Category: ठाणे

Thane news

 ट्रेडिशनल स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचे देदीप्यमान यश

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा   ठाणे : दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा २२ ऑक्टोबरला घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये  ट्रेडिशनल स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी विजय प्राप्त केला. जिल्ह्यातील विविध शाळांमधील खेळाडू…

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी १३ मतदारसंघांत बंडोबा जोरात

  ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी १३ मतदारसंघांत महायुती अथवा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध त्याच पक्षाच्या किंवा मित्रपक्षाच्या इच्छुकांनी बंडखोरी केली आहे. ठाणे शहर, ओवळा-माजिवडा, मुंब्रा-कळवा, डोंबिवली व शहापूर या पाच विधानसभा मतदारसंघांत ठळक बंडखोरी दिसत नाही. महायुती व महाविकास आघाडीमधील प्रत्येकी तीन पक्षांतील इच्छुकांची संख्या जास्त असल्याने व पक्षांमध्ये समन्वय नसल्याने घाऊक बंड झाले आहे. आता येत्या ४ नोव्हेंबरपूर्वी बंडोबांना थंड करण्याचे आव्हान सर्वच पक्षांपुढे आहे. ४ नोव्हेंबरनंतर नेमक्या किती मतदारसंघांत किती बंडखोर राहतात, हे स्पष्ट होईल. पाचपाखाडीमध्ये… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडीतून स्व.आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे उद्धवसेनेतर्फे रिंगणात उतरले आहेत. येथे काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. मविआच्या मतविभाजनाचा शिंदे यांना फायदा होऊ शकतो. ऐरोली, बेलापुरात… ऐरोली मतदारसंघात गणेश नाईक (भाजप) विरुद्ध उद्धवसेनेचे एम.के. मढवी अशी लढत असताना शिंदेसेनेच्या विजय चौगुले यांनी रिंगणात उडी मारली आहे. बेलापूरमध्ये गणेश नाईक यांचे पुत्र संदीप यांनी अलीकडेच शरद पवार गटात प्रवेश करून भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याविरोधात बंड केले. शिंदेसेनेचे विजय नहाटा यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. मीरा-भाईंदरमध्ये भाजपला भीती? मीरा-भाईंदरमध्ये गेल्या वेळी अपक्ष निवडणूक लढवून विजयी झालेल्या गीता जैन यांनी आणि भाजपचे नेते नरेंद्र मेहता यांनी अर्ज दाखल केला होता. भाजपने ऐनवेळी गीता जैन यांना डावलून मेहता यांनी उमेदवारी दिली. त्यामुळे जैन यावेळीही पुन्हा अपक्ष रिंगणात आहेत. याखेरीज भाजपमधील सुरेश खंडेलवाल (अपक्ष), अजित पवार गटाचे अरुण कदम (अपक्ष) यांनीही बंडाचे निशाण फडकवले आहे. कल्याण ग्रामीणचा तिढा कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील विजयी झाले होते. मनसेने लोकसभेत दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करण्याकरिता पाटील यांच्या विरोधात अर्ज दाखल न करण्याकरिता भाजपचा दबाव असतानाही शिंदेसेनेचे राजेश मोरे यांनी रिंगणात उडी घेतली आहे. कदाचित मुंबईतील माहीम व कल्याण ग्रामीणचा तिढा एकाच वेळी सुटेल. कल्याण पूर्व आणि पश्चिम कल्याण पूर्वेत भाजपने सुलभा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांची लढत उद्धवसेनेच्या धनंजय बोडारी यांच्याशी असतानाही शिंदेसेनेचे महेश गायकवाड (अपक्ष) यांनी, तर काँग्रेसच्या सचिन पोटे (अपक्ष) यांनी अर्ज दाखल करून दोन्ही अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढवली आहे. कल्याण पश्चिममध्ये शिंदेसेनेच्या विश्वनाथ भोईर यांच्या विरोधात नरेंद्र पवार व वरुण पाटील या भाजपच्या इच्छुकांनी अर्ज दाखल केले. काँग्रेसचे राकेश मुथा व राजाभाऊ पातकर यांनी बंडखोरी करून उद्धवसेनेचे सचिन बासरे यांची चिंता वाढविली आहे. उल्हासनगरात काय? उल्हासनगरात भाजपचे कुमार आयलानी व शरद पवार गटाचे ओमी कलानी, असा सामना असताना अजित पवार गटाचे भरत गंगोत्री यांनी रिंगणात उडी घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या मतांचे विभाजन होण्याची भीती आहे. अंबरनाथ, मुरबाडमध्ये चिंता कुणाला? अंबरनाथमध्ये सुमेध भवार या काँग्रेस पदाधिकाऱ्याने बंड केले आहे. मुरबाडमध्ये किसन कथोरे विरुद्ध सुभाष पवार या लढतीत शरद पवार गटाचेच शैलेश वडनेरे यांच्या बंडामुळे पक्षाची चिंता वाढली. भिवंडी पूर्व, पश्चिम वादात भिवंडी पूर्वेत सपाच्या रईस शेख यांच्या विरुद्ध उद्धवसेनेच्या रूपेश म्हात्रे यांनी शड्डू ठोकला, तर भिवंडी ग्रामीणमध्ये भाजपच्या स्नेहा पाटील यांनी शिंदेसेनेचे शांताराम मोरे यांच्या विरोधात मैदानात उडी घेतली. भिवंडी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसच्या दयानंद चोरघे यांच्या विरोधात काँग्रेसचे विलास पाटील यांनी बंड केले आहे. एमआयएमकडून तुरुंगात असलेले खालिद गुड्डू व वारीस पठाण यांचेही अर्ज आहेत. 0000

प्रदूषणमुक्त सण साजरे करण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव आवाहन

  ठाणे : राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात केवळ हरित फटाके वाजवण्याची परवानगी आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याचे पालन करून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. सर्व ठाणेकरांना सणाच्या निमित्ताने शुभेच्छा देतानाच आरोग्याची खबरदारी घेण्याचेही आवाहन राव यांनी केले आहे. सणांच्या काळात ६ ते ८ आणि रात्री ८ ते १० या काळात हरित फटाके फोडण्याची परवानगी आहे. प्रदूषणमुक्त सण साजरा करून नागरिकांनी स्वत:सोबतच प्राणी, पक्षी, झाडे यांचाही फटाक्यांच्या दुष्परिणामांपासून बचाव करावा, असे आयुक्त राव यांनी म्हटले आहे. या संदर्भातील आवाहन करणारे जनजागृती फलकही महापालिका क्षेत्रात प्रर्दशित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरिकांनी हरित फटाके फोडताना काळजी घ्यावी. फटाके फोडताना, सिंथेटीक कपड्यांएवजी सूती कपडे परिधान करावेत. मोकळ्या जागेत फटाके फोडावेत. फटाके फोडताना पाणी आणि वाळू यांचा साठा जवळपास ठेवावा. फटाके फोडताना लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सूचनांनुसार नागरिकांनी जबाबदारीने फटाके फोडावेत, असे आवाहन महापालिकेच्या पर्यावरण विभागाने केले आहे. त्याचबरोबर, दिवाळीची सुटी लक्षात घेऊन दैनंदिन साफसफाई, सार्वजनिक शौचालयांची सफाई, पाणी पुरवठा या व्यवस्था सुरळीत राहतील याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत दिले आहेत. ००००००

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांसह आशा सेविकांनाही दिवाळी भेट

६००० रुपयांची दिवाळी भेट आशा सेविकांच्या बॅंक खात्यात जमा ठाणे : दिवाळी सणाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेचे वर्ग २ ते ४ मधील सर्व कर्मचारी यांचे सानुग्रह अनुदान, ऑक्टोबर महिन्याचे वेतन तसेच, आशा सेविकांना देण्यात येणारी ६००० रुपयांची दिवाळी भेट दिवाळीपूर्वीच बॅंक खात्यात जमा करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने नियोजनाबद्ध व्यवस्था केल्याने सानुग्रह अनुदान, वेतन आणि दिवाळी भेट ही  दिवाळीच्या आधीच जमा करण्यात आली. त्याबद्दल आशा सेविका आणि ठामपा कर्मचारी यांच्यात आनंदाचे वातावरण असून त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आभार मानले आहेत. ठाणे महापालिकेचे २ ते ४ या संवर्गातील ६३०० कर्मचारी, शिक्षण विभागातील ७३६ कर्मचारी, ठाणे परिवहन सेवेचे १४९३ कायम कर्मचारी, महापालिकेचे थेट कंत्राटी कर्मचारी व इतर असे ३६५ कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान २४००० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले. तर, ४९२ आशा सेविकांना गतवर्षीप्रमाणेच ६००० रुपयांची दिवाळी भेट देण्यात आली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, सानुग्रह अनुदान, दिवाळी भेट तसेच, कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वीच बॅंक खात्यात जमा करण्यात आले. ही सर्व एकत्रित रक्कम सुमारे २२ कोटी रुपये आहे. ठाणे महापालिकेच्या विविध विभागांसाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवणाऱ्यात येते. या कामगारांनाही  देय  असलेल्या रकमेनुसार सानुग्रह अनुदानाचे वितरण तसेच ऑक्टोबरचे वेतन संबंधित कंत्राटदारामार्फत दिवाळीपूर्वीच करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. त्याची अमलबजावणी करण्यात आल्याची खात्री विभागप्रमुखांमार्फत करण्यात आली  आहे.

जितेंद्र आव्हाड तुम्ही प्रचार करू नका, तुमचे काम बोलतयं

कळवा-खारेगाव संकुल पदाधिकाऱ्यांचे आव्हाडांना पत्र ठाणे : राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघामध्ये जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला असा सामना रंगला असतानाच, या मतदार संघातील कळवा- खारेगाव भागातील गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हाड यांना पाठविलेले पत्र सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे. त्यात जितेंद्र आव्हाड तुम्ही प्रचार करू नका…तुमचे काम बोलतय अशा आशयाचा मजकूर आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर ठाणे जिल्ह्यातही पक्षात उभी फुट पडली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांची साथ दिली तर, आव्हाड यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी अजीत पवार यांची साथ दिली. तेव्हापासून या दोन्ही गटात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची लढाई सुरू आहे. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातून जितेंद्र आव्हाड हे तीनदा निवडुण आले आहेत. या मतदार संघातून राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडुण येतात. यामुळे हा परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत हा बालेकिल्ला कोणात्या पवारांचा असेल, हे स्पष्ट होणार आहे. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षाने जितेंद्र आव्हाड यांना पुन्हा निवडणकीच्या रिंगणात उतरविले आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी (अजीत पवार) या पक्षाने नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे येथे गुरू-शिष्याची लढाई होणार आहे. या दोन्ही नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्ती प्रदर्शन केले असून त्याचबरोबर दोन्ही नेते मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी मेळावे घेत आहेत. असे असतानाच, या मतदार संघातील कळवा- खारेगाव भागातील गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हाड यांना पाठविलेले पत्र सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे. त्यात जितेंद्र आव्हाड तुम्ही प्रचार करू नका…तुमचे काम बोलतय अशा आशयाचा मजकूर आहे. वास्तुआनंद, गोपीनाथ टाॅवर, चावंडाई रेसीडेन्सी, वेदांत पार्क, साई विहार, राज पार्क, वैष्णवीधाम, विराट, समृद्धी हाईट यासह इतर संकुलांनी असे पत्र आव्हाड यांना पाठविले आहे. काय म्हटलयं पत्रात… गेले अनेक दिवस आम्ही आपणास गल्लीबोळात प्रचार करताना पाहत आहोत. आपण मागील १५ वर्षे प्रामणीकपणे एवढे काम करीत आहात आणि आमच्या पारसिक परिसराचा विकास केल्यानंतर आपण गल्लीबोळात प्रचार करत फिरणे आम्हांला पाहवत नाही. तरी आपणास प्रचार करण्याची आवश्यकता नाही. आम्ही नागरीक आपणा सोबतच आहोत. त्यामुळे आमच्या सोसायटीने निर्णय घेतला आहे की आपणास एकमताने मतदान करणार. आपले प्रचारक आम्हीच आहोत. ही निवडणूक आता आम्ही आमच्या हातात घेतली आहे. ही निवडणुक आता लोकचळवळ झाली असुन केलेल्या कामाची पावती देण्याची हीच वेळ आहे, असे संकुलांच्या पत्रात मजकूर आहे.

ठाण्यातील सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित

ठाणे : ठाणे आयुक्तायल क्षेत्रातील सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांचे सायबर पोलीस ठाणे अखेर कार्यान्वित झाले आहे. नव्या पोलीस ठाण्यामुळे आता सायबर गुन्ह्यासंदर्भात तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. या पोलीस ठाण्यात सहा अधिकारी आणि ३० कर्मचारी असणार आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाजवळ हे पोलीस ठाणे बांधण्यात आले आहे. गेल्याकाही वर्षांमध्ये ठाणे जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. त्याप्रमाणे गुन्ह्यांची प्रकरणे देखील वाढली आहेत. ठाण्यात दररोज सायबर गुन्हे घडत आहेत. शेअर मार्केटच्या नावाने फसवणूक, मोबाईलवर एखादी लिंक पाठवून बँक खाते रिकामे करणे, ऑनलाईन ‘टास्क’ देऊन आर्थिक फसवणूक करणे अशा प्रकरणांमध्ये फसवणुकीचे प्रमाण अधिक आहे. फसवणूक होणाऱ्यांमध्ये सर्वच वयोगटातील नागरिक आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र असे पोलीस ठाणे नव्हते. त्यामुळे सायबर गुन्हे शोध कक्षामार्फत पोलीस तपास करत होते. काही महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाजवळ सायबर पोलीस ठाण्याचे बांधकाम पूर्ण झाले होते. मंगळवारी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले. या पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह सहा अधिकारी आणि ३० पोलीस कर्मचारी कार्यरत असणार आहे.

कल्याण ग्रामीणचा निर्णय वरिष्ठांचा!

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची स्पष्टोक्ती ठाणे –महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवार दिला जाणार नसल्याचे बोलले जात असतानाचा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने अखेरच्या यादीत कल्याण…

मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारताच ठाण्यातील बंड शमले

  ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्याविरोधात दंड थोपटत अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा करणारे शिंदे सेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे या दोघांनी शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केलेले नसल्यामुळे महायुतीमधील बंडखोरी टळली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोळे वाटारत महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिल्याने या दोघांनी निवडणूक लढायची नाही असा निर्णय घेऊन अर्ज दाखल केलेले नसल्याचे सुत्रांकडून समजते. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर यांनी उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले होते. दादाचं काम बोलतय असे पोस्टर शहरभर झळकवून त्यांनी या मतदारसंघावर दावाही ठोकला होता. परंतु महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा भाजपला गेली. या मतदारसंघातून भाजपचे आमदार संजय केळकर हे दोनदा निवडून आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघाची जागा महायुतीच्या जागा वाटपामध्ये भाजपच्या वाट्याला गेली आणि भाजपने येथे संजय केळकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. यामुळे भोईर हे नाराज झाले होते. त्याचबरोबर शिंदे सेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनीही संजय केळकर यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची घोषणा करत बंडखोरी करण्याची तयारी सुरू केली होती. हे दोघे अपक्ष निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम होते. यामुळे ठाणे शहर मतदारसंघात बंड अटळ मानले जात होते. या बंडामुळे भाजप आणि महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली होती. शिंदे सेनेच्या नेत्यांकडून ठाणे शहरात बंडाची भाषा होऊ लागताच मतदारसंघाशेजारीच असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ देण्याची मागणी करत भाजपनेही दबावतंत्राचा अवलंब केला होता. असे असतानाच, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात भाजप इच्छुकांनी अपक्ष अर्ज दाखल केले नाहीत. तर, अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा करणारे शिंदे सेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे या दोघांनी शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केलेले नसल्यामुळे महायुतीमधील बंडखोरी टळली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोळे वाटारत महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिल्याने या दोघांनी निवडणूक लढायची नाही असा निर्णय घेऊन अर्ज दाखल केलेले नसल्याचे सुत्रांकडून समजते. कोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले. त्यांचा शब्द अंतिम मानून निवडणूक लढवायची नाही असा निर्णय घेतला. – संजय भोईर, माजी नगरसेवक, शिवसेना (शिंदे गट) ०००००

भाजपा युवा व महिला मोर्चाने शिकविला सीईडीपी स्कील्ड इन्स्टिट्यूटला धडा!

ठाण्यातील ८ विद्यार्थीनींचे पैसे मिळवून दिले परत ठाणे : जनरल नर्सिंग कोर्स देण्याच्या नावाखाली सर्वसामान्य कुटुंबातील गरीब मुलींची फसवणूक करणाऱ्या ठाण्यातील बनावट सीईडीपी स्कील्ड इन्स्टिट्यूटला भाजपा महिला मोर्चाने धडा शिकविला आहे. फसवणूक झालेल्या ८ मुलींची १ लाख ६२ हजारांची रक्कम संस्थेने परत दिली आहे. या संस्थेवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुरज दळवी, समर्थ नायक व नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले यांनी केली आहे. सामान्य घरातील तरुण मुलींना लवकर रोजगार मिळवून देण्याचे आमिष दाखवून राममारुती रोडवरील सीईडीपी स्कील्ड इन्स्टिट्यूटने मुलींना प्रवेश दिले होते. प्रवेश घेताना महाराष्ट्रातील विद्यापीठाची अभ्यासक्रमाला मान्यता असल्याचे सांगण्यात आले. या अभ्यासक्रमाचे शुल्क म्हणून एका वित्तीय संस्थेकडून मुलींच्या कागदपत्रांची शहानिशा न करताच कर्ज मंजूर करुन संस्थेला दिले गेले. त्यानंतर या मुलींचे परराज्यातील बनावट विद्यापीठात प्रवेश करण्यात आल्यावर या प्रकाराला ८ मुलींनी आक्षेप घेतला. त्यांनी भाजपा मध्यवर्ती कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुरज दळवी, समर्थ नायक, नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले, सरचिटणीस प्रशांत कळंबटे,गुलाब झा, कीर्ती शेट्टी, प्रसाद विश्वकर्मा,हिमांशू राजपूत यांनी इन्स्टिट्यूटमधील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर आठ मुलींनी प्रवेशावेळी जमा केलेली रक्कम १ लाख ६२ हजारांची रक्कम परत करण्यात आली. या इन्स्टिट्यूटवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाने केली आहे. त्याचबरोबर अशा फसवणूक करणाऱ्या शैक्षणिक संस्थांची सातत्याने तपासणी करुन कारवाईचा आग्रह धरला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि केळकर कुटुंबियांचे फार जुने संबंध – ना. रामदास आठवले

अनिल ठाणेकर ठाणे : संजय केळकर हे सर्वसामान्य लोकांशी संवाद ठेवणारे आमदार आहेत, प्रामाणिक आहेत तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि केळकर कुटुंबियांचे फार जुने संबंध आहेत. केळकरांना जास्तीत जास्त मतांनी…