Month: April 2024

डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संविधान यांना अभिप्रेत लोकशाहीसाठी उत्तरदायी-धिरेंद्रमनी त्रिवेदी

 अशोक गायकवाड अलिबाग : संविधानकर्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांना अभिप्रेत लोकशाही साठी निवडणूक यंत्रणेतील आपण त्यांच्याप्रती उत्तरदायी आहोत, असे मत भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक खर्च निरीक्षक धिरेंद्रमनी त्रिवेदी…

भाईंदर मध्ये स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी

भाईंदर : भाईंदरमध्ये दुरुस्ती कामादरम्यान घरातील स्लॅब कोसळून कंत्राटदार आणि कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हरिराम चौहान (५५) आणि मखनलाल यादव (२६) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. भाईंदर पूर्व येथील ‘श्री नाथ ज्योती’ या इमारतीच्या तळ मजल्यावर राहणाऱ्या विनय कुमार त्रिपाठी यांच्या घरी अंतर्गत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचे कंत्राट त्यांनी हरिराम चौहान यांना दिले होते. दरम्यान रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास हे काम सुरु असताना किचन मधील पाण्याच्या टाकीला लागून असलेल्या भिंतीचा स्लॅब अचानक खाली कोसळला. या ढिगार्‍याखाली कंत्राटदार हरिराम चौहान आणि कामगार मखनलाल यादव व आकाश यादव अडकले होते. याबाबतची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळताच जवानांनी तिघांना ढिगार्‍यातून काढून रुग्णालयात हलवले. मात्र यात हरीनाम चौहान आणि मखनलाल यादव यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी सांगितले. तर आकाश यादव हा यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संरचनात्मक अहवाल सादर करण्याचे आदेश. भाईंदर मधील इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या घटनेतील इमारत ही पाच मजली असून ती फारच जुनी झाली आहे. त्यामुळे इमारतीचा संरचनात्मक अहवाल काढण्याचे आदेश मिराभाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर यांनी दिले आहेत.

अग्निशमन दिनानिमित्त शहीद अग्निशमन जवानांना आदरांजली

नवी मुंबई : अग्निविमचनाचे काम करीत असताना आपल्या प्राणांचे बलिदान करणाऱ्या शहीदांचा सन्मान ठेवणे हे आपले कर्तव्य असून त्यांच्या स्मृतींपासून अधिक चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते असे सांगत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शहीद‌ अग्निशमन जवानांच्या  स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करीत भावपूर्ण आदरांजली दिली. नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलाच्या वतीने वाशी अग्निशमन केंद्रात अग्निशमन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी आयुक्तांनी उपस्थित अग्निशमन जवानांशी संवाद साधला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 5 अग्निशमन केंद्राद्वारे शहर सुरक्षिततेची जबाबदारी आपले अग्निशमन दल पार पाडत असून आपत्तीनंतर आपत्ती निवारणाचे कार्य करण्यासोबतच आपत्ती उद्भवूच नये याकरिता नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणारे उपक्रम राबविण्यावर भर द्यावा असे आयुक्तांनी यावेळी सूचित केले. मागील वर्षी पावसाळी कालावधीत इरशाळवाडी येथे आपत्तीप्रसंगी मदतकार्य करताना वीरगती प्राप्त झालेले नवी मुंबई महानगरपालिकेचे सहा. अग्निशमन केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांच्याही सेवाभावी समर्पित कार्याचे स्मरण याप्रसंगी आयुक्तांनी केले. यावेळी आयुक्तांप्रमाणेच उपस्थित अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार तसेच अतिरिक्त आयुक्त तथा मुख्य अग्निशमन अधिकारी श्री शिरीष आरदवाड, शहर अभियंता श्री संजय देसाई, उप मुख्य अग्निशमन अधिकारी श्री पुरुषोत्तम जाधव, वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री सागर मोरे, कार्यकारी अभियंता श्री अजय संख्ये, अग्निशमन केंद्र अधिकारी श्री जे टी पाटील व श्री जी एस सुसवीरकर आणि इतर अग्निशमन अधिकारी यांनी शहीद वीरांच्या स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण अभिवादन केले. 14 एप्रिल 1944 रोजी मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये एस एस फोर्ट स्टिकीन या जहाजाला लागलेल्या आगीत मुंबई अग्निशमन दलातील 66 जवानांनी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन अग्निविमोचनाचे कार्य केले. या शहीद जवानांना तसेच त्यानंतरही अग्नीविमोचनाचे कार्य करताना आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या शहीद जवानांना भावपूर्ण अभिवादन करीत 14 एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिन म्हणून पालन करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून 14 ते 20 एप्रिल 2024 या कालावधीत संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येत असून या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रातील मॉल्स, मोठ्या सोसायट्या, हॉस्पिटल्स, शाळा – महाविद्यालये, हॉटेल्स, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी अग्निसुरक्षतेच्या दृष्टिकोनातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे तसेच विविध ठिकाणी मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे

डॉ.‌ बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हा परिषदेच्या सभागृहात अभिवादन

ठाणे : डॉ.‌ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी  जिल्हा परिषद ठाणे येथील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण विभाग प्रमुख संजय बागुल तसेच  समाज कल्याण विभाग, महिला व बालविकास विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जोपर्यंत भारत देश अस्तित्वात आहे तोपर्यंत बाबासाहेबांचे संविधान अबाधित राहील – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : जोपर्यंत भारत देश अस्तित्वात आहे तोपर्यंत बाबासाहेबांचे संविधान अबाधित राहिल. भारत देशाची एकात्मता आणि अखंडता ही बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे. आजच्या दिवशी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करीत असताना परमपूज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आणि ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ हा मंत्र, हा विचार अधिकाधिक प्रसारित करण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते करीत आहेत. असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी बाबासाहेबांना अभिवादन करताना काढले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानलव, बोधिसत्व, परमपूज्य, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी, १४ एप्रिल, २०२४ रोजी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय, झेड विंग, फ्लॉवर व्हॅली कमर्शियल कॉम्प्लेक्स, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे (पश्चिम) येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन तसेच कोर्टनाका, ठाणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी अभिवादन केले. यावेळी ‘भारतीय संविधान निर्माते डाॅ बाबासाहेब आंबेडकर अमर रहे’, ‘डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ या राष्ट्रवादी काँग्रेस कार्याकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी कोर्ट नाका परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विरु वाघमारे, युवक कार्याध्यक्ष संदेश पाटील, जिल्हा कार्यकारिणी सरचिटणीस रविंद्र पालव, परिवहन समिती सदस्य मोहसीन शेख, नितीन पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुजय सावंत, दिनेश मेहरोल, मनोज कोकणे, अतुल कदम, संतोष सहस्त्रबुद्धे, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, ब्लॉक अध्यक्ष सुधाकर नाईक, समीर पेंढारे, निलेश फडतरे, शंकर कोळेकर, निलेश कापडणे, प्रभाग अध्यक्ष समीर शेख, साहिल सुर्यवंशी, महिला विधानसभा अध्यक्षा सुवर्णा खिल्लारी, अरुणा पेंढारे, वंदना खानोलकर, ब्लॉक अध्यक्षा शामा भालेराव, लक्ष्मी वैती, प्रिया वाघेरा, मनिषा कांबळे, राणी कटारनवरे, पुजा खोपडे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष हुसेन मणियार, सोशल मिडीया सेल अध्यक्ष कल्पेश मिठबावकर, विद्यार्थी विधानसभा अध्यक्ष केतन माने, विद्यार्थी ब्लॉक अध्यक्ष हर्ष चापले, विद्यार्थी पदाधिकारी मुर्शिद खान आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

नमुंमपा मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

नवी मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अॅम्फीथिएटर येथे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार व श्री. शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री. शरद पवार, शहर अभियंता श्री. संजय देसाई, परिमंडळ उपायुक्त श्री. सोमनाथ पोटरे, कार्यकारी अभियंता श्री. अजय संखे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मतदान जनजागृतीसाठी दादर चैत्यभूमी परिसरात विशेष स्वाक्षरी मोहीम

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने नवीन मतदारांची नोंदणी वाढवणे आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी परिसरात मुंबई शहर जिल्हा कार्यालयाच्या तर्फे विशेष स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज चैत्यभूमी स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील भिमज्योतीस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ.आश्विनी जोशी यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माथेरानमध्ये पाणी पुरवठा समाधानकारक

जल प्राधिकरणाच्या पाणी नियोजनामुळे माथेरान : माथेरान मध्ये मागील काही दिवसांपासून गर्मीने डोके वर काढले असताना माथेरानला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत या तलावात असणारे पाणी माथेरान पर्यटन नगरीला पिण्याकरता पुरवठा केला जातो व हे पाणी कमी पडत असल्याने नेरळ येथून पंपिंग द्वारे माथेरानला जादाचा पाणीपुरवठा करण्यात येतो त्यामुळेच या पर्यटन हंगामामध्ये माथेरान कराना पाणी टंचाईस सामोरे तर जावे लागणार नाही ना याची चिंता सर्वांना लागून राहिली आहे परंतु जल प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या सूनियोजित नियोजनामुळे पाणीटंचाई सध्या तरी जाणवत नसल्याने सर्वत्र समाधान होत आहे. काही वर्षांपूर्वी माथेरान मध्ये या तलावातून पूर्ण गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असे व एन पर्यटन हंगामामध्ये येथे भीषण पाणीटंचाई सामोरे जावे लागत असेल परंतु नेरळ येथून माथेरान करतात जलवाहिन्या टाकून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर माथेरानकरांनी पाणीटंचाईपासून मुक्तता झाली होती परंतु मे महिन्याच्या शेवट शेवटला मात्र पाणीटंचाई सामोरे जावे लागते परंतु यावर्षी नेरळ येथून होणार पाणीपुरवठा समाधानकारक असल्याने  व शालेय मध्ये मुबलक पाणीसाठा सध्या  उपलब्ध असल्याने  माथेरानकरांना अजून तरी पाणी टंचाईस सामोरे जावे लागलेले नाही परंतु जल प्राधिकरणाने नेरळ येथून होणाऱ्या पाणीपुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या  पंपांची दुरुस्ती योग्य प्रकारे करून ठेवल्यास मे महिन्यामध्ये होणाऱ्या पाणीटंचाई पासून माथेरान करांना दिलासा निश्चित मिळणार आहे. माथेरान मध्ये मे महिन्यामध्ये पूर्वी होणारी पर्यटकांची गर्दी मागील काही वर्षांमध्ये कमी झाल्याने पाण्याचा वापर  ही कमी झाला आहे  त्यामुळे या दिवसांमध्ये माथेरान करांना पाणीटंचाई जाणवत नाही परंतु काही भागांमध्ये मात्र पाणी मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी होत असतात जल प्राधिकरणाने दोन महिने आधीपासूनच प्रत्येक सोमवार व मंगळवार या दोन दिवशी विविध भागात पाणी पुरवठा बंद केला असल्याने सध्या माथेरान मधील तलावात पाणी उपलब्ध आहे त्यामुळेच येणाऱ्या पर्यटन हंगामात माथेरानकरांना पर्यटन हंगाम असाच राहिला तर पाणी टंचाई सामोरे जावे लागणार नाही असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

ठाण्यात विविध ठिकाणी होणार प्रात्यक्षिके

अग्निशामक दल सेवा सप्ताहाचे आयोजन ठाणे :अग्निशमन दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने सेवा सप्ताह आयोजित केला आहे. या सप्ताहाचा आरंभ शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून रविवारी सकाळी करण्यात आला. त्या निमित्ताने ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त  प्रशांत रोडे यांनी बाळकूम अग्निशमन केंद्र येथे शहीद स्तंभाला अभिवादन केले. या प्रसंगी ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त (अग्निशमन विभाग) दिनेश तायडे, अग्निशमन दलाचे प्रमुख गिरीश झळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी आदी उपस्थित होते. याचवेळी, महाराष्ट्र फायर सर्व्हीस असोसिएशनच्या देणगी पेटीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई बंदरात १४ एप्रिल, १९४४ रोजी लागलेल्या आगीत अग्निशमन जवान शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ अग्निशमन दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने १४ एप्रिल ते २१ एप्रिल या काळात ठाणे अग्निशमन दलातर्फे शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात, विविध आस्थापना, सोसायटी येथे अग्निसुरक्षेबाबतची प्रात्यक्षिके करण्यात येतील.

कल्याण लोकसभा क्षेत्रात ख्रिश्चन समाजासाठी ‘ख्रिश्चन भवन’-डॉ. श्रीकांत शिंदे

कल्याण  : ‘ख्रिश्चन एकता सामाजिक संघटनेच्या सदस्यांनी, तसेच फादर्सनी  माझी भेट घेत कल्याण लोकसभा क्षेत्रात ख्रिश्चन समाजासाठी ‘ख्रिश्चन भवन’ उभारण्यासह अन्य मागण्या मांडल्या. त्यावर ख्रिश्चन समाजाशी सकारात्मक चर्चा केली. या सर्व…