Category: ठाणे

Thane news

 काँग्रेस आघाडीची आश्वासने खोटी – केंद्रीय मंत्री शेखावत

  अनिल ठाणेकर ठाणे : महाविकास आघाडीतील काँग्रेसने यापूर्वी जेवढी आश्वासने दिली त्यापैकी एकाचीही पुर्तता केलेली नाही.जुनी पेन्शन योजना लागु करण्याचे प्रलोभन दाखवुन काँग्रेसने कर्नाटक, हिमाचल प्रदेशात सत्ता हस्तगत केली,…

गद्दार विरुद्ध खुद्दार हाच या निवडणुकीतील मुद्दा – नरेश मणेरा

अनिल ठाणेकर ठाणे : गद्दार विरुद्ध खुद्दार हाच या विधानसभा निवडणुकीतील मुद्दा आहे. यामुळेच प्रताप सरनाईक यांच्याविरोधातील या लढाईत निष्ठावंत म्हणून मतदार मलाच निवडून देतील, असा दावा ओवळा माजीवडा विधानसभा…

राजदत्त यांच्या हस्ते विजय गोखले यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदान

गंधार बालकलाकार पुरस्काराची मानकरी स्पृहा दळी  ठाणे : ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले स्पृहा दळी हिला  गंधार बालकलाकार…

पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी

ठाणे : विधानसभा निडणूकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर तसेच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी मतदानाच्या दिवशी तसेच त्यापूर्वीच्या दोन दिवसांत ड्रोनद्वारे पाहाणी करण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या मतदारसंघात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास पोलिसांना संबंधित ठिकाणी जाऊन तात्काळ पाहाणी करणे शक्य होणार आहे. आयुक्तालय क्षेत्रातील प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी ड्रोन उपलब्ध असतील. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील सर्वाधिक १४ मतदारसंघ हे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात आहेत. ठाणे पोलिसांकडून मागील काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दररोज पायी गस्ती घातले जात आहे. तसेच ठिकठिकाणी रुट मार्च देखील काढण्यात आले आहेत. निवडणूकीच्या कालावधीत अनेकदा मतदान केंद्र किंवा एखाद्या ठिकाणी गोंधळ उडत असतो. आयुक्तालय क्षेत्रात तब्बल १४ मतदारसंघाचा भाग असल्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असते. त्यामुळे केंद्रीय सशस्त्र दलाच्या तुकड्या देखील पाचारण करण्यात आल्या आहेत. तसेच स्थानिक पातळीवर पोलिसांचाही बंदोबस्त असतो. सर्वत्र पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असले तरी काही ठिकाणी गोंधळाची किंवा कायदा सुव्यवस्था नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नसते. त्यामुळे ठाणे पोलिसांनी ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात एकूण ३५ पोलीस ठाणे आहेत. या सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत या ड्रोनचा वापर केला जाणार आहे. त्याचे चित्रीकरण ठाणे, भिवंडी आणि उल्हासनगर येथील नियंत्रण कक्षामध्ये संलग्न केले जाणर आहे. एखाद्या ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेल्यास पोलिसांकडून तात्काळ त्या ठिकाणी पाहणी करून तेथील परिस्थिती नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे. मागील लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत ड्रोनचा वापर झाला नव्हता. परंतु या निवडणूकीत ड्रोनचा वापर केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ड्रोनचा वापर केला जाणार आहे. मागील काही दिवसांपासून ड्रोनचा वापर करून आमच्या कर्मचाऱ्यांनी कारवाया देखील केल्या आहेत. तसेच संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात पोलिसांचा देखील बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. – ज्ञानेश्वर चव्हाण, सह पोलीस आयुक्त, ठाणे शहर पोलीस. 0000

मतदान केंद्र, परिसर, रस्ते, पदपथ यांच्या स्वच्छतेला प्राधान्य

 कळवा, मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रावर राबविण्यात आली सर्वंकष स्वच्छता मोहीम   ठाणे : बुधवार, २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व मतदान केंद्र आणि त्याच्या परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत, शनिवारी, कळवा, मुंब्रा आणि दिवा या प्रभाग समिती क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रे, १०० मीटरचा परिसर, नजिकची सार्वजनिक शौचालये, पदपथ, मतदान केंद्राकडे येणारे रस्ते, चौक, दुभाजक यांची साफसफाई करण्यात आली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ही सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांनी कळवा येथील मतदान केंद्र परिसरात साफसफाई केली. तसेच, यावेळी मतदान करणे आणि स्वच्छता राखणे याची शपथही घेण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सर्व सफाई कर्मचारी, अधिकारी, प्रभाग समिती मधील स्वच्छता निरीक्षक यांनी या सफाई मोहिमेत सहभाग घेतला. एकूण ३६७ ठिकाणी १५२८ मतदान केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात येत असून त्यासाठी १३९० कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे. उद्या, रविवार, १७ नोव्हेंबर रोजी मानपाडा-माजिवडा, वर्तकनगर, उथळसर या प्रभाग समिती क्षेत्रातील मतदान केंद्रांवर स्वच्छता केली जाणार आहे. तर, सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी नौपाडा-कोपरी, वागळे इस्टेट आणि लोकमान्य नगर- सावरकर नगर या प्रभाग समिती क्षेत्रातील मतदान केंद्रांवर स्वच्छता केली जाणार आहे. 00000

वाघबीळ येथील उबाठा गटाचे माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

अनिल ठाणेकर ठाणे : शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी आपल्या आजवरच्या कारकिर्दीत विकासकार्याचा डोंगर मतदारसंघात उभा केला आहे. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन दररोज पक्ष प्रवेश होत आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघात  आमदार प्रताप सरनाईक यांच्या विकासकामांच्या धडाक्याने प्रेरित होऊन, मोठ्या प्रमाणात शिवसेनेत इनकमिंग सुरू आहे. आतापर्यंत उबाठा गटाचे, काँग्रेस व इतर अनेक पक्षाचे पदाधिकारी, शेकडो कायकर्ते यांनी गेल्या काही दिवसात शिवसेनेत प्रवेश केला असून त्यामुळे ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणखी मजबूत झाली आहे. हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धडाकेबाज कामगिरीवर विश्वास ठेऊन वाघबीळ येथील उबाठा गटाचे माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांनी महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून पाठिंबा दर्शविला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माझ्यावर असलेला विश्वास दाखवून शिवसेना पक्षात  पक्षप्रवेश होत असल्यामुळे दिवसेंदिवस शिवसेना पक्षाची ताकद अजून बळकट होत आहे, याचा मला आनंद आहे असे  प्रताप सरनाईक म्हणाले. यावेळी माजी नगरसेवक संजय तांडेल, ओवळा-माजिवडा विधानसभा समनव्यक साजन कासार, विभागप्रमुख रवी घरत, शिवसैनिक मंगेश शिंगे उपस्थित होते.

आघाडी बनवुन महाराष्ट्राला पिछाडीवर नेणाऱ्यांना रोखा-जे.पी.नड्डा

अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्रात डबल इंजिनच्या सरकारने उत्तम काम केले असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकास धरतीवर अवतरला आहे. तर, विरोधक आघाडी बनवुन सर्व प्रकल्प रोखण्याचे तसेच महाराष्ट्राला पिछाडीवर नेण्याचे काम करीत आहेत. तेव्हा, येत्या २० तारीखला यांना रोखण्याचे काम करून जनतेने कायमचे घरी बसवावे. असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री जगतप्रकाश (जे.पी.) नड्डा यांनी केले. ठाण्यातील एम.एच. हायस्कूल येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या विशेष सभेत जे.पी.नड्डा यांनी ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातील उच्चशिक्षित व उद्यमी व्यावसायिकांना संबोधित केले. याप्रसंगी, खासदार नरेश म्हस्के, ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार संजय केळकर, ओवळा- माजिवडयाचे उमेदवार, आमदार प्रताप सरनाईक, आमदार ॲड. निरंजन डावखरे, भाजप प्रदेश महामंत्री माधवी नाईक, शिवसेना शहरप्रमुख हेमंत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, माजी उपमहापौर ॲड. सुभाष काळे, रिपाई (आ) भास्कर वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. गुरुनानक जयंतीचे औचित्य साधुन जे.पी.नड्डा यांनी ठाण्यातील गुरुदवारामध्ये दर्शन घेतले. त्यानंतर विशेष सभेला उपस्थिती दर्शवत ठाणेकरांच्या माध्यमातून महाराष्ट्राशी संवाद साधला. आधी राजकारण म्हटले की घराणेशाही, तुष्टीकरण होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या वाटेवर चालुन राजकारणाची परिभाषा बदलुन टाकली आहे. या आधी नेहरूंनी तीन वेळा विजय मिळवला तेव्हा, विरोधक कमजोर होते. पण नरेंद्र मोदींनी मजबुत विरोधक असताना तिसऱ्यांदा विजयश्री मिळवली. मोदी यांच्याच नेतृत्वाखाली अनेक राज्यांमध्ये भाजपाची सरकारे आल्याचे सांगून जे.पी.नड्डा यांनी, हे तुष्टीकरणाचे राजकारण करून समाजासमाजात फूट पाडतात. याऊलट मोदींच्या नेतृत्वावर जगातील देशानाही अभिमान वाटतो. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात…जग आमच्या असहमतीचाही आदर करत आहे. भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोन पुर्णपणे बदलला आहे.तर दुसरीकडे विरोधक एनडीएचा व मोदींचा विरोध करताना आता देशाचाही विरोध करू लागल्याचे नड्डा म्हणाले. देशातील आणि राज्यातील विकास कामे आणि विविध योजनांचा उहापोह करून नड्डा यांनी, करोडो युवांचा हा भारत देश आहे. सबका साथ सबका विकास करीत असताना पदपथावरील प्रत्येक गरीबासाठी राहण्याची भोजण्याची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिनच्या सरकारमुळे विकास धरतीवर उतरला आहे. आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रो ते अटल सेतु असे सर्वच प्रकल्प त्यांनी रोखले. लाडकी बहिण योजने विरोधातही ते न्यायालयात गेले. ही मंडळी आघाडी म्हणवतात आणि पिछाडीचे काम करतात. म्हणुन २० नोव्हे. ला यांना रोखण्याचे काम करून घरी बसवा. असे आवाहन नड्डा यांनी केले. ००००

नजीब मुल्ला यांना निवडून दिल्यास मुंब्रा-कळव्याच्या विकासासाठी तीन हजार कोटी देईन – उपमुख्यमंत्री अजित पवार

अनिल ठाणेकर ठाणे : १५ वर्षे एकाला संधी दिलीत त्याने वीज चोरी केली आता पाच वर्पे मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना निवडून द्या, मुंब्रा कळवा मतदारसंघाच्या विकासासाठी तीन हजार कोटी देईल, हा माझा वादा आहे, टोरन्ट मुक्त व ड्रग्ज मुक्त मुंब्रा कळवा मी करून दाखवणार, हे माझे वचन आहे, अशी जाहीर घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी केली. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत  राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ मेक कंपनी समोरील पटांगणात, मुंब्रा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीरसभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीरसभेला मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यातही लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय दिसत होती..यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, डाॅ अलतमाज फैजी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, डाॅ मुमताज शहा, माजी नगरसेवक राजन किणे, अनिता किणे, मोरेश्वर किणे, रुपाली गोटे, आशरीन राऊत, इब्राहिम राऊत, अजिज शेख, राजू अन्सारी, जफर नोमानी, मनिषा भगत, नेहा नाईक, संगिता पालेकर, वहिदा खान, नासिर खान, नजिमुद्दीन मलिक, मुख्तार अन्सारी, मोहसीन शेख, ठाणे महिला जिल्हाध्यक्ष वनिता गोतपागर, युवक जिल्हाध्यक्ष विरु वाघमारे, रिदा रशीद, शर्मिला किणे, राजा सूर्यवंशी, नसीम खान, सिजर सोनी, विष्णू भगत, मयुर सारंग, ऐय्याज हसन,स्मीता खैरे, नाजीया तांबोळी, नंदा शिंदे, माया कटारिया आदी मान्यवर उपस्थित होते. शिवफुलेशाहूआंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित राष्ट्रवादी काँग्रेस आहे.यामुळेच विधानसभा निवडणुकीत १० टक्के मुस्लिम उमेदवारांना संधी दिली.मागील एका वर्षात अनेक निर्णय झाले. यात राज्यातील अल्पसंख्याक समाज वंचित राहू नये म्हणून मार्टी ची स्थापना केली आहे.संभाजी नगर येथे अल्पसंख्यांक आयुक्तालय उभारले आहे.अल्पसंख्याक समाजातील मुलांनी अधिकचे शिक्षण घ्यावे  यासाठी प्रत्येक मुलाला परदेशी शिक्षणाकरीता ५ लाखावरुन ३० लाख शिष्यवृत्ती दिली आहे. वक्फ बोर्ड च्या कार्यालयाची संख्या वाढवण्यासाठी जागेचे प्रावधान करत आहे. मागील ३ महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे व मी मिळून कळवा मुंब्रा मतदासंघांच्या विकासासाठी २०० कोटीचा चा निधी दिला. १५ वर्षे एकाला संधी दिलीत त्याने वीज चोरी केली आता पाच वर्पे मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांना निवडून द्या, घड्याळासमोरील बटन दाबून नजीब मुल्ला यांना विजयी करा मी मुंब्रा कळवा मतदारसंघाच्या विकासासाठी तीन हजार कोटी देईल,  हा माझा वादा आहे, तसेच टोरन्ट मुक्त न ड्रग्ज मुक्त मुंब्रा कळवा मी करून दाखविन, हे माझे वचन आहे, घड्याळला मत म्हणजे राज्याच्या विकासाला मत असे सांगत मी वचन देतो ते पूर्ण करतो, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. 0000

नितीन गडकरी यांची आज ठाण्यात सभा

ठाणे : भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ठाण्यातील गावदेवी मैदानावर रविवारी  सायंकाळी ६ वाजता भव्य जाहीर सभा होणार आहे. या सभेनिमित्ताने ठाणेकरांना शहराच्या विकासाचे व्हिजन ऐकावयास मिळेल. भाजपाचे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संजय केळकर यांच्यासह कोपरी-पाचपाखाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ओवळा-माजिवडा मतदारसंघातील प्रताप सरनाईक, मुंब्रा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांची सभा होत आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली. या सभेला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेनेचे शहरप्रमुख हेमंत पवार, आरपीआयचे शहराध्यक्ष भास्कर वाघमारे,यांच्यासह मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिकांबरोबरच महायुतीचे  कार्यकर्तेही उपस्थित राहतील. या सभेसाठी महायुतीकडून सध्या जोरदार तयारी सुरू आहे. 0000

संजय केळकर आणि संजय भोईर यांचे मनोमिलन;

ठाणे शहरात महायुतीमधील नाराजी अखेरच्याक्षणी दूर ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्याविरोधात निवडणूक लढण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मागे घेतल्यानंतरही शिंदे सेनेचे संजय भोईर हे प्रचारापासून दूर असल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली होती. परंतू केळकर यांनी गुरुवारी सायंकाळी भोईर यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असून या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये प्रचार रणनीती बाबत चर्चा झाल्याने अखेरच्या क्षणी दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याचे चित्र आहे. ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्यासाठी शिंदेच्या सेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे हे इच्छूक होते. परंतु हा मतदार संघ महायुतीच्या जागा वाटपात भाजपच्या वाट्याला गेला असून येथून भाजपने आमदार संजय केळकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. यामुळे नाराज झालेले संजय भोईर आणि मिनाक्षी शिंदे यांनी अपक्ष निवडणुक लढण्यासाठी उमेदवारी अर्ज घेतले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर दोघांनी अर्ज दाखल केले नव्हते. यामुळे या मतदार संघातील बंडखोरी टळली होती. असे असले तरी संजय भोईर, मिनाक्षी शिंदे हे दोघेही केळकर यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय केळकर यांच्या समक्ष मिनाक्षी शिंदे यांच्यासह स्वपक्षातील नाराजांचे म्हणणे ऐकून घेत त्यांची नाराजी दूर केली होती. यानंतर मीनाक्षी या सुद्धा प्रचार सुरू केला होता. असे असले तरी संजय भोईर मात्र प्रचारापासून दूर होते. बाळकूम, माजीवडा, कोलशेत भागातुन भोईर यांचे सहा नगरसेवक निवडून येतात. या भागात त्यांचा मोठा प्रभाव आहे. ते प्रचारापासून दूर असल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली होती. भाजप उमेदवार संजय केळकर यांनी गुरुवारी सायंकाळी शिंदेच्या शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, संजय भोईर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी केळकर यांनी भोईर यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये प्रचार रणनीती बाबत चर्चा झाल्याने अखेरच्या क्षणी दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याचे चित्र आहे. संजय केळकर आणि संजय भोईर यांनी विविध प्रश्नांबरोबरच प्रचाराच्या रणनीतीबाबत सविस्तर चर्चा झाली. भविष्यात बाळकूम-ढोकाळीतील नागरिकांना परिपूर्ण सुविधा मिळतील, यासाठी कटीबद्ध असल्याचे केळकर यांनी सांगितले. तसेच या भेटीत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा विक्रमी मताधिक्याने विजय साकारण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी आमदार निरंजन डावखरे, ठाणे विधानसभा निवडणूक प्रमुख सुभाष काळे, शिंदेच्या शिवसेनेचे शहरप्रमुख हेमंत पवार, विद्याधर वैशंपायन, माजी नगरसेवक भुषण भोईर हे उपस्थित होते, अशी पोस्ट संजय भोईर यांनी समाजमाध्यमांवर करत भेटीचा फोटो शेअर केला आहे.