Category: Blog

Your blog category

ग्रामीण भागातील आगळी-वेगळी दिवाळी

  खर्डी : दीपावली म्हणजे आनंदाची उधळण, फराळाची मेजवानी, फाटक्यांची आतषबाजी, दिव्यांची आरास, रांगोळीची सजावट, विद्युत दीपमाळा व आकाश कंदिलांची घराघरांवर केलेली रोषणाई असे चित्र असते; मात्र शहापूरसारख्या ग्रामीण भागात वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. दीपावली, बलीप्रतिपदा व पाडवा या दिवशी उंबरखांड, दहिगाव, अजनूप, शिरोळ, टेंभा, दळखण, बेलवड व बीरवाडीसह ग्रामीण भागातील शेतकरी सकाळी जनावरांचा गोठा शेणाने सारवतात. त्यानंतर जनावरांना आंघोळ घातली जाते. त्यांना रंगवले जाते. तसेच, फुग्यांनी सजवून गावच्या वेशीवर नेतात. त्यानंतर तेथे पेंढा किंवा गवत पेटवून त्यावरून या जनावरांना उड्या मारायला लावतात. दिवाळीच्या दिवशी जनावरांना अग्निवरून उडी मारायला लावल्यास त्यांना कोणतेच आजार होत नाहीत, अशी ग्रामस्थांची श्रद्धा असल्याचे शेतकरी कैलास म्हसकर सांगतात. दारासमोर रांगोळी काढून त्यावर गुरांच्या शेणाचे पाच पूंजक ठेवतात. त्यावर झेंडुची फूले ठेवली जातात. नंतर हे पूंजक सुकल्यावर शेतात सर्वत्र टाकतात. त्यामुळे शेतात चांगले पीक येते, असे शेतकरी सदानंद घरत, नितीन सांडे व सखुबाई हिलम यांनी सांगितले. खर्डीतील काही संस्था खेड्यापाड्यातील आदिवासी बांधवाच्या घरोघरी जाऊन फराळ व मिठाईचे वाटप करतात. पाडव्याच्या दिवशी नागरिक एकमेकांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देतात. अशाप्रकारे पूर्वापार चालत आलेली परंपरा आजही ग्रामीण परिसरात सुरू आहे. दिवाळी हा सण साजरा करण्यासाठी सर्व कुटुंबे एकत्रित येतात. विशेषतः ग्रामीण भागात दिवाळी उत्साहाने साजरी केली जाते. शेणाच्या गवळणी, पेंद्या तयार करून त्याची पूजा केली जाते. ज्यांच्याकडे जनावरे नाहीत, ते मातीच्या गवळणी आणि पेंद्या तयार करतात. काही गावांमध्ये या काळात जनावरांचे पूजन केले जाते. त्याचबरोबर नरक चतुर्दशीच्या दिवशी भाऊबीज साजरी करण्याची पद्धत आहे. झेंडूच्या फुलांचे तोरण घरांना पिवळ्या आणि नारंगी झेंडूच्या फुलांचे तोरण लागलेले पाहायला मिळते. अवघं घर फुलांनी सजवले जाते. ग्रामीण भागातील फराळात सहसा चिवड्याचे विविध प्रकार, पारंपरिक रव्याचे लाडू, करंजी, चकल्या, अनारसे व शेव असे विविध चविष्ट पदार्थ बनवले जातात. ते मित्र परिवारात वाटून आनंद द्विगुणित केला जातो. फटाक्यांची आतषबाजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मातीच्या कुंड्या विकत आणल्या जातात. त्या घरी बनवून त्यात बत्ताशे टाकतात. त्यावर दिवा लावला जातो. याची शेतकरी मनोभावे पूजा करतात. घरातील मौल्यवान वस्तू, वाहन, अवजारे याचीही पूजा केली जाते. या दिवशी मोठ्या प्रमाणावर आतषबाजी केली जाते. शाळकरी मुले ही किल्ला बनवण्यात व्यस्त असतात. पाडव्याच्या दिवशी पती-पत्नी जोडीने बसून पूजा करतात. पत्नी- पतीला ओवाळते, तेव्हा पत्नीला दिवाळी भेटवस्तू देण्याची प्रथा आहे.  

  युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करतांना माजी आमदार परशुराम उपरकर

अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी पुरावे सादर करा –  किशन जावळे

अशोक गायकवाड रायअशोक गायकवाडगड :उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार पनवेल तालुक्यातील मौजे वळवली, येथील स. नं.४९/०, या जमिन मिळकतींवरील अतिक्रमणे नियमानुकूल करणेच्या अनुषंगाने सर्व अतिक्रमणदार यांची कागदपत्रे व पुरावे तसेच या संदर्भात…

सोयगाव पोलीस ठाण्यासमोर तीन तास ठिय्या व घोषणा बाजी

सोयगाव;-शहरात सोशल मीडियावर एकाने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या बद्दल अपशब्द वापरून कमेंट केल्याने शहरातील मराठा सेवकांचा तीनशे ये चारशे जणांचा जमाव सायंकाळी सात वाजता पोलीस ठाण्यासमोर येऊन रात्री…

जिल्ह्यात १ नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश – चंद्रकांत सूर्यवंशी

अशोक गायकवाड रत्नागिरी :जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी १८ ऑक्टोबरला १ वाजल्यापासून ते १ नोव्हेंबरला रात्री १२ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक…

heading- राज्यपालांच्या हस्ते जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न

सौरऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने, बायोएनर्जी क्षेत्रांत राज्य आघाडीवर : राज्यपाल सी पी राधाकृष्णन अशोक गायकवाड मुंबई :’शाश्वत विकासासाठी हरित व नवीनीकरणीय ऊर्जा’ या विषयावर जागतिक व्यापार केंद्र मुंबईतर्फे आयोजित पाचव्या जागतिक…

‘वाचन प्रेरणा दिन’ निमित्त कोकण भवनात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन

  नवी मुंबई : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त पुस्तक प्रदर्शनाचे  उद्घाटन कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांच्या हस्ते आज करण्यात आले. कोकण विभागाचे मराठी भाषा…

माथेरान मधील मुख्य रस्त्यांची बत्ती गुल

माथेरान : पर्यटन नगरी माथेरान मधील मुख्य रस्त्यावर अनेक दिवसांपासून बत्तीगुल असल्याने पर्यटकांना आणि नागरिकांना अंधारातून चाचपडत मार्गक्रमण करावे लागत आहे. संबंधीत ठेकेदार याबाबत काहीही ठोस उपाययोजना करत नसून केवळ आपली कामांची बिले वसुलीसाठी केव्हातरी येऊन हजेरी लावत असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे. त्याचप्रमाणे गावातील गल्लीबोळात सुध्दा हीच परिस्थिती असल्याने काळोखातून अपंग व्यक्तींना पायी चालत जाणे खूपच त्रासदायक बनलेले आहे. अनेकदा याबाबत सोशल मीडियावर काहींनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्याकडे संबंधित खात्याने दुर्लक्षच केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. माथेरान हे पर्यटनस्थळ असल्यामुळे रात्री अपरात्री केव्हाही पर्यटक येत असतात. दस्तुरी पासून गावांपर्यंत क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते असल्याने चालत येणे सोयीचे ठरते. परंतु या मुख्य रस्त्यावर नेहमीच बत्ती गुल असते. काही दिवसांपूर्वी मुख्य बाजारपेठ येथील मुन्ना पानवाले यांच्या दुकानात चोरीची घटना घडली होती. असे प्रकार आगामी काळात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.रहदारीच्या रस्त्यावर सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या पर्यटकांना रात्रीच्या वेळी खरेदी करणे कठीण होते. त्यामुळे काहीही खरेदी न करता ते आपल्या हॉटेलमध्ये जातात याचा परिणाम इथल्या व्यापारी वर्गावर, लहानमोठ्या स्टोल्स धारकांवर होत असतो. याकामी संबंधित खात्याने या समस्या मार्गी लावण्यासाठी युद्धपातळीवर कामे करावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

उद्धव ठाकरें ठणठणीत !

 आदित्य ठाकरेंनी दिली माहिती मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत असून लवकरच ते प्रचारात सहभागी होतील अशी माहीती आदित्य ठाकरे यांनी दिली. उद्धव ठाकरे सोमवारी नियमित तपासणीसाठी मुंबईतील…

पॅरिस ऑलिम्पिक मेडल विजेत्यांचा राज्य सरकारातर्फे अखेर सत्कार !

मुंबई : यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक मधिल ब्राँझ मेडल विजेत्या स्वप्नील कुसळे आणि पॅराऑलिम्पिकममधिल सिल्व्हर मेडल विजेत्या सचिन खिलारी यांच्यासहीत आंतरराष्ट्रीय पातळीवर मेडल जिंकणाऱ्या महाराष्ट्राचा खेळाडूंचा राज्य सरकारतर्फे रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात…