Month: June 2024

रुंदीकरण केलेल्या ठाण्यातील रेल्वे फलाटावर पावसाच्या पाण्याचे तळे

लोकलमध्ये चढताना प्रवाशांची कसरत ठाणे : ६२ तासांचा मेगाब्लॉक घेऊन ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच आणि सहाचे रुंदीकरण करण्यात आले. कमी कालावधीत केलेल्या या कामांचा सर्वस्तरातून गौरव झाला. आता…

कोचिंग क्लासेस संघटनेच्या साडेसात हजार पदवीधर सदस्यांमुळे रंगत

अमोल जगताप यांनी दाखल केला अर्ज अनिल ठाणेकर ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघातील यंदाची निवडणूक कोचिंग क्लासेस संघटनेच्या प्रवेशामुळे रंगतदार झाली आहे. कोचिंग क्लासेस संघटनेचे सुमारे साडेसात हजार पदवीधर सदस्य या निवडणुकीत सक्रीय झाल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. दरम्यान, शिवराज्याभिषेक दिनाचा मुहूर्त साधून गुरूवारी कोचिंग क्लासेसचे अमोल जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ठाण्यात कोकण पदवीधर निवडणूकिसाठी कोचिंग क्लास संघटनेच्या वतीने अमोल जगताप  यांना उमेदवारी देण्यात आली असून शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या  आणि रोजगार निर्मिती करणे यांसारखे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अमोल जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आपला अर्ज दाखल करण्याआधी जगताप यांनी कोर्टनाका येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी सतीश देशमुख, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, शैलेश सपकाळ भरत जाधव बबन चव्हाण संचालक शिक्षक उपस्थित होते. सदर प्रसंगी त्यांनी,  शिक्षक, पदवीधरांचे प्रश्न, बेरोजगारी याबाबत विधिमंडळात आवाज उठवण्यासाठी आपण निवडणूक लढवित असल्याचे सांगितले. दरम्यान, गेल्या सहा महिन्यापूर्वी कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीने  ९००० तरुण पदवीधर यांचे अर्ज  भरून त्यांचा समावेश मतदार म्हणून करून घेतला आहे. शिवाय,  हजारो माजी विद्यार्थी यांना संपर्क साधण्यात आलेला आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सतिश देशमुख यांनी, महाराष्ट्रातील क्लासेस संचालक म्हणजेच खासगी शिक्षक यांच्या न्याय हक्कासाठी संघटना काम करीत आहे. शालेय शिक्षण व्यवस्था कमकुवत पडत आहे. मात्र, त्यांच्या रोजगार बाबत कोणीही बोलत नाही. पदवीधर याच्या समस्यांबाबतही कोणताही विचार केला जात नाही. पदवीधरांना केवळ गृहीत धरण्यात येते. त्याविरोधात आमचा लढा आहे, असे सांगितले.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन आज रोजी लल्लुभाई कम्पाऊंड,एमएमआरडीए वसाहतीत ज्योती एजुकेशनल अॅड सोशल वेल्फेअर ट्रस्ट मार्फत झाडे लावुन साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाला सह.समाज विकास अधिकारी सुनिल आटपाडकर,सिनियर क्राईम पी आय मानखुर्द जगदिश भामवाळ तसेच संस्थेचे अध्यक्ष राजेंन्द घनगांव,सचिव सचिन सर,पञकार आंनद जाधव ,समाजसेवक लोखंडे,हिराताई काळे तसेच विभागातील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘करूनच दाखवू प्रदूषणमुक्त ठाणे’ या कार्यक्रमात पर्यावरण वीरांना पुरस्कार प्रदान

‘नागरिकांच्या सहकार्याने ठाणे सुंदर, हरित आणि प्लास्टिकमुक्त करणे शक्य’ – आयुक्त सौरभ राव ठाणे : नागरिकांच्या सहकार्याने आपले ठाणे सुंदर, हरित आणि प्लास्टिकमुक्त करणे शक्य आहे. त्यासाठी महापालिकेची यंत्रणा आणि नागरिक यांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिका आणि श्रीकला संस्कार न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ‘करूनच दाखवू प्रदूषणमुक्त ठाणे’ या बहुपेडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या आरंभी आयुक्त राव यांनी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उपस्थितांशी संवाद साधला. तसेच, पर्यावरण रक्षणासाठी निरनिराळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या नागरिक आणि संस्थांचा पारितोषिके प्रदान करून गौरवही केला. या कार्यक्रमास, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपायुक्त (पर्यावरण विभाग) अनघा कदम, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार, उपायुक्त दिनेश तायडे (परिमंडळ ३), मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, श्रीकला संस्कार न्यासच्या दिपाली काळे आदी उपस्थित होते. आपण प्रातिनिधिक स्वरुपात एक दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करत असलो तरी प्रत्यक्षात प्रत्येक दिवस हा पर्यावरण दिनच असतो. आपण करत असलेला श्वाच्छोसवास हा या पर्यावरणाची देणगी आहे. त्याचे कायम स्मरण ठेवून या पर्यावरणाच्या रक्षणात आपण आपला वाटा उचलला पाहिजे, असे आयुक्त राव यांनी सांगितले. पंचमहाभुतांच्या पाचही घटकांच्या संवर्धन आणि संतुलनासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असते. त्या प्रयत्नांमध्ये लहान मुले, युवक-युवती, माध्यमे, कंपन्या, गृहसंकुले, शासकीय विभाग  या सगळ्यांनी हातभार लावला तर हे कार्य सोपे होईल. त्यातून वायू, जल, ध्वनी या प्रदूषणांचा आपल्यावरील परिणाम सिमित करणे शक्य होईल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. आपल्या शहराचा विचार करता नाल्यात पडणारा कचरा ही मोठी पर्यावरणीय समस्याच आहे. त्याला आळा घालण्यात महापालिकेच्या प्रयत्नात जशा काही त्रुटी आहेत, तशाच त्या नागरिकांच्या व्यवहारातही आहेत. नाल्यातील हजारो टन कचरा, विशेषत: प्लास्टिकचा कचरा हा पर्यावरणाचे आणि त्यायोगे पुढील पिढीचे नुकसान करत आहे. त्यामुळे नाल्यात कचरा टाकू नका, हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात महापालिकेची यंत्रणा कमी पडते आहे. तसेच, नाल्यात कचरा टाकण्यापेक्षा थोडी कळ सोसून तो कचऱ्याच्या गाडीतच टाकण्याबाबत नागरिकांचा आळसही दिसतो आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही नागरिकांशी त्यांच्या वस्तीत जाऊन संवाद साधत आहोत. प्लास्टिकमुक्तीचे अभियान राबवून नागरिकांच्या सहकार्याने ठाणे सुंदर, हरित आणि प्लास्टिकमुक्त करून दाखवू, अशी ग्वाही याप्रसंगी आयुक्त राव यांनी दिली. या कार्यक्रमात, श्रीकला संस्कार न्यासच्या कलाकारांनी विविध नृत्ये, नाटिका, स्टॅण्डअप कॉमेडी, प्रश्नमंजुषा स्पर्धा आदी सादर केले. त्याबद्दलही आयुक्त राव यांनी संस्थेचे कौतुक केले. पर्यावरणविषयक जागृतीसाठी संस्थेने अभिनव पद्धतीने मांडणी केली, असे आयुक्त म्हणाले. या कार्यक्रमात, पर्यावरणपुरक प्रकल्पांसाठी टीसा, एन्ह्यारोकेअर, मायक्रो मास्टर लॅब, ऑक्सिकेअर इंडस्ट्री, झिरो डी इंडस्ट्री यांना पुरस्कार देण्यात आला. तर, ‘माझी वसुंधरा’ या शासनाच्या अभियानाअंतर्गत ज्या शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांनी वातावरण बदल या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला व पर्यावरणपूरक कामे केली अशा व्हिपीएम पॉलिटेक्निक, एपी शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय यांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर, रहिवासी संकुलात वृक्षारोपण, सोसायटीच्या आवारात उद्यान, टेरेस गार्डन करणाऱ्या उत्कृष्ट रहिवासी संकुलांना पुरस्कार देण्यात आला. त्यात, कशीश पार्क, स्वस्तिक गार्डन, सिद्धांचल फेज-1, ओझोन व्हॅली, निलकंठ हाईट्स, गार्डन इस्टेट, सनक्रेस सोसायटी, ग्रेस स्क्वेअर, गोदरेज एमराल्ड, कॉसमॉस महुआ, विकास कॉम्पलेक्स, टाटा हाऊसिंग, दोस्ती विहार, सुकुर पार्क यांचा समावेश आहे. समर्थ भारत व्यासपीठ, ॲन्टी प्लास्टिक बिग्रेड, परिसर भगिनी विकास संघ यांनी रहिवासी संकुलांमध्ये केलेल्या जनजागृतीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. तर, त्यास उत्सर्फुतपणे प्रतिसाद देऊन ओला व सुका कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या ऋतुपार्क, ॲक्युरा रूस्तुमजी अरबेनिया, तारंगन, रविउदय, रोझा गार्डनिया, दोस्ती इम्पेरिया, बाल स्नेहालय, नंदनवन होम्स, खारेगाव यांना पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी अलार्क देसाई, उल्हास परांजपे, उत्तरा परांजपे, कौस्तुभ ताम्हणकर, अजित करकरे, गौरी करकरे, रमाकांत बारी यांनाही पुरस्काराने गौरवण्यात आले.

निरंजन डावखरे आज अर्ज भरणार

कोकण पदवीधर निवडणूक कोकण भवनमध्ये भाजपाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाच्या वतीने आमदार निरंजन वसंत डावखरे यांच्याकडून आज सकाळी ११.३० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनमधील विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात अर्ज भरण्यावेळी भाजपाच्या प्रमुख लोकप्रतिनिधींबरोबरच कोकणातील हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व भाजपाचे निरंजन डावखरे यांच्याकडून केले जात आहे. भाजपाने यंदाही त्यांना उमेदवारी जाहीर केली असून, त्यांची विजयानंतर हॅट्रीक होणार आहे. त्यादृष्टीकोनातून भाजपाकडून कोकण पदवीधर मतदारसंघात मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. आतापर्यंत २ लाख १४ हजार मतदारांची नोंदणी झाली असून, भाजपाकडून शहरांबरोबरच गावा-गावांमध्ये संपर्क साधण्यात येत आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या कोकण भवन (बेलापूर) येथील कार्यालयात निरंजन डावखरे यांच्याकडून शुक्रवारी (ता. ७) सकाळी साडेअकरा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. या वेळी भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कोकणातील हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीने शाळा पूर्ववत सुरु करण्याचे स्पष्ट आदेश द्यावा-भालचंद्र देशपांडे

अशोक गायकवाड अलिबाग : डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांस शाळा पूर्ववत सुरु करण्याचे स्पष्ट आदेश त्वरित देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. शाळेचे विद्यार्थी, पालक तसेच समाजाच्या विविध स्तरावरून शाळेच्या भवितव्याविषयी विचारणा होत असल्याने आरसीएफ व्यवस्थापनातर्फे वस्तुस्थिती निर्देशक सदर निवेदन देण्यात येत आहे, अशी माहिती मुख्य प्रशासकीय व्यवस्थापक –आरसीएफ थळ भालचंद्र देशपांडे यांनी दिली आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित एक शाळा आरसीएफ वसाहत कुरुळ येथे गेली ४३ वर्षे सुरू आहे. आरसीएफचा थळ-वायशेत प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्यावेळी या परिसरात इंग्रजी माध्यमाची शाळा नसल्याने आरसीएफ कर्मचार्‍यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सदर शाळा सुरू करण्यात आली होती. शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाच्या आवश्यक सर्व परवानग्या व शाळेची नोंदणी डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांचे नावे करण्यात आली. यानुसार शासन नियम व शैक्षणिक धोरणानुसार शाळा चालविण्याचे संपूर्ण दायित्व डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांचे असल्याने शाळेसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांची नेमणूक देखील डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांनी केली आहे. तत्कालीन परिस्थितीत या शाळेत बहुतांश विद्यार्थी आरसीएफ कर्मचार्यांची मुलेच होती त्यामुळे शाळेसाठी पायाभूत सुविधा, संपूर्ण वार्षिक खर्चाइतके अर्थसहाय्य आणि व्यवस्थापन शुल्क आरसीएफने डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांना देण्याबाबत आरसीएफ व्यवस्थापन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्यात एक द्विपक्षीय करार १९८१ साली करण्यात आला. या कराराची मुदत २०११ पर्यन्त होती. कालांतराने सदर शाळेत शिकणार्‍या आरसीएफ कर्मचार्‍यांच्या मुलांच्या संख्येत लक्षणीय रित्या घट झाली असली तरीही परिसरातील आरसीएफ कर्मचारी व्यतिरिक्त नागरिकांची मुले शिकत असल्याने करारानुसार शाळेसाठी पायाभूत सुविधा आणि आवश्यक अर्थसहाय्य आरसीएफ व्यवस्थापनातर्फे करण्यात येते. २०११ पासून सदर करारात दोन्ही पक्षांच्या सम्मतीने कालानुरूप आवश्यक बदल करून दर पाच वर्षासाठी या कराराचे नूतनीकरण करण्यात येत होते. यानुसार विद्यमान कराराची मुदत ३१ मे २०२४ पर्यन्त होती. मात्र २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून सदर शाळेसंदर्भात आरसीएफसोबत करार नूतनीकरण करण्यास डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांनी अनाकलनीय कारणांनी असमर्थता दाखविली. शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यादृष्टीने सदर करार किमान दोन वर्षे मुदतीने पुन्हा करण्यात यावा म्हणून डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांना आरसीएफ व्यवस्थापनातर्फे लेखी स्वरुपात वारंवार विनंत्या करण्यात आल्या. मात्र सदर करार नूतनीकरण न करण्याबाबत डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे ठाम राहिली. सदर शाळा सुरू राहावी यासाठी आरसीएफ व्यवस्थापन विविध स्तरावर प्रयत्नशील आहे. मा. शिक्षणाधिकारी (रायगड) यांना दिनांक १८ एप्रिल २०२४ रोजी व्यवस्थापनाने पत्र पाठवून डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे द्वारा शाळा पूर्ववत सुरू ठेवणेबाबत आरसीएफची कोणतीही हरकत नसल्याचे कळविण्यात आले. तसेच मा. शिक्षण आयुक्त महाराष्ट्र शासन यांनी सदर प्रकरणात हस्तक्षेप करून संबंधित शैक्षणिक संस्थेस योग्य ते निर्देश द्यावेत अशी विनंती दिनांक २७ मे २०२४ च्या पत्राद्वारे व्यवस्थापनातर्फे करण्यात आली आहे. दरम्यानच्या कालावधीत डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या कार्यकारिणीसोबत बैठका घेऊन शाळा सुरू ठेवण्याचे यथोचित प्रयत्न करण्यात आले. शाळा सुरू ठेवण्याबाबत आरसीएफ व्यवस्थापनाचा सातत्याने सकारात्मक दृष्टीकोण असताना आरसीएफसोबत करार नूतनीकरण न करण्याबाबत डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या भूमिकेमुळे आगामी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पुढे शाळा सुरू ठेवण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या अनिश्चित परिस्थितीमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या दृष्टीने आरसीएफ व्यवस्थापनातर्फे मा. विभागीय शिक्षण संचालक, मुंबई यांना दिनांक ४ जून २०२४ रोजी पत्र देण्यात आले आहे. यात डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांस शाळा पूर्ववत सुरु करण्याचे स्पष्ट आदेश त्वरित देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. शाळेचे विद्यार्थी, पालक तसेच समाजाच्या विविध स्तरावरून शाळेच्या भवितव्याविषयी विचारणा होत असल्याने आरसीएफ व्यवस्थापनातर्फे वस्तुस्थिती निर्देशक सदर निवेदन देण्यात येत आहे, असे मुख्य प्रशासकीय व्यवस्थापक, आरसीएफ थळ, अभय देशपांडे यांनी सांगितले आहे.

उघड्यावर अन्नपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करा !

वाचक मनोगत पालिकेच्या अन्न व औषध विभागाच्या सूचनेनुसार उघड्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स,गाड्या तसेच दुकानांना खाद्यपदार्थ झाकून ठेवणे बंधनकारक आहे. जाळीदार झाकणीने किंवा पारदर्शक प्लॅस्टिकने असे पदार्थ झाकून ठेवणे अपेक्षित…

दुष्काळाची दाहकता

विशेष श्याम ठाणेदार दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दुष्काळाची दाहकता जाणवत आहे. गेल्या वर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे यावर्षी राज्यावर भीषण दुष्काळाचे सावट आहे. दिवसेंदिवस दुष्काळाचे हे सावट आणखी गडद होत चालले आहे. गेल्या…

थोडी पिछाडी पण भाजप आता देशव्यापी

विश्लेषण प्रमोद मुजुमदार लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्या असल्या तरी यापुढे हिंदी पट्टयातला पक्ष म्हणून शिक्का मारता येणार नाही. मित्रपक्षांच्या मदतीने भाजपने तमिळनाडूमध्ये शिरकाव केला. कर्नाटकमध्ये फार पडझड होऊ…