Category: ठाणे

Thane news

लकी व्यायामशाळेच्या नूतनीकरणाचा शुभारंभ

ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार व याँनच्या विशेष निधितून खासदार नरेश म्हस्के, आमदार  रविन्द्र फाटक यांच्या मार्गदर्शनाने कोपरीतील प्रभाग क्रमांक २० मधील लकी व्यायामशाळेच्या नूतनीकरणाच्या कामाचा नुकताच…

ठाणे महानगरपालिकेतर्फे साजरा होणार मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

डॉ. निर्मोही फडके यांच्या व्याख्यानाने होणार उद्घाटन ठाणे  : राज्यभरात १४ जानेवारी ते २८ जानेवारी, २०२५ हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने ठाणे महानगरपालिकेतही विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मंगळवार, १४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे होणार आहे. त्यानंतर, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी डॉ. निर्मोही फडके यांचे ‘जगू मराठीचे रंगी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. पंधरवड्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी सोमवारी, कै. नरेंद्र बल्लाळ हॉल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी उपस्थित होते. ग्रंथदिंडी व पुस्तक प्रदर्शन या पंधरवड्यात, सोमवार, २० जानेवारी रोजी स. १०.३० ते स. ११.३० या वेळेत महापालिका भवन ते परमार्थ निकेतन ते ज्ञानराज सभागृह ते महापालिका भवन अशी ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर, प्राच्य विद्या संस्थेच्या सहकार्याने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे जुन्या आणि नवीन पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. त्याचवेळी, सभागृहात सुलेखनकार अच्युत पालव यांचे सुलेखन पाहण्याची संधी मिळेल. पुस्तक प्रदर्शनात जुन्या पुस्तकांसह कोश, रामायण, महाभारत यांचे खंड पाहता येतील. तसेच, पुस्तक विक्रीचे स्टॉलही यावेळी ठेवण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी सोमवार, २० आणि मंगळवार २१ रोजी स. १० ते सायं. ६ वाजेपर्यंत खुले राहील. महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या स्पर्धा बुधवार, २२ जानेवारी रोजी महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी निबंध, सुलेखन (हस्ताक्षर), शुद्धलेखन आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या पंधरवड्याच्या काळात, शिक्षण विभागातर्फेही शालेय स्तरावर विविध स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात येणार आहे प्रा. प्रवीण दवणे यांचे व्याख्यान आणि समारोप मंगळवार, २८ जानेवारी रोजी पंधरवड्याचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ केै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात होईल. त्यात, महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शालेय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिेके देण्यात येतील. त्यानंतर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांचे मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान होईल. हे व्याख्यान सर्व नागरिकांसाठीही खुले आहे.

१९७२ साली अकरावी उत्तीर्ण झालेल्यांची आदिवासी शाळांमध्ये घसघशीत मदत

– सत्तरी गाठलेल्या ‘मुली मुलां’चा उत्साह कौतुकास्पद ठाणे, दि. (प्रतिनिधी) : अंबरनाथ येथील दि एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालय येथे १९७२ साली अकरावी (जुनी) शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी समाज माध्यमाद्वारे एकत्र येऊन ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात सुमारे सहा शाळांना भेट दिली आणि तेथील मुली, मुले आणि शिक्षक तसेच शाळांना घसघशीत सहाय्य केले. सत्तरी ओलांडलेल्या या विद्यार्थ्यांच्या विधायक कार्याचे कौतुक करण्यात येत आहे. समाज माध्यमावर ‘आम्ही १९७२चे विद्यार्थी’ असा समूह काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. या माध्यमातून १९७२ साली जुनी अकरावी उत्तीर्ण झालेल्या सुमारे ५४ मुली आणि मुलांनी (आज मितीस सत्तरीत असलेल्या) एकत्र येऊन काही विधायक उपक्रम हाती घेतले. या उपक्रमांचा एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अंदाड येथे भेट दिली. ‌विशेष म्हणजे दि एज्युकेशन सोसायटीच्या अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालय या शाळेचीच शाखा अंदाड येथे असून सौ. दीपिका विशे या मुख्याध्यापिका आहेत.   त्यानंतर अंदाड येथे प्रवीण शिर्के मुख्याध्यापक असलेल्या  शाळेला भेट दिली. यानंतर  हीव, सपाटपाडा, मानिचा पाडा येथील शाळांना भेटी दिल्या. या ठिकाणी मडके, कुंदे, चौधरी, हुलावळे, पाटील असे शिक्षक आदिवासी मुले मुलींना आधुनिक जगाशी स्पर्धा करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. पाटी, पेन्सिल, कंपॉस, वह्या, चित्रकला वह्या, रंग, खोडरबर, शाळेसाठी आवश्यक असलेल्या वस्तू, सतरंजी पट्ट्या, रोख रक्कम अशाप्रकारे सहाय्य करण्यात आले. मुख्याध्यापक, शिक्षिका, शिक्षक, कर्मचारी, गणवेशातील मुली, मुले यांनी अतीशय शिस्तबद्ध पद्धतीने या सत्तरीतल्या मुली मुलांचे प्रेमादराने स्वागत केले. रमेश कुर्जेकर, भारती सातघरे, भारती चव्हाण, ज्योती तावडे, सिद्धार्थ पुराणिक, सरोजिनी राणे, नीलांबरी गुप्ते, प्रतिभा धर्माधिकारी, प्रकाश मावळणकर, रत्नाकर कोर्डे, अनघा पोतनीस, संजीव पोतनीस, विजय औटी, दिगंबर वेर्णेकर यांचा या १९७२ च्या तुकडीत समावेश होता. भारती सातघरे, रत्नाकर कोरडे, सिद्धार्थ पुराणिक यांनी या तुकडीचे नेतृत्व करतांना मुंबईहून सर्व शालोपयोगी साहित्य आणण्यासाठी परिश्रम घेतले. उद्योजक (व विद्यार्थी) विश्वनाथ पनवेलकर यांनी ही सहकार्य केले.

देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मराठीचा सुगंध दरवळेल ! शरद पवार

दिल्ली येथे पार पडणाऱ्या ‘९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चा स्वागताध्यक्ष म्हणून मराठी साहित्यकांशी आज संवाद साधला. गेले काही दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी माझे दौरे, भाषणं सुरु होते. त्यातील सातत्यपूर्ण संबोधनामुळे माझा घसा बसला…

आधुनिक भारत स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी बांधलेला आहे’ – अभय बापट

ठाणे : सर्वधर्मपरिषदेतील स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाचा जगावर अद्भूत प्रभाव पडला. जगावर आजही स्वामीजींच्या विचारांचे गारुड कायम आहे. आजचा आधुनिक भारत हा स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी बांधलेला आहे, असे प्रतिपादन…

श्रीमत् दासबोधांतील सलोकता, समीपता, सरूपता व सायोज्यता या चार मुक्तींचा अवलंब दैनंदिन जीवनात करा.- सद्गुरू श्री वेणाभारती महाराज

अनिल ठाणेकर ठाणे : आताच्या पिढीने इतका ताण वाढवुन घेतलाय की, हा ताण कसा कमी करायचा, त्या संभ्रमाचाही वेगळा ताण त्यांना उद्भवत आहे. तेव्हा, तणावमुक्त होण्यासाठी श्रीमत् दासबोधांतील सलोकता, समीपता, सरूपता व सायोज्यता या चार मुक्तींचा अवलंब दैनंदिन जीवनात करा. असे उदबोधक प्रवचन सद्गुरू श्री वेणाभारती महाराज यांनी दिले. ठाण्यात सरस्वती क्रीडा संकुलाच्या प्रांगणात सुरू असलेल्या ३९ व्या कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत ‘तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली’ हे तिसरे पुष्प शुक्रवारी सद्गुरू श्री वेणाभारती महाराज ह्यानी गुंफले. यावेळी, व्यासपीठावर व्याख्यानमालेच्या या सत्राचे अध्यक्ष सीए संजीव ब्रम्हे, सुहास जावडेकर तर श्रोत्यांमध्ये व्याख्यानमालेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, सचिव शरद पूरोहित, विद्याधर वैशंपायन तसेच, सौ.कमल संजय केळकर आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तणावमुक्त जीवनाचे सार उलगडताना सद्गुरू श्री वेणाभारती महाराज ह्यांनी, ताणतणाव अनेक प्रकारचे आहेत. हे ताण कमी करण्यासाठी सिंहावलोकन करा, वृद्ध मंडळीकडून जाणून घ्या. आपल्या परंपरा सोडु नका, त्या आपल्या आरोग्याशीच नव्हे तर, भाग्याशी निगडीत आहेत. एखाद्याचा आदर्श घ्या, पण विनाकारण स्पर्धा करू नका. शेजाऱ्याकडे अमुक आहे, तमुक आहे म्हणुन आपल्याकडे हवे ही असुया नसावी. पाळण्यात होतो, तेव्हा कुठे आजार होते ? शरीर आजारी होत नाही तर, मानसिक अस्वस्थता, ताणतणाव आहेत म्हणून आजार आहेत. शेवटी अग्नी जर शरीर स्विकारत असेल तर त्या शरीरात आजार नाहीत. असे स्पष्ट करून आज जगण्यातील आत्मा हरवला आहे. जे आपल्या वेदामध्ये, उपनिषदांमध्ये, सनातन ग्रंथामध्ये लिहिले आहे ते सर्वोत्कृष्ठ आहे. ग्रंथ हेच गुरु आहेत, हीच खरी संपत्ती आहे. हे सत्य आपल्याला जाणता आले पाहिजे. आपण कितीही शिकलो तरी वेदांपेक्षा उपनिषदांपेक्षा लहान आहोत. वेद हेच आपले गुरु आहेत. त्यामुळेच भारत हा सगळ्यांचा आध्यात्मिक गुरु असुन भगवद्गीता हा आद्यग्रंथ असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वजांचे देणे नाकारले तर, ताण वाढणे स्वाभाविक आहे. तेव्हा, ताण कमी करण्यासाठी श्रीमत् दासबोधामधील सलोकता, समीपता, सरूपता व सायोज्यता या चार मुक्तीचा अवलंब दैनंदिन जीवनात करा. जीवनात प्रवाही राहुन सगळ्या गोष्टी सहज करायला शिका, घरातील देवघरात मुक्तीच्या शक्तीचा धागा आहे, पुढील अनंत पिढयांसाठी तो जपुन ठेवत ह्या मुक्ती त्यांना सोपवा. अशा प्रकारे अध्यात्म आणि ईश्वराशी कृतज्ञ राहण्याचे महत्त्व सोदाहरण विषद करून सद्गुरू श्री वेणाभारती महाराज ह्यांनी, गृहस्थधर्मातील कौटुंबिक गमतीजमती सांगत उपस्थित श्रोत्यांना तणावमुक्तीसाठी अनेक सहजसुलभ मार्मिक तोडगे देखील सुचवले. चौकट आजकाल सत्य ऐकण्याची कुणाचीच हिंमत नाही. कारण सत्य कटू असते, ते सत्य नारायण आहे. तेव्हा, रस्त्यावर असेल अथवा कुठेही सत्यनारायणाच्या दर्शनाचा संकोच करू नका. किंबहुना, वर्षभरात प्रत्येकाच्या घरात एक तरी सत्यनारायण झाला पाहीजे. घरातील हॉलमध्ये सत्यनारायण आणि महाप्रसाद टेरेसवर असे प्रघात टाळा. असे स्पष्ट करून श्री वेणाभारती यांनी केळीच्या पानावरील शिऱ्याच्या प्रसादाची महती विषद केली.

ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित सांस्कृतिक महोत्सव संपन्न

 बक्षीसपात्र विद्यार्थ्यांनी सादर केली १३ नृत्य आणि २ नाटके ठाणे : ठाणे महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये उत्तम कलागुण असून त्यांना बाल रंगकर्मी योजनेत प्रशिक्षण देऊन या विद्यार्थ्यांचे एखादे बालनाट्य बसवून महाराष्ट्राभर त्याचे २५ प्रयोग व्हावेत, असे प्रतिपादन अभिनेते आणि निर्माते मंगेश देसाई यांनी ठाणे महानगरपालिका शाळांचा सांस्कृतिक महोत्सवाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात केले. ठाणे महानगरपालिका शाळांचा मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सव काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे नुकताच संपन्न झाला. सांस्कृतिक महोत्सव २०२४-२५ मध्ये नृत्य आणि नाट्य विभाग अशा दोन प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. नृत्यविभागात इयत्ता १ ली ते ५वीच्या एकूण २४, इयत्ता ६ वी ते ८ वीच्या ६१ शाळांनी, तर नाट्य विभागांमध्ये १९ अशा एकूण १०४ शाळांनी भाग घेतला होता. त्यामधून बक्षीसपात्र विद्यार्थी व शाळांना मंगेश देसाई, बालकलाकार  मायरा वायकूळ, उपायुक्त (शिक्षण) सचिन सांगळे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बक्षीसपात्र १३ नृत्ये आणि २ नाटके असे १५ कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले प्रारंभी ठाणे मनपा शाळा क्र. १३. खोपटच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ठाणे महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी विद्यार्थी बालकलाकारांचे आणि मार्गदर्शक शिक्षकाचे कौतुक केले. तसेच, बालकलाकार मायरा हिने सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी, गटाधिकारी संगीता बामणे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी बाबाजी फापाळे, जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी ठाणे व पालघरचे संचालक जगन्नाथ जाधव आदी उपस्थित होते. सांस्कृतिक समिती २०२४-२५च्या कार्याध्यक्षा अनघा पालांडे पानी उपस्थिताचे आभार मानले. गटप्रमुख प्रेरणा कदम यांच्या राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समिती सदस्य सुरेश पाटील, नूतन बांदेकर,  सहचिटणीस नीलिमा पाटील यांनी केले. मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सव स्पर्धा सन २०२४-२५चा निकाल पुढीलप्रमाणे – बालनाट्य विभाग, इयत्ता 1 ते 8 1) प्रथम क्रमांक – शाळा क्रमांक 14,गट क्रमांक 1( जाये तो जाये कहा) 2) द्वितीय क्रमांक – शाळा क्रमांक 125,गट क्रमांक 7 (धरती की फिर्याद) 3) तृतीय क्रमांक – शाळा क्रमांक 31,गट क्रमांक 7( वृध्दाश्रम) 4) उत्तेजनार्थ – शाळा क्रमांक 11,गट क्रमांक 1( विद्यार्थी सुरक्षा समिती) उत्कृष्ट लेखन – शाळा क्रमांक 14,गट क्रमांक 1( जाये तो जाये कहां) उत्कृष्ट नेपथ्य- शाळा क्रमांक 125,गट क्रमांक 7( धरती की फिर्याद) उत्कृष्ट अभिनय मुलगा- मोगली पात्र शाळा क्रमांक 14,गट क्रमांक 1( जाये तो जाये कहां) उत्कृष्ट अभिनय मुलगी- शारदा पात्र शाळा क्रमांक 31,गट क्रमांक 7( वृध्दाश्रम) नृत्य विभाग इयत्ता 1 ते 5 1) प्रथम क्रमांक – शाळा क्रमांक 18,गट क्रमांक 2 (धनगर नृत्य) 2) द्वितीय क्रमांक – शाळा क्रमांक 64, गट क्रमांक 6,(राम आयेंगे) 3) तृतीय क्रमांक- शाळा क्रमांक 96, गट क्रमांक 7 (शिक्षण नृत्य)…

‘पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा चिनी मांजा वापरू नये’

 – ठाणे महापालिकेचे आवाहन ठाणे (१२): पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिक किंवा सिंथेटिक पदार्थापासून तयार केलेला चिनी मांजा किंवा चिनी दोरा किंवा नायलॉन किंवा प्लास्टिक कृत्रिम मांजा हा माणसांसाठी तसेच…

प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान उंचावण्यासाठी विविध गुणदर्शन स्पर्धा महत्त्वाची – छायादेवी शिसोदे

अनिल ठाणेकर ठाणे : विद्यार्थ्यांना कला सादर करताना पाहून आनंद होतो त्यामुळे अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणे आणि प्रोत्साहन देण्यासाठी आजचा हा मंच प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांचे आत्मसन्मान उंचावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. नाट्य, गीत, समुह गीतं, समुह नृत्य अशा विविध कलागुणांना उंचावर घेऊन जाण्यासाठी विशेष शिक्षकांनी मोलाची भुमिका बजावली आहे. या स्पर्धेसाठी उपस्थित सर्वांना शुभेच्छा मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी यावेळी दिल्या. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षण विभाग प्राथमिक आयोजित जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा २०२४-२५, एन. के. टी. सभागृहात १० जानेवारीला पार पडला. मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिल्हा परिषद शाळा शेलवली बांगर येथील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची उंची वाढवली. जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत सेस फंडातून जिल्हा स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागाच्या वतीने स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून सांस्कृतिक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा आपण दरवर्षी आयोजित करतोय. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मंच देण्यासाठी आणि विविध गुण सादर करण्यासाठी ही स्पर्धा मोलाची आहे असे शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी प्रास्ताविक करताना मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राथमिक विभागातील कार्यक्रम उत्तमरित्या सादर केले जात आहेत. यासाठी शिक्षकांनी घेतलेली मेहनत मोलाचे आहे. सर्व विद्यार्थ्यांना सदिच्छा शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुले यांनी दिल्या. डोंबारी समाजातील बांधवांनी आपल्या कलागुणांना सादर करीत उदरनिर्वाह केला आहे. त्यांना येणाऱ्या विविध समस्या समाजासमोर मांडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना त्यांची जाणीव नृत्याच्या माध्यमातून करून देण्यासाठी “नाचतो डोंबारी” या गाण्यावर सादरीकरण करताना “नाचतो डोंबारी, आम्ही कसरत करतो जगण्यासाठी, वाजले का ती घंटा शाळेची माझ्यासाठी” असा संदेश विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करताना दिला ही आनंदाची बाब आहे असे मत व्यक्त जिल्हा परिषद शाळा बौद्ध पाडा, केंद्र खातीवली येथील मुख्याध्यापक संतोष जाधव यांनी व्यक्त केले. तालुका स्तरावरील विजेता विद्यार्थ्यांनी आज जिल्हा स्तरावर सादरीकरण करण्यासाठी उत्साही वातावरणात सहभाग नोंदविला. लोकनृत्य – इ. 2 री ते 8 वी गट, समूहगान (लहान गट) – इ. 1 ली ते 5 वी, समूहगान (मोठा गट) – इ. 6 वी ते 8 वी, वक्तृत्व (लहान गट) – इ. 1 ली ते 5 वी, वक्तृत्व (मोठा गट) – इ. 6 वी ते 8 वी, नाट्य – इ. 1 ली ते 8 वी गट सादरीकरण प्रत्येक तालुक्यातील पाच लोककला व लोकनृत्य विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या सादरीकरण केले. यावेळी एन. के. टी शाळा संस्थापक नानजीभाई ठक्कर, उपशिक्षणाधिकारी अरूण शिंदे, विस्तार अधिकारी शिक्षण आशिष झुंजारराव, विस्तार अधिकारी शिक्षण देवदत्त शिंदे, एन. के. टी. हायस्कूलचे मुख्याध्यापक लिडीया सैलियन, जिल्हा  समन्वयक अनिल कुऱ्हाडे, जिल्हा समन्वयक भरत वेखंडे, परीक्षक, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक व सहायक शिक्षक यातील तज्ञ परीक्षक उपस्थित होते  तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते. सुत्रसंचलन रवींद्र तरे यांनी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे मोलाचे काम केले  आहे. या कार्यक्रमास सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी नास्ता, चहा व दुपारच्या भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती, तसेच विद्यार्थ्यांना जाण्यायेण्यासाठी वाहतूक भत्याची रक्कम या पूर्वीच पंचायत समिती स्तरावर वितरित करण्यात आली असून कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा उस्फुर्त सहभाग लाभला तसेच कार्यक्रमाचे आयोजन व व्यवस्था याबाबत उपस्थित विद्यार्थी व शिक्षक यांनी समाधान व्यक्त केले आहे. ०००

आर्ट एक्झीबीशनला  विद्यार्थ्यांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद

 आर्ट स्पॅशच्यावतीने आयोजित ठाणे : आर्ट स्पॅशच्यावतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आर्ट एक्झीबीशनला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यातून अनेक विविध कलाकृती रंगविल्या. आर्ट स्पॅशच्या संचालिका आणि कला शिक्षक नंदा भोसले यांनी समाजसेविका जयश्री शेळके यांच्यासहकार्याने हे प्रदर्शन घोडबंदर रोड येथील हावरे सिटी रोड वरील बिट्स या कलादालनात आयोजित केले होते. 5 ते 55 वयोगटातील ८० विद्यार्थी आणि शिक्षकांनी या प्रदर्शनात भाग घेत विविध कलाकृती साकारल्या. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि भेट वस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रदर्शनाला माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी भेट देत विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले.