Month: January 2026

७५ महिलांच्या ७५ गुलाबी ई-रिक्षा प्रवाशांसाठी मोफत धावल्या

ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त ७५ महिलांच्या ७५ गुलाबी ई-रिक्षा प्रवाशांसाठी मोफत धावल्या ठाणे : २७ जानेवारी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या ७५ व्या जयंती निमित्त ७५ महिलांनी आपल्या ७५ गुलाबी ई-रिक्षाने लहान मुलांपासून ७५ वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास सेवा देऊन जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी केली.  सकाळी १० वाजता ७५ महिला गुलाबी युनिफॉर्म घालून ७५ गुलाबी ई-रिक्षा सोबत शासकीय विश्रामगृह, कोर्ट नाका, ठाणे येथे उपस्थित होत्या. मिलींद बल्लाळ, राजन साप्ते आदी मान्यवरांच्या हस्ते भगवा झेंडा फडकवून मोफत सेवेचे उदघाट्न करण्यात आले. वाट न बघता आज रिक्षा मिळली, आज कोणी रिक्षाने नाही म्हटले नाही,   प्रवास सुखकर झाला, अशा प्रतिक्रिया ठाणेकर नागरिकांनी दिल्या. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या समाजसेवेच्या दृष्टीकोनाला आणि कार्याला दिलेली ही आदरांजली आहे, असे आयोजक जयदीप कोर्डे, डॉ. श्रीकांत राजे, संजय मिरगुडे, अविनाश पावळे यांनी म्हटले.

 भुवन शाळेच्या खेळाडूंवर ग्रामस्थांकडून भेटवस्तूंचा वर्षाव…

भुवन शाळेच्या खेळाडूंवर ग्रामस्थांकडून भेटवस्तूंचा वर्षाव… प्रजासत्ताकदीनी पोलीस निरिक्षक दादासो एडके यांच्या हस्ते शाळेच्या खेळाडूंचा गौरव! राजीव चंदने मुरबाड : जिल्हा स्तरावर लंगडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल जि. प. भुवन शाळेच्या खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या सर्व विद्यार्थ्यांवर ग्रामस्थांकडून व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुरबाड कडून विशेष भेटवस्तू,ड्रेस, शैक्षणिक साहित्य, गौरवचिन्ह देऊन विशेष कौतुक करण्यात आले. हा कौतुक सोहळा मुरबाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक दादासाहेब एडके, प्रसिद्ध समाजसेवक व दानशूर व्यक्तिमत्व मेहबूबभाई पैठणकर, गटशिक्षणाधिकारी मधुकर घोरड, रघुनाथ बांगर यांच्या शुभहस्ते पार पडला. प्रथमच जिल्हा परिषद भुवन शाळेच्या खेळाडूंना जिल्हा स्तरावर प्रथम बक्षीस भेटल्यामुळे सर्व ग्रामस्थांना व शिक्षकांना अत्यानंद झाला आहे.विजेत्या संघाचे ढोलताश्याच्या गजरात मिरवणूक काढून ग्रामस्थांनी स्वागतही करण्यात आले. आज प्रजासत्ताक दीनाचे औचित्य साधून सर्व ग्रामस्थांनी या खेळाडूंचे गोड कौतुक करत, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत शैक्षणिक साहित्याची भेट दिली आहे.तसेच यामध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतिनेही दप्तर, वह्या, ट्रॉफी देऊन या मुलींना प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस निरिक्षक दादासाहेब एडके, यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, दररोज होणारे अपघात या विषयी मार्गदर्शन करून शाळेचे शिक्षक व खेळाडूंना पुढील भावी शैक्षणिक वाटचालीस  शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी पोलीस निरिक्षक दादासो एडके, गटशिक्षणाधिकारी मधुकर घोरड, समाजसेवक मेहबूबभाई पैठणकर,  सरपंच भुमिका बांगर,उपसरपंच सुनिल बांगर, माजी सरपंच रघुनाथ बांगर,दर्शना बांगर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप बांगर,ग्रामसेविका सौ. सिंघासने, रिपाईचे दिनेश उघडे, अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे अण्णा साळवे, लोकक्रांतीचे नरेश मोरे, रमेश देसले, जितेंद्र पंडित,सुधाकर शेळके, पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शंकर करडे, तालुका अध्यक्ष दिलीप पवार, सचिव संजय बोरगे, संतोष राऊत,मिडियासेलचे चेतन पोतदार, राजिव चंदने,शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिव्यातील विद्यार्थ्यांना शशिकांत केळशीकर यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिव्यातील विद्यार्थ्यांना शशिकांत केळशीकर यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप भाजपा काजू महामंडळ महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष रुपेश बेलोसे यांची उपस्थिती दिवा : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी दिवा परिसरातील विविध ठिकाणी शैक्षणिक साहित्य व वह्या वाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम भाजपा काजू महामंडळ महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष रुपेश बेलोसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. हा कार्यक्रम महाराष्ट्र भाजपा अनुसूचित जाती मोर्चा ठाणे जिल्हा सरचिटणीस, ह्युमन राईट्स राष्ट्रीय सरचिटणीस तसेच टायगर ग्रुप ठाणे जिल्हा अध्यक्ष शशिकांत (सतीश) केळशीकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेले वह्या व शैक्षणिक साहित्य यावेळी वितरित करण्यात आले. तेथे उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण हेच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना सातत्याने मेहनत करण्याचे आवाहन केले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी उपस्थिती कोकण प्रतिष्ठान दापोली खेड मंडणगड अध्यक्ष तुषार गायकर, उपाध्यक्ष दिलीप शिगवण, सल्लागार गणेश दवंडे, तसेच भाजपा सदस्य साधना सिंग जी, पूनम सिंग व टायगर ग्रुप ठाणे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र भोईर काका, दिवा शहर उपाध्यक्ष कैलास गोगावले, रमेश कोळी, कु. सूरज पानसरे व सर्व सहकारी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले असून, अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

शिळ– दिवा रस्त्यावरील अपघातांच्या पार्श्वभूमीवर दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना निवेदन

शिळ– दिवा रस्त्यावरील अपघातांच्या पार्श्वभूमीवर दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना निवेदन आरती परब दिवा: शिळ– दिवा रस्त्यावर सातत्याने घडणऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दिवा प्रभाग समितीच्या वतीने दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना लेखी निवेदन देण्यात आले. या निवेदनात शिळ– दिवा रस्त्यावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे तसेच महाकालेश्वर मंदिर परिसरात असलेल्या वळणावर वाहनांची वेगवान वर्दळ होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. रस्त्यावर योग्य वेगमर्यादा दर्शविणारे फलक, झेब्रा क्रॉसिंग, गतिरोधक तसेच आवश्यक सूचनाफलक नसल्यामुळे वाहनचा लकांना दिशा न मिळाल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढत असल्याचे सांगण्यात आले. या मार्गावर शाळा व वस्ती असल्याने लहान विद्यार्थी, नागरिक व स्थानिक रहिवाशांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे महाकालेश्वर मंदिराजवळ, दिपक सर्विस सेंटर समोर, राॅबो स्कुल शंकर मंदिर समोर, चंद्रकांत आलिमकर घरा समोर, तुलाजा भवानी मंदिर शिळगांव प्रवेशद्वार समोर, सुभेदार स्कुल समोर या चार ठिकाणी तातडीने गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग पथ व आवश्यक सूचनाफलक बसविण्यात यावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. संबंधित विभागाने याची तात्काळ दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.

धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण 

धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण  रघूवीर खेडकर, अशोक खाडे, रोहित शर्माला पद्मश्री, मुंबई : आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीवर राज करणाऱ्या धर्मेंद्र यांना मरणोत्तर भारतातील मानाच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून यंदाच्या २०२६ सालचे पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. देशातील दुसऱ्या क्रमाकांच्या सर्वोच्च अशा पद्मविभुषण पुरस्कारासाठी देशभरातून धर्मेंद्र यांच्यासह पाच जणांची निवड केली, तर  १३ जणांना पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.…

भारताने टी२० मालिका जिंकली

गुवाहाटी : सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन इनिंगच्या जोरावर भारताने तिसऱ्या टी२० क्रिकेट स्पर्धेत न्युझीलंडचा १० ओव्हर आणि ८ विकेट राखून धुव्वा उडविला आणि टी२० मालिकाही जिंकली.  न्यूझीलंडनं पहिल्यांदा फलंदाजी करताना ९ बाद १५३ धावा केल्या होत्या.कॅप्टन सूर्यकुमार…

ठाण्याच्या सुवर्णा शिंदेंना राष्ट्रपती पदक

ठाण्याच्या सुवर्णा शिंदेंना राष्ट्रपती पदक मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य पोलिस दलातील ७५ हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले असून त्यात ठाण्याच्या सुवर्णा शिंदें…

अंतराळवीर शुभांशू शुक्लांना अशोक चक्र

  नवी दिल्ली : आतंरराष्ट्रीय अवकाश केंद्राला भेट देणाऱ्या भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी भारत सरकारकडून अशोक चक्र जाहीर करण्यात आलं आहे. शांतता काळातील हा सर्वोच्च सैन्य सन्मान पुरस्कार…

एमसीसी ठाणेच्या विजयात शतकवीर विवान, अष्टपैलू रचित चमकले

एमसीसी ठाणेच्या विजयात शतकवीर विवान, अष्टपैलू रचित चमकले एमसीसी लिटिल स्टार  (१४ वर्षांखालील) क्रिकेट लीग मुंबई: ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित एमसीसी लिटिल स्टार लीग (१४ वर्षांखालील) स्पर्धेत एमसीसी ठाणे अ संघाच्या विजयात शतकवीर विवान गुर्जर आणि अष्टपैलू रचित पाटील चमकले. पहिल्या सामन्यात, एमसीसी ठाणे अ संघाने विबग्योर स्ट्रायकर्सवर ५ विकेट राखून मात केली. विबग्योर स्ट्रायकर्सनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ३५ षटकांत १९४ धावा केल्या. त्यात हृदय मेहताने (५२ चेंडूत ४५ धावा) सर्वाधिक योगदान दिले. एमसीसी ठाणे संघाकडून आयुष सुतार (३/२५), रचित पाटीलने (३/३१) प्रभावी मारा केला. एमसीसी ठाणे अ संघाने प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान ३२.५ षटकांत ५ विकेटच्या बदल्यात पार केले. विवान गुर्जरने ८७ चेंडूत १०३ धावांची झटपट खेळी करून विजयात मोलाचा वाटा उचलला. रचित पाटीलने ३८ चेंडूत ३६ धावा फटकावत त्याला चांगली साथ दिली. अष्टपैलू रचित याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. अन्य सामन्यांत, एमसीसी सांताक्रूझ व भांडुप संघांनी विजय मिळवले. संक्षिप्त धावफलक: पहिला डाव: विबग्योर स्ट्रायकर्स – ३५ षटकांत सर्वबाद १९४(हृदय मेहता ४५(५२), आयुष सुतार ३/२५, रचित पाटील ३/३१) वि. एमसीसी ठाणे अ – ३२.५ षटकांत ५ बाद १९५(विवान गुर्जर १०३(८७), दिव्यम मुथा ३/१८). निकाल: एमसीसी ठाणे अ ५ विकेट राखून विजयी. सामनावीर: रचित पाटील ३/३१ आणि ३६(३८). एमसीसी ठाणे ब – २५.५ षटकांत ९ बाद ८४(मोहम्मद अमीन ३८(५९), आयुष गुप्ता ३/८) वि. एमसीसी सांताक्रूझ ८ षटकांत २ बाद ८५(अगस्त्य २९(१२), पीयुष तिवारी २/३८). निकाल: एमसीसी सांताक्रूझ ८ विकेट राखून विजयी. सामनावीर: आयुष गुप्ता (३/८). विबग्योर स्ट्रायकर्स ३०.१ षटकांत सर्वबाद ११५(आशीर बेग २९(४९) वि. एमसीसी भांडुप – १२.२ षटकांत २ बाद ११६(आर्यन चेंबुरकर ८२(४०). निकाल: एमसीसी भांडुप ८ विकेट राखून विजयी. सामनावीर: आर्यन चेंबूरकर ८२(४०).