Month: January 2026

महाराष्ट्र पोस्ट, पश्चिम रेल्वे आणि ओम साईश्वर सेवा मंडळाची विजयी गर्जना!

विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित ६२ वी खो-खो स्पर्धा – महाराष्ट्र पोस्ट, पश्चिम रेल्वे आणि ओम साईश्वर सेवा मंडळाची विजयी गर्जना! पुरुष व्यवसायिक विभागात मध्य रेल्वे वि. रचना नोटरी व पश्चिम…

 बाळासाहेबांना जन्मशताब्दीनिमित्त स्वरपंखचा अनोखा नजराणा                                         

श्रीकांत ठाकरे आणि महंमद रफी यांच्या गाण्यांनी दिव्यांग गायकांची हिंदुहृदयसम्राट यांना मानवंदना बाळासाहेबांना जन्मशताब्दीनिमित्त स्वरपंखचा अनोखा नजराणा मुंबई, दि. (प्रतिनिधी) : बोरीवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात स्वररंग प्रतिष्ठान आयोजित स्वरपंख या संपूर्ण दिव्यांग बांधवांच्या वाद्यवृंदाने मराठी गाणी आणि लावण्यांच्या खुमासदार सादरीकरणाने अतीशय कमाल केली. रंगमंचावरील कुणी प्रज्ञा चक्षु तर कुणाचे हात, कुणाचे पाय नाहीत परंतु केवळ जगण्याची जिद्द नाही तर सूर, स्वर, संगीत, वाद्य अशा कशातही आम्ही कमी नाही किंबहुना धडधाकट कलाकारांपेक्षा आम्ही काकणभर सरस ठरु, अशा प्रकारे सभागृहात आपापल्या अदाकारीने दाखवून दिले. एका बाजूला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरु होत असतांना बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहणारे बंधूराज ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि केवळ श्रीकांतजींसाठीच मराठी गाणी गाणाऱ्या महंमद रफी यांच्या आवाजाची जादू दिव्यांग गायकांनी रसिक प्रेक्षकांसमोर सादर केली आणि एका अर्थाने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्वररंग प्रतिष्ठान आयोजित स्वरपंखचा अनोखा नजराणा पेश केला. बिपिन वर्तक, मकरंद भोसले, विनोद गावंडे, सुधीर पालांडे, सारिका शिंदे, श्रद्धा घुगे या गायक कलाकारांनी विविध प्रकारच्या गाण्यांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांना मराठी चित्रपट गीतांचा नजराणा पेश केला. नृत्यांगना ज्योती मस्तेकर यांनी  ढोलकीच्या तालावर, अप्सरा आली अशा लावण्यांच्या नृत्यावर उपस्थित रसिक प्रेक्षकांना थिरकायला लावले. संतोष मोहिते, नागेश कांबळे, दीपक कांबळे, हर्षवर्धन वर्तक, डोनाल्ड कोळी, महेश नाईक, शिवाजी बनसोडे या वादक कलाकारांनी स्वरपंखच्या कार्यक्रमास उत्साहाचे, भरारीचे पंख लावल्याने कार्यक्रमाची नजाकत वाखाणण्याजोगी होती. स्वतः प्रज्ञा चक्षु असलेल्या बिपीन वर्तक यांनी केलेले सूत्रसंचालन व्यावसायिक मराठी वाद्यवृंदातील प्रख्यात निवेदकांची आठवण करून देत होती. स्वररंग प्रतिष्ठान आयोजित स्वरपंख या संपूर्ण दिव्यांग कलाकारांच्या अनोख्या वाद्यवृंदाची संकल्पना आणि निर्मिती कनक क्रिएशनचे अतुल साटम यांची होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बोरीवली नाट्य परिषदेचे झुंजार पदाधिकारी विजय तारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. महाजनको, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बॅंक, घारे ज्वेलर्स, गिरगांव कट्टा, लायन्स क्लब ऑफ मुंबई प्लॅटिनम, फार्मा प्रोफेशनल संदीप मानकामे यांनी प्रायोजकत्व स्वीकारले होते. सामाजिक,  शैक्षणिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आयोजकांच्या ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ‘ अशा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रेरणेने सदैव पाठीशी उभे राहणारे गिरगांव कट्टा चे सर्वेसर्वा प्रदीप मालंडकर, आयोजक संजय देसाई, श्रीकृष्ण कुलकर्णी यांच्या शुभहस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

लीना र. प्रभू यांना ‘सायकोलॉजिस्ट ऑफ द इयर २०२५’ पुरस्कार

लीना र. प्रभू यांना ‘सायकोलॉजिस्ट ऑफ द इयर २०२५’ पुरस्कार मुंबई : मुंबई येथे आयोजित ‘ग्लोऱ्या आंतरराष्ट्रीय एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड्स २०२५’ सोहळ्यात नामवंत मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक लीना र. प्रभू…

वयाच्या साठीत उभा केला मधनिर्मितीचा उद्योग

वयाच्या साठीत उभा केला मधनिर्मितीचा उद्योग कसोटी, जिद्द आणि विश्वासाच्या जोरावर उभा राहिला एक ब्रँड पर्यावरणाशी नाते जोडून गुणवत्तेच्या जोरावर यशस्वी झाला उद्योग योगेश चांदेकर पालघरः  वय, शिक्षण अनुभव याचा उद्योग उभारणीत कोणताही अडथळा येत नाही. नवे काही करण्याची तयारी आणि ग्राहकाला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि पर्यावरणाशी नाते जोडणारे देण्याची तयारी या त्रिसूत्रीवर उद्योगाचे यश अवलंबून असते. डहाणू तालुक्यातील घोलवड येथील साठ वर्षीय विश्वास नेरुरकर यांनी  नवीन उद्योग सुरू करून एक प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवले आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील घोलवड हे महाराष्ट्र शासनाने,घोषित केलेले महाराष्ट्रातील तिसरे मधाचे गाव असुन, याचा वसा घेऊन उद्योगात यशस्वी झेप घेऊन  संकल्प हनी चा मुख्य उद्देश घेऊन स्थानिकांना,  थोड्याफार रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी हा नेरूरकर यांचा प्रयत्न आहे. निसर्गातूनच घेऊन माणसाला नैसर्गिक देण्याची जिद्द यातून ‘संकल्प हनी’चा उद्योगाचा जन्म झाला. आज या उद्योगांना शंभर नव्हे, तर १०१ टक्के गुणवत्तेची हमी दिली आहे. गुणवत्ता, दर्जा आणि नैसर्गिक हेच त्यांच्या यशाचे गणित आहे. नोकरीऐवजी उद्योगात रमले मन विश्वास नेरूरकर यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले. नोकरीत त्यांना रस नव्हता. विद्युत संबंधी व्यवसाय काही काळ केला; परंतु लोकांच्या आरोग्याची काळजी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. भेसळ त्यांना पाहवत नव्हती. त्यामुळे स्वतःच शंभर टक्के पर्यावरणपूरक आणि निसर्गाशी कोणतीही तडजोड न करता त्यांनी मधमाशी पालनाचे प्रशिक्षण डहाणू तालुक्यातील कोसबाड येथे घेऊन मधाची निर्मिती करण्याचे त्यांनी ठरवले. केवळ स्वतः पुरती मध निर्मिती न करता इतरांना सहभागी करून घेतले व संकल्प घेऊन संकल्प हनीची निर्मिती केली. संकल्पातून ‘संकल्प हनी’…

 ‘आरसीबी–आयटीआय इनोव्हेशन लॅब’चे भव्य उद्घाटन

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे’तर्फे ‘आयटीआय मुंबई १’ येथे ‘आरसीबी–आयटीआय इनोव्हेशन लॅब’चे भव्य उद्घाटन मुंबई : ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे’ (आरसीबी) तर्फे शनिवारी, २४ जानेवारीला ‘आयटीआय मुंबई १’ येथे इंडस्ट्री ४.० सुसज्ज…

 राज्यातील शेतकऱ्यांना एक न्याय, अंबानीला एक न्याय!

राज्यातील शेतकऱ्यांना एक न्याय, अंबानीला एक न्याय! शेतकऱ्यांसाठी न्यायाचा तराजू कायमच हलका का रमेश औताडे मुंबई : राज्यातील शेतकरी आजही निसर्गाच्या लहरीपणाशी, बाजारभावाच्या अस्थिरतेशी आणि कर्जाच्या ओझ्याशी झुंज देत आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, कीड आणि उत्पादन खर्च वाढूनही हमीभावाची हमी नाही. पीक विमा वेळेवर मिळत नाही,कर्जमाफीची आश्वासने हवेत विरतात. अशा स्थितीत शेतकऱ्यांसाठी न्यायाचा तराजू कायमच हलका का ठरतो, असा सवाल शेतकरी करत आहेत. याच राज्यात आणि देशात मोठ्या उद्योगसमूहांसाठी मात्र धोरणे वेगळी भासतात. जमीन, वीज, पाणी, करसवलती, कर्जपुनर्रचना सगळे काही वेगाने मंजूर होते. प्रकल्प रखडले तरी दंड नाही; तोटा झाला तरी सवलत. मग शेतकऱ्यांच्या बाबतीतच नियम कठोर का? शेतकऱ्यांचे कर्ज थकले की नोटीस, जप्ती आणि मानसिक ताण; पण उद्योगपतींच्या कर्जावर पुनर्गठन आणि सवलती मिळतात हा दुहेरी न्याय का? विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत शेतकरी कर्जाच्या चक्रातून बाहेर पडू शकलेले नाहीत. आत्महत्यांची आकडेवारी धोक्याची घंटा वाजवत असताना, सरकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप शेतकरी संघटना करत आहेत. “आम्हाला दया नको, समान न्याय हवा,” अशी आर्त हाक शेतकरी वर्गातून उठते आहे. शेती हा उद्योग मान्य करूनही त्याला उद्योगासारख्या सवलती का नाहीत? उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव, वेळेत पीक विमा, सरळ आणि पारदर्शक कर्जमाफी, वीज-पाणी सवलती या मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. दुसरीकडे, मोठ्या उद्योगांसाठी धोरणांची लालफीत क्षणार्धात कापली जाते. हा फरकच शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असे एका शेतकऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सरकारला प्रश्न केला. राज्यातील जनमत आज स्पष्ट आहे. कायद्याचे निकष समान हवेत. शेतकऱ्यांना न्याय देताना तसूभरही कमीपणा नको. देश अन्नदाता शेतकऱ्यांवर उभा आहे; त्याच अन्नदात्याच्या जगण्याचा प्रश्न दुर्लक्षित ठेवून विकासाची गाडी पुढे जाऊ शकत नाही. शेतकऱ्यांना एक न्याय आणि उद्योगपतींना दुसरा—हा अन्याय आता थांबायलाच हवा, अशी ठाम मागणी राज्यभरातून शेतकरी करत आहेत.

उच्चभ्रू सोसायटीमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी प्रवेश नाकारणे हा लोकशाहीचा अपमान -ॲड. विक्की पाटील

उच्चभ्रू सोसायटीमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी प्रवेश नाकारणे हा लोकशाहीचा अपमान -ॲड. विक्की पाटील ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत यंदा उच्चभ्रू सोसायटीमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी प्रवेश नाकारला गेला. हा एकप्रकारे लोकशाही व्यवस्थेचा अपमान आहे.असा आरोप अपक्ष उमेदवार ॲड. विक्की पाटील यांनी रविवारी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना केला.याविरोधात आम्ही जनहीत याचिका दाखल करण्याचा विचार सुरु केला आहे. अशी माहिती ॲड. विक्की पाटील यांनी दिली. नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ (अ) मधून  अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या ऍड.विक्की पाटील यांनी १० हजारहून अधिक मत घेतली होती.यात त्यांचा थोडक्यात पराभव झाला. याबाबत सविस्तर बोलण्यासाठी विक्की पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली होती.यावेळी बोलतांना विक्की पाटील म्हणाले की २०१० पासून मी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. सातत्याने शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून नागरिकांची काम करत होतो.पण यंदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती झाली. परिणामी प्रभाग क्रमांक ४ (अ )येथे मी इच्छुक असताना जागावाटपात ती जागा भाजपाच्या वाट्याला गेली. मात्र जनसेवेचा वसा मी घेतला असल्याने नागरिकांच्या सेवेकरिता मी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उमेदवारी दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. माझ्याकडे प्रचारासाठी खूप कमी अवधी होता. त्यातही माझ्यामागे पक्षाचे कोणतेही पाठबळ नव्हते. तरीही मी सुरुवातीपासून दारोदारी जाऊन  प्रचार करण्यावर भर दिला. मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद ही मला प्रचारादरम्यान मिळत होता.माझ्या मतदारसंघात अनेक उच्चभ्रू सोसायटी ही येतात. पण या निवडणुकीत माझ्या मतदार संघातील अनेक उच्चभ्रू सोसायटीमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी प्रवेशच नाकारला जात होता. या येथे अनेक उमेदवारांना मतदारापर्यंत पोहचूच दिले गेले  नाही.याचा अनुभव मी माझ्या प्रचाराच्यावेळी स्वतः त घेतला आहे. आम्हाला प्रचारादरम्यान सोसायटीच्या प्रवेशद्वारावर रोखले जात होते. हा एक प्रकारे लोकशाहीचा अपमान आहे.असा आरोप विक्की  पाटील यांनी यावेळी बोलतांना केला.ही पद्धत लोकशाहीला घातक अशी आहे. हे रोखण्यासाठी  यासंदर्भात लवकरच आपण एक जनहित याचिका  न्यायालयात  दाखल करण्याचा   विचार सुरू केला आहे. अशी माहिती ऍड.विक्की पाटील यांनी यावेळी बोलतांना दिली.तसेच माझा या निवडणुकीत पराभव झाला असला तरी यापुढे मी एस. के. पाटील या माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरूच ठेवणार आहे. असे ही विक्की पाटील यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले.

नमुंमपा मुख्यालयात मतदार शपथ सामुहिकरित्या ग्रहण

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून नमुंमपा मुख्यालयात मतदार शपथ सामुहिकरित्या ग्रहण नवी मुंबई : भारत निवडणूक आयोग यांचेमार्फत प्राप्त निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्र सभागृहात सोळाव्या राष्ट्रीय मतदार दिवसाची सामुहिक शपथ २३ जानेवारी रोजी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्यासमवेत सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांनी ग्रहण केली. नुकतीच नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी रोजी सुव्यवस्थित रितीने पार पडलेली आहे व ५७.१५ टक्के नागरिकांनी मतदानात सहभाग नोंदविलेला आहे. जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असणारा भारत देश १०० कोटी मतदार नोंदणीकडे वाटचाल करत असून यावर्षीच्या १६ व्या राष्ट्रीय मतदार दिवसाची ‘My India, My Vote’ ही संकल्पना घोषित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने देशातील प्रत्येक मतदाराने मतदान प्रक्रियेत उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, परिमंडळ २ चे उपआयुक्त संजय शिंदे, मुख्य विधी अधिकारी अभय जाधव, कार्यकारी अभियंता प्रविण गाडे, सहा.आयुक्त अरुण पाटील तसेच महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक सुरेश वांदिले आणि महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक व युवक मोठया संख्येने उपस्थित होते. ‘आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखून व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू’ – अशा आशयाची सामुहिक शपथ उपस्थितांनी ग्रहण केली.

नागरी संरक्षण दल प्रथमच प्रजासत्ताक दिन संचलनात

नागरी संरक्षण दल प्रथमच प्रजासत्ताक दिन संचलनात चीफ वॉर्डन आमदार संजय केळकर यांची माहिती अनिल ठाणेकर ठाणे : येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ठाण्यात होणाऱ्या संचलनात नागरी संरक्षण दलाचा (सिव्हिल…

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांचा सत्कार

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांचा सत्कार अनिल ठाणेकर मुंबई: न्यायप्रिय व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर असतील, तोपर्यंत आपल्या संविधानाला आणि लोकशाहीला कोणताही धोका नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या सन्मानार्थ मुंबई उच्च न्यायालयात आयोजित भव्य सत्कार सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. आधी अवघा ९ टक्के असलेला महाराष्ट्राचा दोषसिद्धी दर आज ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे आणि तो ६० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे,” सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.याचवेळी, कोल्हापूरच्या बहुप्रतीक्षित सर्किट बेंचला त्यांच्या कार्यकाळातच पूर्ण बेंचचा दर्जा देण्याची विनंती त्यांनी सरन्यायाधीशांकडे केली. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना न्याय अधिक जलद आणि सुलभपणे मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मुंबई उच्च न्यायालयाच्यावतीने आयोजित या ऐतिहासिक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी न्याय, संविधान आणि सामाजिक समतेच्या मूल्यांवर आधारित भारताच्या न्यायव्यवस्थेचा गौरव केला. “न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे कार्य सूर्याप्रमाणे प्रकाशमान असून सामान्य नागरिकांना न्यायाची ऊर्जा देणारे आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांच्या शौर्यपरंपरेचा उल्लेख करत शिंदे यांनी दोन्ही भूमींच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशावर भाष्य केले. “देश आज सुरक्षित आहे, कारण आपल्या सीमांवर जवान डटून उभे आहेत आणि शेतकऱ्यांच्या श्रमातून समृद्धी निर्माण होत आहे,” असे त्यांनी सांगितले.हरियाणातील मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि न्यायनिष्ठेच्या बळावर देशाच्या सर्वोच्च न्यायपीठापर्यंत मजल मारल्याचे नमूद करत, शिंदे यांनी त्यांच्या जीवनप्रवासाला प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी ठरवले. धारा ३७० रद्द करण्याचा निर्णय, वन रँक वन पेन्शन योजना, मतदार याद्यांशी संबंधित महत्त्वाचे आदेश, महिलांसाठी आरक्षणासंदर्भातील निर्देश तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत दिलेले ठाम निर्णय यांचा उल्लेख करत त्यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या न्यायनिष्ठेचे कौतुक केले. “आपल्या निर्णयांमुळे जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे,” असे ते म्हणाले.पर्यावरणपूरक विकासावर भर देताना शिंदे यांनी चारधाम प्रकल्पासारख्या निर्णयांचे उदाहरण दिले. “विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे हीच आजची खरी गरज आहे. पर्यावरण संवेदनशील विकासाची दिशा आपल्या निर्णयांतून स्पष्टपणे दिसते,” असे शिंदे यांनी नमूद केले.राज्यातील न्यायव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, २०२२ पासून राज्यात ३२ नवीन न्यायालयांची स्थापना करण्यात आली असून त्यात १४ अतिरिक्त सत्र न्यायालयांचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयासाठी नव्या भव्य इमारतीच्या उभारणीसाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दोषसिद्धी दराबाबत बोलताना शिंदे म्हणाले, “या आधी महाराष्ट्राचा कन्विक्शन रेट केवळ ९ टक्के होता. आज तो ४५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मात्र, येथेच न थांबता तो ६० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ वाढवण्यावर सरकार भर देत आहे.” लोकशाहीतील न्यायपालिकेच्या महत्त्वावर भाष्य करत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानाबाबतचे विचार उद्धृत केले. “संविधान कितीही चांगले असले तरी ते अंमलात आणणारे लोक न्यायप्रिय असतील, तरच लोकशाही अधिक बळकट होते,” असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या शेवटी शिंदे यांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या उत्तम आरोग्य आणि यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि मुंबई उच्च न्यायालयातील इतर न्यायाधीश आणि वकील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.