Category: ठाणे

Thane news

 आमदार संजय केळकर यांचे ‘घर चलो’ अभियान

    अनिल ठाणेकर ठाणे : भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइं महायुतीचे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ करण्यात आला. हरिनिवास येथील दत्त…

ठाण्यात जन्म-मृत्यु दाखल्यांसाठी महिनाभराची प्रतिक्षा

नव्या प्रणालीतील तांत्रिक अडचणींचा नागरिकांना फटका     ठाणे : केंद्र शासनाने जुनी नागरी नोंदणी प्रणाली (सीआरएस पोर्टल) संकेतस्थळ बंद ठेवून ती अद्ययावत करत चार महिन्यांपुर्वी कार्यान्वित केली असली तरी…

 बचत गटांच्या सरस महोत्सवांना आचार संहितेची झळ.!

 दिवाळी निमित्त होणाऱ्या आर्थिक उलाढालीत यंदा खंड     ठाणे : दिवाळीच्या मुहूर्तावर विविध खाद्यपदार्थ, पणत्या, शोभेच्या वस्तू, विद्युत रोषणाई यांची महिला बचत गटांकडून जोरदार विक्री करण्यात येते. यासाठी जिल्हा…

 शिवसेनेचे वामन म्हात्रे अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार

 शिवसेनेत दुसऱ्या बंडखोरीचे संकेत, २८ ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार   बदलापूर : महायुतीतील कुरबुऱ्या आता उघडपणे सुरू असून मुरबाड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर सोमवरी…

 मुरबाडमधून सुभाष पवारांची बंडखोरी

 राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश, उमेदवारीवरही शिक्कामोर्तब   बदलापूरः शिवसेनेचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख आणि ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांनी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार ) पक्षात प्रवेश केला आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्याविरूद्ध लढण्यासाठी पवार तयारी करत होते. या प्रवेशासह त्यांच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथून शरद पवार गटातून इच्छुक असलेले बदलापुरचे शहर अध्यक्ष शैलेश वडनेरे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड विधानसभा मतदारसंघात एकेकाळी कॉंग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. सुरूवातीला शांताराम घोलप आणि पुढे गोटीराम पवार यांच्या माध्यमातून हा मतदारसंघ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात राहिला. गोटीराम पवार यांच्या चार टर्म आमदारकीनंतर आता पुन्हा त्यांचे पुत्र सुभाष पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. काही वर्षांपूर्वी सुभाष पवार यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना शिवसेनेने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पदही दिले होते. त्यांच्याकडे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख पदही होते. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही ही जागा भाजपला गेल्याने इच्छुक असलेले सुभाष पवार यांची कोंडी झाली. पवार यांनी महाविकास आघाडीची दारे यापूर्वीच ठोठावली होती. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाकडे जाण्याची शक्यता असल्याने त्यांनी तसा संपर्क यापूर्वीच केल्याची माहिती होती. रविवारी भाजपने आपल्या पहिल्याच यादीत आमदार किसन कथोरे यांना येथून उमेदवारी जाहिर केल्यानंतर सुभाष पवार यांनी आपण निवडणूक तर लढणारच, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षात जाणार हे निश्चित मानले जात होते. त्यानुसार सोमवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि माजी आमदार गोटिराम पवार यांच्या उपस्थितीत सुभाष पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशासोबतच पवार यांना पक्षातर्फे उमेदवारीही मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता किसन कथोरे विरूद्ध सुभाष पवार असा पारंपारिक सामना होणार आहे. पवारांच्या प्रवेशाला आक्षेप ज्यांनी आज पक्षात प्रवेश केला ते ठेकेदार आहेत. वडिलांच्या पुण्याईवर यांचे राजकारण आहे. अशाप्रकारे पक्षानेही लोकांना प्रवेश आणि उमेदवारी देणे योग्य नाही. आम्ही पक्षासाठी काम करत आहोत. पक्षाने बाहेरून आलेल्या उमेदवाराला आणि ज्याने लोकसभेला पक्षविरोधी काम केले त्याला उमेदवारी दिल्यास आमचा विरोध राहिल. आम्ही निवडणूक लढवणार कशा पद्धतीने ते लवकरच जाहीर करू. – शैलेश वडनेरे, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शऱद पवार) पक्ष, बदलापूर.

अकृषिक कराच्या जाचातुन मुक्तता केल्याने हाऊसिंग फेडरेशनकडून केळकर यांचा सत्कार

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यानंतर महायुती सरकारकडून अकृषिक कर पूर्णतः माफ करण्यात आला. त्यामुळे अकृषिक (एन ए) कराच्या जिझिया ओझ्याने हैराण झालेल्या गृहनिर्माण संस्थांची कराच्या या जाचातून मुक्तता झाली. या निमित्त महाराष्ट्रातील साडेचार कोटी रहिवाश्यांच्यावतीने ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनने नुकतेच आमदार संजय केळकर यांचा जाहिर सत्कार केला. हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम, फेडरेशनच्या संचालक शैलजा गस्ते, विनोद देसाई, संतोष साळुंखे आणि ॲड.अल्केश कदम आदीसह रहिवाशी उपस्थित होते. महाराष्ट्रात १ लाख २५ हजार गृहनिर्माण संस्था आहेत तर ठाणे जिल्ह्यात ३३ हजार आणि शहरात साडेचार हजार सोसायट्या आहेत. अकृषिक (एनए) कराच्या नोटीसांमुळे राज्यातील साडेचार कोटी रहिवासी हतबल झाले होते. हा एनए कर स्थगित करावा यासाठी ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशन, महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन, पुणे हाऊसिंग फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाने न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली होती. या बरोबरीने ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी विधीमंडळामध्ये तसेच, २०१८ ते २०२३ पर्यंत संबंधीत तीन मंत्र्यांकडे वारंवार बैठका घेऊन हा मुद्दा लावून धरला होता. एक घर आणि दोन कर हा जाच कशासाठी असा सवाल करीत सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन महसुल मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी अकृषिक कर रद्द करण्यासाठी समिती नेमुन एनए कर वसुलीला स्थगिती दिली होती. तर, नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत महायुती सरकारने अकृषिक कर पूर्णतः माफ करण्याचा निर्णय घेतला. अखेर संजय केळकर आणि हाऊसिंग फेडरेशनने केलेल्या अथक प्रयत्नांना यश आले. यानिमित्ताने हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी शनिवारी आ. संजय केळकर यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन जाहिर सत्कार केला. 0000

भारत सरकारने कांडला बंदराचे अध्यक्ष सुशील कुमार सिंग यांची  मुंबई बंदराचे प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याबद्दल त्यांचे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्पलॉईज युनियनच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत…

 वाचन प्रेरणा दिन आणि विज्ञान प्रदर्शन

न्यू इंग्लिश स्कूल आचरा प्रशालेत धी आचरा पीपल्स असोसिएशन संचालित न्यू इंग्लिश स्कूल आचरा प्रशालेत वाचन प्रेरणा दिन आणि विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘ मी वाचले, तुम्हीही वाचा’ या उपक्रमांतर्गत ग्रंथ प्रदर्शनही पार पडले. साटेलकरसर यांनी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे कार्य विशद केले. मुख्याध्यापक जी बी परब सर यांनी वाचनाचे महत्त्व विशद केले. शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. इयत्ता सहावी टे दहावीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रतिकृती सादर केल्या. सुयश सद्गुरू साटेलकर (रडार सिस्टीम – प्रथम क्रमांक), कौशल माधवराव भोसले आणि विक्रम वसंत भूतकडे (रिचार्जेबल टेबल फॅन- द्वितीय क्रमांक), कुंदन धनंजय नाटेकर ( स्मार्ट होम )आणि तेजस निलेश शेट्ये (ग्रास कटर) यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.  शालेय समिती अध्यक्ष निलिमा सावंत, सदस्य राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर, रघुनाथ पाटील यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला. कदम मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 0000 माहुल येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीची  निवड चाचणी २३ ऑक्टोबरला मुंबई :  माहुल, चेंबूर  येथील  वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या वतीने १३ ते १९ या वयोगटातील मुलांसाठी  बुधवार, २३ ऑक्टोबरला  दुपारी ३ ते ६ या वेळेत निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले असून १ सप्टेंबर २००५ ते ३१ ऑगस्ट २०१२ या दरम्यानच्या काळात जन्मलेली  मुले या चाचणीसाठी पात्र ठरतील. इच्छुक मुलांनी वरील दिवशी क्रिकेट किट, क्रिकेटचा पांढरा गणवेश आणि जन्माच्या दाखल्यासह माहुल, चेंबूर येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर निवड चाचणीसाठी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी अमित जाधव यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ८६५५३३७८८५ किंवा ७०२११४७४७५  येथे  संपर्क साधावा.

उत्तर भारतीयांच्या हाती ओवळा- माजिवडा विधानसभेच्या विजयाचा पासवर्ड

 स्थानिक भूमिपुत्र दुसऱ्या क्रमांकावर   ठाणे : विधानसभेची निवडणूक जाहीर होताच सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. या निवडणुकीतील लढत थेट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार असली तरी ओवळा- माजिवडा विधानसभेत मात्र निवडणुकीचे चित्र वेगळे दिसण्याची शक्यता आहे. या मतदारसंघांत पहिल्या क्रमांकाचा मतदार उत्तर भारतीय असल्याने त्याची मते ज्यांच्या पारड्यात पडतील त्या उमेदवाराला विजयाची खात्री असणार आहे. ओवळा- माजिवडा हा मतदारसंघ ठाण्यापासून थेट भाईंदरपर्यंत पोहोचला आहे. सध्या या मतदारसंघात शिवसेनेचे प्रताप सरनाईक आमदार आहेत. येथे निवडून येण्याची त्यांची तिसरी टर्म आहे. ते दोन्ही वेळा निवडून आले तेव्हा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ होती; मात्र आताचे चित्र वेगळे आहे. शिवसेनेत फूट पडल्याने दोन शिवसेना अर्थात दोन शिवसेनेचे उमेदवार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच या मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात नव्या इमारती उभ्या राहिल्याने त्यामध्ये बहुतांश मतदार ठाण्याबाहेरून येथे राहायला आला आहे. परिणामी, स्थानिक भूमिपुत्र मतदारांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. परराज्यातून येथे वास्तव्याला आलेल्यांची संख्या वाढली असून ती ७० टक्क्यांवर पोहोचली आहे. ही संख्या सुमारे तीन लाख एवढी झाली आहे. त्यात उत्तर भारतीयांसह मारवाडी, गुजराती, दक्षिण भारतीय अशा परप्रांतीयांचा समावेश आहे. एकूण मतदारांची संख्या पाच लाख ४० हजार २९३ आहे. तर, नव्या मतदारांची संख्या ११,७५४ हजारांवर पोहोचली आहे. यावरून या मतदारसंघावर परराज्यातील मतदारांचा कब्जा आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यानंतर दुसरा क्रमांक आगरी मतदारांचा लागतो. तिसऱ्या क्रमांकावर अनुसूचित जाती-जमातीमधील मतदारांचे येथे वास्तव्य आहे. अशा परिस्थितीमुळे या मतदारसंघातील बरेचसे चित्र उमेदवार कोणत्या राज्यातील आहे, त्यावर अवलंबून असण्याची शक्यता आहे. महायुतीचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून उत्तर भारतीय अथवा इतर राज्यातील उमेदवार उभा केला तर ही निवडणूक महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देणारी ठरणार आहे. येथे राहणाऱ्या उत्तर भारतातल्या भाजपप्रेमी मतदाराने प्रांतानुसार मतदान करण्याचा निर्णय घेतला तर तो महायुतीला मारक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच काशिमीरा येथे नव्याने वसलेल्या काशिगाव झोपडपट्टीत मतदारसुद्धा या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावताना दिसणार आहे. मुंबई आणि इतर ठिकाणांहून बाधित झालेले नागरिक येथे वसले आहेत. त्यामध्ये बहुतांश मतदार दक्षिण भारतातील आहेत. त्यांनी या मतदारसंघात मतदानाच्या नावांची नोंदणी करून घेतलेली आहे. हा मतदारसुद्धा चेहरा पाहून मतदान करण्याची चिन्हे आहेत. सरनाईकांचे पारडे जड शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक येथून २००९ ते २०१९ असे सलग तिसऱ्यांदा येथून निवडून आले आहेत. २००९ मध्ये ते ९०४१ मतांच्या फरकाने निवडून आले होते. त्यांनी या निवडणुकीत ३६.०३ टक्के मते मिळवली होती. यावेळी एकूण १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते; तर २०१४ मध्ये हा फरक १०,९०६ एवढा होता. यावेळी त्यांना ३६.७५ टक्के मते मिळाली होती. यावेळी एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. तर, २०१९ मध्ये मात्र सरनाईक मोठ्या फरकाने निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा तब्बल ८४,००८ मतांनी पराभव केला होता. काँग्रेसच्या उमेदवाराला ३३,५८५ मते मिळाली होती, तर सरनाईक यांना १,१७,५९३ मते मिळाली होती. या वेळीसुद्धा १४ उमेदवार रिंगणात होते.

इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन (आय.एम. ओ.)  चे जनरल सेक्रेटरी  अर्सेनिओ दोमिंगुझ  यांना सागरीका या मासिकाचा अंक देताना नुसीचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर.