Category: होम

ठाणे महानगरपालिकेतर्फे साजरा होणार मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

डॉ. निर्मोही फडके यांच्या व्याख्यानाने होणार उद्घाटन ठाणे  : राज्यभरात १४ जानेवारी ते २८ जानेवारी, २०२५ हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने ठाणे महानगरपालिकेतही विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मंगळवार, १४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे होणार आहे. त्यानंतर, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी डॉ. निर्मोही फडके यांचे ‘जगू मराठीचे रंगी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. पंधरवड्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी सोमवारी, कै. नरेंद्र बल्लाळ हॉल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी उपस्थित होते. ग्रंथदिंडी व पुस्तक प्रदर्शन या पंधरवड्यात, सोमवार, २० जानेवारी रोजी स. १०.३० ते स. ११.३० या वेळेत महापालिका भवन ते परमार्थ निकेतन ते ज्ञानराज सभागृह ते महापालिका भवन अशी ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर, प्राच्य विद्या संस्थेच्या सहकार्याने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे जुन्या आणि नवीन पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. त्याचवेळी, सभागृहात सुलेखनकार अच्युत पालव यांचे सुलेखन पाहण्याची संधी मिळेल. पुस्तक प्रदर्शनात जुन्या पुस्तकांसह कोश, रामायण, महाभारत यांचे खंड पाहता येतील. तसेच, पुस्तक विक्रीचे स्टॉलही यावेळी ठेवण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी सोमवार, २० आणि मंगळवार २१ रोजी स. १० ते सायं. ६ वाजेपर्यंत खुले राहील. महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या स्पर्धा बुधवार, २२ जानेवारी रोजी महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी निबंध, सुलेखन (हस्ताक्षर), शुद्धलेखन आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या पंधरवड्याच्या काळात, शिक्षण विभागातर्फेही शालेय स्तरावर विविध स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात येणार आहे प्रा. प्रवीण दवणे यांचे व्याख्यान आणि समारोप मंगळवार, २८ जानेवारी रोजी पंधरवड्याचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ केै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात होईल. त्यात, महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शालेय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिेके देण्यात येतील. त्यानंतर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांचे मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान होईल. हे व्याख्यान सर्व नागरिकांसाठीही खुले आहे.

 माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त

 दोन कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ कल्याण : ऑल इंडिया केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष, माजी आमदार जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त २ कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण कल्याण पूर्व विजयनगर परिसरात करण्यात आले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये गेले तीन वर्षे प्रशासकीय राजवट सुरू असून नगरसेवकांना जनतेच्या कामाची पूर्तता करण्यासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याने, शिवसेना नगरसेविका माधुरी प्रशांत, शिवसेना संपर्कप्रमुख, निरीक्षक कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र प्रमुख  प्रशांत काळे  यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनात परिस्थिती आणून जनतेच्या विकास कामासाठी 2 कोटी  निधी उपलब्ध करून आणला.  त्यातील बहुतांशी कामे पूर्ण होऊन त्याचे रविवारी स्थानिक कार्यकर्ते यांच्या हस्ते प्रशांत काळे आणि माधुरी काळे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. पोहच रस्ता, पेव्हर ब्लॉक, सिमेंट काँक्रीट रस्ते, पाणी योजना अश्या अनेक केलेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. याबाबत प्रशांत काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानून, आपल्या पाठीशी उभे राहणारे नागरिक यांच्यासाठी आपण सदैव विकास कामांसाठी बांधील असल्याचे सांगितले. यावेळेस शिवसेनेचे विभाग प्रमुख सत्यवान खेडेकर, संतोष साळवी, अनंत आंब्रे, विभाग संघटक प्रशांत मांजरेकर, दिलीप कोल्हे, विशाल विरा, विभाग समन्वयक महेंद एटमे, उपविभाग प्रमुख संभाजी माने, भगवान सोंडकर, शाखाप्रमुख विशाल वाघमारे, प्रदीप तांबे, उपशाखाप्रमुख विकास गुरव, अतुल वाघमारे, सुरेंद्र मोरे, प्रमोद लाड, अमर मलाह, नंदकिशोर सुरकुतवार, राजाराम पठारे, साहेबराव आहिरे आणि मोठ्या संख्येने महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. 00000

 ठाणे व डोंबिवली परिक्षेत्रामध्ये 22 ठिकाणी भक्तीपर्व समागम संपन्न

परमात्म्याशी एकरुपता हाच खऱ्या भक्तीचा आधार – निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज कल्याण : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत निरंकारी मिशनच्या वतीने देशभरात रविवारी भक्ती पर्वाचे आयोजन करण्यात आले. भक्ती पर्व संत समागमाचा मुख्य कार्यक्रम सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेमध्ये संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथे संपन्न झाला. भक्तीपर्वाच्या निमित्ताने ठाणे शहर आणि कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, बदलापुर परिसरामध्ये एकंदर 22 ठिकाणी विशेष सत्संग समारोहांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये हजारोंच्या संख्येने स्थानिक भक्तगणांनी भाग घेतला. समालखा येथील भक्तीपर्व संत समागमामध्ये सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित विशाल जनसमुदायाला संबोधित करताना प्रतिपादन केले, की “भक्ती अशी अवस्था आहे जी जीवनाला दिव्यत्व आणि आनंदाने ओतप्रोत करते. हा इच्छापुर्तीचा सौदा नाही किंवा स्वार्थाचे माध्यमही नाही. खऱ्या भक्तीचा अर्थ आहे परमात्म्याशी गहिरे नाते आणि निःस्वार्थ प्रेम।” याप्रसंगी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात श्रद्धा व भक्तिची अनुपम छटा पहायला मिळाली. दिल्ली, एन.सी.आर.सहित देश-विदेशातील हजारों भाविक-भक्तगणांनी या दिव्य समागमामध्ये भाग घेऊन आध्यात्मिक आनंदाची  दिव्य अनुभूती प्राप्त केली. इस पावन प्रसंगी महान संत सन्तोखसिंहजी यांच्यासह अनेक संतांच्या तप, त्याग आणि ब्रह्मज्ञानाच्या प्रचार-प्रसारामधील त्यांच्या अमूल्य योगदानांचे स्मरण केले गेले आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्यात आली. समागमा दरम्यान अनेक वक्ते, कवी व गीतकारांनी विभिन्न माध्यमातून गुरुचा महिमा आणि भक्तीभावनेचे सारगर्भित वर्ण केले आणि संतांच्या प्रेरणादायी शिकवणूकीतून भाविकांच्या जीवनातील आध्यात्मिक दृष्टीकोन समृद्ध केला. सतगुरु माताजींनी माता सविंदरजी आणि निरंकारी राजमाताजी यांचे जीवन भक्ती आणि समर्पणाचे मूर्तिमंत प्रतीक असल्याचे सांगून या दिव्य विभूतींचे जीवन हे भक्ती आणि सेवा यांचे श्रेष्ठ उदाहरण असल्याचे सांगितले. निरंकारी मिशनचा मूळ सिद्धांत हाच आहे, की भक्ती ही परमात्म तत्वाला जाणूनच सार्थक रूप घेऊ शकते. निःसंदेह सतगुरु माताजींच्या अमूल्य प्रवचनांनी भाविक भक्तगणांना जीवनात ब्रह्मज्ञानाद्वारे भक्तीचे वास्तविक महत्व समजण्याची आणि अंगीकारण्याची प्रेरणा मिळाली.

महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई : शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा कऱण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या नाविन्यपूर्ण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल महावितरण आणि एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड कंपनीला शनिवारी बेळगाव येथे आयपीपीएआय…

 ज्योती म्हापसेकर यांना ‘एकता जीवन गौरव’ पुरस्कार’

डॉ. श्यामल गरुड, जादीश भोवड यांचाही होणार सन्मान मुंबई : मुंबई एकता कल्चर संस्थेतर्फे देण्यात येणारे 2024 –  25 च्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात नाटककार तसेच स्त्री मुक्ती चळवळीच्या सक्षम योगदानाबद्दल ज्योती म्हापसेकर यांना या वर्षीचा एकता जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. लेखिका डॉ. शामल गरुड, कवयित्री डॉ. योगिता राजकर, नंदलाल रेळे, कवी गीतेश शिंदे, पत्रकार जगदीश भोवड तसेच दिनेश राणे, आनंद खरात यांचाही पुरस्कार प्राप्त नामवंतांमध्ये समावेश आहे. ज्येष्ठ कवी अजय कांडर,  स्त्री मुक्ती चळवळीतील कार्यकर्त्या, कवयित्री योगिनी राऊळ आणि पत्रकार – कवी भगवान निळे यांच्या निवड समितीने यावर्षीच्या पुरस्कार विजेत्यांची एकमताने निवड केली आहे. 18 जानेवारी रोजी मुंबई गिरगाव येथील साहित्य संघात होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात सर्व पुरस्कार विजेत्यांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती एकता कल्चर अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी दिली. एकता कल्चर पुरस्कार सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे – ‘स्त्री मुक्ती चळवळीतील’ मान्यवर नेत्या ज्योती म्हापसेकर – (एकता जीवन गौरव पुरस्कार), नंदलाल रेळे – ध्वनी संकलन- उज्जय आंबेकर पुरस्कृत मधु आंबेकर स्मरणार्थ नटवर्य (भालचंद्र पेंढारकर स्मृती पुरस्कार), योगिता राजकर – साहित्य- कवी प्रकाश गणपत जाधव पुरस्कृत गणपत गुणाजी जाधव स्मरणार्थ (नारायण सुर्वे स्मृति पुरस्कार कविता संग्रह – बाईपण ),  डॉ. शामल गरुड – साहित्य- (रजनी परुळेकर स्मृती विशेष पुरस्कार), नारायण गिरप – साहित्य – राजेश जाधव पुरस्कृत (काशिनाथ गणपत बेनकर स्मरणार्थ नारायण पेंडणेकर स्मृती पुरस्कार) ॲड. प्रियांका संदीप संगारे – विधि- मनोज संसारे स्मरणार्थ (संत जनाबाई स्मृती पुरस्कार), मनोज मस्के – नृत्य नीलांबरी उज्जय आंबेकर पुरस्कृत सहदेव बाबाजी लोखंडे स्मरणार्थ (सुबल सरकार स्मृती पुरस्कार), अनुजा कासारे -शैक्षणिक – पल्लवी शिंदे माने पुरस्कृत कांचन रघुनाथ शिंदे स्मरणार्थ (सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार), सुधाकर कदम – संगीत (पंडित कुमार गंधर्व स्मृति पुरस्कार), गीतेश शिंदे -प्रकाशक- रजनी संदीप बेनकर पुरस्कृत (यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार), जगदीश भोवड – पत्रकारिता – वैशाली बाळाराम कासारे स्मणार्थ (जयंत पवार स्मृती पुरस्कार), डॉ. रश्मीन केनिया-वैद्यकीय (डॉ. नितू मांडके स्मृती पुरस्कार) आदींना पुरस्कार घोषित करण्यात आले असून समाजसेवेचे पुरस्कार सर्वश्री आनंद खरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार, दिनेश राणे -प्रकाश पाटील पुरस्कृत महात्मा (ज्योतिबा फुले स्मृती पुरस्कार), विजय भगते –  रमेश गणपत जाधव स्मरणार्थ (बाबा आमटे स्मृती पुरस्कार), विद्या दयानंद काट्रे – प्रियंका प्रकाश जाधव पुरस्कृत सुनंदा गणपत जाधव स्मरणार्थ (रमाबाई आंबेडकर स्मृती पुरस्कार), प्रकाश सोनावणे-नितीन कांबळे पुरस्कृत चंद्रमणी भिकाजी कांबळे स्मरणार्थ (संत गाडगेबाबा स्मृती पुरस्कार), किसन पेडणेकर – (सिंधुताई सपकाळ स्मृती पुरस्कार), अरुण सबनीस- गंगाधर म्हात्रे पुरस्कृत  जनार्धन म्हात्रे स्मरणार्थ (बिरसा मुंडा स्मृती पुरस्कार), शरद जाधव- (भंन्ते महाथेरो स्मृती पुरस्कार), डॉ. अरुण भगत- (स्वामी विवेकानंद स्मुर्ती पुरस्कार) यांना जाहीर करण्यात आले. ‘एकता महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे, नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’चे सल्लागार व ‘ऑस्कर अकादमीच्या निवड समितीतील ज्युरी उज्वल निरगुडकर यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण शनिवार ,१८ जानेवारी सायंकाळी ४:०० वाजता गिरगाव येथील मुंबई मराठी साहित्य संघ नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात एकता महोत्सवाचा सांगता सोहळा आणि पुरस्कार व पारितोषिके वितरण समारंभ संपन्न होणार आहे अशीही माहिती एकताचे उपाध्यक्ष उज्जय आंबेकर, एकताचे सचिव प्रकाश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

भारतातील पहिली संकल्पना गाडगेबाबांच्या धर्मशाळेत

रमेश औताडे मुंबई : ज्या गोरगरीब रुग्णांना मुंबईत येऊन उपचार घेण्याची वेळ येत होती त्यांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय त्या वेळी श्री संत गाडगे महाराजांनी ओळखून जी धर्मशाळा उभी केली त्या धर्मशाळा वास्तूचे आता लवकरच नऊ मजल्यात रूपांतर होणार असून रुग्णवाहिका घेऊन आलेल्या चालकांच्या राहण्याची सोय इथे केली जाणार आहे. भारतातील हि पहिली संकल्पना असणार आहे. अशी माहिती श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट चे प्रमुख विश्वस्त हेमंत सुधाकर सामंत यांनी दिली. मुंबईतील परळच्या केईएम रुग्णालयासमोर असणारी ही धर्मशाळा आता ४५ रूम असणारी नवीन इमारत होणार आहे. त्याच्या बेसमेंटला रुग्णवाहिका पार्किंग करण्याची जागा ठेवली जाणार आहे. शिवाय रुग्णवाहिका घेऊन आलेल्या चालकाच्या राहण्याची सोय केली जाईल. या धर्मशाळेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ५० रुपयांत राहण्याची सोय उपलब्ध होते. दोन वेळचे शिजवलेले अन्नदेखील मिळते. झोपण्यासाठी अंथरुण, पांघरूण आणि खाटदेखील दिली जाते. जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघराची सुविधा देण्यात आली आहे. ही सर्व सुविधा फक्त ५० रुपयांत दिली जात असल्याने रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाइकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसते. २८ फेब्रुवारी १९९३ रोजी या धर्मशाळेचे भूमिपूजन झाले. सात वर्षांनी इमारतरूपी ही धर्मशाळा उभी झाली. या संस्थेचे कार्यक्षेत्र रुग्णांच्या नातेवाइकांच्या राहण्याच्या सोयीवर लक्ष केंद्रित असूनही त्यांना भोजन देणे, दूध आणि फळे देणे, महाग औषधे असतील तर त्यासाठी काही दात्यांचा शोध घेणे, वैद्यकीय शिबिरे भरवणे, भुकेलेल्यांना अन्नदान करणे अशा अनेक उपक्रमांतून धर्मशाळेचा अखंड प्रवास सुरू आहे. परळ येथील संत गाडगे महाराज धर्मशाळेत दिवसाला १०० लोक राहण्याची सोय आहे. या धर्मशाळेत १६ रूम असून, वर्षाला जवळपास साडेतीन हजार रुग्णांची सोय केली जाते. कर्करोगग्रस्त लहान मुलांना अनेक महिने इथेच राहावे लागते. त्यांचे आई-वडील अनेकदा त्यांना पदपथावर झोपवतात. केईएम, वाडिया आणि टाटा या तीन महत्त्वाच्या रुग्णालयांतील रुग्णांसाठी ही धर्मशाळा खरंच आधार बनली आहे. मुलांना मनोरंजन म्हणून टीव्हीचीदेखील सोय आहे. या वास्तूची निर्मिती गुणवंतराव चराटे यांनी केली. स्वच्छतेवर भर देत आजही पंढरपूरच्या दिंडीत जवळपास ४०० ते ५०० स्वच्छता कर्मचारी सहभागी होतात. तिथला संपूर्ण परिसर स्वच्छ करतात, असेही सामंत यांनी सांगितले. 00000

मुलुंडमधील आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

मुंबई : माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुलुंडमध्ये नुकताच ममता दिन साजरा करण्यात आला.यानिमित्त शिवसेना मुलुंड विधानसभा क्षेत्रातील ठाकरे शिवसेनेच्या   शाखा क्रं १०८ व  फँमिली प्लॅनिग असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई  तर्फे महिलां पुरुषांसाठी…

कोकणी-मालवणी माणूसच मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही

सुनील प्रभू यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई : लवकरच मुंबई महानगरपालिका निवडणुका होतील. मुंबई ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे, शिवसेनेचीच आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेवर कोकणी मालवणी माणूसच भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते, विधानसभेतील शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी काल रात्री विश्वास व्यक्त केला तर दादरमध्ये सगळ्या जत्रा होतात पण मालवणी जत्रोत्सव होत नाही, अशी खंत व्यक्त करुन माहीमचे आमदार, विभागप्रमुख महेश सावंत यांनी दादरमध्ये मालवणी जत्रोत्सव भरविण्याचे सूतोवाच केले. बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील कै अनंतराव भोसले मैदानावर शिवसेना शाखा क्रमांक १४ आयोजित आणि शिवसेना शाखा क्रमांक १२ तसेच मागाठाणे मित्र मंडळाच्या सहकार्याने मालवणी महोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. या महोत्सवाची सांगता काल रात्री शिवसेना नेते प्रतोद सुनील प्रभू आणि आमदार महेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी या दोघांनी आयोजकांचे कौतुक करतांना कोकणी मालवणी चाकरमान्यांनी ओसंडून वाहणारे मैदान हीच खरी शिवसेना असल्याचे सांगितले. कोकणी माणूस आणि शिवसेना वेगळी करताच येणार नाही. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खऱ्या अर्थाने कोकणी मालवणी माणसाने पुढे नेण्याचे काम केले आहे. या मालवणी महोत्सवामुळेच कोकणी माणसाला शिवसेनेने बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे, असेही सुनील प्रभू यांनी सांगितले. उत्सव प्रमुख नंदकुमार मोरे यांच्या सह सर्वच पदाधिकाऱ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांच्या हस्ते मालवणी महोत्सव आणि देव गिरोबा मंदिर उभारणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. शिवसेना शाखा क्रमांक १४, १२ चे सर्व पदाधिकारी, मागाठाणे मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी हा महोत्सव यशस्वी केला. प्रभू आणि सावंत या आमदारांनी सर्वांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत त्यांना शुभेच्छा दिल्या.

१९७२ साली अकरावी उत्तीर्ण झालेल्यांची आदिवासी शाळांमध्ये घसघशीत मदत

– सत्तरी गाठलेल्या ‘मुली मुलां’चा उत्साह कौतुकास्पद ठाणे, दि. (प्रतिनिधी) : अंबरनाथ येथील दि एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालय येथे १९७२ साली अकरावी (जुनी) शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी समाज माध्यमाद्वारे एकत्र येऊन ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात सुमारे सहा शाळांना भेट दिली आणि तेथील मुली, मुले आणि शिक्षक तसेच शाळांना घसघशीत सहाय्य केले. सत्तरी ओलांडलेल्या या विद्यार्थ्यांच्या विधायक कार्याचे कौतुक करण्यात येत आहे. समाज माध्यमावर ‘आम्ही १९७२चे विद्यार्थी’ असा समूह काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. या माध्यमातून १९७२ साली जुनी अकरावी उत्तीर्ण झालेल्या सुमारे ५४ मुली आणि मुलांनी (आज मितीस सत्तरीत असलेल्या) एकत्र येऊन काही विधायक उपक्रम हाती घेतले. या उपक्रमांचा एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अंदाड येथे भेट दिली. ‌विशेष म्हणजे दि एज्युकेशन सोसायटीच्या अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालय या शाळेचीच शाखा अंदाड येथे असून सौ. दीपिका विशे या मुख्याध्यापिका आहेत.   त्यानंतर अंदाड येथे प्रवीण शिर्के मुख्याध्यापक असलेल्या  शाळेला भेट दिली. यानंतर  हीव, सपाटपाडा, मानिचा पाडा येथील शाळांना भेटी दिल्या. या ठिकाणी मडके, कुंदे, चौधरी, हुलावळे, पाटील असे शिक्षक आदिवासी मुले मुलींना आधुनिक जगाशी स्पर्धा करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. पाटी, पेन्सिल, कंपॉस, वह्या, चित्रकला वह्या, रंग, खोडरबर, शाळेसाठी आवश्यक असलेल्या वस्तू, सतरंजी पट्ट्या, रोख रक्कम अशाप्रकारे सहाय्य करण्यात आले. मुख्याध्यापक, शिक्षिका, शिक्षक, कर्मचारी, गणवेशातील मुली, मुले यांनी अतीशय शिस्तबद्ध पद्धतीने या सत्तरीतल्या मुली मुलांचे प्रेमादराने स्वागत केले. रमेश कुर्जेकर, भारती सातघरे, भारती चव्हाण, ज्योती तावडे, सिद्धार्थ पुराणिक, सरोजिनी राणे, नीलांबरी गुप्ते, प्रतिभा धर्माधिकारी, प्रकाश मावळणकर, रत्नाकर कोर्डे, अनघा पोतनीस, संजीव पोतनीस, विजय औटी, दिगंबर वेर्णेकर यांचा या १९७२ च्या तुकडीत समावेश होता. भारती सातघरे, रत्नाकर कोरडे, सिद्धार्थ पुराणिक यांनी या तुकडीचे नेतृत्व करतांना मुंबईहून सर्व शालोपयोगी साहित्य आणण्यासाठी परिश्रम घेतले. उद्योजक (व विद्यार्थी) विश्वनाथ पनवेलकर यांनी ही सहकार्य केले.