Category: होम

मला देवाकडून कुठलाही आदेश येत नाही- राहुल गांधी

केरळ : मी वायनाडचा खासदार राहायचे की रायबरेलीचे, या संभ्रमात आहे. पण मला कुठलेही इश्वरी संकेत मिळत नाहीत. पंतप्रधान मोदींना मात्र तसे काहीसे करता येते. देवानेच पंतप्रधान मोदींना देशातील प्रमुख विमानतळे आणि वीज प्रकल्प अदानींकडे सोपवण्याचे निर्देश…

निधी वाटपात महाराष्ट्रावर अन्याय

मुंबई : महाराष्ट्रातून जीएसटीसह सर्व प्रकारच्या कर संकलनातून सर्वात जास्त निधी केंद्र सरकारकडे जमा होतो पण राज्याला निधी देताना मात्र हात आखडता घेतला जातो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे नवीन सरकार स्थापन…

२४ जूनपासून संसदेचं अधिवेशन

नवी दिल्ली : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर आता संसदेचे पहिले अधिवेशन येत्या २४ जूनपासून सुरु होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामण नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करू…

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत धुसफूस

मुंबई : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिला वर्धापन साजरा करणाऱ्या शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीतील धुसफूस एन कार्यक्रमात पहावयास मिळाली. काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन सोहळा नुकतेच अहमदनगरमध्ये पाडला. या सोहळ्यात स्टेजवर बसलेल्या नेत्यांकडून एकमेकांवर खोचक टीका…

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

जालना : अंतरवाली सराटीत उपोषणास बसलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली असून उपचार घेण्यास त्यांनी नकार दिलाय. त्यांच्या उपोषणचा आज ५ वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. राज्य सरकारने सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, मराठा समाजाला…

चार सहा महिने थांबा, राज्य सरकारच बदलतो- शरद पवार

मुंबई : “सरकारला अनुदान द्यावेच लागेल, नाही दिले तर रस्त्यावर उतरायला लागेल. चार सहा महिने थांबा मला राज्य सरकार बदलायचं आहे. निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात द्यायचा आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. लोकसभेला साथ दिली…

कुवेतमध्ये अग्नीकल्लोळ

सहा मजली इमारतीला आग; ४१ भारतीय कामगारांचा मृत्यू नवी दिल्ली : कुवेतमधिल एका निवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ४९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यात ४१ भारतीय कामगारांचा समावेश आहे. हा आकडा वाढण्याची…

महायुतीचा पुन्हा मविआशी मुकाबला

विधानपरिषदेसाठी उमेदवार ठरले; मुंबई : शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील राज्यातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी उमेदवार आज फायनल झाले. अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिमदिवशी मुंबई शिक्षक मतदार संघ वगळता उर्वरीत तीन जागांवर भाजपाप्रणित…

महिलेच्या विनयभंग प्रकरणी वसईतील महिला आक्रमक!

तहसीलदर कार्यालयात केलं शृंगार त्याग आंदोलन वसई तालुक्यातील वासळई येथे तीन दिवसापूर्वी तलाठी कार्यालयात महिलेवर  विनयभंग करण्याचा प्रयत्न तलाठ्याने केल्याच्या घटनेचे आता तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळतात. याप्रकरणी आज वसईतील महिलांनी वसई तहसीलदार कार्यालयावर मोठा मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी अनोख्या पद्धतीने शृंगार त्याग आंदोलन केले. यावेळी त्या तलाठ्यावर कठोर कारवाईची मागणी करत शासनाला शृंगार भेट देण्यात आला. यावेळीराज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठीचे निवेदन तहसीलदारांकडे देण्यात आले. या घटनेची नोंद घेत जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सदर तलाठ्याला निलंबित केल्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. फेरफार करण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा वासळई-सजेतील तलाठ्याने विनयभंग केल्याची घटना घडली असून, या तलाठी विशाल करे याला वसई पोलीसांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती. मात्र त्याची जमीनावर लगेच सुटका झाली. या प्रकरणी प्रारंभापासून वसई पोलीस आरोपीस पाठीशी घालत असल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचा निषेध आणि संबंधित तलाठ्याच्या निलंबनाच्या मागणीसाठी वसईतील महिला संघटना, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, तसेंच सामान्य वसईकरांतर्फे वसई तहसीलदार कार्यालयावर जाहीर मोर्चा काढण्यात आला. तलाठ्यावर कठोर कारवाई करण्याची आणि त्याच्या निलंबनाची मागणी यावेळी तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्याकडे महिला तर्फे करण्यात आली. तसेच राज्याचे गृहमंत्री आणि महसूलमंत्र्यांना याबाबतचे निवेदन आणि शृंगार तहसीलदार यांना देण्यात आला. त्यानंतर महिलांनी आपला मोर्चा वसई पोलीस ठाण्यावर नेला होता. त्यांनाही विनयभंग केलेल्या तलाठ्याला तातडीने जमीन कसा मिळाला अशी विचारणा केली. तर पोलिसांच्या वतीने आता तलाठ्याच्या जामीन रद्द करण्या बाबत न्यायालयात बाजू मांडणार असल्याचे आश्वासन महिलांना दिले आहे. तहसीलदार कार्यालयावर आंदोलन सुरु असतानाच जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सदर तलाठ्याला निलंबित केल्याचा फॅक्स आल्याचे सांगण्यात आले. आजच्या मोर्च्यात वसईतील सर्वच पक्षातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य डॉमनिका डाबरे, माजी नगरसेविका किरण चेंदवणकर ,वेरोनिका रिबेलो , सिता जाधव, रश्मी राव, साधना डिक्रूज, वेरोनिका डाबरे, मिलिंद खानोलकर,ऍड. सुमित डोंगरे यांच्या सह मोठ्या प्रमाणत महिला सहभागी झाल्या होत्या.

विरार पूर्व उपविभागात 10 कोटींची वीज चोरी

विरार : महावितरणच्या विरार पूर्व उपविभागात मागील एक वर्षात तब्बल 10 कोटी रुपयांची वीज चोरी पकडण्यात आली आहे. या प्रकरणी दोषी आढळलेले चार लाइनमन निलंबित करण्यात आले आहेत. यातील बहुतांश…