Category: मुंबई

Mumbai news

मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचा कधीच आग्रह नव्हता – शरद पवार

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार करीत असलेल्या उद्धव ठाकरेंना स्वता मुख्यमंत्री व्हायचे होते या आरोपांना राष्ट्रवादीच्या शरद पवार यांनी सनसनीत उत्तर दिले. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदासाठी कधीच आग्रह…

लोकशाहीचा उत्सव….

मुंबईतील जे जे स्कुल ऑफ आर्टस येथे निवडणूकीची साधने ताब्यात घेताना निवडणूक कर्मचारी. मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांसाठी उद्या मतदान होत आहे. (छाया संतोष नागवेकर)

शिवसेना कुणाची ? आज फैसला !

स्वाती घोसाळकर मुंबई : लोकसभेच्या महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यासाठी उद्या सोमवार २० मे रोजी मतदान होत आहे. उद्या महाराष्ट्रातील होणाऱ्या १३ लोकसभेच्या जागेपैकी मुंबई आणि ठाण्यातील लोकसभा जागेकडे अवघ्या देशाचे लक्ष…

पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी एसटीच्या १,१६१, तर बेस्टच्या ६२९ बस धावणार

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होत असून निवडणूक कर्मचारी, सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी; तसेच मतदान यंत्र, साहित्य मतदान केंद्रात सोडण्याचे आणि मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परत घेऊन येण्यासाठी एसटी, बेस्ट बस धावणार आहेत. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात बेस्ट बसच्या ६२९ बस धावणार असून, एसटीच्या पाचव्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात १,१६१ बस धावतील. बेस्टच्या बसमधून दिव्यांग मतदारांना मोफत प्रवास करता येणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होत असून पहिल्या टप्प्यापासून ते पाचव्या टप्प्यांपर्यंत एसटी महामंडळाने राज्यभरात एकूण ८,९४५ बस निवडणुकीच्या कामासाठी वापरल्या. पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक २० मे रोजी एकूण १३ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यासह ठाणे, भिवंडी, कल्याण, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या मतदारसंघात मतदान होईल. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासाठी १२७ बसचे आरक्षण करण्यात येणार आहे. तर, पालघर लोकसभा मतदारसंघात २५४ बस, ठाणे, भिवंडी, कल्याण ६५ बस, नाशिक आणि दिंडोरी ५१५ बस, धुळ्यासाठी २०० बस धावणार आहेत. अशा एकूण एसटीच्या १,१६१ बस धावणार आहेत. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचवण्यासाठी बेस्ट उपक्रमाची बससेवा उपलब्ध असणार आहे. या सेवेसाठी मतदारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. तसेच ही सेवा मुंबई शहरांसह उपनगरांतही लागू आहे. मुंबई उपगनरात ३८२ बस मुंबई शहरात २१२ बस अशा एकूण ५९४ बस धावणार आहेत. तर, मुंबई शहर भागात व्हीलचेअर असलेल्या १० आणि उपनगरांत २५ अशा एकूण ३५ बस धावणार आहेत. १८ ते २० मेपर्यंत बेस्ट उपक्रमाच्या ६२९ बसगाड्या संपूर्ण मुंबईभर धावणार आहेत. एसटी महामंडळाला प्रत्येक बसमागे २४ ते ३० हजार रुपये मिळणार आहेत. तसेच बेस्ट बसलाही तेवढीच रक्कम मिळणार असल्याने एकूण महसूल कोट्यवधीच्या घरात जाण्याचा अंदाज आहे, असे बेस्ट उपक्रमातील आणि एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. २० मे रोजी मुंबईकरांचा प्रवास अवघड निवडणुकीच्या कामात बेस्ट उपक्रमातील बस उपलब्ध केल्याने २० मे रोजी मुंबईतील रस्त्यांवर बेस्ट बसची संख्या अपुरी असेल. त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी मुंबईकरांचा प्रवास अवघड होण्याची शक्यता आहे.

सलग तिस-या दिवशीही अनधिकृत होर्डिंगविरोधी  कारवाईत 10 मोठे होर्डींग निष्कासित

3 दिवसात 31 आकाराने मोठे होर्डींग हटवले – वाशीगावाजवळील अवाढव्य होर्डींगचाही समावेश नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत होर्डींगविरोधी धडक मोहीम राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सलग तिस-या दिवशीही प्रभावीपणे राबविण्यात येऊन मोठ्या आकाराचे 10 होर्डींग निष्कासित करण्यात आले. मुंबईतील घाटकोपर येथे वादळी वारे आणि अकाली पर्जन्यवृष्टी कालावधीत होर्डींग पडून घडलेल्या दुर्घटनेनंतर नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी तातडीने बैठक घेत परवाना विभाग तसेच अतिक्रमण विभागाला सतर्क राहून कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार अतिक्रमण विभागामार्फत लगेचच अनधिकृत होर्डिंग विरोधातील कारवाई सुरू करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली सर्व विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त यांच्या समुहाने धडाकेबाज कारवाई करीत पहिल्या दिवशी सायं. 6 पासून पहाटे 5 वाजेपर्यंत नमुंमपा क्षेत्रातील 15 मोठ्या आकाराचे अनधिकृत होर्डींग निष्कासित केले. दुसऱ्या दिवशीही सकाळपासून पहाटेपर्यंत अथक कारवाई करीत 6 मोठे होर्डींग हटविण्यात आले. ही अनधिकृत मोहीम तिस-या दिवशीही तितक्याच तीव्रतेने चालू ठेवत 18 मे रोजी पहाटेपर्यंत 10 मोठे होर्डींग सुरक्षितपणे निष्कासित करण्यात आले असून सलग 3 दिवसांच्या धडक मोहीमेत एकूण 31 अनधिकृत होर्डींग हटविण्यात आले आहेत. 17 मे पासून 18 मे रोजी पहाटेपर्यंत राबविण्यात आलेल्या या मोहीमेत सायन पनवेल रोडनजिक वाशीगाव येथे आकाराने अवाढव्य असलेले होर्डींग हटविण्याची कारवाई 2 दिवस अहोरात्र काम करून करण्यात आली असून त्याठिकाणचे 4 होर्डींग निष्कासित करण्यात आले आहेत. नेरूळ विभागातही हर्डिलिआ कंपनीनजिक सायन पनवेल रोडशेजारी लक्ष्मीवाडी या ठिकाणी असलेले 3 मोठे अनधिकृत होर्डींग निष्कासित करण्यात आलेले आहेत. ऐरोली विभागात ऐरोली – पटनी रोड येथील पदपथावर असणारे सेक्टर 20 येथील होर्डींग तसेच ऐरोली सेक्टर 9 दिवागाव येथे वंदना अपा. येथील होर्डिंग अशी 2 मोठी अनधिकृत होर्डींग हटविण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे घणसोली कार्यक्षेत्रातील रबाले रेल्वेस्टेशन समोर मोनार्क हॉटेल नजिक असलेले अनधिकृत होर्डींगवर निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे. अशाप्रकारे अनिधकृत होर्डींग विरोधातील धडक मोहीमेत तिस-या दिवशी 10 मोठे अनधिकृत होर्डींग हटविण्यात आले असून त्यामध्ये वाशीगाव येथील प्रचंड मोठ्या होर्डींगचाही समावेश आहे. अशाप्रकारे 15 तारखेपासून 18 मे रोजी पहाटेपर्यंत 3 दिवसांच्या धडक मोहीमेत एकूण 31 मोठ्या आकाराचे अनधिकृत होर्डींग हटविण्याची कारवाई करण्यात आली असून होर्डींग काढताना सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. त्यासोबतच हायवे लगतची मोठी होर्डींग काढताना रहदारीला व वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये याचीही काळजी घेत अशा ठिकाणची होर्डींग मध्यरात्रीपासून पहाटेच्या कालावधीत काढण्यात आली आहेत. ही अनधिकृत होर्डींग विरोधातील कारवाई आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार अशीच कार्यान्वित राहणार असून प्रसंगी दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी सांगितले आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली या कारवाईची प्रत्यक्ष अंमलबजावणी अतिक्रमण विभागाचे सहा. आयुक्त व सर्वच विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि त्यांचे अधिनस्त अधिकारी, कर्मचारी व तांत्रिक कर्मचारी आणि कामगार करीत आहेत

मतदार कामगार अधिकारी-कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी द्या

मुंबई शहरात २० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांचे निर्देश मुंबई,  : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने राज्यात तसेच राज्याच्या सीमेलगतच्या…

सोळा जीव घेतल्यानंतरही रेल्वेला गांभीर्य नाही

रमेश औताडे मुंबई : रेल्वे परिसर व प्लॅटफॉर्म वर प्रवाशांची सुरक्षा करणे रेल्वेचे आद्य कर्तव्य आहे. मात्र याचा विसर पाडलेल्या रेल्वे प्रशासनाला कशाचे सोयरे सुतक नाही. 16 निष्पाप जीव रेल्वेने घेतले की पालिकेने घेतले की अजून कुणी घेतले यावर सध्या तज्ञ कमिटी तपास करत आहे. 16 जीव गेल्यानंतर रेल्वेने आपल्या हद्दीतील, फालातावरील अनधिकृत प्रकार नेस्तनाबूत करण्याची मोहीम युद्ध पातळीवर राबवायला पाहिजे होती मात्र तसे दिसत नाही.असे मत प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अमोल मोरे यांनी व्यक्त केले. रेल्वे स्टेशन तिकीट विंडो जवळ बंद पडलेले आरोग्य केंद्र व त्या बाजूला अनधिकृत फेरीवाले यांच्या मनमानी वास्तव्यामुळे प्रवाशी सुरक्षा धोक्यात आली आहे. रेल्वे प्लॉटफॉर्म वर जे खाद्यपदार्थ स्टॉल आहेत त्यांनी रेल्वे रुळ पासून स्टॉलचे अंतर किती असावे या नियमांचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर कोणतीही कारवाही रेल्वेने केली नाही. त्या स्टॉल वरील अनधिकृत बांधकाम कोसळून दुर्घटना होऊन प्रवाशी जीव जाऊ शकतात. ब्रिजवर चिंचोळ्या जागेतून ये जा करताना प्रवाशी जखमी होऊ शकतात. रेल्वे ब्रीजवर असणारे फेरीवाले यांनाही अभय दिले जात आहे. भिकारी,गर्दुल्ले, नशा करणारे प्रवाशी, भुरटे चोर, यांच्यावर रेल्वे पोलीस, होमगार्ड, शहर पोलिस, यांचा वचक राहिला नाही.प्रवाशांना धक्काबुक्की करत तृतीयपंथी, चोरटे, गर्दुल्ले बिनबोभाट प्रवास करत आहेत. अनेक ठिकाणी नूतनीकरण सुरू आहे त्या ठिकाणी कंत्राटदार सुरक्षा पट्टी, रेड मार्किंग, सावध फ्लॅग गार्ड आदी कोणतीही काळजी न घेता मनमानी विकास कामे सुरू आहेत. रेल्वेत झिक झ्याक अवस्थेत असलेले पंखे, टुयब लाईट, गरम होऊन स्पार्क झाले तर आगाची दुर्घटना होऊन प्रवासी जीव धोक्यात येऊ शकतो. अनेक स्थानकात जंबो पंखे बंद अवस्थेत आहेत त्याची देखभाल कंत्राटदार करत नाही. अनेक ब्रीज वर फेरीवाले जागा अतिक्रमण करून बसले असल्याने गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरी होऊ शकते.रेल्वे दरवाजे कडी कोयंडा तुटल्याने दरवाजे आदळतात त्याने अपघात होऊ शकतो. या व इतर अनेक प्रकारे रेल्वे सुरक्षा गंभीर आहे.प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत व फलाटावर उभे आहेत. त्यामुळे रेल्वेने या प्रकरणी गांभीर्ययाने लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर अजून जीव जातील व सखोल तपास समिती तपास करतच राहील.असे प्रवासी बोलत आहेत.

मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात मोबाइल नेण्यास मनाई

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी आज २० मेला सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० वाजेदरम्यान मतदान होत आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रात मोबाइल नेण्यास मनाई असणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली. श्री. यादव म्हणाले की, मुंबई शहर जिल्ह्यात दोन्ही लोकसभा मतदारसंघात एकूण २५२० मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश मा. भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या प्रत्येक निर्देशाची अंमलबजावणी कसोशीने करण्यासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासनाचा कटाक्ष आहे. मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करणे, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाईलचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यास मतदारांना मज्जाव करण्यात आला आहे. मतदारांना मतदान केंद्रापासून १०० मीटर बाहेर मोबाइल ठेऊन मतदान करण्यासाठी जावे लागेल, असे श्री. यादव यांनी सांगितले.

मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

विकास धारियाची प्रथम मानांकित महम्मद घुफ्रानवर मात मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व लोकमान्य मंडळ, माटुंगा यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बँक्वेट हॉल, लोकमान्य नगर, माटुंगा ( पश्चिम ) येथे सुरु असलेल्या मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उप उपांत्य फेरीत मुंबई महानगरपालिकेच्या विकास धारियाने स्पर्धेतील प्रथम मानांकित व विद्यमान एशियन चॅम्पियन  महम्मद घुफ्रानवर सरळ दोन सेटमध्ये २५-८, १६-७ असा सहज विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे इतर निकाल पुढीलप्रमाणे ओमकार टिळक ( ए. के. फाउंडेशन ) वि वि सौरभ मते ( डी. के. सी. सी. ) २५-१, १८-१४ फहीम काझी ( शिवतारा कॅरम क्लब ) वि वि सिद्धांत वाडवलकर ( डी. के. सी. सी. ) ११-२२, २५-२०, २५-६ प्रशांत मोरे ( रिझर्व्ह बँक ) वि वि संदीप देवरुखकर ( ओ. एन. जी. सी. ) १०-७, २५-१५ महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे काजल कुमारी ( इंडियन ऑइल ) वि वि समिधा जाधव ( डी. के. सी. सी. ) २५-१२, २५-० वैभवी शेवाळे ( डी. के. सी. सी.) वि वि निलम घोडके ( पी. ओ. आर. सी. ) १५-२४, २५-७, १८-१६ रिंकी कुमारी ( पी. ओ. आर. सी. ) वि वि उर्मिला शेंडगे ( रिझर्व्ह बँक ) २५-२१, १६-२१, २५-५ अंबिका हरिथ ( रिझर्व बँक ) वि वि सेजल लोखंडे ( डी. के. सी. सी. ) २२-१४, २३-११

औपचारीकता!

स्टंप व्हीजन स्वाती घोसाळकर वानखेडे मैदानावर लखनौ सुपर जाइन्टविरुद्ध खेळलेला सामना मुंबई इंडियन्ससाठी फक्त एक औपचारीकता होती. २०२२ च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने लीगमध्ये सर्वात शेवटचं स्थान पटकावलं होतं. यावर्षीसुद्धा मुंबई…