Category: रायगड

raigad news and updates

ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

आमदार महेंद्र दळवी व जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत डॉ. नितीन अंबाडेकर व डॉ.पुरुषोत्तम मडवी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांचे केले कौतुक अशोक गायकवाड रायगड : आरोग्य विभागाचे संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, नर्सिंग विभागाचे उपसंचालक डॉ.पुरुषोत्तम मडवी यांनी सदिच्छा भेट दिली. शिबिरामध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधाबाबत माहिती घेतली आणि या उपक्रमाबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने व त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले. तसेच या शिबीराकरिता सेंट्रल टीबी डिव्हिजनल टीम यांनी भेट दिली.आमदार महेंद्र दळवी यांच्या शुभहस्ते व जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबिराची २८ डिसेंबरला सांगता कार्यक्रम संपन्न झाला. या शिबिरामध्ये जिल्ह्यातील १७४ ज्येष्ठ महिला तर २९० पुरुष असे एकूण ४६४ नागरिकांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घेतली. ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळून येणारे उच्च रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात तसेच हृदयरोग-गरजेनुसार 2D ECHO, X…

जेबीएसपी’ वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार प्रशांत ठाकूर यांचा जाहीर सत्कार

अशोक गायकवाड पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच झाली.या सभेत संस्थेच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या सभेमध्ये संस्थेच्या वितविध शाळांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल तसेच विविधि स्पर्धां तसेच परीक्षांमध्ये उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. खांदाकॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात झालेल्या या सभेला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी.देशमुख, कृष्णा ठाकूर, सचिव एस.टी. गडदे, संचालक संजय भगत, वर्षा ठाकूर, वसंत पाटील, जगदीश घरत, हरीशचंद्र पाटील, अमोघ ठाकूर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

‘जेबीएसपी’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच झाली.या सभेत संस्थेच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली…

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील मद्य तसेच बनावट मद्यविक्री रोखणार – रविकिरण कोले

अशोक गायकवाड रायगड : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क रायगड-अलिबाग विभागामार्फत उपाययोजनाबाबत रायगड जिल्हयात एकूण ५ कार्यकारी निरीक्षक पथके असून २ भरारी निरीक्षक पथके कार्यरत असून त्यांना रायगड जिल्ह्यातील मद्यविक्री…

ई- रिक्षाच्या संख्येत ताबडतोब वाढ करावी पर्यटकांची मागणी

माथेरान : नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी माथेरानला पसंती दिली आहे.परंतु वाहतुकीच्या गहन समस्यांना सामोरे जात प्रवास करावा लागत असल्यामुळे लवाजम्यासह आलेल्या पर्यटकांची त्रेधातिरपीट उडत आहे. ई रिक्षाची सुविधा उपलब्ध…

तुफानातला दिवा विझला आहे – प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे

पॅन्थर प्रकाश पगारे यांना भावपूर्ण आदरांजली तुफानातला दिवा विझला आहे – प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे अशोक गायकवाड कर्जत :दलित पॅन्थर ते रिपब्लिकन चळवळ असा तीस ते पस्तीस वर्षाचा प्रवास असणारे,…

जड-अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी-किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : राष्ट्रीय महामार्ग कमांक १६६-अ वर धरमतर ब्रिज ते अलिबाग तसेच अलिबाग ते मांडवा जेट्टी व अलिबाग-रेवदंडा-मुरूड या राज्यमार्गावरील जीवनावश्यक वस्तू वगळून जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूक बंदी अधिसूचना जारी केली आहे. रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याकारणाने ३१ डिसेंबर २०२४ रोजी “थर्टी फस्ट” चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागता करीता प्रचंड प्रमाणात पर्यटक हे मांडवा, किहीम, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशिद, मुरूड, दिवेआगर,वर्धन, महाड अशा पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणात आपआपली वाहने घेवून येत असतात. सध्या नाताळ निमित्ताने विद्यार्थ्यांना सुट्टी असल्याकारणाने पर्यटक हे रायगड जिल्ह्यामध्ये फिरण्याकरीता वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यावरील बीचला भेटी देत असतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच शहरामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असून त्यातच महामार्गावरील जड-अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. वडखळ-अलिबाग हा रस्ता एकेरी रस्ता आहे. तसेच अलिबाग-रेवस व अलिबाग-रेवदंडा-मुरूड हे रस्ते अरूंद आहेत. पर्यटकांची प्रचंड प्रमाणात येणारी व जाणारी वाहने व त्याच वेळी रोडवरून होणारी डंपर, ट्रक व इतर जड-अवजड वाहनांची वाहतूक कोंडी होण्याची तसेच अपघात होण्याची दाट शक्यता आहे. २८  व २९ डिसेंबर २०२४ रोजी शनिवार व रविवार रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने पर्यटक हे मोठ्या प्रमाणात येणार आहेत. वाहतूक कोंडीमुळे पर्यटक व नागरीकांना मानसिक त्रास सहन करावा लागू नये व सध्या घडत असलेले अपघात पाहता, अपघाताचे प्रमाण कमी होण्याच्या दुष्टीकोनातून उपाययोजना म्हणून तसेच पर्यटक व नागरीकांचा प्रवास सुखरूप व्हावा याकरीता २८ डिसेंबरला सकाळी ६.०० ते दि.२९ डिसेंबर ४.०० वाजेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग कमांक १६६-अ वर धरमतर ब्रिज ते अलिबाग तसेच अलिबाग ते मांडवा जेट्टी व अलिबाग-रेवदंडा-मुरूड या राज्यमार्गावरील जीवनावश्यक वस्तू वगळून जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूक बंदी अधिसूचना जारी केली आहे. 0000

उल्हासनगरचे शासकीय रुग्णालय पुन्हा अंधारात

 अतिदक्षता विभाग सोडून उर्वरित रुग्णालयात वीज नाही   उल्हासनगर: उल्हासनगर येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात शुक्रवारी सहा ते सात तास अंधारात होते. वीज नसल्यामुळे रुग्ण त्रस्त झाले होते. शुक्रवारी महावितरणाकडून स्थानिक परिसरात देखभाल दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे वीजपुरवठा बंद होता. तर रुग्णालयातील पर्यायी वीज व्यवस्थाही त्याचवेळी देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आली होती. एकाच दिवशी दोन्ही यंत्रणा बंद असल्याने रुग्णांचे मात्र हाल झाले. यादरम्यान अनेक शस्त्रक्रियाही रखडल्या होत्या. यापूर्वीही रुग्णालय अंधारात गेल्याचे प्रकार झाले होते. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त होतो आहे. शुक्रवारी उल्हासनगरमध्ये महावितरणकडून देखभाल दुरुस्तीसाठी वीज पुरवठा खंडित केला जातो. या काळात रुग्णालयात जनरेटरच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरू राहतो. मात्र शुक्रवारी काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडून रुग्णालयातील इलेक्ट्रिक पॅनल बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे जनरेटर देखील बंद ठेवण्यात आले होते. परिणामी संपूर्ण रुग्णालयाचा वीज पुरवठा १२ वाजल्यापासून खंडित झाला होता. सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे संपूर्ण रुग्णालयात अंधार पसरला होता. वार्डातले दिवे, पंखे बंद असल्यामुळे रुग्ण त्रस्त झाले होते. सुदैवाने अतिदक्षता विभागात पर्यायी व्यवस्था असल्याने यंत्रणा सुरू होती मात्र या काळात रुग्णालयात होणाऱ्या शस्त्रक्रिया आणि प्रसूती बंद ठेवण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली. एखादी तातडीची शस्त्रक्रिया करायची असल्यास आम्ही रुग्णाला उल्हासनगरमधीलच दुसऱ्या शासकीय रुग्णालयात घेऊन जातो आणि तिथे शस्त्रक्रिया करतो, अशी माहिती डॉ. बनसोडे यांनी दिली. अत्यंत महत्त्वाचे रुग्णालय उल्हासनगरचे मध्यवर्ती शासकीय रुग्णालय तीन ते चार तालुक्यांसाठी महत्त्वाचे आहे. अंबरनाथ, मुरबाड, कल्याण आणि उल्हासनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे रुग्णालय महत्त्वाचे आहे. आधीच खाटा नसल्याने येथे रुग्णांना खाली झोपवून उपचार घ्यावे लागत असल्याचे यापूर्वीच समोर आले होते. त्यात आता या प्रकारामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यापूर्वीही वीज पुरवठा बंद गेल्या वर्षी मे महिन्यात अशाच प्रकारे उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील वीजपुरवठा ठप्प झाला होता. त्याचा रुग्णालयातील रुग्णांना मोठा फटका बसला होता. ऐन उन्हाळ्यात तापमान वाढलेले असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णांची लाही लाही झाली होती. त्याचवेळी अनेक विभाग बंद झाले होते. शुक्रवारी अशाच प्रकारे शासकीय यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे रुग्णांचे हाल झाले. रुग्णालय प्रशासन याबाबत नियोजन केल्याचे सांगत वेळ मारून नेत असले तरी रुग्णांचे मात्र या काळात हाल झाले. 900000

शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

माथेरान : लहान मुले ही देवघरची फुले आहेत आणि जेव्हा त्यांना एखादी वस्तू किंवा साहित्य असो अथवा खाऊ असो हे त्यांना अचानकपणे प्राप्त झाल्यास त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्मितहास्य निर्माण…

२८ व २९ डिसेंबरला नागपुरात ‘अक्षरक्रांती’ आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव

नागपूर : अक्षरक्रांती फाऊंडेशन व कला गौरव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले शिक्षण संस्था सभागृह, रेशिमबाग, नागपूर येथे २८ व २९ डिसेंबरला ‘पहिले अक्षरक्रांती आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव’ संपन्न होत…