Category: होम

मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा राजिनामा

ठाणे : मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी रविवारी ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजिनामा दिला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने त्यांनी राजिनामा दिल्याचे म्हटले आहे. अविनाश…

 कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत दीपोत्सव साजरा

 शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांच्या जयंतीनिमित्त दुसऱ्या वर्षीही आयोजन   राज भंडारी पनवेल : पनवेल शहरातील कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेचे संस्थापक दादासाहेब लिमये यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या परिसरात दिव्यांची रांगोळी साकारून त्यावर त्या त्या आकाराचे मातीचे दिवे ठेवत तब्बल ४१ हजारांहून अधिक दिव्यांच्या रोषणाईमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि पालकांसमवेत दीपोत्सव साजरा केला. सर्वप्रथम शाळेतील विद्येची देवता सरस्वती देवी आणि शिक्षण महर्षी तथा संस्थेचे संस्थापक दादासाहेब लिमये यांच्या प्रतिमेसमोर शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांच्याहस्ते पूजन करून शाळेच्या मैदानात साकारण्यात आलेल्या विठ्ठलाच्या प्रतिकृतीचे पूजन करण्यात आले. दादासाहेब लिमये यांच्या जयंतीनिमित्त शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांच्या संकल्पनेतून सलग दुसऱ्या वर्षीही दीपोत्सव साजरा करण्यात आला. गतवर्षी ११ हजार दिव्यांच्या रोषणाइमध्ये हा दीपोत्सव पार पडला होता. यावर्षी देखील अशाच पद्धतीने दीपोत्सव साजरा करण्याची संकल्पना मांडण्यात आल्यानंतर शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी प्रत्येक मुलांना केवळ ५ मातीच्या पणत्यांच्या दिव्यांचे योगदान देण्याचे आवाहन केले, आणि मुलांनी या दीपोत्सवासाठी उत्साह दाखवीत तब्बल ४१ हजार दिवे शाळेत जमा केले. यामध्ये संस्थेच्या वतीने ५०० लिटर तेल दीपोत्सवासाठी उपलब्ध करून देत एक आगळा वेगळा असा दीपोत्सव साजरा केला. सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीच्या कळंबोली येथील शाळेत तब्बल ११ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अत्यंत कमी शुल्क आकारून शिक्षण विद्या देणाऱ्या या शाळेत ४ भाषांच्या शाळा सुरू आहेत. ज्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांचे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असून शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची संख्या देखील जवळपास ३५० इतकी आहे. गोरगरिबांच्या मुलांना उत्तम शिक्षण देण्याची प्रतिभा डोळ्यासमोर ठेवून दादासाहेब लिमये यांनी या शिक्षणसंस्थेची स्थापना केली. ती आजही शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे जपत आहेत. यावेळी उपमुख्याध्यापक सुरेश शिंदे, पर्यवेक्षक श्रीम. पूनम कांबळे, श्रीम. अनिता पाटील, बाबुराव शिंदे, धर्मेंद्र दीक्षित, प्राथमिक विभाग प्रमुख श्री. पाटील, ज्यू. कॉलेज उपमुख्याध्यापक, संजय पाटील, अण्णासाहेब झिटे, कार्यालय प्रमुख बिना कडू, प्रसाद सहस्त्रबुद्धे, माजी विद्यार्थी अजय सूर्यवंशी, इंग्रजी विभाग प्रमुख सौ. कुलकर्णी, मराठी प्राथमिक विभागाचे मोकल आदींसह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

 युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात युवासेनेच्या भविष्यातील धोरणावर मंथन

युवासेना मिनी कॅबिनेट स्थापन करण्यावर भर देण्यात आला.   अनिल ठाणेकर ठाणे : युवासेना कोर कमिटीची महत्वपूर्ण बैठक ठाणे येथील आनंद आश्रमात पार पडली. शिवसेनेचे पक्षनेते एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात युवासेनेच्या भविष्यातील धोरणावर मंथन करण्यात आले. या बैठकीत युवासेना मिनी कॅबिनेट स्थापन करण्यावर भर देण्यात आला. या बैठकीत युवासेनेतील कोर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते. युवासेनेची आगामी दिशा आणि भूमिका ठरविण्यासाठी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. युवासेनेसाठी महत्वाचे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले. संघटनात्मक पुनर्रचना, युवकांचा सहभाग, महिलांचे सबलीकरण आणि पक्षाच्या भविष्यातील धोरणांवर विशेष भर देण्यात आला. महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये युवासेनाचा विस्तार, राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन, समुदायीक संपर्क मोहिम राबविणे तसेच सामाजिक व पर्यावरणीय विकासासाठी विशेष प्रयत्न या ठरावांमध्ये प्रामुख्याने समाविष्ट होते.विशेषत: दुर्बल घटकांतील मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देणाऱ्या युवासेना शैक्षणिक मदत कक्ष उपक्रमावर आणि शासकीय विभागांशी समन्वय साधण्यासाठी युवासेना मिनी कॅबिनेट स्थापन करण्यावर भर देण्यात आला.हे सर्व ठराव शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. महाराष्ट्राला प्रगतीशील व सर्वसमावेशक राज्य बनवणे हा त्या मागील उद्देश आहे. या दृष्टीने सर्व युवा सैनिकांनी जोमाने कामाला लागावे व प्रगतीशील महाराष्ट्र घडवण्यात आपला मोलाचा वाटा द्यावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. ००००

लोकसभा निवडणुकीत विजयोत्सव,तर विधानसभेत जनमत विरुद्ध गेल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा रडीचा डाव – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : लोकसभा निवडणुकीच्यावेळी १०. पैकी ८ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले आणि तो विजयोत्सव साजरा करण्यात आला की हा महाराष्ट्रातील जनतेचा विजय आहे.पण विधानसभेत तेच जनमत महाविकास आघाडीच्या विरुद्ध गेल्यानंतर रोज रडीचा डाव खेळण्याचे काम डॉ.जितेंद्र आव्हाड करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे. डॉ.जितेंद्र आव्हाड यांची शॉर्टटर्म  मेमरी लॉस झालेला आहे, या निष्कर्षाप्रत मी आलेलो आहे. याचक  कार्यालयामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मी सांगितले होते की, १४९ म्रंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील  २४ हजार दुबार मतदार आहेत हा सर्वप्रथम आक्षेप मी स्वतः निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नोंदविला होता. १२ हजार दुबार नावे ही १४४ कल्याण ग्रामीण मधील, १४९ म्रंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील  मध्ये आहेत. हा सर्वप्रथम आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अणि जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही नोंदविला होता. याच्याविरुद्ध आर ओ कडे तीन नावे वगळता येणार नाहीत यासाठी थयथयाट करायला कोण गेले होते ? याची शोधपत्रकारिता करावी, सीसी फूटेच तपासावे, याचे सत्य आपल्या डोळ्यासमोर येईल. जितेंद्र आव्हाड यांना स्वतःच्या विजयावर विश्वास नाहीय का ? की आपण एवढ्या मताधिक्याने कसा जिंकलो? याची शंका मनामध्ये आहे का ? आम्ही तर अत्यंत विनम्रपणे मुंब्रा कळव्यातील जनतेने जो जनादेश दिला तो स्विकारलेला आहे. जितेंद्र आव्हाड हे ईव्हीएम हॅक करुन त्यांच्या मतदारसंघांमध्ये विजयी झालेत का ? अशाप्रकारची शंका आता त्यांच्या वर्तवणुकीवरुन येत आहे.लोकसभा निवडणुकीच्यावेळी १०. पैकी ८ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले आणि तो विजयोत्सव साजरा करण्यात आला की हा महाराष्ट्रातील जनतेचा विजय आहे.पण विधानसभेत तेच जनमत महाविकास आघाडीच्या विरुद्ध गेल्यानंतर रोज रडीचा डाव खेळण्याचे काम डॉ.जितेंद्र आव्हाड करत आहेत. ईव्हीएबाबत शंका असेल तर जितेंद्र आव्हाड यांनी प्रथम राजीनामा द्यावा पोटनिवडणूक आपोआप लागेल.  मग ही निवडणूक ईव्हीएम घ्यायची की बॅलेट वर घ्यायची हे निवडणूक आयोग ठरवेल. जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएम कसे हॅक होते हे प्रत्यक्ष निवडणूक आयोगाला दाखवावे, पण त्यातुन हे देखील समोर येईल की त्यांचा विजय देखील ईव्हीएम हॅक करुन केला आहे, हे सत्य देखील जगासमोर येऊ शकते.२८८ विधानसभा जागांपैकी २४ ठिकाणी पराभूत उमेदवारांनी दुबार वीवीपॅट मोजणीचा आग्रह केला आहे. याचा अर्थ ९० लोकांना ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही. हेच यावरुन सिद्ध होते.आणि २४ ठिकाणी देखील रिकाउंटींग होईल तेव्हा त्यांना देखील विश्वास होईल की महाराष्ट्रातील जनतेने त्यांना नाकारले आहे.ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२४ -२५ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली त्या दिवसापासून महाविकास आघाडी ही योजना कशी फेल होमार ? या योजनेला पैसे मिळणार नाहीत? तसेच या योजनेच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये देखिल गेले. पण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिनही नेत्यांच्या नेतृत्वाखाली ५ महिन्यांचे इन्स्टॉलमेंट महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिबीटी ने गेले आणि ज्या महाविकास आघाडीने ह्या योजनेला विरोध केला, जे या योजनेच्या विरोधात कोर्टात गेले त्यांच्याच जाहीरनाम्यामध्ये सत्तेत आल्यानंतर ३ हजार पैसे देऊ अशा प्रकारे खोटं देखिल बोलले गेले. म्हणजे एकीकडे महाविकास आघाडीने दीड हजार रुपयांना विरोध केला, हि योजना पुढे चालणार नाही असे वक्तव्य केले, त्याच्या विरोधात मा. उच्च न्यायालयात गेले. पण त्याच महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये ३००० रुपये माता भगीनींच्या खात्यामध्ये आम्ही देऊ अशा प्रकारे ते खोटं बोलले. म्हणूनच महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींनी महाविकास आघाडीचा पराभव केला.  लाडकी बहीण योजना फेल करण्यासाठी महाविकास आघाडी कोर्टा मध्ये गेली, असे आनंद परांजपे म्हणाले. ०००

ठामपाचा नवीन विकास आराखडा कळवा – खारीगांव उद्ध्वस्त करणारा- डॉ. जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर ठाणे : महापालिकेने नवीन प्रारुप विकास आराखडा तयार केला आहे. हा विकास आराखडा विशिष्ट हेतू समोर ठेवून करण्यात आला आहे. विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, माणसे संपवून केला जाणारा विकास काय कामाचा? ठामपाच्या या विकास आराखडय़ात संपूर्ण कळवा – खारीगांव उद्ध्वस्त होणार आहे. आराखडे मंजूर असलेल्या सोसायट्यांमधून अवाढव्य रस्ते तयार करून पाचशे ते हजार इमारतींवर वरवंटा फिरवण्याचा कट आखला असून  यात तब्बल ४५ हजार रहिवाशी बेघर होणार आहेत.  कोणाच्या भल्यासाठी हा आराखडा तयार करण्यात आला आहे?  असा सवाल करून या आराखडय़ाच्या विरोधात जनआंदोलन उभे करण्याचा इशारा मुंब्रा कळव्याचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. नव्या प्रारुप विकास आराखड्यात कळवा आणि खारीगांव भागातील तब्बल १ हजारांच्या आसपास इमारती बाधीत होणार आहेत. गावठाण भागही उद्ध्वस्त होणार आहे. कळवा खाडी पुलापुढील भागात असलेल्या तीन इमारती या पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन येथील रहिवाशी बेघर होणार आहेत. कळव्यातील ४५० इमारती या विकास आराखडय़ामुळे बाधीत होणार असून खारीगावात देखील ५५० च्या आसपास इमारती बाधीत होऊन येथील तब्बल ४५ हजारांच्या आसपास कुटुंबे थेट रस्त्यावर येणार आहेत. येथील मंदिरे, मैदाने, बाधीत होत असल्याचेही डॉ. आव्हाड यांनी सांगितले. विकास आराखडा तयार करताना ज्या काही करामती केल्या आहेत; त्याचाही पर्दाफाश आपण करणार असून कावेरी सेतूची मालकी कोणाकडे आहे. त्याचा एफएसआय वापरता येतो का? ते देखील आता पाहणार असल्याचे ते म्हणाले.कळवा- खारीगांव येथील रहिवाशांना मारुन असा विकास होणार असेल तर त्याला आमचा विरोध आहे.  ठाणे महानगरपालिकेने खारीगांवमधून डीपी रोडचा प्रस्ताव टाकला आहे. हा डीपी रोड पुढे नाशिक महामागार्ला जोडला जाणार आहे. या डीपी रोडमुळे खारीगांवची मूळ संस्कृती नष्ट होणार आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या खारीगांवातील १७ रहिवासी इमारती, ग्रामपंचायतपासूनची १८ जुनी घरे तसेच खारीगांवची ग्रामदेवता जरीमरीचे प्राचीन मंदिरही या विकास आराखडय़ामुळे तोडले जाणार आहे.  त्यामुळे अशा विकास प्रस्तावाच्या विरोधात आता सर्वपक्षीय एकत्र येऊन आंदोलन उभे केले जाईल,  असा इशाराही त्यांनी दिला. तसेच लोकांना उद्ध्वस्त करणारा हा विकास आराखडा एक इंचही पुढे जाऊ दिला जाणार नाही, असेही ते म्हणाले. इथे विकास आराखड्याचा गाजावाजा केला जात आहे. मात्र कळवा, मुंब्रा या भागातील विकास आराखड्यातील रस्त्यांवरच अतिक्रमणे उभी राहत आहेत. येथील पालिका अधिकारी प्रति चौरसफुटामागे  ३०० रुपये घेऊन आपले खिसे भरत आहेत. परंतु कारवाई करण्यासाठी पालिका पुढे येत नसल्याचा आरोपही आव्हाड यांनी यावेळी केला. ००००

महापरिनिर्वाण दिनानिमित्त 5 व 6 डिसेंबरला रात्रभर लोकलसेवा सुरु ठेवा:- वर्षाताई गायकवाड

मुंबई : संविधान निर्माते महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने महामानवास अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दरवर्षी मुंबईत दाखल होत असतात. मुंबईतील चैत्यभूमी येथे लाखोंचा जनसागर भेट देत…

समीर भुजबळ यांचे राष्ट्रवादीत पुनर्वसनाचे संकेत

हरिभाऊ लाखे नाशिक : नांदगाव विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करणारे राष्ट्रवादीचे (अजित पवार) माजी पदाधिकारी समीर भुजबळ हे पराभूत झाल्यानंतर पुन्हा या पक्षाचे ज्येष्ठ नेते, काका छगन भुजबळ यांच्याबरोबर सक्रिय झाले आहेत. समीर हे सोबत होते, आहेत आणि राहतील, अशा शब्दांत काकांनी पुतण्याची पाठराखण केल्यामुळे राष्ट्रवादीत (अजित पवार) नव्याने त्यांचे पुनर्वसन होण्याचे संकेत मिळत आहेत. स्थानिक राजकारणात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. विधानसभा निवडणुकीत समीर भुजबळ हे मैदानात उतरल्याने उभयतांमध्ये पराकोटीचे मतभेद झाले होते. नांदगावमधील बंडखोरीचे पडसाद नांदगावच नव्हे तर, जिल्ह्यातील अन्य मतदारसंघात उमटले. राष्ट्रवादीच्या (अजित पवार) मुंबई शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन समीर भुजबळ यांनी नांदगावमधून अपक्ष उमेदवारी केली होती. तेव्हापासून छगन भुजबळ यांनी काहिसे अलिप्त धोरण स्वीकारत त्यांचे निवडणूक लढवणे ही बंडखोरी नसल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला. पक्षाचा राजीनामा देऊन ते निवडणूक लढत असून शिंदे गटाने देवळालीत अधिकृत उमेदवार दिल्याकडे काकांनी लक्ष वेधले होते. नांदगावमधील या उमेदवारीने कांदे-भुजबळ वाद पुन्हा उफाळून आला. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप झाले. हे वाद प्रचारासह मतदानाच्या दिवशी समर्थकांना धक्काबुक्की, धमक्यांपर्यंत गेले होते. निवडणुकीत कांदे यांनी भुजबळ यांना पराभूत करुन काका-पुतण्याला एकाचवेळी शह दिला. विधानसभा निवडणुकीआधी छगन भुजबळ यांनी पुत्र पंकज यांची विधान परिषदेवर वर्णी लावली होती. पराभूत झालेले पुतणे समीर भुजबळ यांचे पुनर्वसन आता कुठे, कसे करणार, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. गुरुवारी महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त मुंबई नाका येथे फुले स्मारकात छगन भुजबळ यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी समीर हे बरोबर होते, आहेत आणि उद्याही राहतील, अशा मोजक्याच शब्दांत काय ते सांगून टाकले.

सरस्वती मंदिर हायस्कूल आणि बंगाली एज्युकेशन सोसायटी यांच्यात रंगणार अंतिम सामना

आंतरशालेय खो-खो स्पर्धा मुंबई : सरस्वती मंदिर हायस्कूलसच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त आंतरशालेय लंगडी व खो-खो स्पर्धांचे आयोजन केले आहे माहीमच्या सरस्वती मंदिर हायस्कूल, सेनापती बापट मार्ग येथे आयोजित आंतरशालेय खो-खो स्पर्धा सुरु आहेत. पहिला उपांत्य सामना सरस्वती मंदिर हायस्कूलने अहिल्या विद्या मंदिरचा १८-१० असा एक डाव आणि ८ गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. सरस्वतीच्या खेळाडू रिया सिंगने उत्कृष्ट कामगिरी करत नाबाद १:४० मिनिटे खेळून ७ गुण मिळवले, तर राधिका कोंडुसकरने १:५० मिनिटे खेळत ३ गुणांची भर घातली. वैदवी बटावलेनेही प्रभावी खेळ करत नाबाद ३:१० मिनिटे खेळले आणि १ गुण मिळवला. दुसऱ्या बाजूला, अहिल्या विद्या मंदिरच्या अर्णवी शेंगाळेने आक्रमणात ६ गुण मिळवत एकहाती लढत दिली, मात्र तिला संघाकडून पुरेशी साथ न मिळाल्याने संघाला पराभव पत्करावा लागला. दुसरा उपांत्य सामना बंगाली एज्युकेशन सोसायटीने वाडीबंदर एमपीएस स्कूलवर १५-०४ असा एक डाव आणि ११ गुणांनी विजय मिळवला. बंगाली संघाकडून कार्तिकी कानसेने ५:३० मिनिटे खेळत ३ गुण मिळवले, सिद्धी शिंदेने ५:३० मिनिटांत ४ गुणांची कमाई केली, तर अनघा पन्हाळेने १:२० मिनिटे खेळत २ गुण मिळवले. त्यांच्या प्रभावी खेळामुळे संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. वाडीबंदर एमपीएस स्कूलकडून निधी शिगवण आणि अंकिता वाकोडे यांनी प्रत्येकी १ गुण मिळवला, परंतु संघाची एकत्रित कामगिरी अपयशी ठरली. आता अंतिम फेरीत सरस्वती मंदिर हायस्कूल आणि बंगाली एज्युकेशन सोसायटी यांच्यात चुरस पाहायला मिळेल. ००००

कामगार महर्षी आंबेकर स्मृती शालेय-कॉलेज मोफत कॅरम स्पर्धा १० डिसेंबरला

मुंबई : कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती आंतर शालेय-कॉलेज मोफत कॅरम स्पर्धा १० ते १२ डिसेंबर दरम्यान परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर…