Month: January 2026

 दुर्गाडी किल्ल्याच्या पायऱ्यांवर आढळलेल्या कोब्रा नागास सर्पमित्राने दिले जीवनदान

दुर्गाडी किल्ल्याच्या पायऱ्यांवर आढळलेल्या कोब्रा नागास सर्पमित्राने दिले जीवनदान कल्याण : कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी माता मंदिराकडे जाणाऱ्या मध्यभागातील पायरी परिसरात आढळलेल्या कोब्रा नागास सर्पमित्राने पकडून जीवदान दिल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. सर्प मित्र दत्ता बोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्गाडी माता मंदिराकडे जाणाऱ्या मध्यभागातील पायरी परिसरात गुरुवारी दुपारी साडेपाच फुटी लांब कोब्रा नागाची आणि मुंगूस यांची झुंज रंगली होती. दरम्यान तिथे किल्ले दुरुस्ती काम करणारे कामगार पोहचले त्यांची चाहूल लागल्याने मंगूस पळून गेले. त्या नागाचा रूद्र अवतार पाहता मंजुराची भितीने त्रेधातिरपीट उडाली. प्रसंगावधान पाहत सुरक्षा कर्मचारी मोरे यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्याशी संपर्क साधला असता तातडीने घटनास्थळी पोहचत सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी साडेपाच फुटी लांब विषारी कोब्रा नागास पकडून जीवदान दिल्याचे पाहता उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी सांगितले की, गारव्यामुळे साप उन्हाची तिरिपसाठी दगडी पायरी परिसरात उबीसाठी आला असावा. संदर्भीत पकडलेल्या विषारी नागास जीवनदान देत नैसर्गिक अधिवासात सोडले. ही घटना पाहता भक्तांनी देखील मंदिर परिसरात जाता येताना लक्ष देत मार्गाक्रमण गरजेचे आहे

चिंताजनक विमान दुर्घटना

२८ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाले. अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे…

अशा छंदिष्टांचे कोतुक व्हायलाच हवे…..

आज सकाळीच एका वृत्तपत्रात ठाण्यातल्या कौस्तुभ साठे यांच्या आगळ्यावेगळ्या सह्यांच्या संग्रहाबाबत वाचण्यात आले. कौस्तुभने आतापर्यंत ४५०० मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्या असून त्या व्यवस्थित जतन केले आहे. अजूनही अशा स्वाक्षऱ्या गोळा…

टोलयंत्रणेचा दिलासा, अमेरिकेला तडाखा

भारतात टोल व्यवस्था पुर्णपणे कॅशलेस होणार, ही सरत्या आठवड्यातील पहिली रंजक बातमी तर भारताच्या निर्यातशुल्काचा अमेरिकेला तडाखा बसला, ही अशीच एक खास बातमी. भारतीय आर्थिक विकासदर वाढीवर जागतिक नाणेनिधी फिदा…

आरक्षणावर ताजी चर्चा

आरक्षणावर ताजी चर्चा सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस बजावून अनुसूचित जाती-जमातींमध्ये ‌‘क्रिमी लेयर‌’ लागू करण्याबाबत मत मागितले आहे. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, इतर मागासवर्गीयांसाठी ‌‘क्रिमी लेयर‌’ लागू असताना या…

 पनवेल-गव्हाण भागात भाजप महायुती उमेदवारांना जनसमर्थन

पनवेल-गव्हाण भागात भाजप महायुती उमेदवारांना जनसमर्थन पनवेल: रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गव्हाण जिल्हा परिषद गट तसेच वहाळ व गव्हाण पंचायत समिती गणामध्ये भाजप महायुतीच्या उमेदवारांना नागरिकांकडून उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचारादरम्यान सर्व स्तरातून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या भरघोस विजयाचा आत्मविश्वास अधिक बळकट केला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली गव्हाण जिल्हा परिषद गट तसेच वहाळ व गव्हाण पंचायत समिती गणामध्ये भाजप महायुतीचे उमेदवार जोमाने प्रचार करत असून विजयासाठी सज्ज झाले आहेत. अनुभवी आणि विकासाभिमुख नेतृत्वामुळे प्रचाराला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळत आहे.स्वर्गीय जनार्दन भगत, लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे आणि राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, वाय. टी. देशमुख यांची जन्मभूमी असलेल्या गव्हाण विभागाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम या नेतृत्वाने गेल्या अनेक वर्षांत केले आहे. नागरिकांचे प्रश्न सातत्याने सोडविणे, लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि कोणत्याही भेदभावाविना मदतीचा हात देणे ही या नेतृत्वाची ओळख आहे. सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कायम लोकाभिमुख कार्यपद्धती अवलंबली आहे. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव राहिला असून यामुळेच त्यांना नेहमीच जनतेचा भरघोस पाठिंबा लाभला आहे. या विश्वासार्ह आणि विकासाभिमुख नेतृत्वाचा लाभ भाजप महायुतीच्या उमेदवारांना या निवडणुकीत निश्चितच होणार असून गव्हाण जिल्हा परिषदमध्ये निकिता खारकर, तसेच वहाळ पंचायत समितीमधून वितेश म्हात्रे व गव्हाण पंचायत समितीगणामध्ये जिज्ञासा कोळी या तीनही उमेदवारांचा अर्थात भाजप महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 दादागिरी आणि पैशाची भाषा करणाऱ्या उमेदवारांना आता जनता माफ करणार नाही: विलास फडके

दादागिरी आणि पैशाची भाषा करणाऱ्या उमेदवारांना आता जनता माफ करणार नाही: विलास फडके राज भंडारी पनवेल: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. यातच आदई पंचायत समिती गणातून शेतकरी कामगार पक्षाचे अनुभवी नेते विलास फडके तसेच नेरे जिल्हा परिषद गटातून मारुती बाळू भस्मा हे मैदानात उतरले आहेत. आपल्या आयुष्याची अनेक वर्षे ज्यांनी समाजसेवा करण्यात खर्ची घालविली त्या विलास फडकेंसोबत जनशक्ती आणि विरोधात धनशक्ती अशी निवडणूक रंगत आहे. मागील निवडणुकीत ज्यांनी धनशक्तीच्या जोरावर ही जागा जिंकली ते गेल्या ८ वर्षात मतदार जनतेकडे फिरकले सुद्धा नाहीत. त्यामुळे जनतेने आता ठरवले आहे. धनशक्तीला तालुक्यातील जनता आता जनशक्तीचा अवतार दाखवणार असल्यामुळे आदई पंचायत समिती गणातून जनता विलास नारायण फडके आणि नेरे जिल्हा परिषद गटातून मारुती बाळू भस्मा असे आम्हा दोन्ही उमेदवारांना भरघोस मतदान करून निवडून देणार असल्याचा विश्वास विलास नारायण फडके यांनी प्रचारादरम्यात व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मागील वेळी जनतेने धनशक्तीच्या जोरावर भाजपच्या उमेदवाराला निवडून दिले होते. मात्र पुन्हा निवडणूक लागण्यासाठी ८ वर्षांचा कालावधी लागला. गेल्या ८ वर्षात आम्ही ज्यांना मतदान केलं ते आमच्याकडे फिरकलेच नाहीत, असा सुर मतदार जनतेने लावला आहे. तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या मतदार संघातील जनतेसाठी असणाऱ्या विविध योजना, सवलती या त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचे उमेदवार अपयशी ठरले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे भाजपच्या वतीने दादागिरी आणि पैशाची भाषा करून जनतेला गृहीत धरणाऱ्यांना आता जनता माफ करणार नसून महाविकास आघाडीच्या खटारा चिन्हावरील उमेदवारांना जनता मोठ्या संख्येने मतदान करून निवडून देणार असल्याचा विश्वास विलास फडके यांनी व्यक्त केला.

 आरोग्य विभागाचे ‘कोकण स्पंदन’ उत्साहात

आरोग्य विभागाचे ‘कोकण स्पंदन’ उत्साहात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कलाविष्काराने जिंकली रसिकांची मने अशोक गायकवाड रत्नागिरी: रुग्णांची सेवा करताना दिवसरात्र व्यस्त असणाऱ्या डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कोकण स्पंदन’ या स्नेहसंमेलनाने रत्नागिरीकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. भारतीय प्रजासत्ताक दिन आणि ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ यांचे औचित्य साधून येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा सांस्कृतिक कार्यक्रम २६ जानेवारीला पार पडला.जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, क्षयरोग, कुष्ठरोग व हत्तीरोग विभाग, महिला रुग्णालय आणि प्रादेशिक मनोरुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि मुख्याधिकारी वैभव गारवे आदी उपस्थित होते.स्टेथोस्कोप बाजूला ठेवून जोपासली कला आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले वैद्यकीय कर्तव्य बजावत असतानाच जोपासलेली कला यावेळी सादर केली. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात ६० हून अधिक वैविध्यपूर्ण कलाप्रकार सादर करण्यात आले. शास्त्रीय व सुगम संगीताच्या सुरेल मैफिलीने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. लोकनृत्य आणि बॉलीवूड गाण्यांवरील बहारदार सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. उपस्थितांना खळखळून हसवणारी मिमिक्री (नक्कल) आणि सामाजिक संदेश देणाऱ्या एकांकिका व नाटकांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे, आणि पॅथॉलॉजिस्ट डॉ. अर्जुन सुतार यांच्यासह संपूर्ण टीमने अहोरात्र परिश्रम घेतले.रत्नागिरीच्या सांस्कृतिक इतिहासात आरोग्य विभागाने सेवेसोबतच कलेच्या क्षेत्रातही मारलेली ही भरारी कौतुकास्पद असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. प्रेक्षकांच्या तुडुंब प्रतिसादाने सावरकर नाट्यगृह दुमदुमून गेले होते.

V

केडीएमसीच्या एच प्रभागात अनाधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार, उपायुक्त समीर भुमकर व बाळासाहेब चव्हाण यांच्या निर्देशानुसार ह प्रभागाचे सहा.आयुक्त राजेश सावंत यांनी डोंबिवली पश्चिम येथील देवीचा पाडा (स्मशानभूमीच्या मागे) तसेच नवीन देवीचापाडा येथील २५ खोल्या आणि १० चाळीचे जोते संपूर्णत: निष्कासित करण्याची कारवाई केली. हि कारवाई फेरीवाला पथकाचे कर्मचारी, ठेकेदाराचे १० कामगार, १ जे.सी.बी. यांच्या सहाय्याने करण्यात आली.

 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार 30 जानेवारीला विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे व डॉ. विलास आठवले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. तसेच, याप्रसंगी हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधिमंडळाचे सह सचिव नागनाथ थिटे, सह सचिव (समिती) राजेश तारवी, उप सचिव  विजय कोमटवार, स्वाती ताडफळे, अवर सचिव सुरेश मोगल, उप सभापती यांचे खाजगी सचिव अविनाश रणखांब, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.