Category: होम

 मुंबई पोर्टमधील गोदी कर्मचाऱ्यांचे कौटुंबिक स्नेहसंमेलन संपन्न

मारुती विश्वासराव यांना मुंबई कामगाररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार अनिल ठाणेकर मुंबई : मुंबई पोर्ट  प्राधिकरणाच्या गोदी विभागातील नोकरीत असणारे कर्मचारी व सेवानिवृत्ती  कर्मचाऱ्यांचे  ४८ वे कौटुंबिक स्नेहसंमेलन २६ जानेवारीला शिवाजी मंदिर येथे ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.मारुती विश्वासराव यांना मुंबई  कामगार रत्न पुरस्कार आणि उत्कृष्ट वृत्तपत्र लेखक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ॲड. एस. के. शेट्ये यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, सर्वप्रथम ७६  व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सध्या  मुंबई बंदरात पूर्वी ४४ हजर कामगार होते,  आता २७०० कामगार शिल्लक राहिले आहेत. तरी देखील मुंबई बंदरातील गोदी कामगारांनी ६५ दशलक्ष टन मालाची चढ उतार केली आहे. गोदी कामगारांनी कमी कामगारांमध्ये जास्त उत्पादकता काढली आहे. बंदर व गोदी कामगारांसाठी १ जानेवारी २०२२ पासून भरघोस पगारवाढीचा वेतन करार झाला आहे. या वेतनकराराची प्रत्यक्षात वाढ १  फेब्रुवारी २०२५  पासूनच्या पगार व  पेन्शनमध्ये मिळणार आहे. याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, ज्ञानेश्वर वाडेकर, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल  एम्प्लॉईज युनियनचे जनरल  सेक्रेटरी सुधाकर अपराज, सेक्रेटरी दत्ता खेसे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी बापू घाडीगावकर, मुंबई बंदर प्राधिकरण आऊट डोअर डॉक्स स्टाफ पूजा समितीचे अध्यक्ष संदीप घागरे, मुंबई पोर्ट ट्रस्ट  एस.सी. एस.टी. वेल्फेअर असोसिएशनचे कार्याध्यक्ष अंकुश कांबळे आदी मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन फिलोंथरोपी फाउंडेशनचे पदाधिकारी  व उत्कृष्ट निवेदक विजय सोमा सावंत यांनी केले. याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे व ज्ञानेश्वर वाडेकर  यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज  युनियनचे प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव यांना मुंबई  कामगार रत्न पुरस्कार आणि उत्कृष्ट वृत्तपत्र लेखक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला,  सेवानिवृत्तीबद्दल बापू घाडीगावकर व दुबे यांचा सत्कार करण्यात आला. गोदी विभागातील अधिकारी व युनियन पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. करमणुकीचा कार्यक्रम म्हणून गौरी थिएटर्स निर्मित प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित “नियम व अटी  लागू करा” या लोकप्रिय नाटकाचा २८२ वा प्रयोग दाखविण्यात आला. स्नेहसंम्मेलनासाठी आलेल्या  गोदी कर्मचाऱ्यांच्या  कुटुंबामुळे सभागृह भरगच्च भरले होते.

सानपाडा येथे  एसपीएल २०२५ क्रिकेट सामन्यांचा सांगता सोहळा  संपन्न

नवी मुंबई : नवी मुंबईमधील सानपाडा तरुणाईची व क्रीडा रसिकांची सर्वाधिक पसंतीची क्रिकेट लीग, सानपाडा प्रिमियर लीग च्या ८ व्या पर्वाचा सांगता समारंभ मोठया जल्लोशात संपन्न झाला, अशी माहिती मारुती…

कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्काळ कृती आराखडा तयार करा – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड :  कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्काळ कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिल्या. मुख्यमंत्री सात कलमी कार्यक्रमांतर्गत १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने खालापूर विभागातील औद्योगिक गुंतवणूक वाढीसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली रसायनी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) भारत वाघमारे, उपविभागीय अधिकारी (प्रांत) कर्जत प्रकाश संकपाळ, खालापूर तहसीलदार अभय चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विक्रम कदम, पोलीस निरीक्षक रसायनी संजय बाबर, पोलीस निरीक्षक खोपोली शीतल राऊत, पोलीस निरीक्षक सचिन पवार खालापूर, तसेच एमआयडीसी क्षेत्रातील औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जावळे यांनी औद्योगिक क्षेत्रातील व्यवसाय सुलभतेसाठी उपाययोजनांवर सखोल मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्काळ कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था, कर्मचारी आणि महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना, औद्योगिक क्षेत्रासाठी मूलभूत सुविधा, अग्निशमन दलाची गरज, अखंडित वीजपुरवठा आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.औद्योगिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले.

 ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेतंर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम संपन्न

अशोक गायकवाड अलिबाग : बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची रायगड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, या योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. योजनेच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त रविवारी  महिला व बालविकास मंत्री आदिती…

रायगड जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांना केंद्रीय गृहमंत्री पदक-२०२३ जाहीर

अशोक गायकवाड रायगड : अभिजित शिवथरे, अपर पोलीस अधीक्षक, रायगड यांच्या असामान्य व सर्वोत्कृष्ट गुन्हे तपासाच्या कामगिरीबद्दल केंद्रीय गृहमंत्री पदक-२०२३ जाहीर होऊन त्यांना पोलीस मुख्यालय अलिबाग-रायगड, येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ना. अदिती तटकरे वरदा सुनील तटकरे, मंत्री, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अभिजित शिवथरे, हे पोलीस उप-अधीक्षक म्हणून पालघर जिल्ह्यात कार्यरत असताना, दिनांक ५ डिसेंबर २०१४ रोजी कासा पोलीस ठाणे येथे कॉ.गु.र.नं.१५९/२०१४ हा दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यामध्ये अभिजित शिवथरे तत्कालीन पोलीस उप-अधीक्षक यांनी नाविन्यपूर्ण पद्धतीने व अथक परिश्रमाद्वारे गुन्ह्याचा तपास व आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करून आरोपीविरुद्ध निर्धारित वेळेत दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले व आरोपींना शिक्षेपर्यंत पोहचविले. त्यामुळे महामार्गावरील दरोडा, जबरीचोरी सारखे गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश आले.

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरव

ठाणे : अशोक गायकवाड रविवार, (दि.२६ जानेवारी २०२५) रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात “उत्कृष्ट अधिकारी” म्हणून उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांना प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले. या यशात माझे सर्व वरिष्ठ अधिकारी, सहकारी अधिकारी कर्मचारी तसेच प्रसारमाध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचाही मोलाचा वाटा आहे. आपल्या सर्वांच्या मार्गदर्शन, सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते.याचबरोबर माझ्या कुटुंबियांची मला आजपर्यंत मिळालेली “खंबीर साथ, त्यांचा त्याग” आणि आपल्या सर्वांचा आशिर्वाद, शुभेच्छा मी कधीही विसरू शकत नाही.मी आपल्या सर्वांचाच कायम ऋणी आहे. असे मत दैनिक बित्तंबातमी प्रतिनिधी अशोक गायकवाड यांच्या बरोबर बोलताना सानप यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्राच्या पुरुष व महिला खो-खो संघाची विजयी सलामी

38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा हल्दवणी, उत्तराखंड : महाराष्ट्राच्या पुरुष व महिला खो-खो संघाने यजमान उत्तराखंडवर दणदणीत डावाने विजय मिळवित 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची विजयी सलामी दिली.  गौलापूर येथील इंदिरा गांधी स्पोर्टस्‌‍ संकुलात मंगळवारी सुरू असलेल्या या स्पर्धेत सलामीच्या सामन्यात प्रियांका इंगळे हिच्या अष्टपैलू खेळामुळे  (2.20 मिनिटे नाबाद व 2.10 मिनिट संरक्षण व 8 गुण) महिला संघाने  उत्तराखंडवर 37-14 असा 23 गुण व 1 डाव राखून विजय मिळविला. आश्विनी शिंदे (2.30मि.) व सानिका चाफे (2.20 मिनिटे) यांनी तिला संरक्षणात साथ दिली. उत्तराखंडची कर्णधार भारती गिरी हिने एक मिनिटे संरक्षण करीत एकाकी लढत दिली. पुरुष गटातही महाराष्ट्राने उत्तराखंडला 37-22 असे 15 गुण व एक डावाने नमविले. यात रामजी कश्यपने अष्टपैलू खेळ करताना आपल्या धारदार आक्रमणात 8 गडी बाद करीत संरक्षणात 1.46 मिनिटे पळतीचा खेळ केला. अनिकेत चेंदवणकरने 2.10 मिनिटे संरक्षणाची बाजू सांभाळली. उत्तराखंडकडून प्रींस कश्यप व राहूल शर्मा यांनी प्रत्येकी 6 गडी बाद करीत लढत दिली. अन्य निकाल ः पुरुषः  ओडीसा  विजयी विरुद्ध छत्तीसगड 43-34, 9 गुण व 6.25 मिनिटे राखून. महिला ः ओडीसा वि.वि. तामिळनाडू 36-18, 18 गुण व एक डावाने.

मराठमोळे नेमबाज सज्ज, दहा मीटर एअर रायफलमध्ये पदकाची आशा

३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड २०२४-२५ डेहराडून : गतवेळी केवळ एका पदकावर समाधान मानावे लागलेल्या महाराष्ट्राच्या नेमबाजी चमूकडून यावेळी ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत किमान १५ पदकांची अपेक्षा आहे. डेहराडून येथील त्रिशूल शूटींग रेंजवर २९ जानेवारी ते ६ फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (एमओए) नेतृत्वाखाली उत्तराखंडच्या स्वारीवर गेल्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ‘टीम महाराष्ट्र, जय महाराष्ट्र’ असा नारा दिलाय. जागतिक पदकविजेती कोल्हापूरची सोनम म्हसकर, तिचीच शहर सहकारी आणि राज्यस्तरीय स्पर्धेत विक्रमी कामगिरी करणारी शांभवी क्षीरसागर व राष्ट्रीय पदकविजेती नाशिकची आर्या बोरसे हे त्रिकूट नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात अचूक वेध साधण्यासाठी एकाग्रचित्त होतील. या प्रतिभावान नेमबाजांकडून महाराष्ट्राला उद्या पदकांची अपेक्षा असेल. मागील गोव्यातील ३७व्या राष्ट्रीय स्पर्धेत कोल्हापूरच्या अभिज्ञा पाटील हिने २५ मीटर पिस्तूल प्रकारात महाराष्ट्राला नेमबाजीतील एकमेव पदक जिंकून दिले होते. त्यामुळे यावेळी महाराष्ट्राचे नेमबाज किती पदके जिंकणार याकडे सर्वांच्या नजरा असतील. कोल्हापूरच्या नेमबाजांवर मदा ऑलिम्पिक कांस्यपदकविजेता स्वप्नील कुसाळे व अर्जून पुरस्कारार्थी अनुभवी नेमबाज राही सरनोबत या कोल्हापूरच्या स्टार नेमबाजांच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्राच्या पदकांची अपेक्षा वाढली आहे. शिवाय मुंबईची हिना सिद्धू व राष्ट्रीय पदकविजेती छत्रपती संभाजीनगरची रिया थत्ते हे नेमबाजही पदकाच्या शर्यतीत असतील. महाराष्ट्राचे नेमबाज यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेत किमान १५ पदके जिंकतील, असा विश्वास संघाच्या व्यवस्थापिका श्रद्धा नालमवार यांनी व्यक्त केला.

हिंदुस्थान कंपोजिटसच्या ११०० कामगारांना थकीत डिएचे धनादेश मिळणार

उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज कार्यक्रम मुंबई : घाटकोपर पश्चिम येथील  व आता बंद असलेल्या  हिंदुस्थान कंपोजिटस लिमिटेडमधील   (फेरोडो) ११०० कामगारांचा थकलेला महागाई भत्ता- डिएचे  वितरण धनादेश देऊन उद्या बुधवारी सकाळी ११ वा. मातोश्रीवर होणार आहे. हे वितरण शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या  पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते काही कामगारांना धनादेश देऊन प्रतिकात्मक करण्यात येणार आहे. नंतर या धनादेश वितरणाचा  कार्यक्रम आमदार सुनिल राऊत, लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे,मुंबईचे सह पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पडवळ आणि कामगारांच्या  उपस्थितीत बुधवारीच सायंकाळी ५ वा. एसएनडीटी कन्या महाविद्यालय सभागृह घाटकोपर पश्चिम येथे होणार आहे. अशी माहिती या डिएची थकीत रक्कम मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे प्रमुख कार्यकर्ते शिवसेना माजी उपविभागप्रमुख नंदू आंबोकर यांनी दिली. या कार्यक्रमास माजी महापौर महादेव देवळे, हिंदुस्थान कंपोजिटसचे व्यवस्थापकीय संचालक पवनकुमार चौधरी,माजी नगरसेवक सुनिल भालेराव हे उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना समन्वयक रवींद्र कोठावदे, शिवसेना उपविभागप्रमुख विजय पडवळ, शाखाप्रमुख निलेश पोहरकर यांनी केले आहे. हा थकीत डीए मिळावा यासाठी नंदू आंबोकर यांच्यासह सुधीर पाटील,अप्पा चव्हाण,एल.जी.नाईक यांनीही प्रयत्न केले.या प्रयत्नांना लोहमार्ग आयुक्त रवींद्र शिसवे,सह पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पडवळ यांची साथ लाभली.या पार्श्वभूमीवर विक्रोळीत संदेश विद्यालयात हिंदुस्थान कंपोजिटसच्या कामगारांची एक बैठक  झाली. थकीत डीएचा लढा ३० वर्षे औद्योगिक न्यायालय, उच्च न्यायालयात चालूनही यावर काही निर्णय होईना शेवटी संतप्त कामगारांनी हा लढा आऊट ऑफ कोर्ट सोडवावा, कोर्टाबाहेर सोडवावा अशी भूमिका विक्रोळीच्या बैठकीत घेतली.त्यानंतर आंबोकर यांच्यासह सर्व प्रयत्नकारांनी हिंदुस्थान कंपोजिटसच्या मालकांशी चर्चा केली.त्यावेळी मालकही कोर्टाबाहेर यावर तोडगा काढण्यात तयार झाले. त्यानुसार सुवर्णमध्य काढून प्रत्येक  कामगाराला,मृत कामगारांच्या वारसाला ही डीएची रक्कम त्यांनी केलेल्या सेवा वर्षानुसार मिळणार आहे. ३० वर्षांच्या लढ्यानंतर हे पैसे मिळत आहे,ही आम्हा सर्व कामगारांच्या दृष्टीने निश्चितच आनंदाची गोष्ट आहे,असे नंदू आंबोकर यांनी सांगितले. या कार्यक्रमास आमदार सुनिल राऊत यांचे विशेष सहकार्य लाभलेले आहे.

सुधागड तालुका आमदार सन्मान चषक

श्री स्वयंभु हनुमान क्रीडा मंडळ चिवे संघ विजेता ठाणे ः भारतीय जनता पार्टी ठाणे शहर व सन्मान फाउंडेशन आयोजित सुधागड तालुका स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आमदार चषक रविवारी कॉम्रेड गोदुताई परुळेकर मैदान, चंदनवाडी येथे संपन्न झाली. दिवसभरात 32 संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामना चिवे विरुद्ध झाप असा रंगला. अतितटीच्या लढतीत चिवे – झाप अंतिम गुणफलक नोंदवून चिवे – श्री स्वयंभु हनुमान क्रीडा मंडळ या संघाने 12-11 असा विजय मिळवला. विजेता संघाला प्रथम पारितोषिक सन्मान चिन्ह व रोख 21000/- रुपये देण्यात आले. द्वितिय पारितोषिक झाप – श्री नाथभैरव क्रीडा मंडळाने पटकावत 15 हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह जिंकले. तृतीय क्रमांक पारितोषिक ओम काळभैरव आपटवणे संघ ठरला. त्यांना रोख पारितोषिक 10 हजार रुपये व सन्माचिन्ह देण्यात आले. श्री भैरवनाथ नागशेत क्रीडा मंडळ चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरला. त्यांनाही रोख पारितोषिक 10 हजार रुपये व सन्माचिन्ह देण्यात आले. विजेत्यांना आमदार संजय केळकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य राजेश मापारा, पेण सुधागड राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, वैकुंठ पाटील, शिवसेना नेते प्रकाश देसाई, परिवहन सदस्य विकास पाटील, अनिल भोईर, गणपत डिगे, प्रकाश शिलकर, आयोजक रमेश सागळे, भाजपा ठाणे शहर महिला चिटणीस रेवती सागळे, ज्ञानेश्वर यादव, यांच्यासाह सुधागड वासी मोठया संख्येने उपस्थित होते. वैयक्तिक पारितोषिकात उत्कृष्ट पकड झाप संघाचा कल्पेश देशमुख, उत्कृष्ट चढाई ओम काळभैरव आपटवणे संघाचा समाधान मोरे, पबिलक हिरो श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ नागशेत संघाचा राज बेलोसे, सर्वोत्कृष्ट खेळाडू चिवे संघाचा अमर ठाकूर ठरला. शिस्तबद्ध संघाचे पारितोषिक श्री. भैरवनाथ जोगेश्वरी आतोणे सुधागड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आमदार संजय केळकर, आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे, भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले व ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे, उद्योजक अच्युत दामले, पालीचे नगरसेवक पराग मेहता, सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष धनंजय साजेकर, माजी अध्यक्ष गणपत सितापराव, संचालक प्रा. बळीराम निंबाळकर सर, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे सल्लागार चंद्रकांत बेलोसे, उद्योजक गणेश दंत, उद्योजक चारुदत्त सावंत, ज्येष्ठ पत्रकार संतोष उतेकर, ज्येष्ठ नगरसेवक संदीप लेले, ज्येष्ठ संपादक कैलाश म्हापदी, भाजपा ठाणे शहर सरचिटणीस सचिन पाटील, उद्योेजक ओमकार साजेकर,  कल्याण-डोंबिवली सुधागड तालुका अध्यक्ष यशवंत कदम, चिवे गावचे सरपंच रोहिदास साजेकर, उद्योजक प्रवीण खाडे, उद्योजक स्वप्नील पायगुडे, टेंभीनाका शिवसेना शाखाप्रमुख निखिल बुडजडे, उद्योजक संतोष तोडकर, धीरज साजेकर, सखाराम आंबेकर, सुर्यकांत साळुंखे, भाजपा ठाणे शहर सचिव संतोष साळुंखे, भाजपा ठाणे शहर चिटणीस माधुरीताई मेटांगे, रंजना खाडे, कोकण पदवीधर संयोजक सचिन मोरे, शिवाजी दळवी, शिवसेना उपविभागप्रमुख सिद्धु यादव, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष विक्रम भोईर, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम, भार्जे गावचे सुभाष मुंडे, सुजित बारस्कर, भाजपा ओबीसी सेलचे कृष्णा भुजबळ, राजेश कवे, पी. आय. संतोष धाडवे, शिवाजी दळवी, निलेश महाडीक, महेश सितापराव, उद्योजक संजय सागळे, नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ डोंबिवली अध्यक्ष जयेश ठाकूर यांच्यासह ठाणे, रायगड, मुंबई, पुणे जिल्ह्यातून सुधागडवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आयोजक रमेश सागळे, कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, सुनिल तिडके, राकेश थोरवे, अविकांत साळुंके, जयगणेश दळवी, धनंजय खाडे, प्रविण बामणे, ज्ञानेश्वर यादव, अजित सागळे, सुधीर नेमाणे, सखाराम चव्हाण, रविंद्र चव्हाण, सुहास यादव, दत्ता यादव, गजानन केदारी, विजय जाधव, अजय जाधव, चंद्रकांत बेलोसे, दत्ता सागळे, श्याम बगडे, जनार्दन घोंगे, सुरेश शिंदे, अनिल सागळे, दिनेश बुरुमकर, गजानन जंगम, हरिश्चंद्र मालुसरे, मोहन भोईर, राम भोईर भगवान तेलेगे यांच्यासह तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. केतन म्हस्के व अलंकार मनवी यांच्या उत्कृष्ट सुत्रसंचलनाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. दिवसभरात उपस्थितांच्या मनोरंजनासाठी बल्लाळेश्वर म्युझिकल ग्रुप आणि रिदम म्युझिक अ‍ॅकेडमीच्यावतीेने मराठी वाद्यवृंदाचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गायक नथुराम शिंदे, किशोर शिलकर, समीर दंत, नुतन सावंत, प्रतिक्षा भणगे (शिलकर), ढोलकीपटु तेजस मोरे व बालशाहीर – गायक सौजस मोरे यांनी सुमधूर गायनाने रसिकांची मने जिंकली. गायक किशोर शिलकर यांनी आयोजक रमेश सागळे यांच्या जीवनावर वैयक्तिक तयार केलेले गीत सादर केले व सौजश मोरे यांनी कबड्डडीसाठी तयार केलेले गाणे सादर केले. शेवटी आयोजक रमेश साबळे यांनी उपस्थितीत मान्यवर, सुधागड तालुका रहिवासी, ठाणेकर, खेळाडु, पंच आणि पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले.