Category: क्रीडा

नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ डोंबिवली कल्याण यांच्यावतीने डोंबिवलीमध्ये भव्य कबड्डी स्पर्धेचा थरार

ठाणे- नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ (डोंबिवली – कल्याण) यांच्या विद्यमाने सुधागड तालुका स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन रविवार दि. 21 एप्रिल 2024 रोजी लोढा हेरिटेज मैदान, भोपर रोड,…

भारतीय पुरुषांचा अंतिम फेरीत ८५ धावांनी दारूण पराभव

कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेतील आज झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा दारूण पराभव करत इंग्लंड-एशिया कपावर नाव…

भारतीय पुरुष संघ अंतिम फेरीत श्रीलंकेविरुध्द खेळणार

इंग्लंड-आशिया इनडोअर क्रिकेट स्पर्धा कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेत भारताने साखळीतील शेवटचे दोन्ही सामने जिंकत अंतिम फेरी गाठली. इंग्लंडने साखळीत केलेल्या पहिल्या पराभवाची सव्याज परतफेड करताना अंतिम फेरीत रुबाबात प्रवेश केला. गुणतालिकेत  श्रीलंका प्रथम स्थानावर असून पाठोपाठ भारत सुध्दा दुसऱ्या स्थानावर असून इंग्लंड व सिंगापूर अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर असून अंतिम सामन्यातून बाहेर फेकले गेले आहेत. आज भारतीय संघाने  इंग्लंडच्या पहिल्या पराभवाची सव्याज पराभवाची परतफेड करत स्पर्धेत पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारत अंतिम फेरीत स्थान मिळवले. भारतीय संघ गुणी असून अंतिम फेरीत भारत चमकदार कामगिरीची नोंद करेल असे प्रशिक्षक जयेश साळगावकर यांनी स्पष्ट केले. आज झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १६ षटकात १०२ धावा करताना सामन्यावर सुरवातीपासूनच वर्चस्व राखले होते. या सामन्यात भारताच्या विजय गौडाने (१६ धावा, १ बळी), धनुष भास्कर (१९धावा १ बळी), आफ्रोज पाषा (१९ धावा व २ बळी), कार्थिक सुब्रमनियन (१८ धाव ) व दैविक राय १ बळी) यांनी जोरदार कामगिरी करताना इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. तर इंग्लंडच्या अनिश पटेल (१७ धावा), टॉम क्लार्क ( १३ धावा १ बळी) व कॉर्नर रॉफ (१० धावा व २ बळी) यांची कामगिरी चांगली झाली.

इंग्लंड-आशिया इनडोअर क्रिकेट स्पर्धा

भारतीय पुरुष संघाला पराभवाचा धक्का कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेत रंगत भरली जात असून काल भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला व भारत (२०.५ गुण) गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर फेकला गेला तर श्रीलंका (३५.५ गुण) व इंग्लंड (२१ गुण) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. या स्पर्धेत भारताला अजून एक सामना सिंगापूर विरुध्द खेळायचा असल्याने भारत अंतिम सामन्यात खेळताना दिसेल. इतर सर्व संघाचे साखळी सामने झाले असल्याने व त्यांना गुण वाढवण्याची कोणतीही संधी नाही. गुणतालीकेतील पहिले दोन संघ अंतिम सामना खेळातील. काल झालेल्या इंग्लंड विरुध्दच्या सामन्यात भारताचे खेळाडू प्रचंड दबावाखाली खेळताना दिसले. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १६ षटकात ७५ धावा केल्या तर प्रती उत्तरादाखल…

महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्या वतीने 2024-25चं वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यंदाच्या वर्षी ७० व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्र कॅरम असोसिएशन एका विशेष कॅरम स्पर्धेचे आयोजन  करणार असून या स्पर्धेचे पुरुष गटाचे पहिलं पारितोषिक ७०…

रोहित हीरो, हार्दिक झिरो

स्टंप व्हीजन स्वाती घोसाळकर मुंबई- वानखेडे स्टेडियमवरील आयपीएलच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा रोहीत शर्मा आज हिरो तर कॅप्टन हार्दीक झिरो ठरला. शेवटच्या षटकात बाँलिंग टाकण्याचा अट्टाहास कॅप्टन हार्दीकच्या अंगलटीस आला. चेन्नईने हार्दीकच्या…

इंग्लंड-एशिया इनडोअर क्रिकेट कप स्पर्धेला श्रीलंकेत सुरुवात

भारतीय पुरुष व पुरुष मास्टर्स संघाची घोषणा कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेवर स्पर्धा संचालक म्हणून हिरान डी मेल यांची निवड झाली आहे. हि स्पर्धा इनडोअर अरीना, ऑस्टेशिया स्पोर्ट्स क्लब, थलावाथुगोडा, कोलंबो, श्रीलंका येथे सुरु झाली आहे. या स्पर्धेत यजमान श्रीलंकेसह, भारत, सिंगापूर असे तीन आशियायी देश व इंग्लंड सहभागी झाले आहेत. हि स्पर्धा १८ एप्रिल रोजी या स्पर्धेतील अंतिम सामने खेळवले जातील. भारतीय पुरुष संघाच्या कर्णधारपदी धनुष भास्करची तर उप कर्णधारपदी दैविक रायची (दोघेही कर्नाटक) वर्णी लागली आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी मुंबई, महाराष्ट्राच्या जयेश साळगावकरची निवड झाली आहे. जयेश साळगावकर याआधी सिंगापूरकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळाडू म्हणून चमकदार कामगिरी केली आहे. या संघातील इतर खेळाडू पुढील प्रमाणे आहेत. विजय गौडा, सुरज रेड्डी, अफरोज पाशा, कार्तिक सुब्रमनिअयन, एम. मल्लिकार्जुन, वैभव गुरुदत्त, अमरसिंग वर्मा, आशिक ख्रिस्त्य, जश जोशी व अधिराज जोहरी. हे सर्व खेळाडू या स्पर्धेसाठी झालेल्या वेगवेगळ्या निवड चाचणी स्पर्धांमधून निवड केले आहेत. पुरुष मास्टर्स गटाच्या (४०+) भारतीय संघाच्या कर्णधारपदी प्रसन्ना कुमार (कर्नाटक) तर उप कर्णधारपदी प्रशांत कारीया (महाराष्ट्र) यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई येथील प्रशांत कारीयाच्या रूपाने महाराष्ट्राला प्रथमच भारताचे उपकर्णधार पद वाट्याला आले आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी प्रकाश राठोड यांची निवड केली आहे. या संघातील इतर खेळाडू पुढील प्रमाणे आहेत. नरेश खुराना, प्रो. चिरंथना नंजप्पा, अंशुल शर्मा, अभिषेक वेस्ली, केशव रेड्डी, समीर शाह, राकेश चव्हाण, गौरव कांबळी, झुबीन हकीम, डॉ. सुनील मूर्थी यांची निवड करण्यात आली आहे. या भारतीय संघाची घोषणा इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेश (IISF) चे  अध्यक्ष अजय नाईक व सचिव मिलिंद पुंजा यांनी केली.

दिलीप वेंगसरकर माझे हिरो आणि आदर्श – डॉ. शैलेश श्रीखंडे

मुंबई : दिलीप वेंगसरकर हे माझे हिरो आणि आदर्श आहेत असे प्रतिपादन विख्यात कॅन्सर सर्जन आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक शैलेश श्रीखंडे यांनी केले. ड्रीम ११ कप या १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.  ओव्हल मैदानातील ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर ड्रीम ११ कप या १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास येऊ शकाल का असा वेंगसरका यांचा मला फोन आला आणि मी तात्काळ त्यांना हो म्हणून सांगितले. मी देखील आय.ई.एस. स्कुल साठी लहान असताना शालेय क्रिकेट स्पर्धेत खेळलो असल्याने आणि दिलीप वेंगसरकर या व्यक्ती बद्दल प्रचंड आदर असल्याने मी येथे आलो. क्रिकेट मधील आपल्या अप्रतिम कारकिर्दी नंतर या व्यक्तीने युवा क्रिकेटपटूनसाठी जे अप्रतिम कार्य केले आहे त्याला खरोखरच तोड नाही. त्यामुळेच दोन  शस्त्रक्रिया मध्ये थोडा वेळ काढून मी आज यथे आलो आहे. क्रिकेट खेळायला मैदानात उतरल्यानंतर खेळपट्टी, वातावरण या साऱ्याना दोष न देता प्रत्येक वेळी आपली सर्वोत्तम खेळी करायला हवी कारण हीच गोष्ट आपल्या उर्वरित आयुष्यात देखील उपयोगी ठरते. आम्ही आज देखील प्रत्येक शस्त्रक्रिया करताना आपले सर्व ज्ञान पणाला लावतो तेव्हांच त्या यशस्वी होतात असे श्रीखंडे यांनी सांगितले.  वेंगसरकर यांनी देखील यावेळी  बोलताना आपल्या फलंदाजीने संघाला विजय मिळवून देणाऱ्या हर्ष गायकर आणि आयुष शिंदे यांनी शेवटपर्यंत नाबाद राहिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. जेव्हां एखाद्या फलंदाजांचा जम बसतो त्यावेळी आपली विकेट फेकून परतण्यापेक्षा संघाला विजयी करून परतणे हेच महत्वाचे असते असे त्यांनी सांगितले. या स्पर्धेत ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीने क्रिकेट मंत्रा अकादमी संघावर ८ विकेट्सनी मात करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.  विजेत्यांना डॉ. श्रीखंडे आणि भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट मंत्रा अकादमी संघाने निर्धारित ३५ षटकांत ५ बाद १८३ धावांचे लक्ष्य उभारले. ४ बाद ७१ वरून आयुध मोहंती (नाबाद ४५) आणि वंश चुंबळे (५०) या जोडीने पाचव्या विकेटसाठी ८९ धावांची भागी रचली.  आलेख सिंग याने ४१ धावांत २ बळी मिळविले. या आव्हानाचा पाठलाग करताना ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या यश जगताप (२६) आणि अस्मित झा (३७) या सलामीच्या जोडीने ६२ धावांची सलामी दिली. हे दोघे बाद झाल्यानंतर आयुष शिंदे (नाबाद ५१) आणि हर्ष गायकर (नाबाद ६०) या जोडीने जबरदस्त फटकेबाजी करीत केवळ १३ षटकांतच १०७ धावांची अभेद्य भागीदारी करून २८ षटकांतच संघाचा विजय साजरा केला. हर्ष गायकर याने केवळ ३२ चेंडूत ११ चौकारांसह नाबाद ६० तर आयुष शिंदे याने ५५ चेंडूत ५ चौकारांसह नाबाद ५१ धावा केल्या.  अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून हर्ष गायकर याची निवड करण्यात आली. संक्षिप्त धावफलक –  क्रिकेट  मंत्रा अकादमी – ३५ षटकांत ५ बाद १८३ (श्रीहन हरिदास २२, समृद्ध भट २०, आयुध मोहंती  नाबाद ४५, वंश  चुंबळे ५०; आलेख सिंग ४१ धावांत  २ बळी ) पराभूत विरुद्ध ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी – २८ षटकांत २ बाद १८४ (यश जगताप २६, अस्मित झा ३७, आयुष शिंदे नाबाद ५१, हर्ष गायकर नाबाद ६०).

अखेर ‘सूर्या’ तळपला..

स्वाती घोसाळकर मुंबई : वानखेडेवर कालनिर्णयच्या पंचागाप्रमाणे ६.५५ मिनिटांनी सुर्यास्त झाल्यावर कॅप्टन हार्दिक पांड्या नाणेफेकीसाठी उतरला खरा पण त्यानंतर रात्रीच्या अंधारात मुंबईचा सूर्य अखेर तळपळा. वानखेडेवर झालेल्या मुंबई इंडियन्स आणि आरसीबी विरुद्धच्या…

अखेर विजयाची गुढी उभारली

स्वाती घोसाळकर गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी अखेर मुंबई इंडियन्सने विजयाची गुढी उभारली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना मुंबई इंडियन्सने या मौसमतला आपला पहिला विजय नोंदवला. याचबरोबर कर्णधार हार्दिक पंड्यानेही सुटकेचा निश्वास सोडला.…