Category: होम

भाजपाचे ‘बुथ विजय’ अभियान बुधवारपासून सुरू

मावळ,रायगडमध्ये भाजपाचे उमेदवार नसले तरी महायुतीचे उमेदवार ताकतीने निवडून आणणार – अवधूत वाघ राज भंडारी पनवेल : मित्र पक्षांसहित देशात ४०० हून अधिक जागा भाजपा निवडून आणणार तसेच मावळ, रायगडमध्ये भाजपाचे उमेदवार नसले तरी महायुतीचे उमेदवार ताकतीने निवडून आणणार असल्याचे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पनवेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. ६ एप्रिल रोजी भाजपा आपला ४४ वा वर्धापन दिन साजरा करत आहे, त्यानिमित्ताने बुथ विजय अभियान या नवीन योजनेचा शुभारंभ आजपासून सगळीकडे केला आहे, या योजनेची माहिती प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते वसंतराव जाधव, पंकज मोदी, भाजपाचे रायगड जिल्हा सरचिटणीस माजी नगरसेवक नितीन पाटील तसेच प्रकाश बिनेदार उपस्थित होते. यावेळी माहिती देताना अवधूत वाघ म्हणाले, जगातील सर्वात मोठा पक्ष भाजपा आहे. बुथ विजय अभियानांतर्गत प्रत्येक बुथवर भाजपा कार्यकर्ता जाऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून केंद्र व राज्य सरकारने केलेली विविध कामे, विकास योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा, आंतरराष्ट्रीय ख्याती या माहिती सोबतच प्रत्येक घरोघरी विविध योजनांच्या लाभार्थींना भेटून घेतलेल्या सरकारी योजनांचा लाभ घेतल्याबद्दल आभार मानले जाणार आहेत. महायुतीच्या उमेदवाराला ५१ टक्के मते पडली पाहिजेत यासाठी बुथवर कार्यकर्ते मेहनत घेणार आहेत, अशी शेवटी प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. भाजपच्यावतीने ४०० पार चा नारा देणाऱ्या अजेंड्यावरून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाजपला गोचीत पकडले असून इंडिया आघाडीच्यावतीने भाजपकडून संविधान बदलविण्यासाठी ४०० पारचा नारा देण्यात येत असल्याच्या आरोपावरून अवधूत वाघ यांनी उत्तर देताना सांगितले की, गेल्या ७० वर्षांमध्ये अनेक बदल घडले आहेत, त्यानुसार घटनेमध्ये देखील बदल करणे गरजेचे आहे. लोकसभेत २/३ संख्याबळ असल्यामुळे तत्कालीन राजीव गांधी यांच्या नेतृत्वातील सरकारने देखील काही बदल केले होते. त्यानुसार पुन्हा काळ बदलत चालला आहे. या बदलत्या काळानुसार घटनेत काही तरतुदी करणे गरजेचे असल्यामुळे भाजपची देखील ती तयारी सुरू आहे. मात्र ज्या पद्धतीने विरोधकांकडून संविधान बदलण्याची खोट्या स्वरूपाची भाषा केली जात आहे, तर संविधान बदलण्याची कोणाच्या बापामध्ये हिम्मत नाही, असे उत्तर देत उपस्थित झालेल्या या प्रश्नाला अवधूत वाघ यांनी पूर्णविराम दिला.

सावधान ! सुर्यदेव कोपणार

मुंबई : हवामान बदलामुळे जगभरात तापमानाची वाढ नोंदविली जात असतानाच आता महाराष्ट्रातही येत्या तीन महिन्यातील तब्बल २० दिवस उन्हाचा जबरदस्त तडाका बसणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.सुर्यदेव कोपणार असून नागरिकांना…

वंसत मोरेंना वंचितचा ‘आसरा’

स्वाती घोसाळकर मुंबई : प्रत्येक दिवसागणिक वंचितचे प्रकाश आंबेडकर आश्चर्यकारक भूमिका मांडत असल्याने राजकीय पंडींतासोबत राजकारणीही चकीत झाले आहेत. नरेंद्र मोदींची हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी भाजपविरोधी मतात फुट पडू नये यासाठी आग्रही असणारे…

ईडीला ‘सुप्रीम’ झटका

‘आप’च्या संजय सिंह यांना जामीन नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीला आज सुप्रीम कोर्टाने जोरदार झटका दिला. गेल्या सहा महिन्यापासून दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या ‘आप’चे खासदार संजय सिंह यांना सर्वोच्च न्यायालयात…

आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सुरक्षागृह

ठाणे : ऑनरकिलिंगच्या घटनांबाबत राज्य सरकार गंभीर झाले आहे. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण आणि सुरक्षित घर पुरवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस अधीक्षक/ पोलिस आयुक्त, जिल्हा समाजकल्याण अधिकारी व महिला व बालविकास अधिकारी या तिघांचा स्पेशल सेल तयार केला आहे. ठाण्यातही हा सेल तयार झाला असून ऑनरकिलिंग करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाणार आहे. ऑनरकिलिंग ही देशातील मोठी गंभीर समस्या आहे. जात अन् धर्माच्या बाहेर जाऊन विवाह करणाऱ्या जोडप्यांचा अतोनात छळ केला जातो. अनेकदा आप्तस्वकीय आणि जाती- धर्माच्या ठेकेदाराकडून त्यांची निर्घृण हत्या केली जाते. अशी अनेक प्रकरणे केवळ उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यातच नव्हे तर पुरोगामी महाराष्ट्रातदेखील घडलेल्या आहेत. संविधानात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असताना विवाह करणाऱ्या अशा जोडप्यांसोबत ऑनरकिलिंग होणे, त्यात सरकार, प्रशासन कमी पडणे, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करत देशातील प्रत्येक राज्यांना स्पेशल सेल निर्माण करून या घटना रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी नियोजन करण्यास बजावले आहे. त्या आदेशानुसार राज्य सरकारने याबाबतचे परिपत्रक काढले आहे. देशातील ऑनरकिलिंग थोपविण्यात सरकार कमी पडत आहे. त्यामुळे देशात आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. शक्ती वाहिनी संस्थेकडून जनहित याचिका ऑनरकिलिंगच्या घटना थांबवून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे, ही सरकारची जबाबदारी आहे, तसे आदेश सरकारला द्यावेत, यासाठी शक्ती वाहिनीनामक संस्थेने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आदेश पारित केले. या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली आता महाराष्ट्र सरकारकडून सुरू झाल्या आहेत. ठाणे जिल्ह्यालाही या आदेशाची अंमलबजावणी करायची आहे. त्यासाठी शासनाकडून परिपत्रक काढले असून त्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील संबंधित अधिकारी कामाला लागले आहेत. विशेष कक्षात यांचा समावेश पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, जिल्हा समाजकल्याण अधिकारी आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी या तिघांचा समावेश असलेला विशेष कक्ष (स्पेशल सेल) सुरू करण्याला सुरुवात केली आहे. पोलिस आयुक्त/अधीक्षक या सेलचे अध्यक्ष असून जिल्हा समाजकल्याण अधिकारी सदस्य आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सदस्य सचिव असणार आहेत. या समस्येवर काम करण्यासाठी जिल्हाधिकारी/जिल्हा दंडाधिकारी, संबंधित जिल्ह्यातील महापालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक/ पोलिस आयुक्त, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी यांची समिती तयार केली आहे. एक वर्षापर्यंत सुविधा समितीमार्फत आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आवश्यकतेप्रमाणे सुरक्षागृहाची मदत पुरवण्याचे दक्षता घेणार आहे. ज्या ठिकाणी या जोडप्यांना पोलिस संरक्षण देता येईल, अशा ठिकाणी…

पाणी टंचाईबाबतच्या नियोजनासाठी आतापासूनच तयारीला लागा

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे  कठोर निर्देश ठाणे : येणाऱ्या नजीकच्या काळात जिल्ह्यात पाणीपुरवठा विषयी व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे त्यानुषंगाने पाणीटंचाई उपाययोजनासंबंधी यंत्रणांनी काटेकोर नियोजनाच्या तयारीला आतापासूनच लागा, असे निर्देश अत्यंत कठोर शब्दात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज शहापूर येथे आयोजित पाणी टंचाई उपाययोजना आढावासंबंधी  बैठकीत दिले. यावेळी ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती छायादेवी शिसोदे, भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप,  शहापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे,  ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पंचायत समिती शहापूरचे उपअभियंता विकास जाधव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ कार्यकारी अभियंता तन्मय कांबळे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता  प्रदीप कुलकर्णी, स्वच्छ भारत मिशनचे कार्यकारी अभियंता पंडित राठोड तसेच सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, पाणीपुरवठा व जलसंपदा विभागातील सर्व अभियंता, उप अभियंता, शहापूर पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी या बैठकीस उपस्थित असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून 31 मार्चपर्यंत टँकरग्रस्त असलेल्या एकूण 91 गाव-पाड्यातील पाणीपुरवठ्याबाबतची सद्य:स्थिती जाणून घेतली आणि नजीकच्या काळात संभाव्य पाणीटंचाईचा सर्वतोपरी विचार करून त्यानुषंगाने आवश्यक उपाययोजना आतापासूनच सुरू करण्यास निक्षून सांगितले. ते म्हणाले, ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या जगण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे. त्यामुळे कोणताही ग्रामस्थ पाण्यावाचून राहता नये. ज्या गावात पाणी पातळी कमी होऊन पाणी टंचाई आढळून येण्याची शक्यता आहे त्या गावपाड्यासाठी पंधरा दिवस आधी प्रस्ताव सादर करून एक दिवस आधीच टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात यावा. शहापूर येथील भाऊली धरणाच्या सुरू असलेल्या कामाबाबतही त्यांनी आढावा घेतला आणि संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या की, त्यांनी रोजच्या रोज धरणाचे काम किती झाले याबाबत प्रगती अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना रोजच्या रोज सादर करावा. या धरणाचे काम उत्कृष्ट प्रतीचे आणि वेळेत पूर्ण करावे. त्याचबरोबर नजीकच्या काळात या उपाययोजना अंमलात आणण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मंजुरीसाठी  तातडीने सादर करण्याविषयी त्यांनी सक्त सूचना दिल्या. पाणी नाही असे एकही गाव नसावे, यासाठी सर्व यंत्रणांनी पाणीटंचाईबाबत काटेकोर नियोजन करावे, गावातील लोकसंख्या, गावातील हातपंप संख्या, विहिरींची संख्या आणि पाण्याचे इतर पर्याय तपासून पुढील पंधरा दिवसांत शहापूर तालुक्यातील पाणीपुरवठा संदर्भात नियोजन करण्यात यावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी उपस्थित सर्व ग्रामसेवकांना दिल्या. पाण्याचे टँकर व इतर आवश्यक उपाययोजनांचे आतापासूनच व्यवस्थित नियोजन करावे,  असेही ते शेवटी म्हणाले. याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शहापूर तालुक्यात स्वच्छता प्रश्न महत्त्वाचा आहे.‌ कचऱ्याची विल्हेवाट वेळोवेळी लावणे गरजेचे आहे. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच कचरा उचलला गेल्यानंतरचे व उचलण्याआधीचे असे फोटो काढून फोटो संकलन करावे. तसेच ग्रामसेवकांनी ज्या ठिकाणी ग्रामस्थ किंवा इतर कोणी कचरा टाकत असेल तर त्या संबंधितावर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी. शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शिसोदे यांनी जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांना आश्वस्त केले की, ग्रामीण भागामध्ये पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी, पाणी टंचाईविषयी आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी जिल्हा परिषदेची पाणीपुरवठा यंत्रणा काटेकोरपणे नियोजन करेल. ००००

ठाणे स्थानकात प्रवाशांची घुसमट थांबणार!

ठाणे : मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर गर्दीचे स्थानक म्हणून ठाणे रेल्वे स्थानकाकडे पाहिले जाते. या स्थानकावर लाखोंच्या संख्येने प्रवासी उतरतात. त्यांना बाहेर पडण्यासाठी रेल्वेने सहा पुलांची निर्मिती केली आहे. आता या संख्येत आणखी एका पुलाची भर पडली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत तो प्रवाशांच्या वापरासाठी खुलाही केला जाणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर हा पूल बांधला आहे. या पुलामुळे प्रवाशांची घुसमट कमी होणार आहे. दादरच्या मागोमाग गर्दीचे स्थानक म्हणून ठाणे रेल्वे स्थानकाचा क्रमांक येतो. दर दिवशी या स्थानकावरून मुख्य आणि उपनगरीय रेल्वेने सुमारे ८० लाख प्रवासी ये- जा करतात. कर्जतपासून अगदी नवी मुंबई, पनवेलपर्यंत आणि कसारा, खोपोलीपासून मुंबईपर्यंत जाणारे प्रवासी या मार्गाचा वापर करतात. हे स्थानक रेल्वेला मोठा आर्थिक हातभार लावणारे आहे. त्यामुळे या स्थानकातील प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा मिळायला हव्यात, असा रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न असतो. त्याचाच भाग म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने या स्थानकावर आणखी एक नवा प्रवासी पूल बांधला आहे. हा पूल प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असून तो या प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना थेट सॅटीसच्या पुलावर नेऊन सोडणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सॅटीस पुलावर जाऊन ठाणे, घोडबंदर, काशिमीरा, भाईंदर, बोरिवली आदी ठिकाणी जाण्यासाठी बस पकडणे सोपे जाणार आहे. हा पूल प्लॅटफॉर्म क्रमांक १० कडून मुख्य पुलावरून येणाऱ्या प्रवाशांसाठी उपयोगाचा ठरणार आहे. हा नवा पूल मुख्य पुलाला जोडला आहे. त्यामुळे मुख्य पुलावरून ठाणे पश्चिमेकडे जाऊ पाहणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा वापर करता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पुलाचे बांधकाम सुरू होते. आता ते पूर्णत्वास आले आहे. आता त्यावर काँक्रीट टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत तो प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांना स्थानकात ये-जा करण्यासाठी जाण्यासाठी एकूण सहा पुलांचा वापर सुरू आहे. आता त्यात सातव्या पुलाची भर पडली आहे. पैकी सहाही पूल थेट सॅटीस पुलाशी जोडले गेले आहेत. स्थानकावर एकूण दहा प्लॅटफॉर्म असून हे सहाही पूल त्यांच्याशी जोडले जाणार आहेत. तर एक पूल सार्वजनिक आहे. त्यामुळे एकाच वेळी स्थानकावर अनेक गाड्या उभ्या राहिल्या तरी त्यातून उतरणाऱ्या गर्दीला या पुलाच्या माध्यमांतून स्थानकाबाहेर पडणे सुलभ होते. शिड्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. आता काँक्रीटीकरण केलेल्या शिड्या आणि पुलावरील फ्लोअरवर मार्बल ग्रॅनाईटच्या लाद्या बसवण्याचे काम सुरू होणार आहे. येत्या आठ- दहा दिवसांत हा पूल प्रवाशांना वापरण्यायोग्य होईल.

श्रीमती भागुबाई चांगु ठाकूर विद्यालयाची अद्वितीय कामगिरी

प्लास्टिक रिसायकलिंग वॉरियर्स स्पर्धा पनवेल : इंडियन सेंटर फॉर प्लास्टिक इन द एनवोर्मेन्ट यांच्यामार्फत प्लास्टिक रिसायकलिंग वॉरियर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या  द्रोणागिरी येथील श्रीमती भागुबाई चांगु ठाकूर विद्यालयाने अद्वितीय अशी कामगिरी बजावली. यामध्ये एकूण 157 किलोग्रॅमवेस्ट प्लास्टिक जमा करून शाळेने एक उच्चांक प्रस्थापित केला आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शाळेचे चेअरमन चंद्रकांत घरत, मुख्याध्यापिका अनुराधा काठे यांचा मंगळवारी सत्कार केला. ही स्पर्धा इंडियन ऑइल एस पी एल ओ पी एल गेल इंडिया लिमिटेड रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यातर्फे रायगड जिल्हा आणि नवी मुंबई शाळांसाठी प्रायोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल 26 फेब्रुवारी 2024 ला जाहीर करण्यात आला होता. त्यानिमित्ताने 1 एप्रिल 2024 सोमवार रोजी या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेमध्ये अद्वितीय कामगिरी बजावल्याबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शाळेचा पालक वर्ग शिक्षक वर्ग शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा काठे, इनचार्ज टीचर निकिता मॅडम आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेच्या निमित्ताने मुलांनी उत्स्फूर्तपणे प्लास्टिक रिसायकलिंग चे महत्व पालकांना पटवून देत घराघरातून रिसायकलेबल प्लास्टिक जमा करून शाळेत आणले तसेच ठिकठिकाणी फेकून दिल्या जाणाऱ्या बाटल्या आणि प्लास्टिकचा कचरा योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत विद्यार्थ्यांनी सर्वांना समजून सांगितली.

मतदार जनजागृती गीतांच्या सिडीचे प्रकाशन

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते अशोक गायकवाड रायगड : मतदार जनजागृतीसाठी गीतमाला तयार करण्यात आली आहे. या गीतांच्या सिडीचे प्रकाशन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते करण्यात आले. रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हानिवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून मतदार जनजागृतीसाठी गीतमाला तयार करण्यात आली आहे. या गीतांच्या सिडीचे प्रकाशन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या प्रकाशन सोहळ्यास अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन महेश पाटील, तहसिलदार म्हसळा, समीर घारे आदि उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मतदान प्रक्रिया हा लोकशाहीचा उत्सव आहे. या उत्सवात प्रत्येक मतदाराने मतदान करुन आपला सहभाग नोंदवावा यासाठी या गीतांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघांचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार समीर घारे यांनी या गीतांची निर्मिती केली आहे. एकूण ६ गीते असून पारंपरिक चालीवर असलेल्या या गीतांचे लेखन, गायन भिमराव सूर्यतळ यांनी केले असून संगीत सचिन धोंडगे यांनी दिले आहे. सहकलाकार म्हणून प्रतिक निकम, आदेश डेरवणकर आणि किरण शिंदे यांनी काम केले आहे. या गीतमाला सिडीची निर्मिती नायब तहसिलदार धर्मराज पाटील, तहसिलदार समीर घारे यांनी केली आहे. ही संपूर्ण निर्मिती शासकीय अधिकारी कर्मचारी यांची आहे. या उत्कृष्ट निर्मितीसाठी संपूर्ण यंत्रणेचे जिल्हाधिकारी जावळे यांनी कौतुक करून अभिनंदन केले. रायगड जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणी या गीतांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.