Category: रायगड

raigad news and updates

 घराच्या छतावर वीज निर्मिती करून २४४८ ग्राहक झाले स्वावलंबी

 कल्याण आणि भांडुप परिमंडलात पीएम सूर्यघर योजनेचा लाभ   कल्याण :प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या कल्याण आणि भांडुप परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत १३ हजार ८३१ जणांनी अर्ज केले आहेत. यातील २ हजार ४४८ ग्राहकांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित अर्जदारांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याची प्रक्रिया सुरु आहे अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत पर्यावरणपूरक वीज निर्मितीसोबतच आपल्या मासिक वीजबिलात बचत करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. सौर प्रकल्पातून ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य होते. तर शिल्लक वीज महावितरण विकत घेते. निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट ३० हजार रुपये अनुदान २ किलोवॅटपर्यंत मिळते. ३ किलोवॅटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी १८ हजार रुपये अनुदान मिळते. ३ किलोवॅटपेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान ७८ हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे. गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांकरीता इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगसह सामाईक उपयोगासाठी १८ हजार रुपये प्रति किलोवॅट अनुदान मिळते. गृहसंकुलासाठी अनुदानाची एकूण कमाल मर्यादा ५०० किलोवॅट आहे. महावितरणतर्फे रुफटॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांना सोलर नेट मीटर मोफत देण्यात येत आहे. ग्राहक आणि सोलर रूफटॉप बसवणाऱ्या एजन्सींसाठी महावितरणने मीटर चाचणीची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि जलद केलेली आहे. त्याचप्रमाणे १० किलोवॅटपर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. पीएम-सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प बसवण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. वीज ग्राहकांनी https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा असून सर्व सुविधा ऑनलाईन व पेपरलेस उपलब्ध आहेत. 0000

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन पुस्तिकेचे प्रकाश

अलिबाग : अशोक गायकवाड रायगड जिल्ह्याचे सन २०२४ चे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा नियोजन अधिकारी श्”जयसिंग मेहेत्रे, सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक श्रीमती वृषाली माकर आदि उपस्थित होते. 0000

विधी सेवा शिबीर तसंच शासकीय सेवा व योजनांचा महामेळाव्याचा लाभ घ्या – न्या. ए.एस.राजंदेकर

अशोक गायकवाड रायगड : विधी सेवा शिबीर व शासकीय सेवा व योजनांचा महामेळावाकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये रायगड जिल्हयातील शासकीय कार्यालयाच्या योजनांची माहिती एकाच छताखाली सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सचिव, न्यायाधीस अमोल अ. शिंदे यांनी दिली आहे.या कार्यकमाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग न्या. ए.एस.राजंदेकर यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग व जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने १९ जानेवारी, सकाळी ११.०० वा. बालगंर्धव रंगभवन, रिलायन्स पेट्रोकेमिकल टाउनशिप, नागोठणे, ता. रोहा येथे “विधी सेवा शिबिर व शासकीय सेवा योजनांचा महामेळावा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये रायगड जिल्हयातील शासकीय कार्यालयाच्या योजनांची माहिती एकाच छताखाली सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सचिव, न्यायाधीस अमोल शिंदे यांनी दिली आहे.या कार्यकमाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग न्या. ए.एस.राजंदेकर यांनी केले आहे. 000000

मुंबई पोर्टच्या कलाकार योगिनी दुराफे यांना अनुभूती जनसेवा सन्मान पुरस्कार

मुंबई : टी.एम.जी. क्रीयेशन्स आणि इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न झालेल्या अनूभुती महागौरव संमेलनात सौ. योगिनी शामकांत दुराफे यांना राज्यस्तरीय अनुभूती…

१ हजार १६ गावे, वाड्यांच्या पाणीटंचाईसाठी ५ कोटी ६२ लाख‌ांचा आराखडा तयार-डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड अलिबाग :रायगड जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज होत असून, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्याचा…

सीएसटी रेल्वे स्थानकावरील हळदीकुंकू समारंभ जल्लोषात

केतन खेडेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई महिला अध्यक्षा आरतीताई साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सीएसटी रेल्वे स्थानकावर नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला चाकरमानी महिलांचा उत्स्फूर्त…

आरटीई २५ टक्के जागांच्या नोंदणीला सुरुवात – पुनीता गुरव

रायगडातील २६६ शाळांमध्ये ४ हजार ५७८ जागा उपलब्ध अशोक गायकवाड अलिबाग : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रियेला मंगळवार १४ जानेवारीपासून सुरूवात झाली…

वर्ल्ड कराटे चॅम्पियनशीपमध्ये डॉ. देव इंटरनॅशनल मार्शल आर्टस ॲकॅडेमीच्या

अर्णव जाधव आणि गार्गी राऊत यांची चमकदार कामगिरी, आमदार महेंद्र थोरवे यांनी केले सन्मानित अशोक गायकवाड खालापूर : वर्ल्ड कराटे चॅम्पियनशीपमध्ये डॉ. देव इंटरनॅशनल मार्शल आर्टस ॲकॅडेमीच्या अर्णव दिपाली शैलेश…

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या नेतृत्वाखाली सहा बांगलादेशी नागरिकांना अटक

अशोक गायकवाड अलिबाग : पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या नेतृत्वाखाली महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे पाच पुरुष व एक महिला या बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेऊन या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड जिल्हा हद्दीमध्ये गेले दोन दिवसापासून रायगड जिल्ह्यात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात येत होती. त्याअनुषंगाने १२ जानेवारीला महाड एमआयडीसी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली कि, मौजे पिंपळदरी मोरांडे वाडी ता. महाड येथे काही बांगलादेशी कामगार त्यांचे अस्तित्व लपवून अवैधरीत्या घुसखोरी करून वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्य करीत आहे. त्या अनुषंगाने महाड एमआयडीसी पोलिसांनी तपास पथक तयार करून मौजे पिंपळदरी मोरांडे वाडी येथे चंद्रकांत शिंदे याचे घरात छापा टाकला असता त्यामध्ये महाड एमआयडीसी पोलिसांना अवैधरीत्या वास्तव्यास असलेले ०६ बांगलादेशी नागरिक मिळून आले. त्यांना मौजे पिंपळदरी मोरांडे वाडी ता. महाड येथून ताब्यात घेण्यात आले. सदर बांगलादेशी नागरिकांना पी.डी.आय.पी.एल या बांधकाम कंपनीने कामावर ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर बांगलादेशी नागरीकांकडे पोलिसांनी बांगलादेशातून भारतात येण्याकरिता वैध प्रवासी कागदपत्राची मागणी केली असता त्या इसमांनी आमच्या कडे कोणतेही वैध कागदपत्रे नाहीत. आम्ही बांगलादेशातील गरिबी व उपासमारीस कंटाळून रोजगाराकरिता सीमेवरील गस्ती पथकाची नजर चुकवून भारतात प्रवेश केलेला आहे. अशी माहिती दिल्याने सदर इसमांनविरुद्ध महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ०६/२०२५ कलम ३ (१) (अ ) परकीय नागरिक आदेश १९४८, विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १४, पारपत्र (भारतात प्रवेश) १९५० चे कलम ३ (अ ) ६(अ ) प्रमाणे बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस करीत आहे. १) माणिक तुफेझेल विशष वय ३२ वर्ष धंदा सेंट्रिंग चे काम सध्या रा. पिंपळदरी ता. महाड जि. रायगड, मूळ रा. सुबोधपुर बडतळा बाजार, पो. ठाणे दश्शोना, जि. चौंडगा जोषारे खुलना, देश -बांगलादेश, २) नूर इस्माल बिस वास उर्फ सिकंदर रोने मानेरूलखान वय ३० वर्ष सध्या रा. वरंध ता. महाड जि. रायगड मूळ रा. बासग्रॅम, पोलीस ठाणे कालिया, विभाग खुलना जि. नोडाई, देश बांगलादेश, ३) सागर मिराज शेख वय ३० वर्ष रा. पिंपळदरी ता.महाड जि. रायगड मूळ रा.उत्तर शिंगे, पोलीस ठाणा नोडल, जि. नोडल विभाग खुलना, देश बांगलादेश, ४) शांतु शकुरअली शेख वय-१९ वर्ष सध्या रा. पिंपळदरी ता. महाड जि. रायगड, मूळ रा. पुरुलिया, पोलीस ठाणा कालिया, जि. नाडाई विभाग खुलना, देश- बांगलादेश., ५) शिलीम हामशेर परामणी वय-४० वर्ष, सध्या राहणार पिंपळदरी तालुका महाड जिल्हा रायगड, मूळ रा अब्दुलपुर ठाणा-लालपुर जिल्हा नाटोर विभाग रासई देश बांगलादेश असे पाच पुरुष व एक महिलेस ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी माणगाव विभाग पुष्पराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महाड एमआयडीसी प्रभारी सपोनि/जीवन माने व पोसई/संजय मुंडे, पोसई/समेळ सुर्वे. सफौ/हनुमंत पवार, सफौ/दीपक ढेपे, पोह/राजेश गोरेगावकर, पोह/चनप्पा अंबरगे, पोह/सिद्धेश मोरे, पोना/राजेश माने, पोना/सतीश बोटे,पोना/गणेश भैलुमे,पोशी/सुनील पाटील, पोशी/सुनीलकांजर, पोशी/शीतल, बंडगर, पोशी/निखीलबळे, पोशी/अमोल कुंभार, पोशी/शुभम पवार, पोशी/सुजील गोंधळी, पोशी/सागर गुलींग, पोशी/विजय दळवे मपोशी/ तेजश्री भोईर, यांनी गुन्हयाचे तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

१०० दिवसांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम विहीत वेळेपूर्वी यशस्वी करा – डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड अलिबाग : १०० दिवसांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम विहीत वेळेपूर्वी यशस्वी करणे व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी यांना दिल्या. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी जनतेला सोयी सुविधा मिळाव्यात या अनुषंगाने १०० दिवसांचा महत्वाकांक्षी उपक्रम जाहीर केला आहे. या उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, प्रत्येक तालुकानिहाय आढावा घेण्यात येत आहे. तसेच कामचुकार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जात आहे. महाड, पोलादपूर तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांच्या आढावा शुक्रवारी आयोजित केलेल्या बैठकीला गैरहजर राहणारे वराठी ग्रामपंचायत अधिकारी मोतिसिंग लहानुजी भस्मे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी निलंबित केले आहे. बैठकीला विनापरवानगी गैरहजर राहण्यासोबत भस्मे यांनी १५ वा वित्त आयोगाचा खर्च कमी करणे, प्रधानमंत्री आवास योजना कामात जाणून बुजुन दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री १०० दिवसांचा महत्वाकांक्षी उपक्रम जाहीर केला आहे. या उपक्रमांतर्गत शंभर दिवसांत नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासनातील सुधारणा या बाबींवर भर दिला जात आहे. उपक्रमांतर्गत शुक्रवारी (दि.१०) महाड, पोलादपुर तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांची आढावा सभा घेण्यात आली. सदर सभेमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, १५वा वित्त आयोग १०० टक्के खर्च करणे, स्वच्छ भारत अभियानातंर्गत करण्यात आलेली कामे यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी १०० दिवसांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम विहीत वेळेपूर्वी यशस्वी करणे व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना डॉ. भरत बास्टेवाड यांनी उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी यांना दिल्या.सदर आढावा सभेस महाड तालुक्यातील वराठी ग्रामपंचायत अधिकारी मोतिसिंग लहानुजी भस्मे हे विनापरवानगी गैरहजर राहिले होते. तसेच मोतिसिंग लहानुजी भस्मे यांनी १५ वा वित्त आयोगाचा खर्च कमी करणे, प्रधानमंत्री आवास योजना कामात जाणून बुजुन दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्याने मोतिसिंग लहानुजी भस्मे यांना निलंबीत करण्यात आले आहे. सदर आढावा सभेस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, महाडच्या गटविकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, पोलादपुरच्या गटविकास अधिकारी दिप्ती गाट, सहाय्यक गटविकास अधिकारी नामदेव आण्णा कटरे तसेच सर्व विस्तार अधिकारी, शाखा अभियंता उपस्थित होते.