Category: मुंबई

Mumbai news

शिवसेना कुणाची ….?

लोकसभा निवडणूकीच्या महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील निवडणूकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब वांद्रे येथे मतदान केले. आणि ज्यांच्यामुळे ठाकरे माजी मुख्यमंत्री बनले त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सहकुटुंब…

इतिहासात पहिल्यादांच ठाकरेंनी दिले ‘पंजा’ला मत

मुंबई : यंदाची लोकसभा निवडणूक अतिशय खास आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय बदल आपण पाहू शकत आहोत. दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना अशा प्रकारचं राजकारण पहिल्यांदाच महाराष्ट्र अनुभवत आहे. यातच यंदा इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील कोणीतरी जाहीरपणे काँग्रेसला मतदान केल्या असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रामध्ये आज पाचव्या टप्प्यातील लोकसभेचे मतदान होत असून मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. यामध्ये मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई ईशान्य आणि मुंबई उत्तर पश्चिम या मतदार संघाचा समावेश आहे. मातोश्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. हे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघांमध्ये येते. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट किंवा शिवसेना एकनाथ शिंदे गट या दोघांचाही उमेदवार नाही. या ठिकाणी काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली असून भारतीय जनता पक्षाने उज्जवल निकम यांना संधी दिली आहे. अशावेळी जनता कोणाला साथ देते हे पाहणं अतिशय उत्सुकतेच असणार आहे. तर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असून ते यंदा काँग्रेसला मतदान करतील असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. यामुळे इतिहासात पहिल्यांदा काँग्रेसच्या हाताला ठाकरेंच मत मिळाल अस चित्र आहे. असं जरी असलं तरी दुसरीकडे दक्षिण मध्य मतदारसंघांमध्ये राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याने राज ठाकरेंनी धनुष्यबाणाला म्हणजेच राहुल शेवाळेंना मतं दिले असल्याची चर्चा आहे. अशावेळी एका ठाकरेंनी धनुष्यबाणाला तर दुसऱ्या ठाकरेंनी हाताला मत दिलं असल्याचं म्हटले जात आहे. या गोष्टीची चर्चा दिवसभर मुंबई सह राज्यामध्ये पाहिला मिळाली.

एमबीए सीईटीचा निकाल जाहीर

मुंबई : सीईटी सेलने एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. सीईटी कक्षामार्फत ९ ते ११ मार्च राज्य व राज्याबाहेरील परीक्षा केंद्रावर घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एक लाख ५२ हजार ९९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १७८ परीक्षा केंद्रावर एक लाख ३८ हजार ६८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. सीईटी सेलच्या वतीने यावर्षी परीक्षेसंदर्भात आक्षेप नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. यामध्ये ४१५ विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवले होते. त्यापैकी (युनिक) आक्षेप ९९ होते. सर्व आक्षेपांचे निराकरण करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लॉगइनमध्ये गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली होती. दरम्यान, सीईटी सेलच्या वतीने १३ परीक्षा आतापर्यंत झाल्या आहेत. यापैकी १० अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये बीएड, एमएड, बीपीएड, एमपीएड, लॉ पाच वर्षे आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर झालेला आहे.

काजल आणि फहिमला अंतिम जेतेपद

मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व लोकमान्य मंडळ, माटुंगा यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बँक्वेट हॉल, लोकमान्य नगर, माटुंगा ( पश्चिम ) येथे सुरु असलेल्या मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात शिवतारा कॅरम क्लबच्या फहिम काझीने मुंबई महानगरपालिकेच्या विकास धारियावर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ०-२५, २०-१०, २५-११ असे नमवून विजेतेपद पटकाविले. तर दुसरीकडे आपल्या अनुभवाच्या जोरावर इंडियन ऑईलच्या काजल कुमारीने प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या पोस्ट ऑफिस रिक्रिएशन क्लबच्या रिंकी कुमारीचा २५-१, २५-१३ असा सहज पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. विजेत्यांना लोकमान्य मंडळाचे कार्याध्यक्ष मनोहर गोडसे, लोकमान्य नगरचे कार्याध्यक्ष सुहास बेडेकर, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष धनंजय पवार, उपाध्यक्ष केतन चिखले, मानद सरचिटणीस अरुण केदार व सहसचिव संजय बर्वे यांच्या हस्ते रोख पारितोषिक, चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पुरुष एकेरी गटाचे उप उपांत्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे विकास धारिया ( मुंबई महानगरपालिका ) वि वि ओमकार टिळक ( ए. के. फाउंडेशन ) ५-२३, १८-१७, १९-५ फहिम काझी ( शिवतारा कॅरम क्लब ) वि वि प्रशांत मोरे ( रिझर्व बँक ) २५-८, ०-२५, २५-१२ महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे काजल कुमारी ( इंडियन ऑइल ) वि वि वैभवी शेवाळे ( डी. के. सी. सी.) २०-२, २५-० रिंकी कुमारी ( पोस्ट ऑफिस रिक्रिएशन क्लब ) वि वि अंबिका हरिथ ( रिझर्व्ह बँक )  ०-२५, १९-१४, २२-०

मतदानाचा हक्क बजावणे झाले शक्य

मतदानाच्या दिवशी नवमतदारांना मिळाले मतदार ओळखपत्र मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात २० मे रोजी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या भागात मतदान सुरू झाले. मात्र निवडणूक आयोगाकडून मतदार ओळखपत्र न मिळाल्याने अनेक नवमतदारांचा हिरमोड झाला. परंतु पोस्टमन सोमवारी सकाळी मतदार ओळखपत्र घेऊन घरी पोहोचल्यामुळे बहुसंख्य नवमतदारांना सोमवारी मतदानाचा हक्क बजावता आला. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करता यावे यासाठी बहुसंख्य नवमतदारांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. मात्र अर्ज करण्यास विलंब झालेल्या नवमतदारांना निवडणुकीपूर्वी ते मिळू शकले नाही. मतदानाचा दिवस उजाडला तरी ओळखपत्र न मिळाल्याने नवमतदारांचा हिरमोड झाला होता. मात्र अनेक नवमतदारांचे मतदान ओळखपत्र मंगळवारी सकाळी ७ ते ११ च्या सुमारास टपाल कार्यालयामार्फत घरपोच करण्यात आले. त्यामुळे या नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावता आला. मतदार ओळखपत्र मिळावे यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर एप्रिल महिन्यात नाव नोंदणी केली होती. काही दिवसांपूर्वी मला माझा ईपीआयसी क्रमांक मिळाला. मात्र मतदार ओळखपत्र मिळाले नव्हते. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही असेच वाटले होते. परंतु टपाल कार्यालयाने सोमवारी सकाळी १० च्या सुमारास मतदान ओळखपत्र घरपोच केले. त्यामुळे मला मतदानाचा हक्क बजावता आला, असे नवमतदार आकांक्षा सकपाळ यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. निवडणूक आयोगाकडून टपाल कार्यालयांना प्राप्त झालेली मतदार ओळखपत्र २० मे रोजी दुपारी १२ पर्यंत मतदारांना सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार टपाल कार्यालयाला उपलब्ध झालेली नवमतदारांची मतदार ओळखपत्रे सकाळी ७ वाजल्यापासून मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहेत, असे पोस्टमन दिनेश धाके यांनी सांगितले.

जबाबदार नागरिकाचे कर्तव्य बजावल्याचा अभिमान

मुंबई : लोकशाहीच्या उत्सवात मतदान केंद्रावर जात नवमतदारांनीही आपले कर्तव्य बजावले. प्रथमच मतदानाचा अधिकार मिळालेल्या नवमतदारांनी मोठ्या उत्साहात सकाळच्या सत्रात मतदान केंद्रावर जात लोकशाहीच्या प्रति असलेले आपले कर्तव्य बजावले. मुंबई…

मर्यादित वाहतूक सेवेमुळे मतदारांचे हाल

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. तसेच प्रचारयात्रेमुळे काही काळ मेट्रो सेवा, अनेक ठिकाणचे रस्ते बंद केल्याने मुंबईकरांचा खोळंबा…

राज्यपाल रमेश बैस – रामबाई बैस यांचे द. मुंबईत मतदान

अशोक गायकवाड मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाअंतर्गत मलबार हिल येथील राजभवन भवन क्लब मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी राज्यपालांच्या पत्नी…

राज्यात वेळेआधीच मान्सून पोहोचणार

मुंबई : देशवासीयांना खुषखबर आहे. यंदा लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे. अंदमान निकोबार व केरळात मान्सून पोहोचण्यासाठीची आवश्यक स्थिती तयार झालीय. पूर्वमोसमी पावसाची जोरदार हजेरी अगोदरच सुरु झाली आहे. मान्सून आगमनासाठी 10 मे पासूनच…

बाळासाहेबांनी उद्धव यांना मुख्यमंत्री केलेच नसते- शिंदे

ठाणे:  शिवसेनाप्रमुखांनी उद्धव ठाकरेंना कधीच मुख्यमंत्री केले नसते, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मी किमान पाच वेळा तरी त्यांना भाजपसोबत युती करा असे सांगितले होते. त्यांना ते मान्य नव्हते. कारण मुख्यमंत्री पदावर त्यांचा…