Month: February 2026

भिडले, नडले आणि मग हरले..

भिडले, नडले आणि मग हरले.. नेपाळ अवघ्या ४ धावांनी इंग्लंडविरुध्द पराभूत स्वाती घोसाळकर मुंबई – अरबी समुद्रांच्या उसळणाऱ्या उंच लाटांपेक्षाही उत्तुंग उत्साहाने ओसंडून वाहणाऱ्या नेपाळच्या पाठीराख्यांच्या समोर नेपाळ बलाढ्य इंग्रजांना भिडले……

पवार राज्यसभेवर तर, ठाकरे विधानपरिषदेवर

पवार राज्यसभेवर तर,ठाकरे विधानपरिषदेवर सिध्देश शिगवण मुंबई : राज्याच्या राजकारणात दोन महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत. राज्याच्या राजकारणातील दोन बढे नेते पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात असणार आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार राज्यसभेतून…

प्रयागराजच्या त्रिवेणी संगमात अजित पवारांच्या अस्थींचे विसर्जन

प्रयागराजच्या त्रिवेणी संगमात अजित पवारांच्या अस्थींचे विसर्जन प्रयागराज : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या अस्थींचे प्रयागराज येथील त्रिवेणी संगमात विधिपूर्वक भावपुर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी धार्मिक…

पद्मश्री नामदेवराव ढसाळांच्या स्मृतीचा जागर

पद्मश्री नामदेवराव ढसाळांच्या स्मृतीचा जागर रमेश औताडे मुंबई : आपल्या धारधार शब्दांनी समाजातील विषमतेवर प्रहार करणाऱ्या विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळांच्या स्मृतीचा जागर पुण्यात करण्यात येणरा आहे. कुलस्वामिनी साहित्य परिषदतर्फे तिसरे विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव…

सावरकरांना भारत रत्न दिल्यास किताबाची प्रतिष्ठा वाढेल– भागवत

सावरकरांना भारत रत्न दिल्यास किताबाची प्रतिष्ठा वाढेल– भागवत संदीप चव्हाण मुंबई:  स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारत रत्न किताब दिल्यास या किताबाची प्रतिष्ठा वाढेल अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भावना व्यक्त…

अर्थसंकल्प क्रीडाक्षेत्राचा शिस्त क्रीडा संघटनांना !

नुकताच केंद्रातील अर्थ मंत्रालयांच्यावतीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात क्रीडा विकास आणि विविध खेळांच्या क्षेत्रात घोडदौड करण्यासाठी प्रयत्न सुरू करीत असल्याचे चित्र दाखविण्यात आलेले आहे. यंदाच्या…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा, बहुजन राजकारणाचा नवा पासवर्ड आहे

जेंव्हा मला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लिहिण्याची विनंती ज्यावेळी आली तेंव्हा एकूणच महाराष्ट्रच्या राजकारणाचा चाळीस वर्षांचा पट माझ्या समोर उभा राहील आणि त्यात एकनाथ शिंदे यांची पंचवीस…

एआयचा मोठा दणका

एआयचा मोठा दणका चार दिवसांपूर्वी जगातील आयटी आणि एआय उद्योगांना प्रचंड मोठा हादरा बसला. जगभरातील या क्षेत्रातील सर्वच बडया दादा कंपन्यांनी मिळून, त्यांच्या शेअर बाजारातील मूल्यामधून, २५ लाख कोटी रुपयांचे…

  पाटील बालमंदिर शाळेत संस्कृती, परंपरा व इतिहास प्रकल्पाचे भव्य आयोजन

पाटील बालमंदिर शाळेत संस्कृती, परंपरा व इतिहास प्रकल्पाचे भव्य आयोजन त्रिदल नॉलेज सिटी प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन कल्याण: मोहने येथील त्रिदल एज्युकेशन सोसायटीच्या पाटील बालमंदिर शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “संस्कृती, परंपरा आणि इतिहास” या विषयावर त्रिदल नॉलेज सिटी प्रकल्प हा एक महत्वपूर्ण शैक्षणिक प्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची ओळख निर्माण करणे, पारंपरिक मूल्यांचे महत्त्व समजावून सांगणे तसेच भारताच्या गौरवशाली इतिहासाची माहिती देणे हा होता. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषण, नाट्यछटा, गीत, वेशभूषा व चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून आपली कला सादर केली. विद्यार्थ्यांनी भारतीय सण-उत्सव, सामाजिक परंपरा तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या थोर व्यक्तिमत्त्वांच्या कार्यावर प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणातून संस्कृती जपण्याचा आणि इतिहासातून प्रेरणा घेण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्ये रुजतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. पाटील बालमंदिर शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटावा, हीच या कार्यक्रमाची खरी फलश्रुती ठरली. या कार्यक्रमासाठी केडीएमसीच्या महापौर  हर्षाली चौधरी थविल, कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक गणेश कोट, रोहन कोट, राहुल कोट, नगरसेविका  तेजश्री गायकवाड, माजी नगरसेवक दुर्योधन पाटील,  दशरथ तरे,सामाजिक कार्यकर्ते  सुरेश सोनार, जेसी कटारिया, रामा कांबळे, वैभव पाटील आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर त्रिदल एज्युकेशन सोसायटीचे  पदाधिकारी एस जे पाटील, जी एल पाटील, प्राचार्य बी एन पाटील, संध्या पाटील, सुदर्शन पाटील, आशिष पाटील, स्वप्निल पाटील, शाळेचे मुख्याध्यापक बी.पी. निचिते, व्हि.डी. चौथे, रुपाली   सावदेकर, लिजी नांबियार, वरिष्ठ शिक्षिका संगिता पाटील, वरिष्ठ शिक्षक विकास पाटील, समस्त शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

  प्रस्तावित वैनगंगा, नळगंगा प्रकल्पात दुष्काळी भागावरील अन्याय टाळा…

प्रस्तावित वैनगंगा, नळगंगा प्रकल्पात दुष्काळी भागावरील अन्याय टाळा… जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन यांची मागणी राजेंद्र साळसकर नागपूर : वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्पांतर्गत गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प ते नळगंगा प्रकल्प पाणी वहन करताना पहिल्या टप्प्यात गरज नसतानाही ८३६ दशलक्ष घनमीटर पाणी देण्यात आले आहे, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात तिथे दुष्काळी भाग असतानाही पाणी कमी देण्यात आले आहे. याकडे जल अभ्यासक आणि वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्पाची प्रथम मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रवीण महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या एका पत्रात त्यांनी याबाबत फेरविचार करून दुष्काळी भागावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी केली आहे. या पत्रात डॉ. महाजन यांनी नमूद केले आहे की, गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प वैनगंगा नदी ते नळगंगा प्रकल्प इथे १८०४.७८ दशलक्ष घनमीटर पाणी वहन प्रस्तावित आहे. हे पाणी विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सिंचन, घरगुती आणि औद्योगिक पाणीपुरवठ्यासाठी प्रस्तावित आहे. या योजनेमुळे ४०४२८१ हेक्टर क्षेत्रास सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहेत. ही विदर्भासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. गोसीखुर्द ते निम्न वर्धा प्रकल्प असा या योजनेतील पहिला टप्पा हा असून दुसरा टप्पा निम्न वर्धा प्रकल्प ते काटेपूर्णा प्रकल्प असा आहे. तिसरा टप्पा हा नियमबाह्य बाबी टाळण्यात याव्यात. आतापर्यंतच्या अनेक कागदपत्रांवरून आपल्या लक्षात येईल की, या प्रकल्पासाठी खूपच घाई करण्यात येत आहे आणि या प्रकल्पात रोज नवनवीन कागदपत्रांचा खेळ खेळला जात आहे. तिथे अनेक बाबी महत्त्वाच्या असून भविष्यात जेव्हा हा प्रकल्प महाराष्ट्रातून केंद्रीय जल आयोगाकडे जाईल, त्यावेळी या आकड्यांच्या खेळावर बोट ठेवले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही, अशी भीतीही या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे आणि असे होऊ नये यासाठी नियमात्मक बाबी स्विकाराव्या. नियमबाह्य बाबी टाळण्यात याव्या, अशी सूचनाही केली आहे. त्यामुळेच वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्पाला कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता हा प्रकल्प आपल्या मार्गदर्शनात पुढे जावा, अशी अपेक्षा या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.