरा,वाल,मटकी,इत्यादी कडधान्ये तसेच भेंडी,घोसाळी,शिरवळे,भोपळा,गवार,काकडी व पालेभाज्या यांची प्रचंड नासधूस करुन नुकसान करीत आहेत.यामुळे मोठे अर्थीक नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत.निलगायींची वाढती संख्या व त्यांचा उपद्रव पाहता रब्बी हंगामातील पिके घेण्याचे संकट शेतकऱ्यांनसमोर आता उभे राहिले आहे.यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.एकिकडे शेतकऱ्यांना पावसाळ्या मोसमात वादळीवाऱ्यासह होणारा पाऊस बेमोसमी होणाऱ्या अवकाळी पावसामुळे नुकसानाला दरवर्षी समोर तर जावे लागतेच परंतु आता हिवाळ्यातील रब्बी हंगामात निलगायींच्या शेत मळ्यातील वाढत्या उपद्रवामुळे अर्थीक नुकसानाला देखील तोंड द्यावे लागते आहे अशी एकंदरीत परिस्थिती दिसत आहे.या निलगायींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी अक्षरशःमेटाकुटीला आले आहेत.या नीलगायींच्या समस्येबाबत वन विभागाकडे स्थानिक शेतकरी रोज तक्रारी करीत आहेत.या निलगायींचा उपद्रव थांबविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना वनविभागाकडून होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.परंतु नीलगाय या वन्यजीव प्राणी असल्याने वनविभागाला याबाबत काहीएक करता येणार नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.नीलगायींचे कळप काही स्थलांतरित होताना भटकंतीत रस्त्यावर देखील येत आहेत.यावेळी रस्ता ओलांडून जाताना निलगायीला भरधाव वाहनांची धडक लागून यात नीलगायीचा अपघात झाल्याच्या घटना देखील येथे घडलेल्या आहेत.नीलगायींचे हे वाढते अपघात रोखण्यासाठी व नीलगायी संरक्षणासाठी वनविभागाकडून आता जनजागृती केली जात आहे.रस्त्यावर वाहनं सावकाश चालवावीत असे आवाहन करण्यासाठी नीलगाय अधिवास असलेल्या संरक्षित क्षेत्रात फलक लावण्यात आलेले आहेत.असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.एकिकडे जंगल भुईसपाट होत असल्याने वन्यप्राण्यांचे अस्तित्व संकटात सापडले आहे.तर दुसरीकडे अन्न आणि पाण्याच्या शोधात भटकत असलेल्या वन्यजीवांची वाताहत होताना दिसत आहे.असे हे विदारक चित्र येथे दिसत आहे. प्रतिक्रिया – नीलगायींच्या उपद्रवामुळे शेतीचे नुकसान झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होताच तातडीने घटनास्थळी पाहणी करुन रीतसर पंचनामा करून त्या शेतकऱ्याला वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळवून दिली जात आहे. संजय सावंत वनपाल, शेणवे वनपरिमंडळ,तालुका शहापूर प्रतिक्रिया – वाढत्या निलगायींच्या उपद्रवामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे.याकडे वनविभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. मनोहर खाडे शेतकरी

  अबुधाबीमध्ये ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंचा पराक्रम!

अबुधाबीमध्ये ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंचा पराक्रम! सूरज पी. एच. यांचे  आंतरराष्ट्रीय रौप्यपदक! दीप रांभिया आणि सोनाली मिलखेलकर यांना सुवर्ण पदक! अबुधाबी येथे ६ ते १५ फेब्रुवारी  दरम्यान अबुधाबी नॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे पार पडलेल्या प्रतिष्ठित ४८व्या आय.एस.सी अपेक्स यूएइ ओपन बॅडमिंटन एलिट चॅम्पिअनशिप २०२६ या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत भारताचा झेंडा उंचावला. विशेष उल्लेखनीय कामगिरी करत आयकर विभाग, मुंबई येथे कार्यरत असलेले आणि खेलो इंडिया योजनेअंतर्गत मान्यता प्राप्त ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीत प्रशिक्षण घेणारे सूरज पी. एच. यांनी पुरुष दुहेरी ३५+ गटात मोहम्मद रेहान यांच्यासह भारतासाठी रौप्यपदक पटकावले. अंतिम सामन्यात त्यांना माजी जागतिक क्रमांक ९ तसेच विद्यमान ३५+ पुरुष दुहेरी विश्वविजेते डॅनी बावा क्रिस्टनंता (सिंगापूर) आणि फर्नांडो कुर्नियावन (इंडोनेशिया) या जोडीविरुद्ध ११–१५, ९–१५ असा पराभव पत्करावा लागला. मात्र त्यांच्या लढाऊ आणि शिस्तबद्ध खेळामुळे भारताला अभिमानास्पद दुसरे स्थान मिळाले. या स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी एकूण ६ आंतरराष्ट्रीय पदके जिंकत ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपक्रमाची ताकद सिद्ध केली. पुरुष दुहेरी गटात दीप रांभिया यांनी उपांत्यपूर्व फेरीत यूएईच्या सरवनन कन्नन व अभीश वल्लाचीरा यांचा २१-१५, २१-१४ असा पराभव केला. उपांत्य फेरीत देव अय्यप्पन व धिरेन अय्यप्पन (यूएई) यांना २१-१३, २१-१९ असे नमवत अंतिम फेरी गाठली; मात्र अंतिम सामन्यात भारताच्या हरिहरन व ध्रुव रावत यांच्याकडून २१-११, २१-१३ असा पराभव स्वीकारावा लागला आणि रौप्यपदक पटकावले. मिश्र दुहेरी प्रकारात दीप रांभिया व सोनाली मिखेलकर यांनी उपांत्यपूर्व फेरीत यूएईच्या धिरेन अय्यप्पन व अलीना काथून यांचा १२-२१, २१-१८, २१-१४ असा पराभव करत शानदार पुनरागमन केले. उपांत्य फेरीत हरिहरन व ताबिया खान यांना २१-१८, २१-१५ असे नमवले. अंतिम सामन्यात यूएईच्या अँडी मारवान हम्झा व नुरानी रुतु अझ्झाह्रा या जोडीवर १८-२१, २१-१६, २१-१२ अशी मात करत सुवर्णपदक पटकावले. महिला दुहेरी प्रकारात सोनाली मिखेलकर व अनघा करंदीकर यांनी कांस्यपदकाची कमाई केली. एकूणच दीप रांभिया व सोनाली मिखेलकर – सुवर्णपदक (मिश्र दुहेरी), दीप रांभिया – रौप्यपदक (पुरुष दुहेरी), सोनाली मिखेलकर व अनघा करंदीकर – कांस्यपदक (महिला दुहेरी) आणि सूरज पी. एच. – रौप्यपदक (पुरुष दुहेरी ३5+) अशी २ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्य अशी एकूण ६ आंतरराष्ट्रीय पदके ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खात्यात जमा झाली. या सर्व यशामागे ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची भक्कम प्रशिक्षण व्यवस्था, प्रमुख प्रशिक्षक  श्रीकांत वाड यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व तसेच प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजिरनीस, राजीव गणपुले यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. ठाणे  महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त श्रीमती. मीनल पालांडे यांनी सदर खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले आहे.  विशेषतः सूरज पी. एच. यांच्या रौप्यपदकामुळे आणि एकूण ६ आंतरराष्ट्रीय पदकांमुळे ठाण्याचा क्रीडा ध्वज जागतिक व्यासपीठावर अभिमानाने फडकला आहे.

ठाणे महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा तहकूब

ठाणे महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा तहकूब सिद्धेश शिगवण ठाणे : ठाणे महापालिका निवडणूकीत नगरसेवक निवडणून आल्यानंतर आणि महापौर विराजमान झाल्यावर पहिलीच सर्वसाधारण सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. मात्र ही सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली.  अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाणे महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आल्याचे अधिकृत सांगण्यात आले. यावेळी सर्व पक्षाचे गटनेते, ज्येष्ठ नगरसेवकांनी अजित पवार यांना आदरांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे महापालिकेतील गटनेते पवन कदम यांनी अजित पवार यांच्या निधनाची घटना मनाला चटका लावून गेल्याचे म्हटले. तर, भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांनीही अजित पवार यांच्या कार्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गटनेते नजीब मुल्ला यांनी अजित पवार यांच्यासोबतचे अनेक किस्से मांडले. अजित पवार यांच्यासोबतची त्यांची शेवटची भेट कशी झाली, अजित पवार यांचे मिळालेले मार्गदर्शन, सकाळी उठून काम करण्याची त्यांची सवय याविषयी नजीब मुल्ला हे भाषण करताना भावूक झाले होते.तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अश्रफ शानू पठान यांनी अजित पवार यांच्या अपघातात कोणी दोषी आहे? अपघात कसा झाला? याची चौकशी करण्याचे आमचे निवेदन महापौरांनी सरकारला द्यावे अशी मागणी केली. तर एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांनीही आम्ही अजित पवार यांच्या कुटुंबासोबत असून प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी केली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक विकास रेपाळे, राम रेपाळे यांनीही अजित पवार यांच्यासोबत निवडणूकांमध्ये काम करताना आलेले अनुभव सांगितले. तसेच अनेक ज्येष्ठ नगरसेवकांनी त्यांच्या भावना यावेळी व्यक्त केल्या. ही सभा  अजित पवार यांना श्रद्धांजली देण्यासाठी तहकुब करण्यात आल्याचे सांगत लवकरच नवीन तारीख घोषित केली जाईल असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

 शिवजयंतीनिमित्त गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टचा सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमात सक्रिय सहभाग

शिवजयंतीनिमित्त गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टचा सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमात सक्रिय सहभाग मुंबई शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य पदयात्रा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनात गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट यांनी मोलाचा सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर व सांस्कृतिक कार्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या कार्यक्रमात गुरुकुल कृती फाउंडेशनचे संस्थापक  उमेश मूरकर तसेच त्यांच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण कार्यक्रमात नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन व समन्वयाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. पदयात्रा, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीत स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग लाभला. सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टने शिवजयंतीच्या निमित्ताने तरुण पिढीमध्ये इतिहासाची जाणीव व समाजभान निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे यावेळी दिसून आले. या कार्यक्रमास पद्मश्री पुरस्कार विजेते उदय देशपांडे (मल्लखांब प्रशिक्षक), आंचल गोयल (जिल्हाधिकारी, मुंबई शहर), बप्पासाहेब थोरात (अपर जिल्हाधिकारी, मुंबई शहर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथील प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई, अनिल घुगे, फुलचंद कराड, नेहा साप्ते, समृद्धी देवळेकर, निलेश गराटे, साहिल उतेकर उपस्थित होते. गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट तर्फे आंतरराष्ट्रीय खेळाडू व रेफ्री विघ्नेश मूरकर यांच्यासह विन्स पाटील, आशिष महाडिक, अश्विनी जांभळे, भूपेश वैती, सय्यद मोहमद, श्रेयांक मौर्य, शिवांक मौर्य, अथर्व काळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाचा सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे, नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक पटकावणारे खेळाडू सिद्धत गुप्ता यांची उपस्थिती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी पदयात्रा, मान्यवरांचे स्वागत, शिस्तबद्ध नियोजन व समन्वय यामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली. शिवजयंतीच्या निमित्ताने सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात तरुणाईला प्रेरणा देण्याचे कार्य ट्रस्टच्या माध्यमातून घडल्याचे यावेळी दिसून आले.

आज चारकोप येथे रंगणार ४थी आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धा

आज चारकोप येथे रंगणार ४थी आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धा मुंबई-आरंभ स्पोर्टस आणि मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने   २१ व २२ फेब्रुवारी मोरया मित्र मंडळ मैदान, चारकोप, कांदिवली (पश्चिम), येथे मल्लखांब स्पर्धा  आयोजित करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय स्पर्धेत…

 ६२ वी ‘संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ रविवारी गेटवे ऑफ इंडियावर

६२ वी ‘संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ रविवारी गेटवे ऑफ इंडियावर स्पर्धेचे उद्घाटन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील जलतरणपटू सज्ज मुंबई (क्री. प्र.) : अथांग अरबी समुद्राच्या निळ्याशार लाटांवर जलतरणपटूंच्या जिद्दीचा आणि साहसाचा थरार अनुभवण्याची वेळ आली असून, प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक ‘६२ वी संक रॉक ओशन स्विमॅथॉन २०२६’ रविवारी, २२ फेब्रुवारी रोजी दिमाखात पार पडणार आहे. मुंबईच्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया परिसरात रंगणाऱ्या या महास्पर्धेचे उद्घाटन मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर मा. रितू तावडे यांच्या हस्ते होणार आहे. जलतरणपटूंच्या जिद्दीला आणि समुद्राच्या लाटांना आव्हान देणारी ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा नसून धाडस, चिकाटी आणि कौशल्याचा उत्सव ठरणार आहे. गेटवे ऑफ इंडिया परिसरात होणाऱ्या या महास्पर्धेकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जलतरणप्रेमींचे लक्ष लागले असून, शेकडो खेळाडू समुद्राच्या लाटांवर आपले सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ऐतिहासिक परंपरेचा जलतरण महोत्सव : प्रतिष्ठित संस्थांच्या मान्यतेने स्पर्धेचे आयोजन ‘महाराष्ट्र स्टेट अमेच्युअर ॲक्वेटिक असोसिएशन’ (MSAAA) यांच्या वतीने हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या ऐतिहासिक स्पर्धेचे नियोजन असोसिएशनचे अध्यक्ष आनंद माने आणि सरचिटणीस राजेंद्र पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोरपणे करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी खेळाडूंनी रविवारी सकाळी ७:३० वाजता रिपोर्टिंग करणे आवश्यक असून, प्रत्यक्ष शर्यतीची सुरुवात साधारणपणे १०:३० ते ११:३० या वेळेत होणार आहे. सर्व सहभागी खेळाडूंना सकाळी ९:०० वाजता बोटीने प्रस्थान करणे अनिवार्य आहे. तीन अंतरांच्या आव्हानात्मक शर्यती विविध वयोगटांसाठी १ किमी, २ किमी आणि ५ किमी अंतरांचा थरार या सागरी स्पर्धेत जलतरणपटूंना त्यांच्या क्षमतेनुसार १ किमी, २ किमी आणि ५ किमी अशा तीन अंतरांच्या शर्यतींमध्ये सहभागी होता येणार आहे.…

 श्री माँ विद्यालयाने राखले वर्चस्व

१४वी ठाणे शहर मर्यादित आंतरशालेय ॲथलेटिक्स स्पर्धा श्री माँ विद्यालयाने राखले वर्चस्व ठाणे : श्री माँ विद्यालयाने ५१ गुणांची कमाई करत सिम्पथेसायझर स्पोर्ट्स क्लब आयोजित प्रल्हाद भांगले स्मृती १४ व्या ठाणे शहर मर्यादित आंतरशालेय ॲथलेटिक्स स्पर्धेत मुलांच्या गटाचे विजेतेपद संपादन केले. मुलींच्या गटात ५५ गुण नोंदवणाऱ्या ठाणे पोलिस स्कूल संघाने अव्वल स्थान मिळवले.  मावळी मंडळाच्या क्रीडांगणावर पार पडलेल्या स्पर्धेत विराज काटकर युग पाटील आणि विहान निकुंभने आपापल्या वयोगटात सुवर्णपदक जिंकले. तर मयांक भोकरे गोळा फेक स्पर्धेत विजेता ठरला. संक्षिप्त निकाल : मुले ८ वर्षे वयोगट – विराज कोटकर ( सुवर्ण – लांब उडी, २.९३ मिटर), मुले १० वर्षे वयोगट – विहान निकुंभ ( सुवर्ण – लांब उडी, ३.५९ मीटर, रौप्य – ६० मिटर धावणे, ९.६ सेकंद), मुले १२ वर्षे वयोगट – सुवर्ण – ४ X २५ मिटर रिले, १.३६.२ सेकंद, मुले १४ वर्षे वयोगट – युग पाटील ( सुवर्ण – लांब उडी, ४.९५ मिटर, सुवर्ण- ६० मिटर धावणे, ७.९ सेकंद), मयांक भोकरे ( सुवर्ण – गोळा फेक, ११.४६ मिटर, रौप्य – लांब उडी, ४.९२ मिटर), कैफ शेख ( रौप्य – ६० मिटर धावणे, ८.१ सेकंद, कांस्य- लांब उडी, ४.६८ मिटर), अश्विन केंद्रे ( रौप्य – गोळा फेक,९.८१ मिटर).  रिले ४X ५० मिटर – सुवर्ण, १.२४.९ सेकंद, रौप्य १.२९.५ सेकंद. मुली १४ वर्ष वयोगट – वैभवी पुजारी ( कांस्य – ६० मिटर धावणे, ८.९ सेकंद), रिले ४X ६० मिटर – रौप्य १.३३.०३ सेकंद.

आशियातील धारावी कोळीवाड्यात शिवजन्मोत्सव उत्साहात

आशियातील धारावी कोळीवाड्यात शिवजन्मोत्सव उत्साहात रमेश औताडे मुंबई : आशिया खंडात नावाजलेल्या धारावीतील कोळीवाडा परिसरात हिंदू धर्म रक्षक युवा हिंदुत्व संघटनेच्या वतीने शिवजन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कोळीवाडा होळी मैदान येथे कार्यक्रमाची सुरुवात झाली. गड-किल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेतील कार्यकर्त्यांचा प्रमुख सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे डबेवाले, शिवसेनेचे धारावी विधानसभा संघटक विठ्ठल पवार, शाखाप्रमुख किरण काळे, नवनिर्वाचित नगरसेवक जोसेफ कोळी, नगरसेविका अर्चना शिंदे, मनसेचे धारावी विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सोनावणे तसेच धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिटकर यांची विशेष उपस्थिती होती. कोळीवाडा येथून सुरू झालेली मिरवणूक संत कक्कया मार्ग, कामराज हायस्कूल ९० फीट रोड, संत रोहिदास मार्ग, धारावी मेन रोड मार्गे पुन्हा होळी मैदान येथे विसर्जित झाली. या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे अध्यक्ष कौशिक कोळी, समीर भोईटे यांनी केले. “कोणताही पक्ष नाही, एकच झेंडा तोही भगवा” हाच उद्देश होता.

 ‘मुंबई ड्रम डे २०२६’ची रंगीत तालीम; जागतिक दर्जाचे कलाकार एकत्र

‘मुंबई ड्रम डे २०२६’ची रंगीत तालीम; जागतिक दर्जाचे कलाकार एकत्र मुंबई : तालवाद्यप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या ‘मुंबई ड्रम डे २०२६’ या विशेष संगीत मैफिलीपूर्वी जागतिक दर्जाचे कलाकार मरीन ड्राइव्ह येथे रंगीत…