Month: January 2026

काँग्रेसची जिल्हा परिषदेसाठी ओबीसी बहुजन पक्षाशी युती

  मुंबई : प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी बहुजन आघाडी व काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषदेसाठी युती झाली आहे. ही एक वैचारिक युती असून आगामी जिल्हा परिषद निवडणुका एकत्रित लढू असा निर्णय यावेळी…

यूएईचे राष्ट्रपती हिज हायनेस शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर स्वागत केले. एकाच कारमधून प्रवास केला. भारत–यूएई मैत्री अधिक दृढ होण्याची ही भेट महत्त्वाची ठरणार आहे.

मुंबईत ‘मराठी भवन’चा पत्ता नाही, ३० मजली ‘बिहार भवन’ उभारणार

मुंबई : मुंबईत मराठी भवन उभारण्याचा अजून पत्ता नसताना दुसरीकडे बिहार सरकारने मुंबईत अत्याधुनिक आणि भव्य ३० मजली ‘बिहार भवन’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारचा हा महत्त्वाकांक्षी…

भिवंडीत राजकीय राडा अन् फ्रीस्टाईल हाणामारी

  भिवंडी : भिवंडीत भाजपा पक्षात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. भिवंडीतील प्रतिष्ठेच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये कोणार्क विकास आघाडीचे विलास आर पाटील यांचा मुलगा मयुरेश पाटील यांनी भाजपा आमदार महेश चौघुले…

२९ महापालिकेतील महापौरपद आरक्षण सोडत २२ जानेवारीला

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारी रोजी काढली जाणार आहे. २२ जानेवारीला सकाळी ११ वाजता सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रवर्गाचा महापौर कोणत्या नगरपालिकेमध्ये बसणार हे २२ जानेवारीला निश्चित होईल. नगरविकास…

मुंबईत ‘ठाकरे’ महापौर होणार ?

मुंबई : मुंबई महानगर पालिकेत सगळी गणित जुळली आणि नशिबाने साथ दिली तर मुंबईच्या  महापौरपदावर ठाकरे विराजमान होऊ शकातात… मुंबई महानगरपालिका निवडणूकीचा निकाल असा लागला आहे की कोणत्याच पक्षाला स्वबळावर…

मुंबई महानगरपालिकेत महापौर महायुतीचाच होणार– एकनाथ शिंदे

मुंबई : शिवसेना आणि भाजप हे मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र निवडणूक लढले असून  मुंबईत महायुतीचा महापौर होईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यासह महायुती म्हणून जिथे जिथे एकत्र निवडणूक…

भाजपाचा ठाणे महापौरपदावरही दावा

दोन वर्ष महापौर पद अन्यथा भाजपा विरोधात बसणार ०  मुंबई महापौरपदवरून तिढा कायम सिध्देश शिगवण ठाणे: ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने एकहाती बहुमत मिळवले असतानाही भाजपाने ठाणे महापौर पदावर दावा ठोकल्याने नवा…

‘लाल वादळ’ आज पालघरमध्ये थडकणार !

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखोंचा लाँग मार्च० मागण्यांसाठी अनिश्चित काळासाठी पालघरमध्ये धरणे आंदोलन अनिल ठाणेकर ठाणे : आपल्या न्याय मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लाल वादळ आज पालघरमध्ये थडकणार आहे. आज पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून आलेल्या लाखो लोकांचा एक अतिभव्य पायी मोर्चा काढला. हा मोर्चा डहाणू तालुक्यातील चारोटी येथून सुरू झाला असून, रात्री मनोर येथे मुक्काम करेल आणि उद्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करेल. जोपर्यंत सरकारच्या वतीने निश्चित कालमर्यादेसह लेखी स्वरूपात आपल्या ज्वलंत आणि प्रलंबित मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत हा प्रचंड जनसमुदाय पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करणार आहे. अखिल भारतीय किसान सभा (एआयकेएस), सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू), अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (एडवा), डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच (एएआरएम) यांसारख्या संघटनाही मोठ्या संख्येने सामील झाल्या आहेत. या मोर्चाचे नेतृत्व माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि एआयकेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, पॉलिट ब्युरो सदस्य आणि एडवाच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, केंद्रीय समिती सदस्य, माकप राज्य सचिव आणि किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले, केंद्रीय समिती सदस्य आणि सीटूचे राज्य सचिव, डहाणूचे दोन वेळा आमदार असलेले विनोद निकोले, राज्य सचिवमंडळ सदस्य आणि एएआरएमचे राज्य निमंत्रक किरण गहला आणि इतर अनेक जण करत आहेत. उद्या सीपीएमचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस विजू कृष्णन हे देखील या मोर्चात सामील होतील. या मोर्चाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत: वनाधिकार कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे; सर्व देवस्थान, इनाम, वरकस आणि सरकारी जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर करणे; मोदी सरकारने रद्द केलेली मनरेगा योजना पूर्ववत सुरू करणे; स्मार्ट मीटर योजना रद्द करणे; पेसा कायद्याची अंमलबजावणी करणे; चार श्रम संहिता रद्द करणे; वाढवण आणि मुरबे बंदरांचे जनविरोधी प्रकल्प रद्द करणे; पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची सोय करणे; शिक्षण, रोजगार, रेशन, आरोग्य इत्यादी सुविधांमध्ये वाढ करणे.

मुंबईतील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार.

मुंबईतील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार. मुबई : महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे २४ नगरसेवक विजयी झाले आहेत. या नवनिर्वाचित नगरसेवकांचा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री आमदार अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस व मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकाबाजूला धनशक्ती होती, प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे वाटण्यात आले, विरोधी पक्षाला धमक्या देण्यात आल्या. सर्व यंत्रणा सत्ताधारी पक्षासाठी काम करत होती तर दुसऱ्या बाजूला जनशक्ती होती. जनतेने काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवत २४ नगरसेवक निवडून दिले आहेत. अत्यंत विपरित परिस्थितीत काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या निर्धाराने लढले आहेत. आमची संख्या कमी असली तरी मुंबईकरांच्या प्रश्नावर महापालिकेत आवाज उठवतील व जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील. मुंबईकरांना चांगले रस्ते, स्वच्छ पिण्याचे पाणी, वाहतुक कोंडीतून सुटका, बेस्ट बसची चांगली सुविधा, प्रदुषणमुक्त मुंबई करायची आहे. महापालिकांच्या विविध संस्थांमध्ये खाजगीकरणाचा सपाटचा सुरु आहे त्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे काम केले जाईल. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावही अंकुश ठेवण्याचे कामही या नगरसेवकांच्या माध्यमातून केले जाईल, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. एका प्रश्नाला उत्तर देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपात हुकूमशाही आहे तर काँग्रेसमध्ये लोकशाही आहे, आमच्या पक्षात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. कोणी टिका केली असेल तर पक्ष त्यावर निर्णय घेईल. पक्षाने मला मुंबईच्या अध्यक्षपदाची संधी दिली आहे, माझ्या कार्यकर्त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. येणाऱ्या काळात मुंबईत काँग्रेस पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचे काम आम्ही करणार आहोत असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. “आमच्या नगरसेवकांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे त्यांना कोणत्या हाॅटेलमध्ये ठेवण्याची गरज वाटत नाही”, असा टोलाही खासदार वर्षा गायकवाड यांनी लगावला.