Category: होम

सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी भारत सरकारची अभिनव पहल योजना

मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाची अंमलबजावणीसाठी कार्यवाही करा – डॉ. राजेश देशमुख अशोक गायकवाड नवी मुंबई :राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित करुन दिलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाची कोकण भवनामध्ये…

वर्ल्ड कराटे चॅम्पियनशीपमध्ये डॉ. देव इंटरनॅशनल मार्शल आर्टस ॲकॅडेमीच्या

अर्णव जाधव आणि गार्गी राऊत यांची चमकदार कामगिरी, आमदार महेंद्र थोरवे यांनी केले सन्मानित अशोक गायकवाड खालापूर : वर्ल्ड कराटे चॅम्पियनशीपमध्ये डॉ. देव इंटरनॅशनल मार्शल आर्टस ॲकॅडेमीच्या अर्णव दिपाली शैलेश…

खेळाडू गौरवाने पुण्यात खाशाबांची १००वी जयंती साजरी

पुणे : भारताचे पहिले वयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांची 100 वी जयंती बुधवारी (दि.१५) पुण्यात राष्ट्रीय क्राडापटूंचा गौरव करून साजरी करण्यात आली. वारजे येथिल आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इन्फीनिटी…

सिनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्यावतीने व लोकमान्य मंडळ माटुंगा यांच्या सहयोगाने २४ ते २७ जानेवारी २०२५ दरम्यान ओ. एन. जी. सी., भारतीय आयुर्विमा महामंडळ व इंडियन ऑईल पुरस्कृत ३२ व्या…

नवी मुंबई महानगरपालिकेचा अभिजात मराठी भाषा जागर

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने जारी केलेल्या 31 डिसेंबर 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार 14 ते 28 जानेवारी या कालावधीत सर्वत्र ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे.…

श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट कल्याण द्वारा गरजूंना धान्यकीट व चिक्की वितरण

कल्याण : श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट कल्याणच्या वतीने मंगळवारी अन्न क्षेत्रात सालाबादप्रमाणे मकरसंक्रांत  निमित्ताने यंदाही संस्था संचालक व मान्यवरांच्या हस्ते गरजू लोकांना धान्यकीट व चिक्की वितरण करण्यात आले. कल्याण पश्चिमेतील आधार वाडी जवळ येथे असलेल्या अन्न क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून दररोज गरजू लोकांना भोजन व दरमहा धान्यकीटचे वितरण करण्यात येत आहे. या संस्थाचे सेवा कार्य मानव सेवा ही प्रभु सेवा ह्या पू. डोंगरे महाराज ह्यांनी दिलेल्या सुत्रांच्या प्रेरणेने होत आहे. यासाठी रामकृष्ण सेवा संस्थाचे संचालक जसु चंदाराणा,  विनु तन्ना मेहेनत घेत  आहे. याकामी छबिल कारीया, मितुल देसाई,  वंश चंदाराणा, सुभाष रायचूरा, राजिव चंदाराणा, भिखू कारीया, विष्णूकुमार चौधरी, अवधूत शेट्टे, रश्मी चंदाराणा, मोनीश चंदाराणा आदी लोकं सहभागी होत आहेत.

शाळेची बस आल्याने विद्यार्थ्यांची प्रवासाची चिंता दूर

कल्याण : कल्याण पश्चिमेतील नूतन विद्यालय या शाळेसाठी प्रवासी बस आल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवासाची चिंता दूर झाली आहे. सद्यस्थितीत मराठी शाळांना लागलेल्या विद्यार्थ्यांच्या गळतीला अनेक शाळा  सामो-या जात असताना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी…

खासदार नरेश म्हस्के यांनी शिष्टमंडळासमवेत घेतली आयुक्त सौरभ राव यांची भेट

ठाणे : ठाणे शहरातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा पुनर्विकास जलद गतीने व्हावा व नागरिकांना मालकी हक्काची घरे उपलब्ध व्हावीत यासाठी ठाण्यातील काही विकासकांनी खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन सादर केले…

वैश्य मेळावा, लक्ष्य 2025′ संपन्न

ठाणे : भव्य दिव्य असा `वैश्य मेळावा, लक्ष्य 2025′ हा 600 पेक्षा जास्त समाजबांधवांच्या उपस्थितीत उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. अनेक मान्यवर पाहुण्यांनी उपस्थिती  लावून मार्गदर्शन केले. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री व विद्यमान आमदार दिपक केसरकर, खासदार नरेश म्हस्के तसेच प्रसिद्ध उद्योगपती विवेक माणगांवकर, भाई कामेरकर, हनुमंत हेडे, अरुंधती भालेराव, कीर्ती गावडे, भाई शेटये, अशोक नर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर, दिपक मेजारी, रुपाली तेलवणे, संजय भाट, विष्णु सातवसे, मनोज आंग्रे, चंद्रकांत खाडये आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार नरेश म्हस्के आणि माजी मंत्री विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते सर्व समाज संस्था आणि प्रतिष्ठित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. वैश्य उद्योजक समाज बांधवांसाठी वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट चांगले कार्य करीत आहे, त्याला आमचे सर्वतोपरी सहकार्य असेल. वैश्य समाजाच्या कार्याची तोंड भरून स्तुती केली आणि कोणत्याही प्रकारचे सहकार्य लागल्यास आम्ही सोबत असू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर यांनी समाज संपन्न, समृद्ध झाला तर देश संपन्न होईल असे सांगून मान्यवरांना पुरस्कार देताना पुरस्कारामुळे प्रेरणा मिळते आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते असे सांगितले. सकाळी 8 ते  रात्री 7 पर्यंत मेळाव्याचे प्रत्येक सत्र अतिशय नीटनेटके आणि व्यवस्थित होत गेले. अनेकांचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरणारे  होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मोटिवेशनल स्पीच आणि मार्गदर्शन खूपच सुंदर झाले. संपूर्ण हॉल सकाळपासून शेवटपर्यंत भरगच्च भरलेला होता, यावरूनच या कार्यक्रमाची यशस्विता सांगता येते.…

अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी मुंबईच्या दिशेने पायी कूच करणार

माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सहभागी होणार   हरिभाऊ लाखे नाशिक : अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या मागण्यांसाठी अंबड येथून गुरुवार १६ जानेवारी सकाळी ८ वाजता पायी मोर्चा मुंबईकडे रवाना होणार आहे. २२ जानेवारी रोजी राज्यपाल यांना भेटून निवेदन देणार आहोत या आंदोलनात शेवटी शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सहभागी होणार असल्याची माहिती प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिली. अंबड व सातपूर येथील सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची सुमारे 1100 हेक्टर इतकी जमीन सन 1973 ला बळजबरीने संपादित केली. त्यावेळी अनेक आश्वासने शासनाने दिली होती. एकही आश्वासनाची पूर्तता केली नाही. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या : 1994 च्या परिपत्रकातील पीएपी धोरणात बदल करण्यात यावा अंबड ग्रामस्थांना कोणत्याही मूलभूत सुविधा न देता ग्रामस्थांची असलेली गायरान जमीनही विनासंमती एमआयडीसीला देण्यात आली. ती गायरान जमीन घेण्यात येऊ नये अथवा मोठ्या उद्योगाला देण्यात यावी. एम आय डी सी व नासिक महानगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही STP v ETP प्लांट न बनवल्यामुळे उरलेली शेती नापीक झाली त्यामुळे शेती पिकत नाही. सन 1973 ला जमीन संपादित झाल्यानंतर त्यांच्या लेआउट मध्ये 4 ते 5 मीटर चे रस्ते सोडल्याने आज उरलेल्या जमिनीत अंतिम लेआउट करता येत नाही. एमआयडीसीतील अनेक पडीत भूखंडाचे छोटे छोटे तुकडे करून बिल्डर व गुंतवणूकदार यांना वाटप करण्यात येत असल्याने उद्योजकांना भूखंड मिळत नाही. अंबड चुंचाळे येथे प्रचंड नागरी वस्ती वाढल्याने गेल्या 20 वर्षापासून मागणी असलेले नवीन स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर करण्यात यावे. एमआयडीसीत अनेक भूखंडावर बेकायदेशीर पोटभाडेकरू व बेकायदेशीर भूखंडाचा वापर थांबविण्यात यावा. अशा विविध मागण्यांबाबत शासनाने दखल घ्यावी यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचे स्वरूप मोर्चेकरी साधारणता 100 ते 125 प्रकल्पग्रस्त शेतकरी असतील सुरुवात दिनांक 16/1/2025 पासून अंबड येथून 1) 16/1/25 मुक्काम 1ला घोटीच्या आसपास 2) 17/1/25 मुक्काम 2रा कसारा खर्डीच्या आसपास…