Month: January 2026

ठामपा निवडणुकीत ३२ प्रभागांमध्ये चार तर एका प्रभागात तीन उमेदवारांना मतदान केल्यावरच प्रक्रिया पूर्ण – सौरभ राव

ठामपा निवडणुकीत ३२ प्रभागांमध्ये चार तर एका प्रभागात तीन उमेदवारांना मतदान केल्यावरच प्रक्रिया पूर्ण – सौरभ राव अनिल ठाणेकर ठाणे- ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६साठी ठाणे महापालिका क्षेत्रातील एकूण ३३ प्रभागांमध्ये विभाजन…

कवी नारायण सुर्वेच्या कवितेवर आधारित रिल स्पर्धा

कवी नारायण सुर्वेच्या कवितेवर आधारित रिल स्पर्धा कल्याण:  पु.ल. कट्टा कल्याण ही साहित्य, सांस्कृतिक, कला क्षेत्रात काम करणारी संस्था असून सदर संस्थेच्या वतीने विविध साहित्यिक सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत असतात.…

 दोन हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त, ४४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

किन्हवलीत पोलीसांची यशस्वी कारवाई दोन हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त, ४४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत अविनाश उबाळे ठाणे : शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या खरपत गाव हद्दीतील शाही नदी किनारी…

औंध – बोपोडी परिसराच्या विकासाला गती देणार- सनी विनायक निम्हण

औंध – बोपोडी परिसराच्या विकासाला गती देणार- सनी विनायक निम्हण पुणे: महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांचे जगणे सुलभ आणि वेगवान करणाऱ्या प्रकल्पांवर भर देणार असल्याचा निर्वाळा भारतीय जनता पक्ष –रिपब्लिकन पक्ष (आठवले)…

रोजगारासाठी आलात, रोजगार करा, राजकारण करून आमच्या डोक्यावर बसू नका – गोवर्धन देशमुख

रोजगारासाठी आलात, रोजगार करा, राजकारण करून आमच्या डोक्यावर बसू नका – गोवर्धन देशमुख अरविंद जोशी मिरा – भाईंदर: मराठी एकीकरण समितीने आज आपला निवडणुकीसाठीचा वचननामा प्रसिद्ध केला. काही दिवसांवर आलेल्या…

मुरबाड तालुक्यातील तंटामुक्त गाव कमिट्या बाद

मुरबाड तालुक्यातील तंटामुक्त गाव कमिट्या बाद अवैध धंद्यांना गुन्हेगारी घालते साद. राजीव चंदने मुरबाड: गावातील वाद गावातच मिटला जावा आणि गाव शांततेकडुन समृद्धीकडे कसा जाईल यासाठी शासनाने तंटामुक्त गाव मोहीम…

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार दगडू सकपाळ यांचा शिवसेनेत प्रवेश

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार दगडू सकपाळ यांचा शिवसेनेत प्रवेश ठाणे: उबाठाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दगडू सकपाळ यांनी शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.…

तामिळनाडूतील पेरियार विद्यापिठाच्या कुलपतींकडून ऐरोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकाची प्रशंसा नवी मुंबई : महानगरपालिकेचे ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारक हे बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांना व्यापक अवकाश उपलब्ध करुन देणारे स्मारक म्हणून देशा-परदेशातील नामवंतांकडून तसेच नागरिकांकडून नावाजले जात आहे. स्मारकाला दररोज मोठया संख्येने नागरिक व पर्यटक भेट देत असतात. तामिळनाडू येथील पेरियार मणियम्मई विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेचे (अभिमत विद्यापीठ) कुलपती डॉ. के. वीरमणी यांनी स्मारकाला भेट देत येथील वैविध्यपूर्ण दालनांचे, त्याच्या मांडणीचे व त्यामध्ये जपलेल्या कलात्मकतेचे मनापासून कौतुक केले. स्मारकातील समृध्द ग्रंथालय हा अभ्यासकांसाठी माहिती व ज्ञानाचा खजिना असून येथील दुर्मीळ छायाचित्र संग्रहालयातील बाबासाहेबांचे जीवन चरित्र पाहून भारावून गेलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. महत्वाचे म्हणजे हे स्मारक अत्यंत विचारपूर्वक डिझाईन केलेले, सुव्यवस्थित आकर्षक मांडणी असलेले आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रभावी असल्याचे असल्याचे ते म्हणाले. त्यांनी असेही निरीक्षण नोंदविले की, हे स्मारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, घटनात्मक दृष्टी आणि सामाजिक न्यायाचा संदेश प्रत्येक माणसापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे महत्वाचे काम करते तसेच वर्तमानातील व भावी पिढ्यांना संवेदनशील बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतांना दिसते. या भेटीदरम्यान कुलपती डॉ. के. वीरमणी यांनी स्मारकाविषयीच्या भावना आणि सदिच्छा अंत:करणापासून असल्याचे सांगत यामधून आयुक्तांची दूरदृष्टी आणि समतेची मूल्ये जपण्याची वचनबद्धता दिसून येते असे मत व्यक्त केले. त्यांनी स्मारकासोबत संयुक्त उपक्रम आणि कार्यक्रमांद्वारे शैक्षणिक आणि विद्यापीठीय सहकार्य वाढवण्याची इच्छाही व्यक्त केली.

गंधर्व गुरुकुलचा ८वा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

गंधर्व गुरुकुलचा ८वा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा कल्याण : गंधर्व गुरुकुलचा नेत्र दीपक आठवा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अतिशय उत्साहात नुकताच पार पडला. विद्यार्थ्यांच्या कला, नृत्य, गायन व नाट्य सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली.  प्रत्येक सादरीकरणातून शिक्षकांनी मुलांवर घेतलेली मेहनत आणि तितक्याच तन्मयतेने विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा आणि रियाज याचा प्रत्यय सर्वांना आला.  ‘श्रीराम’ हा विषय घेऊन सादर करण्यात आलेल्या या स्नेहसंमेलनात श्रीराम हा धर्म नाही तर जीवनाच्या दृष्टिकोन आहे आणि ह्या नामाच्या जपाने होणारे शारीरिक आणि मानसिक फायदे पालक आणि मुलांपर्यंत पोहोचवण्यात गंधर्व गुरुकुल यशस्वी झाले. गजानन पंडीत गुरुजी यांच्या वैदिक मंत्रोच्चारात झालेली कार्यक्रमाची सुरुवात, डॉ प्रमोद नांदगावकर यांनी मोजक्या व मुद्देसूद शब्दात सादर केलेली गंधर्व गुरुकुलाची वाटचाल, प्रभू रामचंद्रांचा प्रेरणात्मक विषय घेऊन गंधर्व गुरुकुल शिक्षिका पूर्वा शिंपी यांचे मुद्देसूद व लाघवी सूत्रसंचालन, बैठक व्यवस्था, गायन, हार्मोनियम, कीबोर्ड, भरतनाट्यम, कथ्थक, वेस्टन डान्स, बासरी, तबला याचे लाईव्ह परफॉर्मन्स आणि त्याला लाभलेली  वादकांची उत्तम साथ लाभली. विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची उत्तम संधी मिळाली. पालकांनीही कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले. स्नेहसंमेलनामुळे सर्वांमध्ये एकोप्याची भावना निर्माण झाली. या कार्यक्रमामुळे शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यातील स्नेह अधिक दृढ झाला, अशी आणि अशाच अनेक प्रेरणादायी पोहच पावत्या पालकांनी दिल्या.  या कार्यक्रमाला कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रविंद्र घोडविंदे, पाटील, जोशी, शीला नांदगावकर, सुधा जानविलकर, खिसमतराव, संदीप रेडकर, शीतल रेडकर, नितीन नांदगावकर, भूमी नांदगावकर, डॉ सचिन सातपुते, सन्नी नागदेव, डॉ सिद्वेश्वर चामनारू, ऍड. विलास भारती, तुषार शिंपी, दामोदर धोरडे महाराज, प्रशांत दीक्षित, विवेकानंद झरे, प्रवीण वाणी, मुकुंद नावकर, अमर धनावडे अशा अनेक मान्यवर आणि मित्रमंडळींनी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवत मुलांचे कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व शिक्षक मयूर सावर्डेकर, सिद्धी सावर्डेकर, ओमकार लवांदे, प्रशांत सावंत, सुनील गोडांबे, कोमल गायकवाड पाटील, कोमल नागावेकर जाधव, अनंता तरणे, पराग वाणी आणि पालकांचे आभार मानून गंधर्व गुरुकुलच्या संचालिका वैदेही नांदगावकर यांनी कार्यक्रमाची सांगता केली.