Category: ठाणे

Thane news

मतदानपूर्व आणि मतदान दिवशीच्या जाहिरातींना ‘एमसीएमसी’चे प्रमाणिकरण बंधनकारक

ठाणे : कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दि.20 नोव्हेंबर 2024 मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच…

निवडणूक विशेष पोलीस निरीक्षकांनी घेतला कोकण विभागाचा आढावा

ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठीची मतदान प्रक्रिया 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकण विभागातंर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांच्या तयारीचा आढावा आज निवडणूक विशेष पोलीस निरीक्षक दीपक मिश्रा यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीदरम्यान घेतला. निवडणूकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असून या कर्तव्यात कोणतीही कसूर राहणार नाही. या दृष्टीने विधानसभा सार्वत्रिक निवडणूका शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातील जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस प्रशासन यांनी सतर्क राहण्याचे आदेश देत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या. आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विशेष पोलीस निरीक्षक यांनी कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांतील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी पालघर, रायगड, रत्नागिरी, ‍सिंधुदूर्ग येथील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी हे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. सुरूवातीला ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी ठाणे जिल्हयातील 18 विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रे, मतदानाची तयारी याबाबत सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती दिली. तसेच कोकण ‍विभागातंर्गत इतर जिल्ह्याबाबतही त्यांनी जाणून घेतले. ‍प्रत्येक जिल्हयात तयार करण्यात आलेल्या कंट्रोल रुमच्या माध्यमातून मतदानाच्या एक दिवस आधी 19 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रियेची अभिरुप चाचणी घेण्यात यावी, जेणेकरुन मतदानाच्या दिवशी येणाऱ्या संभाव्य अडचणी टाळता येतील.‍ मतदान केंद्रावर मतदानासाठी येणारे उमेदवार हे मतदान झाल्यानंतर मतदान केंद्राच्या बाहेर 100 मीटर परिसरात रेंगाळणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी, असे श्री.मिश्रा यांनी नमूद केले.  मतदान केंद्रावर येणाऱ्या वयोवृद्ध मतदारांसाठी जास्तीत जास्त व्हीलचेअर उपलब्ध करण्यात याव्यात, जेणेकरुन मतदारांना मतदान केंद्रावर ताटकळत उभे रहावे लागणार नाही, यासाठी आपल्या विभागातील रुग्णालय, सेवाभावी संस्थांशी संपर्क साधून व्हीलचेअरची पुरेशी उपलब्धतता प्रत्येक मतदान केंद्रावर करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. एखाद्या मतदान केंद्रावर मशीनमध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण होवून मतदान प्रक्रिया थांबली किंवा अन्य काही अडचण उद्भवली तर त्याचे वृत्त हे दिवसभर विविध वाहिन्यांवर दाखवले जाते. त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाल्यावरसुध्दा ती बातमी तशीच सतत सुरू असते याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी ‍याबाबतची माहिती घेवून संबंधित वाहिन्यांशी संपर्क साधून वस्तूस्थिती तात्काळ कळविण्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, जेणेकरुन निवडणूक विभागाची बदनामी होणार नाही, या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही श्री.दीपक मिश्रा यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व ठिकाणी भरारी पथकाच्या माध्यमातून सुरू असलेली वाहनांची तपासणी देखील काटेकोरपणे करण्याचे निर्देश निवडणूक विशेष पोलीस‍ निरीक्षक दीपक मिश्रा यांनी पोलीस प्रशासनाला दिले. ‍कोकण विभागातील सर्व जिल्हयांची मतदानाची तयारी ही अंतिम टप्प्यात असून एखादी समस्या उद्भवल्यास तात्काळ निवडणूक आयोगाशी समन्वय साधावा असे नमूद करीत त्यांनी निवडणूका ‍नि:पक्षपातीपणे व निर्भयपणे पार पाडण्यासाठी सर्व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

मतदानाकरिता मतदान यंत्रे तयार करण्याची प्रक्रिया

 जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील चार मतदारसंघात पार पडली ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतदानाकरिता लागणारी मतदान यंत्रे मतदानाकरिता तयार करण्याची प्रक्रिया…

ठाणे जिल्ह्याच्या प्रचारातून वाहतूक कोंडीचा मुद्दाच हरवला

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात हजारो कोट्यवधी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सार्वजनिक वाहतुकीचे राष्ट्रीय प्रकल्प उभारले जात असले तरी जिल्ह्यातील प्रामुख्याने कल्याण ग्रामीण आणि पश्चिम, डोंबिवली, ठाणे शहर, भिवंडी ग्रामीण आणि पश्चिम याचबरोबर शहापूर या विधानसभा मतदारसंघांमधील अंतर्गत आणि बाह्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या जटील आहे. परंतु विधानसभा निवडणूक रिंगणात उतरलेले आणि स्वतःला भावी आमदार म्हणून भूषण मिरवणाऱ्या सर्व उमेदवारांनी वाहतूक कोंडीच्या मुद्द्याला प्रचारात पूर्णपणे बगल दिली आहे. यामुळे ठाणे जिल्ह्याच्या प्रचारातून वाहतूक कोंडीचा मुद्दाच हरवला असल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वच उमेदवारांकडून निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. यंदा जवळपास सर्वच पक्षातील उमेदवारांकडून मोठी विकासकामे, आर्थिक मदतीची घोषणा, महापुरुषांची स्मारके तर विविध समाजासाठी भव्य वास्तू यांसारख्या अनेक घोषणांचा पाऊस पाडण्यात येत आहे. परंतु जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रश्न असलेल्या आणि दिवसेंदिवस अधिक त्रासदायक होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या विषयाला सर्वच उमेदवारांनी आपल्या प्रचार मुद्द्यातून बगल दिली असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे जिल्ह्यात मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई – बडोदा राष्ट्रीय महामार्ग, मालवाहतुक विशेष रेल्वे मार्ग, ऐरोली – काटई उन्नत मार्ग, कल्याण रिंग रोड यांसारखे काही हजार कोटी…

नवी मुंबईत घरोघरी मतदान जागृतीची माहितीपत्रके वितरीत करून मतदान करण्याचे आवाहन

नवी मुंबई : मतदानाविषयी आवश्यक माहिती उपलब्ध होऊन एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने नियोजन केले असून मतदानाविषयी आवश्यक माहिती देणारे माहितीपत्रक घरोघरी वाटप करण्यात येत आहे. या माहिती पत्रकाचे अनावरण नुकतेच महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड, सहा.संचालक नगररचना सोमनाथ केकाण, 150 ऐरोली विधानसभा स्वीप नोडल अधिकारी उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे पाटील, 151 बेलापूर विधानसभा स्वीप नोडल अधिकारी सहाय्यक आयुक्त सागर मोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या माहितीपत्रकावर तरुणाईला तसेच सर्वच मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले असून मतदान करण्याचे महत्वही सांगण्यात आले आहे. तसेच या पत्रकावर वोटर हेल्पलाईन ॲपचे क्यूआर कोड प्रसिध्द करण्यात आले असून ॲन्ड्रॉइड व ॲपल अशा दोन्ही प्रकारच्या मोबाईल फोनसाठी स्वतंत्र क्यूआर कोड प्रसिध्द करण्यात आले आहेत. हा क्यूआर कोड स्कॅन करुन कोणताही मतदार आपले मतदार यादीतील नाव, आपला भाग क्रमांक, मतदार क्रमांक तसेच मतदार केंद्राचे ठिकाण ही माहिती अगदी सहजगत्या उपलब्ध करुन घेऊ शकतो. सदरची माहितीपत्रके आशा वर्कर तसेच अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत घरोघरी वितरीत केली जात असून प्रत्येकाने 20 नोव्हेंबर रोजीच्या विधानसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले जात आहे. त्याचप्रमाणे निवडणुकीसाठी नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत प्रत्येक मतदारापर्यंत त्याचा भाग क्रमांक, मतदार क्रमांक आणि त्याचे मतदान कोणत्या केंद्रावर आहे अशी संपूर्ण माहिती असलेली मतदार चिठ्ठी पोहचविली जात आहे. या माध्यमातून विधानसभा निवडणूक कार्यालयांप्रमाणेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही मतदारांपर्यंत थेट पोहचून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

स्थानिकांच्या जमिनी वाचवायच्या असतील तर नरेश मणेरा यांनाच विजयी करा- सुरेश म्हात्रे

ठाणे : स्थानिक आगरी, कोळी, मुस्लिम समाजाला आपल्या जमिनी वाचवायच्या असतील तर नरेश मणेरा यांनाच मते देऊन विजयी करा, असे आवासन  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी केले. यावेळी ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नरेश मणेरा हे ही उपस्थित होते. महाआघाडीच्या वचननाम्यात घरातील सर्व मताभगिनी असलेल्या भाग्यलक्ष्मींना तीन हजार रुपये दर महिन्याला मानधन दिले जाणार आहे, २५ लाखाचा विमा देण्याचे आमचे वचन आहे.,  तीन लाखांपर्यंतचे शेतकर्‍यांचे कर्ज माफ केले जाणार आह,जातीय निहाय जनगणना केली जाणार आहे. कंपन्या बंद पडल्याने स्थानिकांच रोजगार बुडाला, स्थानिकांचे रेतीचे व्यवसाय बंद पाडून आमच्या रेतीच्या प्लाॅटवर चौपाटी करुन आमच्या पोटावर बुलडोझर चालवले जात आहेत. क्लस्टरचे डेव्हलपमेंट करताना हजार दोन हजार फुटाच्या घराला साडेतीनशे फूटाचे घर देणार असाल तर हा कुठला न्याय ? अश्या डेव्हलपमेंटला आमचा विरोध आहे. शहराचा विकास होताना विकास कामात स्थानिकांना प्राधान्य दिले जात नाही. ज्याच्यामुळे स्थानिक तरुण तरुणींच्या हाताला काम मिळेल असा १५ वर्षात असा एकही प्रकल्प या मतदारसंघात आला नाही. ४० वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहिले त्या पस्तीस वर्ष नगरसेवक राहिलेल्या नरेश मणेरा या स्थानिक व्यक्तीला उमेदवारी दिल्याबद्दल मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आभारी आहे. नरेश मणेरा यांच्याविषयी लोकांचा उत्सर्त प्रतिसाद पहावयास मिळाली.स्थानिक आगरी, कोळी, मुस्लिम समाजाला आवाहन करेन की आपल्या जमिनी वाचवायच्या असतील तर नरेश मणेरा यांनाच मते देऊन विजयी करा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी व्यक्त केले.

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना  पाठींबा

अनिल ठाणेकर ठाणे : निवडणुकीची रणधुमाळी सुरु होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. मात्र खुद्द शिंदे कोपरी – पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले…

स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेची पथनाटयातून ठिकठिकाणी जनजागृती

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पथनाटयासारख्या लोकप्रिय माध्यमाचा आयुक्त्‍ डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी वापर करण्यात…

भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी निवडणूक कर्तव्यात कसूर केल्याने व कर्तव्यपरायणता न राखल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याद्वारे निलंबनासह गुन्हा दाखल करण्याची कठोर कारवाई !!!

ठाणे : 141-उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील भरारी पथक क्र.3 व 6 मधील उल्हासनगर महानगरपालिकेचे कर्मचारी लिपिक, श्री.संकेत चनपूर, श्री.संदीप शिरसवाल व मुकादम, श्री.आण्णासाहेब बोरूडे तसेच या पथकातील पोलीस कर्मचारी पोलीस हवालदार…

ठाणे जिल्ह्यात दि.11 नोव्हेंबर पर्यंत 23 कोटी 41 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात व ठाणे जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगामार्फत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहिता काळात नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात प्रशासनामार्फत कठोर…