Category: ठाणे

Thane news

अरबी समुद्रात पाणी असेपर्यंत गोदी कामगारांना पेन्शन मिळत राहील – ॲड. एस. के शेट्ट्ये

ठाणे: भारतातील प्रमुख बंदरांमध्ये पूर्वी तीन लाख गोदी कामगार होते. आता वीस हजार कामगार राहिले आहेत. मुंबई बंदरात पूर्वी चाळीस हजार कामगार होते, आता फक्त तीन हजार गोदी कामगार राहिले…

धरणासाठी जमिनी दिलेल्या माजी सैनिकांची शासनाकडून फसवणूक?

डाॅ. जितेंद्र आव्हाडांनीही दिले मुख्यमंत्र्यांना पत्र येत्या प्रजासत्ताक दिनी आजी – माजी सैनिकांनी दिला जलसमाधीचा इशारा   अनिल ठाणेकर ठाणे : रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडच्या मौजे शिवतर या गावात लघुपाटबंधारे योजने…

युपीएससीच्या मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत होणार प्रतिरुप मुलाखती

ठाणे : ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सन २०२४ मधील मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारी २०२५ मध्ये दोन दिवसीय ‘प्रतिरूप मुलाखत (MOCK-INTERVIEW)’…

शहापूर तालुक्यातील नडगाव येथे शेतकरी मेळावा संपन्न

ठाणे : 12 डिसेंबर 2024 रोजी अग्रणी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणे, मार्डेफ ट्रस्ट, पुणे व आर्थिक साक्षरता केंद्र, ठाणे यांच्यावतीने मौजे नडगाव ग्रामपंचायत, नडगाव, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे येथील…

 “पन्नाशीतील ग्रंथाली”चा बहारदार कार्यक्रम संपन्न

वैष्णो व्हिजन संस्थेच्या वतीने आयोजित ठाणे : मराठी साहित्य विश्वातील लोकप्रिय “ग्रंथाली”या संस्थेला 25 डिसेंबर 2024 रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने वैष्णो व्हिजन संस्थेच्या वतीने गुरुवार, 19 डिसेंबर रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे (प.) येथे “पन्नाशीतील ग्रंथाली”या विशेष गप्पा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचांगकर्ते, खगोलशास्त्र अभ्यासक श्री.दा.कृ. सोमण हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एस.एम.सी. इन्फ्रास्टक्चर संचालक श्री.सुहास मेहता तर विशेष निमंत्रित म्हणून मराठी भाषा विभाग संस्था, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे संचालक डॉ.शामकांत देवरे, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज शिवाजी सानप, माहिती संचालनालयाचे माजी संचालक देवेंद्र भुजबळ हे उपस्थित होते. या कार्यक्रमात माजी राज्यसभा सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार, संपादक श्री.कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार, संपादक श्री.दिनकर गांगल, ग्रंथालीचे संपादक श्री.अरुण जोशी, ग्रंथाली संस्थेच्या विश्वस्त डॉ.लतिका भानुशाली व डॉ.मृण्मयी भजक यांनी ग्रंथाली संस्थेच्या पन्नास वर्षांच्या वाटचाल आणि विविध टप्प्यांवरील अनुभव उपस्थितांसमोर कथन केले. त्याचप्रमाणे मराठी भाषा आणि मराठी संस्कृती टिकविण्यासाठी ग्रंथालीसारख्या संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही केले. या कार्यक्रमात मुलाखतकार म्हणून मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य आणि मुंबई दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक माध्यम सल्लागार जयु भाटकर यांनी मान्यवरांना गप्पांमध्ये गुंफले. यावेळी कुमार केतकर म्हणाले की, ग्रंथालीने तळागळातल्या प्रतिभावंत लेखकांना एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले. साहित्य क्षेत्रासाठी हे अत्यंत महत्वपूर्ण योगदान आहे. दिनकर गांगल म्हणाले की, ग्रंथालीने पुस्तक प्रकाशनाबरोबर अनेक सामाजिक व सांस्कृतिक चळवळी राबविल्या आणि त्यातून मराठी वाचकांचे, रसिकांचे विधायक प्रबोधन झाले. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी ग्रंथालीच्या समाजातील योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करून ग्रंथाली व वैष्णो व्हिजन संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच आजच्या पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये जिल्हा माहिती कार्यालयही सक्रीय सहभाग घेईल, असे आश्वासीत केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाण्यातील साहित्यिक अनंत देशमुख, अशोक बागवे, अनुपमा उजगरे, चांगदेव काळे आणि डॉ.निर्मोही फडके या साहित्यिकांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कारही करण्यात आला. वैष्णो व्हिजन संस्थेच्या संस्थापक व कार्यकारी निर्माती पद्मा भाटकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात ग्रंथालीच्या पन्नास वर्षातील कारकिर्दीचा गौरवपर उल्लेख केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अस्मिता पांडे यांनी केले. 00000

 भातसानगर येथे नवोदय विद्यालयासाठी आमदार निरंजन डावखरे आग्रही

 विधान परिषदेत मागणी   ठाणे : शहापूर तालुक्यातील भातसानगर येथे नवोदय विद्यालय सुरू करण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज नागपूर येथे विधान परिषदेत अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांवरील चर्चेत केली. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास खात्यामार्फत ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र नवोदय विद्यालय स्थापन करण्यास मंजुरी दिली असून, याबाबत अधिसूचना जारी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात भातसानगर येथे नवोदय विद्यालयासाठी जागा उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तत्काळ नवोदय विद्यालय सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली. गेल्या काही वर्षांपासून ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र नवोदय विद्यालयासाठी आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून पाठपुरावा केला जात आहे. ग्रंथपालांना दिलासा देण्याची मागणी राज्य सरकारने ग्रंथपालपदासाठी शाळेत १ हजार विद्यार्थ्यांची अट ठेवली आहे. त्यामुळे अनेक ग्रंथपाल अतिरिक्त झाले आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमधील पटसंख्या सातत्याने घसरत असल्यामुळे शाळेत १ हजार ऐवजी ७०० विद्यार्थ्यांची अट ठेवावी. तसेच सहावी ते बारावीऐवजी पाचवी ते बारावीपर्यंतची विद्यार्थी संख्या निश्चित करावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली. वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक नेमावेत पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात अन्य जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांची नियुक्ती केली जात आहे. त्यामुळे जुन्या वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांवर परिणाम होत असून, नव्या महाविद्यालयासाठी प्राध्यापकांची भरती करावी, अशी मागणीही आमदार डावखरे यांनी केली.

ठाण्यात सुट्टीच्या दिवशीही कर संकलन केंद्र सुरूच राहणार, ठाणे महापालिकेचा निर्णय

ठाणे : ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात ठरवून दिलेले मालमत्ता कराचे उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुढील वर्षाच्या मार्च महिन्याअखेरपर्यंत शनिवार, रविवार आणि सार्वजनिक…

बेलापूर कौटुंबिक न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न

ठाणे : बेलापूर कौटुंबिक न्यायालयात नुकतेच राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये एकूण 23 प्रकरणे निकाली काढण्यात आली, ज्यामध्ये 9 प्रकरणांमध्ये पती-पत्नींनी एकमेकांसोबत पुन्हा एकत्र येण्याचे ठरवले.…

केंद्रिय गृहमंत्र्यांवर गुन्हा नोंदवा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या ठाणे शहर युवक आघाडीचे अध्यक्ष विनोद भालेराव यांची मागणी ठाणे : राजधानी दिल्लीत सध्या सुरु असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त…

परभणीत पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा वकिलांनी केला निषेध

संविधानवादी वकील संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन ठाणे : परभणी येथे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची जी तोडफोड करण्यात आली आणि त्यानंतर तेथे दंगल झाली. त्यात पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाल्याच्या…