Category: मुंबई

Mumbai news

कोंकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत 13 उमेदवार रिंगणात

 उमेदवारांनी उमदेवारी अर्ज मागे घेतले नवी मुंबई : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या  कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी दिनांक 7 जून, 2024 पर्यंत स्वीकारण्यात आलेल्या एकूण 25 अर्ज नामनिर्देशनपत्रांची  छाननी झाल्यानंतर 12 अर्ज नामनिर्देशन मागे घेण्यात आले असून निवडणूकीच्या रिंगणात 13 उमेदवार शिल्लक राहिले आहेत.  अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे. मा.भारत निवडणूक आयोगाच्या प्रसिध्दी पत्रकान्वये महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणूकीच्या जाहिर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार अर्जांची छाननी झाल्यानंतर आज बुधवार दिनांक 12 जून 2024 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे.  नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या कालावधीत  छाननी दरम्यान एकूण 25 उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरवून स्विकृत करण्यात  आले होते.  कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून   1) ॲङ घोन्साल्वीस जिमीम मॅतेस 2) निलिमा निरंजन डावखरे  3) केदार शिवकुमार काळे 4)  संजय भाऊराव मोरे 5) अस्मा जावेद चिखलेकर, 6) डॉ.प्रकाश पाडूरंग भांगरथ 7) अंकिता कुलदीप वर्तक, 8) अमित जयसिंग सारिया 9) किशोर ओतरमल जैन, 10) डॉ.भगवान अभिमानसिंग रजपूत 11) प्रा.राजेश संभाजी सोनावणे, 12) अमोल रतन गौतम जगताप असे एकूण 12 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या 13 झाली आहे. ते पुढील प्रमाणे  1) कीर रमेश श्रीधर, इंडियन नॅशनल काँग्रेस 2) डावखरे निरंजन वसंत, भारतीय जनता पार्टी 3) विश्वजित तुळशीराम खंडारे, भीमसेना  4) अमोल अनंत पवार, अपक्ष  5) अरुण भिकण भोई (प्राचार्य),अपक्ष 6) अक्षय महेश म्हात्रे, अपक्ष 7) गोकुळ रामजी पाटील, अपक्ष  8) जयपाल परशूराम पाटील, अपक्ष  9) नागेश किसनराव निमकर,अपक्ष  10) प्रकाश वड्डेपेल्ली, अपक्ष 11)  मिलिंद सिताराम पाटील, अपक्ष 12) ॲड. शैलेश अशोक वाघमारे, अपक्ष 13) श्रीकांत सिध्देश्वर कामुर्ती,अपक्ष असे आहेत. कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान बुधवार 26  जून 2024 रोजी  सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत या वेळेत होणार आहे.  अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य) अमोल यादव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. 000000

पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या- एकनाथ शिंदे

 अशोक गायकवाड मुंबई:तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. राज्यातही शासन शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे, असे सांगून केंद्रीय कृषी मूल्य व किंमत…

नीट परिक्षाच रद्द करा- पटोले

मुंबई : नीट परिक्षेत झालेल्या भ्रष्टाचाराची सीबीआय मार्फत चौकशी करून दोषींना शिक्षा केली पाहिजे आणि ही परिक्षाच रद्द करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. नीट परिक्षेत घोटाळा झालेला…

धरणक्षेत्र अजूनही कोरडीच… दमदार पावसाची प्रतीक्षा

मुंबई : मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. धरणांमध्ये मंगळवारी ५.६४ टक्के पाणीसाठा होता. मुंबईत गेले दोन – तीन दिवस संध्याकाळी पाऊस पडत असला…

कांद्याने रडवल्याची मुख्यमंत्र्यांची कबूली

मुंबई : लोकसभा निवडणूकीत संविधान बदलणार हे सांगण्यात आलं, चारशे पारचा नारा देण्यात आला, लोकांनी हे डोक्यात ठेवलं आणि गडबड झाली त्यात कांद्याच्या निर्यातीवरून झालेला घोळ होताच या कांद्याने आम्हाला रडवले अशी कबुली…

‘आषाढी वारी’साठी यंदा ५००० बसेस सोडणार

मुंबई : विधानसभा निवडणूकीपुर्वी आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव होणार असून भाविकांना कोणताही तास होऊ नये यासाठी सरकारने आतापासूनच कंबर कसली आहे. पंढरीच्या वाराची तयारीही प्रशासनाकडून सुरू झली आहे. आषाढी  यात्रेनिमित्त…

सरसंघचालकांनी मणिपूर दंगलीवरून भाजपाची केली कानउघडणी

नागपुर : मणिपूर दंगलीवरून सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपाची कानउघडणी केली आहे. ईशान्येकडील मणिपूर हे राज्य गेल्या एक वर्षापासून हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. मणीपूर जळत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथे जाऊन…

लालबागच्या राजाचे पाद्यपूजन

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपले ९१ वे वर्ष साजरे करीत आहे. लालबागच्या राजाचे ९१ व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन मंगळवारी सकाळी ६.०० वाजता मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे…

लोकसभेचा निकाल महायुतीचा  ‘निकाल’ लावणारा !

स्वाती घोसाळकर मुंबई: लोकसभा निवडणूक संपून देशात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. पण लोकसभेच्या या निकालानंतर महाराष्ट्रात मात्र भाजपाप्रणीत महायुतीचा पुरता निकाल लागल्याचे चित्र आहे. लोकसभेतील निकालानुसार विधानसभा क्षेत्रातील मतांची…

डॉ. राजेश मढवी यांच्या वाढदिवानिमित्त गरीब गरजूंना शैक्षणिक साहित्याचे वाटप

  मुंबई : १० जून वाढदिवसाचे औचित्य साधून टाटा कॅन्सर हॉस्पिटल परळ येथील रुग्ण व नातेवाईक यांच्यासाठी स्वामी समर्थ संस्था ठाणे व बृहन्मुंबई  पोलिस यांच्या सहकार्याने समाजसेवक ठाणे भाजपा उपाध्यक्ष…