Category: होम

महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या काळातील शालेय शिक्षण विभागाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा – वर्षा गायकवाड.

महायुती सरकारने ‘एक राज्य, एक गणवेश’ व पाठ्यपुस्तकात कोरी पाने’ प्रयोग लादून काय साध्य केले? १- ३५ लाख विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नाही याची जबाबदारी कोणाची? मुंबई : शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आपल्याच पक्षाच्या माजी मंत्र्याने घेतलेले निर्णय रद्द करण्याची कृती हे उशिरा आलेले शहाणपण आहे. दीपक केसरकर यांनी शिक्षण मंत्री म्हणून घेतलेले निर्णय चुकीचे आणि विद्यार्थी विरोधी होते. केसरकरांनी ‘एक राज्य, एक गणवेश’ हा हट्ट कशासाठी धरला होता? कोणाच्या फायद्यासाठी? यामागील ‘अर्थपूर्ण’ कारण काय? असे सवाल विचारून महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात शालेय शिक्षण विभागाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी माजी शालेय शिक्षण मंत्री खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रीया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की,तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी पाठ्यपुस्तकाचे चार भाग करून त्यात कोरी वह्यांची पानं लावण्याचा निर्णय घेण्यापूर्वी शिक्षक, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांशी कोणतीही चर्चा का केली नाही? या दोन्ही निर्णयांना चहूबाजूंनी प्रखर विरोध होत असताना, महायुती सरकारनं हे प्रयोग लादून नेमकं काय साध्य केलं? विद्यार्थ्यांच्या नुकसानाचं काय?. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी माजी मंत्र्याचे चुकीचे आणि विद्यार्थी विरोधी निर्णय रद्द करण्याचे धाडस दाखवले पण या बोगस आणि भ्रष्ट निर्णयांमुळे लाखो सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले. त्यांच्या झालेल्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा भुर्दंड कोण भरणार? असे प्रश्न खा. गायकवाड यांनी विचारले आहेत. ३५ लाख विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नाही – जबाबदारी कोणाची? शैक्षणिक वर्ष संपत आलं तरी, ३५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेला नाही. यासाठी जबाबदार ठरवून संबंधितांवर कारवाई होणार की नाही? शिक्षणाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मागील शिक्षणमंत्री केसरकर यांच्या काळात अशा भोंगळ कारभार आणि अनावश्यक उद्योगांवर अधिक भर दिला गेला. यातून नेमकं कोणाचा स्वार्थ साधला गेला? ठराविक लाडक्या कंत्राटदारांना फायदा करून देण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला आहे. ‘असर’ अहवालाचा इशारा……

बीडची कीड

सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात अखेर सव्वा महिन्याने वाल्मिक कराडवर ‌‘मोक्का‌’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजून एका आरोपीला तपास यंत्रणा अटक करू शकलेल्या नाहीत. बीडमधील संघटित गुन्हेगारी हाताळण्यात…

मंदिरांतील वस्त्रसंहिता स्वागतार्हच !

  देशभरातील लक्षावधी गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील श्रीसिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आल्याचे वृत्त वाचनात आले. मंदिर प्रशासनाने एक पत्रक काढून तसे जाहीर केले आहे. मुंबईच्या मध्यवर्ती…

देशातील भ्रष्टाचार निर्मूलनासाठी राजकीय पुढाऱ्यांनी गांधींजींच्या विचारांचे अनुकरण करावे

अहिंसेच पुजारी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी ३० जानेवारीला साजरी करण्यात येते.त्या निमित्ताने भ्रष्ट अधिकारी व भ्रष्ट राजकीय पुढाऱ्यांवर अंकुश लावण्याकरिता राज्य व केंद्र सरकारने जातीने लक्ष देण्याची गरज आहे. याकरीता…

करार आणि गुंतवणूक

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथील जागतिक परिषदेला हजेरी लावून गुंतवणुकीचे अनेक करार केले. दरवर्षीच असे करार होत असतात. त्यातील किती गुंतवणूक प्रत्यक्षात होते आणि…

‘आरटीई’ प्रवेशासाठी २ फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज

ठाणे : ‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २ फेब्रुवारी २०२५ रोजी पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती…

शिवसेनेतर्फे आदिवासी भागात घोंगडी वाटप !

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मागाठाणे विधानसभा निरीक्षक व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य  शशिकांत झोरे यांच्या  माध्यमातून शिवसेना शाखा क्र.१२ तर्फे बोरिवली नॅशनल पार्क मधील आदिवासी नागरिकांना विभागप्रमुख  उदेश पाटेकर यांच्या शुभहस्ते ब्लँकेट वाटप  करण्यात आले. याप्रसंगी विधानसभाप्रमुख अशोक म्हामुणकर, विधानसभा संघटक सौ शुभदा शिंदे, उपविभागप्रमुख सचिन शिर्के, उपविधानसभा समन्वयक सारिका झोरे, शाखाप्रमुख सचिन मोरे, शाखा समन्वयक योगेश देसाई, शाखा संघटक शुभदा सावंत, शाखा समन्वयक माधुरी खानविलकर, युवासेना सचिन शिरसाट, वृषल पुसाळकर, आशिष सोंडकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन  शशिकांत झोरे यांच्या सह  उपशाखा संघटक सौ इति महाडिक, रईसा मुल्ला, सुलभा गावकर, सोनाली रोकडे यांनी यशस्वीपणे केले.

संविधान गौरव अभियान

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा ठाणे शहर जिल्हाचे वतिने ठाणे :  २५ जानेवारी २०२५ संध्याकाळी ६ वाजता भाजपा विभागीय कार्यालय वर्तक नगर रेमंड ठाण्यात करण्यात आले.  या कार्यक्रमात प्रमुख वक्ते माजी केंद्रीय पंचायतराज राज्य मंत्री कपिल पाटील साहेब यांनी डॉ. बाबासाहेब अम्बेडकर द्वारा लिहलेला संविधान बद्दल सहविस्तार माहीती दिली तसेच या कार्यक्रमात कोकण पदवीधर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार निरंजन डावखरे साहेब भाजपा ठाणेशहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले साहेब भाजपा ठाणेशहर उपाध्यक्ष विक्रम भोईर माजी नगरसेविका सुवर्णा विलास कांबळे अनुसूचित जमाती ठाणेशहर जिल्हाध्यक्ष नताशा सोनकर दिव्यांग सेल ठाणेशहर जिल्हाध्यक्ष आनंद बनकर अनुसूचित जाती मोर्चा ठाणेशहर सरचिटणीस  तेजश चंद्र मोरे उपाध्यक्ष , अरुणा कांबले उपाध्यक्ष  राजेश करोतिया उपाध्यक्ष  सुरेश बहिलम  कोषाध्यक्ष  रामनिवास दिलोड मोर्चाची ठाणे शहर विधान सभा संयोजक रशमी मोरे मोर्चा ठाणे शहर मिडिया प्रमुख  दिनेश मोरया मोर्चातिल पदाधिकारी  सुनिल सोदा  संदीप गहलोध व अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा ठाणेशहर जिल्हाध्यक्ष  विरसिंह पारछा यांचे नेतृत्वाखालील संविधान गौरव अभियानाचा कार्यक्रम करण्यात आले.

नाही तर आरोग्य यंत्रणा आजारी पडेल

रमेश औताडे मुंबई :राज्यातील सरकारी आरोग्य विभागात महत्वाची भूमिका बजावणारी स्टाफ नर्स व स्टाफ ब्रदर आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. सरकारने जर आमच्या मागण्यांचा विचार गांभीर्याने केला नाही तर आरोग्य यंत्रणा आजारी पडेल असा इशारा यावेळी देण्यात आला. आरोग्य विभागात ९०० जागा रिक्त असताना जर आम्हाला आंदोलन करत नोकरी मागावी लागत असेल तर यासारखे दुर्दैव नसावे. असे यावेळी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे अध्यक्ष प्रेमराज बोबडे यांनी सांगितले. यावेळी बोलताना अभिलाष टेकाडे यांनी सांगितले की, वयोमर्यादा संपून गेल्यावर जर आम्हाला नोकरी मिळत असेल किंव्हा मयत झाल्यावर नोकरी मिळणार असेल तर त्या नोकरीचा काय फायदा. सरकारने जर आता आमच्या मागण्याचा गांभीर्याने विचार करणार नसेल तर राज्याची आरोग्य यंत्रणा बंद पडू शकते असा इशारा यावेळी या आंदोलनकर्त्या उमेदवारांनी दिला आहे.