Category: ठाणे

Thane news

शक्तीस्थळावर नतमस्तक…

शक्तीस्थळावर नतमस्तक… मुंबई ठाण्यासह राज्यात २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडणार आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे शक्तीस्थळ येथे उपस्थित राहून नतमस्तक…

डहाणूच्या शाळेत पोषण आहाराला फाटा शिक्षकाने केले थेट तांदळाचे वाटप

डहाणूच्या शाळेत पोषण आहाराला फाटा शिक्षकाने केले थेट तांदळाचे वाटप प्रमुख शिक्षक शेलार यांची चौकशी होणार शालेय व्यवस्थापन समिती आणि वरिष्ठही अंधारात योगेश चांदेकर पालघरः जिल्हा परिषद  शाळातील मुलांना शालेय पोषण…

 यंगिस्तान फाउंडेशनतर्फे ‘प्राइड ऑफ यंग हिंदुस्तान’ अवॉर्ड संपन्न

यंगिस्तान फाउंडेशनतर्फे ‘प्राइड ऑफ यंग हिंदुस्तान’ अवॉर्ड संपन्न देशभरातून निवडलेल्या १५ युवा समाजसेवकांना सन्मान, प्रेरणा व ओळखीचे व्यासपीठ कल्याण: कल्याण उल्हासनगर अंबरनाथ परिसरात कार्यरत असलेल्या यंगिस्तान फाउंडेशन या सामाजिक संस्थेने…

खिशात नाही आणा अन् मला बाजीराव म्हणा… मुख्यमंत्री फडणवीसांची उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जहरी टिका

पुणे, प्रतिनिधी : महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील शिवाजीनगर परिसरात महायुतीतील मित्रपक्ष असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांव सडकून जहरी टिका केली.  खिशात नाही आणा अन् मला बाजीराव म्हणा… अशी अजित पवारांची अवस्था…

 राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात १६ जानेवारी रोजी ‘क्लिनिकल मीट’

मनोरुग्णता विषयक अपंगत्व प्रमाणपत्र प्रक्रियेवर राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात १६ जानेवारी रोजी ‘क्लिनिकल मीट’ ठाणे  : मनोरुग्णता क्षेत्रात अपंगत्व प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अधिक शास्त्रीय, व्यावहारिक आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम व्हावी, या उद्देशाने राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा यांच्या वतीने बॉम्बे सायकियाट्रिक सोसायटीच्या सहकार्याने विशेष क्लिनिकल मीटचे आयोजन करण्यात आले आहे. “मनोरुग्णतेतील अपंगत्व प्रमाणपत्र प्रक्रिया (Disability Certification in Psychiatry)” या विषयावर आधारित ही शैक्षणिक कार्यशाळा शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील मेडिसिन लेक्चर हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली सौरभ कदम, तसेच बॉम्बे सायकियाट्रिक सोसायटीच्या अध्यक्ष व भाभा अणुसंशोधन केंद्राच्या मनोरुग्णता विभागाच्या प्रमुख डॉ. शोभा नायर असणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी २.०० वाजता होणार असून त्यानंतर शैक्षणिक सत्रांना सुरुवात हाेणार आहे. उद्घाटनानंतर  डॉ. अमेय पुसाळकर “अपंगत्व – ओळख व कायदेशीर चौकट” या विषयावर मार्गदर्शन करणार असून, मनोरुग्णतेतील अपंगत्वाची संकल्पना व विद्यमान कायदे व नियमावली यांची माहिती दिली जाणार आहे. या सत्राचे अध्यक्षपद डॉ. स्वप्नाली कदम व डॉ. शोभा नायर भूषवणार आहेत. तद्नंतर डॉ. आश्लेषा ढोले  यांचे “मानसिक आजारांचे मूल्यमापन व प्रमाणपत्र प्रक्रिया” या विषयावर व्याख्यान होणार असून, प्रमाणित मोजमाप पद्धती, दस्तऐवजीकरण व प्रक्रिया यांवर भर दिला जाणार आहे. तसेच डॉ. शीतल मेश्राम “न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर्ससाठी मूल्यमापन साधने” या विषयावर सादरीकरण करणार आहेत. तसेच यावेळी “अपंगत्व प्रमाणपत्र प्रक्रियेत येणाऱ्या दैनंदिन अडचणी” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन

एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मतदान दिनांक १५ जानेवारीला घोषित केलेली आहे. सदर निवडणूकामी परिवहन उपक्रमाकडून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी १४ जानेवारीला सकाळी व १५ जानेवारीला दुपारी बस संचलन विस्कळीत होण्याची शक्यता असून काही बसमार्गावरील प्रवाशी बससेवा बंद करण्यात येणार आहे. तरी तात्पुरत्या स्वरूपात प्रवाशी जनतेस होणाऱ्या गैरसोयीबद्दल नमुंमपा परिवहन उपक्रम दिलगीर आहे. प्रवाशी जनतेने नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ या कालावधीत उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीच्या कामाकरिता परिवहन सेवेच्या २७५ बसेस तैनात

ठाणे महापालिका निवडणुकीच्या कामाकरिता परिवहन सेवेच्या २७५ बसेस तैनात ठाणे  : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ ची मतदान प्रक्रिया बुधवार, १५ जानेवारी रोजी पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी ठाणे परिवहन सेवेच्या मोठ्या प्रमाणावर बसेस निवडणूक कामकाजासाठी वापरण्यात येणार आहेत. दिनांक १४ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत परिवहन सेवेच्या सुमारे ७५ टक्के बसेस निवडणूक कामासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  परिणामी, ठाणे शहरात दोन दिवस बससेवा मर्यादित राहणार असल्याचे परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी नमूद केले. निवडणूक प्रक्रियेसाठी १४ जानेवारी व १५ जानेवारीला २७५ बसेसचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळपासून दुपारी ३.०० वाजेपर्यत व दिनांक १५ जानेवारीला सायंकाळी ४.०० नंतर फक्त ८० ते ८५ बसेस शहरातील विविध मार्गावर चालविण्यात येणार आहे. परिवहन  बसेसची  वाहतूक प्रत्येक मार्गांवर तुरळक प्रमाणात सुरू राहणार आहे. या कालावधीत प्रवाश्यांनी इतर पर्यायी वाहतुकीचा अवलंब करुन परिवहन सेवेस सहकार्य करावे असे आवाहन  परिवहनच्या वतीने करण्यात आले आहे.

सामान्य माणसाला संघाने ‘ताकद’ दिली – उपेंन्द्र कुलकर्णी

सामान्य माणसाला संघाने ‘ताकद’ दिली – उपेंन्द्र कुलकर्णी अनिल ठाणेकर ठाणे : आत्मविस्मृत समाजाचे मत परिवर्तन करण्याचे काम त्याकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले. एक प्रकारे वाहक बनुन संघाने सामान्य माणसाला ताकद दिली. त्यामुळेच संघाचे विचार आज समाज स्विकारत आहे. असे प्रतिपादन करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र सेवा विभाग प्रमुख उपेंन्द्र कुलकर्णी यांनी ठाणेकरांचे वैचारिक प्रबोधन केले. ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती क्रिंडा संकुल मैदानात आमदार संजय केळकर यांनी आयोजित केलेल्या ४० व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेतील “संघ शताब्दी वर्ष” हे चौथे पुष्प रविवारी उपेंन्द्र कुलकर्णी यांनी गुंफले. व्याख्यानमालेच्या या सत्राच्या अध्यक्षपदी श्रीराम पटवर्धन होते. तर, कार्यक्रमाचे निवेदन ज्येष्ठ पत्रकार पु. ल. देशपांडे कला अकादमीचे सदस्य मकरंद मुळे यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष साजरे होत असताना अनेक उपक्रम साजरे होत असल्याचे सांगून उपेंन्द्र कुलकर्णी यांनी, १८८९ साली डॉक्टर हेडगेवार यांचा जन्म, १९२५ मध्ये संघाची स्थापना ते आजपर्यतच्या काळातील क्रांतीकारी घटना आणि राष्ट्रीय चळवळीशी जोडलेल्या घटनांचा उहापोह करून विपरीत स्थितीत संघ स्वयंसेवक कसे राहिले, या आठवणी दृगोचित केल्या. स्वयंसेवकांनी कशा प्रकारे सामाजिक कार्यात योगदान दिले, याच्या आठवणी जागवताना संघाच्या प्रार्थनेतील दाखले देत संघाच्या पंचपरिवर्तनाचे कार्य त्यांनी विस्ताराने विषद केले.डॉ. हेडगेवार यांच्या आधी हिंदुत्त्वाचा विचार अनेकांनी मांडला होता. पण, डॉक्टरांनी आपल्या विचाराला कृतीचे सातत्य असलेल्या संघ शाखांची मजबूत जोड दिली. हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचा मिलाफ त्यांनी घडवून आणला आणि हिंदुंना आत्मभान दिले. या देशातील हिंदू संघटित आणि सशक्त होऊ शकतो, हे सिद्ध करून दाखविणारे डॉ. हेडगेवार हे द्रष्टे नेते होते. हे संघटन टिकवायचे असेल तर समाजाच्या विविध क्षेत्रात त्याचा विस्तार झाला पाहिजे आणि त्याला विधायक कार्याची जोड दिली पाहिजे. या विचारातून मग संघ परिवारात अनेक प्रभावशाली संघटना सक्षमपणे उभ्या झाल्या. जनकल्याण समितीने तर, समाजामध्ये आपल्यापेक्षा पाचपटीने काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांना प्रोत्साहित करीत जनसंघटन वाढवून समाजाला तप्तर करण्याचे काम समितीने केले आहे. जोपर्यंत सामान्य माणुस जोडला जात नाही, तोपर्यत समाज जागृत होणार नाही, हे हेरून संघाने सामान्य माणसाला ताकद दिली. असे कुलकर्णी म्हणाले. समाजाच्या साथीने होणार हिंदु संमेलने आजकाल हिंदू कुटुंबातील संवाद हरवत चालला असून घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. तेव्हा, विसंवादावर मात करण्यासाठी कुंटुंब प्रबोधना करण्याकरीता यातुन सावरलेल्या दांपत्यांनी पुढे ५ कुटुंबांच्या प्रबोधनाची जबाबदारी घ्यायची आहे. हे संघाचे विचार आज समाज स्विकारत आहे, तेव्हा पुढील काळात हिंदूंचे व्यापक संघटन करण्यासाठी समाजाच्या साथीने हिंदुंची संमेलन करणार असल्याचे उपेंन्द्र कुलकर्णी यांनी सांगितले. या संमेलनासाठी समितीही स्थानिक समाजाचीच असणार असुन तेच संमेलने भरवणार आहेत, असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशिक्षण संस्थेत विशेष व्याख्यानाचे आयोजन

ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशिक्षण संस्थेत विशेष व्याख्यानाचे आयोजन यूपीएससी परीक्षार्थींना डीएएफ फॉर्म व सेवा प्राधान्याबाबत मार्गदर्शन ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेला बसणाऱ्या प्रशिक्षणार्थी व विद्यार्थ्यांसाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने संचलित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था येथे “DAF Form Filling & Preference of Services” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार  नुकतेच विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे माजी विद्यार्थी व सध्या ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात कार्यरत असलेले सनदी अधिकारी डॉ. नितीन जावळे (IAS – २००३) प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या विशेष व्याख्यानात ठाणे व मुंबई शहरातील यूपीएससी परीक्षार्थींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमात डॉ. नितीन जावळे यांनी UPSC DAF फॉर्म म्हणजे काय, तो कसा भरावा, फॉर्म सबमिट केल्यानंतर बदल करता येतात का, सेवा प्राधान्य (Service Preference) कसे द्यावे, त्यात बदल कधी व कसा शक्य आहे, याबाबत सविस्तर व सुस्पष्ट मार्गदर्शन केले. याशिवाय कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता, सकारात्मक दृष्टिकोन, अभ्यासाचे योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, संयम, प्रामाणिकपणा, सातत्य व आत्मविश्वास यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या संवादात्मक सत्रामुळे प्रशिक्षणार्थींमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ठाणे महापालिकेचे उपआयुक्त सचिन सांगळे तसेच संचालक महादेव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशासकीय सेवेतील अनुभवातून मार्गदर्शन मिळाल्याने हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे प्रशिक्षणार्थींनी सांगितले. संस्थेचे गिरीश झेंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

निवडणूक निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज

निवडणूक निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार असून, ती निर्भय, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज…