Month: October 2024

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा कालवार मुंबई विभागात तिसरी

ठाणे : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा २ स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा कालवार ता. भिवंडी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था गटातून मुंबई विभागात तृतीय क्रमांक मिळावला…

‘एक सत्य’ दीर्घ कवितेचे १९ ऑक्टोबरला रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथे प्रकाशन

मुंबई : घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर, शहिद स्मारक हॉल येथे कवी अनंत धनसरे यांच्या ‘एक सत्य’ या दीर्घ कवितेचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक शिवा इंगोले यांच्या हस्ते आणि अध्यक्षतेखाली…

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात भारतरत्न माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे,…

विश्वकौतुक पाणी विषयक दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा

मुंबई : पाण्याचा प्रश्न फार गंभीर होत चालला आहे.मोठ मोठी शहरे अपु-या पाणी पुरवठ्यामुळे चिंतीत आहेत. भूगर्भातूनही पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. वाढती लोकसंख्या व वाढते उद्योग यांच्यामुळे…

सेंट्रल बँक एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीची निवडणूक बिनविरोध

मुंबई : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबई एम्प्लॉईज को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली.सेंट्रल बँक एम्प्लॉईज असोसिएशन मुंबईचे सरचिटणीस विजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली.…

नवनिर्वाचित तालुका प्रमुख संतोष जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन केला हल्लाबोल !

राजीव चंदने   मुरबाड: मुरबाडमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका प्रमुखपदी संतोष परशुराम जाधव यांची करण्यात आलेल्या निवडी विरोधात पक्षाच्या नाराज गटाने शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पक्षाचे भिवंडी लोकसभा…

तरच वाचन प्रेरणा दिनाचे सार्थक होईल – प्रज्ञा जांभेकर

रमेश औताडे मुंबई : वाचन प्रेरणा दिन एका दिवसापुरता मर्यादित नसावा वर्षभर त्याची जनजागृती मोहीम सुरू रहावी. त्यासाठी अमेरिका व पॅरिस येथील वाचनालयाचा आदर्श घ्यावा व विद्यार्थी घटकाला समोर ठेऊन…

सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेसाठी २४ तासांमध्ये १२,४०० इच्छुकांचे अर्ज

नवी मुंबई : सिडको महामंडळाने दसऱ्याच्या मुहूर्तावर २६ हजार सदनिकांच्या महागृहनिर्माण योजनेसाठी जाहीर केलेल्या सोडत प्रक्रियेसाठी पहिल्याच दिवशी १२ हजार ४०० इच्छुकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी केल्याने या सोडत प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत या योजनेसाठी नागरीक अर्ज नोंदणी करु शकतील. सिडकोने संकेतस्थळावर या योजनेची माहिती दिली असली तरी घरांच्या किमती अद्याप जाहीर केल्या नाहीत. तसेच विनापरताव्याच्या २३६ रुपये भरुन इच्छुक नागरीक त्यांचे अर्ज नोंदणी करु शकतील. सिडकोचे ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेमध्ये वाशी, खारघर, खांदेश्वर आणि मानसरोवर या रेल्वेस्थानकाजवळील सदनिकांसह तळोजातील पनवेल मुंब्रा महामार्गालगतच्या सदनिकांचा समावेश आहे. या योजनेत लाखो नागरीक आपले नशीब आजमावतील असा अंदाज आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) च्या सदनिकांचा या योजनेमध्ये समावेश असून सिडकोच्या https:\.cidcohomes.com संकेतस्थळावर नागरिक अर्ज नोंदवू शकतील. सिडको मंडळ नवी मुंबईच्या विविध नोड्समध्ये ही ६७ हजार सदनिका बांधत आहेत. यापैकी २६ हजार सदनिका (घर) सोडतीच्या पहिल्या टप्यात उपलब्ध आहेत. या योजनेतील प्रकल्पांचा विकास सिडकोच्या परिवहनकेंद्रित विकास तथा ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट या संकल्पनेवर केंद्रित असून, या योजनेत साकारली जाणारी सर्व घरे ही संबंधित नोड्समधील रेल्वे स्थानके, बस स्थानके व मेंट्रो स्थानकांच्या जवळच बांधण्यात आली आहेत. या शिवाय अतिशय अत्याधुनिक बांधकाम तंत्राचा वापर करून विकसित केलेल्या या योजनतील गृहसंकुले सर्व प्रकारच्या पायाभूत व सामाजिक सोयी-सुविधांनी युक्त असल्याचा दावा सिडकोने केला आहे. सोडतीची वैशिष्ट्ये अर्जदारांना या सोडतीसाठी ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांसाठी असून, प्रधान मंत्री आवास योजनेच्या अनुदानाचा लाभही घेता येईल. या सोडतीशी संबंधित सर्वप्रकारच्या अर्जप्रक्रिया या सोप्या सुलभ ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. योजनेविषयी सर्वप्रकारची माहिती सिडकोच्या https:\.cidcohomes.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जदारांना याजनेशी संबंधित सर्वप्रकारची माहितीसाठी सिडकोच्या वरील संकेतस्थळावरील योजना पुस्तिकेत मिळणार आहे.  

ठाणे स्थानकातील रिक्षा चालकांच्या बेशिस्तीला आळा बसणार

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील सॅटीस पुलाखाली काही मुजोर रिक्षा चालकांच्या बेशिस्तपणामुळे प्रवासी हैराण झाले होते. अखेर या बेशिस्तीला आळा घालण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी सकाळी आणि रात्रीच्या वेळेत स्थानक परिसरात अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यास सुरूवात केली आहे. तसेच प्रवाशांच्या सुरेक्षेच्या दृष्टीकोनातून शेवटचा प्रवासी असे पर्यंत पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकाऱ्याची नेमणूक करण्याच निर्णय घेण्यात आला आहे. रिक्षा मालकांना पांढरा गणवेश आणि चालकांना खाकी गणवेश परिधान करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. या सर्व नियमांची अंमलबजावणी झाल्यास प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबई उपनगरातील सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ठाणे रेल्वे स्थानक ओळखले जाते. ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सहा लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. स्थानक परिसरात महापालिकेने सॅटीस पूलाखाली रिक्षा थांबा तयार केला आहे. काही रिक्षा चालक थांबा सोडून बाहेर उभे राहतात आणि स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना हेरून त्यांच्याकडून दुप्पट रिक्षा भाडे आकारून त्यांची लुट करतात. विशेष म्हणजे, या भागात वाहतूक पोलिसांची चौकी आणि ठाणेनगर पोलिसांचे वाहन उभे असते. पोलिसांदेखत हे सर्व घडत असतानाही ते कारवाई करण्याचे टाळत असल्याचे चित्र होते. या बाबत वाहतूक पोलिसांना तक्रारी प्राप्त होत्या. काही दिवसांपूर्वीच ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी स्थानक परिसराची पाहाणी केली. त्यानंतर येथील गावदेवी रिक्षा थांबा, स्थानक परिसरातील रिक्षा थांब्याविषयी नव्याने आराखडा तयार केला आहे. गर्दीच्या वेळेत रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूटमार किंवा रिक्षा चालक बेशिस्त पद्धतीने वाहन चालवित असतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सकाळी आणि रात्रीच्या वेळी १०- १० अशा एकूण २० कर्मचाऱ्यांची अतिरिक्त नेमणूक करण्यास सुरूवात केली आहे. वाहतूकीचे नियमन करण्यासाठी हे कर्मचारी उपलब्ध असतील. तसेच रात्रीच्या वेळेत अनेकदा महिला प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे सॅटीस पुलाखालील रिक्षा थांब्यावर शेवटचा प्रवासी निघे पर्यंत पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच रात्री संबंधित अधिकारी त्याठिकाणी उपस्थित आहे. याचे छायाचित्र काढून ते वरिष्ठांना पाठवावे लागणार आहे. या नियमामुळे महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळा आहे. गावदेवी परिसरातही रिक्षा चालक दुहेरी पद्धतीने रांग उभी करून वाहतूकीस अडथळा आणत होते. या समस्येबाबत काही दिवसांपूर्वीच वाहतूक पोलीस, व्यापारी आणि रिक्षा चालक संघटनेची बैठक पार पडली. रिक्षा चालकांना गर्दीच्या वेळेत आता एकेरी पद्धतीने वाहने उभी करण्याच्या सूचना केल्या आहेत. या नियमांची कडेकोट अंमलबाजवणी झाल्यास सॅटीस पूलाखालील रिक्षा चालकांच्या बेशिस्तीला आळा बसू शकतो असे प्रवाशांचे म्हणणे आहे. सॅटीस पूलाखालील वाहतूकीचे नियमन करण्यासाठी गर्दीच्या वेळेत सकाळी १० आणि रात्री १० अशा एकूण २० कर्मचाऱ्यांची अतिरिक्त नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पूलाखाली रिक्षा थांब्यावरील प्रवाशांसाठी एक अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातही नियमन केले जाणार आहे. – पंंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे शहर वाहतूक पोलीस. 00000

लाडकी बहीणींना योजनेचा अर्ज घ्यावा लागतोय विकत

 दुकानदारांकडे हे अर्ज कसे पोहोचले असा प्रश्न उपस्थित ठाणे : माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी शासनाने १५ ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ दिली होती. परंतू, हे अर्ज केवळ अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका स्विकारतील असे सांगण्यात आले होते. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिला अंगणवाडीत जाताच त्यांना शेजारील दुकानांमधून अर्ज विकत घेण्यास सांगितले जात असल्याचा प्रकार जिल्ह्यातील अनेक अंगणवाडी केंद्रांवर उघडकीस आला आहे. दुकानदारांकडे सरकारी योजनेचे अर्ज कसे पोहोचले असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध भागातील महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. सुरुवातीला हे अर्ज प्रत्येक प्रभाग समितीमध्ये अंगणवाडी सेविकांच्या मार्फत भरले जात होते. त्यानंतर, या योजनेचे संकेतस्थळ तसेच ॲप्लिकेशन तयार करण्यात आले. त्यामुळे अनेक महिलांनी घरबसल्या या योजनेचा अर्ज भरला होता. अर्ज ऑफलाईन भरलेला असो किंवा ऑनालईन या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नव्हते. यापैकी ज्या महिलांच्या अर्जाला मंजूरी मिळाली, त्यांच्या खात्यावर ऑगस्ट महिन्यापासून योजनेचा हफ्ता येण्यास सुरुवाती झाली. परंतू, या योजनेसाठी महिलांचा वाढता प्रतिसाद पाहून सरकारने या योजनेचा अर्ज भरंण्यासाठी मुदत वाढ दिली. परंतू, हे अर्ज केवळ अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत भरता येतील, असे सांगण्यात आले. सरकारकडून १५ ऑक्टोबर पर्यंत ही मुदत वाढ देण्यात आली होती. त्यानुसार, अंगणवाडी केंद्रांवर सकाळी १० वाजल्यापासून महिलांच्या रांगा लागत होत्या. परंतू, ठाणे शहरातील काही केंद्रांवर महिलांना योजनेचा अर्ज शेजारील दुकानांमधून पाच किंवा दहा रुपयास विकत घेण्यास सांगितले जात होते. त्यामुळे महिलांची अंगणवाडी केंद्रावर तसेच दुकानांमध्ये गर्दी होत होती. परंतू, सरकारी योजनेचा हा अर्ज खासगी दुकान चालकांकडे पोहोचला कसा असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. सरकारने सुरुवाती या योजनेचा अर्ज भरताना कोणत्याही प्रकारचे शुल्क स्विकारले जाणार नाही, असे सांगण्यात आले होते. परंतू, आता याच योजनेचा अर्ज विकत घ्यावा लागला असल्यामुळे महिलांमधून नाराजीचा सुर उमटू लागला आहे. यासंदर्भात, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याशी संपर्क साधला असता, यांसदर्भात माहिती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.