Category: होम

उन्हाने मुंबईकरांचा घामटा काढला

मुंबई : अजून मे महिना दुर असला तरी एप्रिल महिन्यात उन्हाने मुंबईकरांचा घामटा काढला आहे. मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून दुपारनंतर बाहेर फिरताना नागरिकांना घामाच्या धारा लागत आहेत. वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत…

मोदींना देश तोडायचा आहे – ॲड. प्रकाश आंबेडकर

रमेश औताडे  मुंबई : राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे प्रतीक आहेत, असे मी मानतो. ही प्रतिके नरेंद्र मोदी संपवायला निघाले आहेत. मोदींना देश तोडायचा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…

मविआने भाजपसोबत वीस जागा फिक्स केल्या- आंबेडकर  

चंद्रपूर : महाविकास आघाडीने भाजपसोबत लोकसभेच्या २० जागा फिक्स केल्याचा गंभीर आरोप वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. कल्याण, बीड, बुलढाणा अशा काही मतदारसंघातील जागांची नावे घेत या जागा फिक्स केल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. चंद्रपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर…

असली नकलीचा फैसला आता जनताच करेल – जयंत पाटील

नागपूर : महाराष्ट्र मध्ये दोन पक्ष फोडले तरी देखील प्रतिसाद मिळत नाही. म्हणून नकली आणि असलीचा लोकांमध्ये संभ्रम तयार करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्या विरोधातच यंदाचा निकाल असेल, मायबाप…

बोगस डिग्री ते नकली शिवसेना

उद्धव ठाकरेंकडून मोदींचा हिशेब चुकता पालघर :  शिवसेनाला नकली म्हणता ती काय तुमची बोगस डिग्री आहे का? माझ्या मर्दमराठा मावळ्यांच्या घामातून उभी राहीलेली शंभरनंबरी असली शिवसेना आहे. नकलीचा सोस तुम्हाला , तुमची डीग्री…

ईडीच्या अतिरेकावरून महायुतीत धुसफूस

स्वाती घोसाळकर ‘ ४०० पार कशाला हवेतर संसदेचा ताबा घ्या पण विरोधकांना सन्मान द्या, जनतेचा मोदींना पाठींबा असताना ईडीचा उपद्रव टाळला पाहिजे’ – गजानन कीर्तिकर ‘किर्तिकरांचे शरीर एकनाथ शिंदेसोबत तर आत्मा ठाकरेंसोबत…

सांडपाणी वाहिन्या फुटल्याने सगळीकडे दुर्गंधी

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर डोंबिवली : एमआयडीसी निवासी मधील सांडपाणी वाहिन्या आणि त्यावरील चेंबर्स जागोजागी फुटल्याने त्यातील लाखो लिटर सांडपाणी रोज उघड्या नाल्यात आणि पावसाळी गटारात जात असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अस्वच्छता, रोगराई, डासांचे वाढते प्रमाण हे या सांडपाणी उघड्यावर वाहण्याचे दुष्परिणाम होत असून एमआयडीसी आणि केडीएमसी यातून काहीच बोध घेतला नसल्याची टीका रहिवासी करत आहेत. एमआयडीसी निवासी मधील या सांडपाणी वाहिन्या चाळीस वर्षांपेक्षा अधिक जुन्या झाल्याने त्या बदलण्याचे काम एमआयडीसी कडून आता काँक्रिट रस्ते झाल्यावर उशिरा सुरू झाले आहे. परंतु हेही काम अत्यंत कूर्मगतीने सुरू असल्याचे दिसत आहे. सदर या जुन्या वाहिन्या फुटल्यावर सद्या एमआयडीसी कडून कोणतीही दुरुस्ती केली जात नाही. कारण सांगितले जात आहे की आता नवीन सांडपाणी वाहिन्यांचे काम चालू असल्याने त्या जुन्या वाहिन्या काही दिवसातच बाद होणार आहेत. पण हे काम पूर्ण होण्यास कमीतकमी अजून एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत येथील नागरिकांनी या उघड्यावर बाहेर पडणाऱ्या सांडपाणी वाहिन्यांचे दुष्परिणाम भोगायचे का ? असा सवाल दक्ष नागरिक, रहिवासी संघटनेचे सचिव राजू नलावडे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, मनपाकडून कीटकनाशक फवारणी आणि धूरिकरण हेही कित्येक दिवसात केले गेले नाही. निवासी मधील सोमेश्वर पार्क सोसायटी जवळ ( आरएक्स १/१), कावेरी चौक परिसर आणि मिलापनगर तलाव रोडवर इत्यादी अनेक ठिकाणी सांडपाणी वाहिन्या फुटून ते सांडपाणी उघड्या गटारात वाहत असल्याच्या तक्रारी एमआयडीसी कडे करूनही त्याची दखल घेतली जात नाही आहे. त्यात सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी हे सद्या लोकसभा निवडणुकीत प्रचारात मश्गूल असल्याने त्यांना हा महत्त्वाचा प्रश्न दिसत नाही आहे असे वाटते. मतदार जनताही चुपचाप हे सहन करीत आहे. येथील जनतेकडून करोडो रुपयांचा मालमत्ता कर घेणाऱ्या केडीएमसीने तरी यात लक्ष घालून ह्या गंभीर प्रश्नाची दखल घ्यावी अशी मागणी नलावडे यांनी केली.

ताबा सुटून ट्रक झाडाला धडकून उलटला

मुंबईकडे जाणारी वाहतूक तासभर विस्कळीत ठाणे- औषधे घेऊन मुंबईला निघालेल्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक झाडाला धडकला आणि त्या अपघातात तो ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फी कंपनी बस स्टॉपसमोर घडली. औषधे घेऊन मुंबईला निघालेल्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक झाडाला धडकला आणि त्या अपघातात तो ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फी कंपनी बस स्टॉपसमोर घडली. याचदरम्यान पाठी मागून येणारी कार त्या ट्रक धडकली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी, मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर चांगला परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळाले. या मार्गावर सुमारे एक तास वाहतुक धीम्या गतीने सुरू होती. तसेच ही धडक इतकी जोरात होती की त्यामध्ये ते झाड पडले. या अपघातानंतर चालकाने ट्रक सोडून तेथून पलायन केल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. नागपूर येथून मुंबई घाटकोपर येथे दहा टन औषध घेऊन ट्रक चालक जगदीश गौतम (40) हा निघाला होता. सकाळी साडेसहाच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फी कंपनी बस स्टॉप समोर आल्यावर ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटला. आणि तो ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावरती जाऊन जोरात आदळला. तसेच तो तेथील रस्त्यावरती उलटला. या धडकेत ते झाड ही पडले होते. तसेच त्या अपघातग्रस्त ट्रकच्या मागून येणारे कार ट्रकच्या मागील बाजूस जाऊन धडकली. सुदैवाने या अपघातात कारमधील चालकासह 5 जणांना कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस, नौपाडा पोलीस हे ०१-हायड्रा मशीनसह, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक सुमारे ०१-तासापर्यंत रस्त्याच्या एका बाजूने धीम्या गतीने सुरू होती. तर अपघातामुळे रस्त्यावरती पडलेले झाड आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी कापून बाजूला केले. तसेच अपघात ग्रस्त दोन्ही वाहने पोलीस कर्मचाऱ्यांनी ०१-हायड्रो मशीनच्या सहाय्याने रस्त्याच्या एका बाजूला करून तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून देण्यात यश आल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.

माढा लोकसभा मतदार संघातील ‘मसल पॉवर, मनी पॉवर’ संजय हाके संपवणार – प्रकाश शेंडगे

रमेश औताडे  मुंबई : माढा लोकसभा मतदार संघात प्रस्थापितांची असलेली मसल पॉवर मनी पॉवर आमचा ओबीसी उमेदवार संपवणार असल्याचा इशारा ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी शुक्रवारी मुंबई…

अनधिकृत बांधकामे हटवण्याची मोहीम १५ एप्रिलपासून पुन्हा सुरू

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश ठाणे : धोकादायक इमारती रिक्त करण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या व्यवस्थेसाठी प्रमाणित कार्य पद्धती तयार करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी दिले.  तसेच, नैसर्गिक आपत्ती निवारण आणि नागरिकांची जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीकोनातून १५ एप्रिलपासून अनधिकृत बांधकामे हटवण्याची मोहीम पुन्हा सुरू करण्याच्या सूचनाही श्री. राव यांनी दिल्या आहेत. महापालिका आयुक्त सौरभ राव हे प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयाला भेट देवून तेथील कार्यपद्धती जाणून घेत आहेत. या उपक्रमात, शुक्रवारी आयुक्त राव यांनी मुंब्रा आणि दिवा या दोन प्रभाग समितीची माहिती घेतली. मुंब्रा प्रभाग समिती कार्यालयात झालेल्या या बैठकीस, अतिरीक्त आयुक्त (१) संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, परिमंडळ एकचे उपायुक्त मनीष जोशी, सहायक आयुक्त (मुंब्रा) बाळू पिचड, सहायक आयुक्त (दिवा) अक्षय गुडदे, तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते. गेल्या १५ महिन्यात, मुंब्रा भागात अनधिकृत बांधकामाची संख्या ४० होती. त्यापैकी ०८ इमारती पाडण्यात आल्या. १४ इमारती पाडण्याची कार्यवाही सुरू आहे. तर, १८ इमारतीमध्ये कुटुंबे राहत आहेत. मुंब्रा येथील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची संख्या मोठी आहे. त्यात, अती धोकादायक ०६ इमारती आहेत. त्यापैकी, ०४ इमारती रिकाम्या असून ०२ अजूनही व्याप्त आहेत. १०० धोकादायक इमारती असून त्यातील ०८ इमारतींची दुरुस्ती झाली आहे. २३ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिटचे अहवाल आले असून त्या दुरुस्त करण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत. ५७ इमारतींचे दुरुस्ती काम संथ गतीने सुरू आहे. तर, ०९ ठिकाणी काम सुरू झालेले नाही. ०३ इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत. तसेच, ३५० इमारतींची त्या व्याप्त असतानाच दुरुस्ती करायची आहे. तर, ८८४ इमारतींची किरकोळ दुरुस्ती आवश्यक आहे. मुंब्रा येथील एकूण ६६ धोकादायक इमारतीबाबत तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. या इमारतींची सहायक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांच्या टीमने तातडीने पाहणी करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी बैठकीत दिले. ज्या इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे अहवाल परस्पर विरोधी आले आहेत. त्या इमारतींची पाहणी ते दोन्ही स्ट्रक्चर ऑडिटर आणि महापालिकेने नियुक्त केलेले त्रयस्थ ऑडिटर यांनी संयुक्तपणे करून अहवाल द्यावा. येत्या काही दिवसात ही कार्यवाही पूर्ण करावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. जे स्ट्रक्चर ऑडिटर दिशाभुल करणारा अहवाल देतील, त्याच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येता पावसाळा हा नेहमीपेक्षा वेगळ्या धाटणीचा असण्याची शक्यता आहे. कमी काळात मोठा पाऊस असे त्याचे स्वरूप असू शकेल. त्यांची वारंवारताही अधिक असेल. हे लक्षात घेऊन आपत्कालीन व्यवस्थापन करावे लागणार आहे. त्यामुळे, विशेष करून मुंब्रा भागात पर्यायी निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, वाहतूक व्यवस्था यांचे तपशीलवार नियोजन करावे. त्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करावा, स्वयंसेवी संस्थांचे नेटवर्क, खाजगी बांधकाम व्यवसायिकांची यंत्र सामुग्री यांची माहिती घ्यावी. काळजी घेणे आणि तत्काळ प्रतिसाद देणे हे आपल्या हाती आहे. ते आपण काटेकोरपणे करावे, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. गेल्या १५ महिन्यात, दिवा येथील २७३ अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. त्यात, १८७ इमारती अजूनही व्याप्त आहेत. ३२ इमारती पाडण्यात आल्या आहेत. तर, ५४ अव्याप्त इमारती निष्कासन करण्याची कार्यवाही सुरू आहे. अती धोकादायक किंवा धोकादायक स्थितीत एकही इमारत दिवा येथे नाही. ६७ इमारतींना मोठ्या तर ५८५ इमारतींना किरकोळ दुरुस्तीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती यांची प्रस्तावित नवीन कार्यालये, देसाई खाडी पूल, त्यांचे पोहचमार्ग, दिवा रेल्वे उड्डाणपूल, दिवा येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालय, नाल्याची कामे, जलकुंभ आदी कामाची आयुक्त राव यांनी विस्तृत माहिती घेतली. बैठकीनंतर, आयुक्त राव यांनी कौसा येथील स्वातंत्र्य सेनानी हकीम अजमल खान रुग्णालयाची पाहणी केली. तेथे सध्या सुरू असलेल्या ओपीडी सेवांची पाहणी केली. तसेच, नियोजनबद्ध काम करून हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या सूचना आयुक्त राव यांनी दिल्या.