Author: bittambatami.com

प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भरीव योगदान द्यावे – ग.दि.कुलथे

राजपत्रित अधिकारी महासंघ बळकट करण्यासाठी अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ हा राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांचे एक कुटुंब आहे. अधिकाऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून त्या मान्य करून घेण्यात महासंघाची मोठी भूमिका आहे. महासंघाने अधिकाऱ्यांसाठी मुंबईत कल्याण केंद्र बांधण्याचे काम हाती घेतले आहे. संघटना आणखी मजबूत करण्यासाठी व कल्याण केंद्रासाठी ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन महासंघाचे मार्गदर्शक, संस्थापक -अध्यक्ष व मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे यांनी येथे केले. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आणि ठाणे समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात उत्साहात संपन्न झाली. या बैठकीसाठी महासंघाचे मार्गदर्शक, संस्थापक -अध्यक्ष व मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, आरोग्य उपसंचालक डॉ.अशोक नांदापूरकर, डॉ.अविनाश भागवत, सुदाम टाव्हरे, दिगंबर सिरामे या मान्यवरांसह ठाणे समन्वय समिती अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुदाम परदेशी, कार्याध्यक्ष तथा जि.प. उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, उपाध्यक्ष इंजि. मोहन पवार, सरचिटणीस तथा जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सुनिल चव्हाण, जलसंधारण कार्यकारी अभियंता श्री.पंडित राठोड, जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री. रामेश्वर पाचे, जि.प.चे मुख्य वित्त व लेखाधिकारी वैजनाथ बुरडकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर, मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.नेताजी मुळीक, शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धीरज महांगडे, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. प्राची चिवटे, जिल्हा कोषागार अधिकारी सुरेंद्र राऊत, माजी सहायक संचालक श्रीकांत बाभूळगावकर यांच्यासह आरोग्य विभाग तसेच अन्य विभागांचे अधिकारी मोठया संख्येने आवर्जून उपस्थित आहेत. महासंघाचे मुख्य सल्लागार व मार्गदर्शक कुलथे यांनी महासंघाचे ठाणे जिल्ह्यात राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे समन्वय समितीच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामांचे कौतुक करून संघटना आणखी मजबूत होण्यासाठी सर्वच विभागाच्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन योगदान देण्यास सांगितले. महिला अधिकाऱ्यांसाठी बालसंगोपन रजा, सातवा वेतन आयोग, अधिकाऱ्यांच्या पाल्यांसाठी अनुकंपा तत्वावरील नोकरी यासह विविध मागण्या राज्य शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी महासंघ महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. महासंघाने कल्याण केंद्र बांधण्याचे स्वप्न पाहिले असून त्याचे काम बांद्रा येथील जागेत सुरू झाले आहे. या कल्याण केंद्रासाठी निधी जमा करण्यात येत असून सर्व अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने यात योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले. महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने आजपर्यंत केलेल्या लढ्यांची माहिती दिली. महासंघाच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाप्रमाणेच वेतन आयोग, महागाई भत्ता, बालसंगोपन रजा, खंड दोन नुसार वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे, अधिकाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीविरुद्ध कायदा तयार करणे, नवीन निवृत्ती वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी जुनी निवृत्ती योजना लागू करणे अशा अनेक मागण्या यशस्वीपणे मान्य झाल्या आहेत. महासंघामुळे शासकीय अधिकाऱ्यांना लाभ होत आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन महासंघाची शक्ती आणखी वाढविण्यासाठी हातभार लावावा. यासाठी जिल्हास्तरावरील समन्वय समिती मजबूत होणे आवश्यक असल्याचे सांगितले. महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांनीही महासंघाच्या वतीने आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली. महासंघाच्या पाठपुराव्यामुळेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून अनेक सुविधा मिळाल्याचे सांगितले. यापुढील काळातही महासंघाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या मागण्यांसाठी लढा देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कल्याण केंद्राचा निधी जमा करण्यासाठी महासंघाच्या वतीने अँप विकसित करण्यात आला असून या अॅपद्वारे सदस्यांना निधी जमा करून त्याची पावती घेता येणार आहे. जास्तीत जास्त सदस्यांनी या अॅपद्वारे ऑनलाईन निधी द्यावा, असे आवाहन श्री. भाटकर व श्री. सानप यांनी जिल्ह्यातील सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांना केले.ठाणे जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष सुदाम परदेशी व कार्याध्यक्ष अविनाश सातपुते यांनी महासंघाचे काम आणखी वाढविण्यासाठी व संघटन चळवळ मजबूत करण्यासाठी तसेच महासंघाच्या कल्याण केंद्राच्या निधीसाठी जिल्हा समन्वय समिती भरीव योगदान देईल, असे आश्वासन दिले. ठाणे समन्वय समितीचे सरचिटणीस मनोज शिवाजी सानप यांनी प्रास्ताविकात जिल्हा समन्वय समितीच्या कामकाजाची व बैठक आयोजनामागील भूमिका मांडली. उपाध्यक्ष मोहन पवार यांनी सूत्रसंचालन केले.जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी ११ हजार रुपयांचा निधी श्री. कुलथे यांच्याकडे सुपूर्द केला तर श्री. सानप यांनी ऑनलाईन ११ हजार रुपये जमा करून आपले योगदान तात्काळ दिले. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीनंतर महासंघाचे मुख्य सल्लागार श्री. ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर यांच्यासह जिल्हा समन्वय समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. कुलथे यांनी जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांना महासंघाच्या वतीने प्रकाशित केलेली वार्षिक डिरेक्टरी – २०२४ भेट दिली.

निष्काम भावनेतून मदत करणारा कर्मचारी हेमंत सपकाळ

ठाणे : जगात चांगली माणसे  वावरत आहेत म्हणून  हे जग चालत आहे.त्याचे जवलंत उदाहरण म्हणजे ठाणे जिल्हा सामान्य रुगणालयातील कर्मचारी हेमंत सपकाळ हे आहेत.रुग्णालयात येणाऱ्या गरजूंना निष्काम भावनेतून मदत करत असतात ही त्याची ओळख आहे. हे काम इथेच न थांबवता प्रवास येता – जाता गरजूंना मदत करत असतात. दि.24 एप्रिल 2024 रोजी श्रीम. सुलोचना गायकवाड वय 72 व 12 वर्षीय नातू सोबत अंबरनाथ वरून पुण्याला निघाले होते.दोघे अंबरनाथ वरून लोकन ने कर्जत स्टेशनला पोहोचले. पुण्याला जाण्यासाठी कोणार्क एक्सप्रेस गाडीची वाट बघत होते. ट्रेनमध्ये चढताना त्यांची चुकून कपड्याची बॅग प्लॅटफॉर्म न. 1 ला विसरली. ट्रेन लोणावळ्याला पोहचत असताना त्या आजीच्या लक्षात येते की, एक कपड्याची बॅग दिसत नाही. ती ट्रेन मध्ये इतरत्र शोधत होती. त्यावेळेस आजीच्या बाजूच्या सीट वर बसलेले हेमंत सपकाळ यांच्या लक्षात ही बाब आली असता, त्यांनी कर्जत रेल्वे पोलिस आर. पी. एफ. श्रीम. वर्षा गुंजाळ यांना भ्रमध्वनीद्वारे संपर्क केला. सर्व घटना त्यांनी वर्षा गुंजाळ  यांना सांगितली. त्यांनी जळद गंतीने  त्याचे सहकारी होमागार्ड  कर्मचारी यांच्या मदतीने प्लॅटफॉर्म न. 1 वरून ती बॅग शोधून काढली. बॅगचा फोटो पाठवला असता फोनवरुन ती बॅग त्याच आजींचीच आहे याची शहानिशा केली. त्यानंतर त्यांनी स्वतः ती बॅग  सायं. 5 वा कर्जत वरून  नांदेड पनवेल गाडीने घेऊन आल्या तोपर्यंत त्या आजींना श्री. सपकाळ यांच्या सांगण्यावरून लोणावळा स्टेशनला वाट पाहण्यास सांगितलेले होते. काही वेळा नंतर नांदेड पनवेल गाडी साय. 5.45 वा लोणावळा स्टेशन ला आली व आर. पी. एफ. श्रीम. वर्षा मुंजाळ मॅडम नी त्या आजींना फोन करून गाडीमध्ये ती बॅग परत केली. ती बॅग मिळताच त्या आजीच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले व तीने दोघांचे पण मनापासून धन्यवाद मानले. श्री. हेमंत सकपाळ  व वर्षा गुंजाळ  यांनी केलेल्या मदतीचा सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचे काम पूर्णत्वास

आदिवासी क्रांती सेनेच्या लढ्याला यश ठाणे – भारतीय स्वांतत्र्य लढ्यातील योद्धा, आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या ठाणे कारागृहातील स्मारकाचा प्रश्न अखेरीस मार्गी लागला आहे. आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांच्या पाठपुराव्यामुळे हे स्मारक पूर्णत्वास आले असून येत्या दोन मे रोजी या स्मारकात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे फाशीची शिक्षा ठोठावलेल्या आदिवासी समाजातील महान क्रांतीकारक आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाची दुरवस्था झाली होती.  हे  स्मारक सुटसुटीत जागेत स्थलांतर करण्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारे क्रांतिवीर  राघोजी भांगरे यांना दि.2 मे 1848 रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे ब्रिटिशांनी फाशी दिली होती. ह्या महान क्रांतिवीरांच्या स्मृती जागृत करण्यासाठी स्मारक उभारण्यात आले होते. परंतु अनेक वर्षांपासून ह्या स्मारकाची दुरवस्था झाल्याने ते अडगळीत पडले होते. या स्मारकाचे नुतनीकरण करण्यात यावे,  यासाठी महाराष्ट्र आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील भांगरे, आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन या स्मारकाचे नूतनीकरण करावे,  अशी मागणी केली होती. त्यानंतर  तत्कालीन गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी स्मारक परिसराची पाहणी करून तत्कालीन कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव यांना  हे स्मारक सुटसुटीत जागेत स्थलांतरीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हे स्मारक सामान्य नागरिकांसाठी खुले ठेवून ठाणे कारागृहातील स्वांतत्र्य लढ्याचा इतिहास लिखीत स्वरूपात फलकावर लावण्यात याव्यात , अशी मागणी अनिल भांगले यांनी केली होती. अखेरीस आदिवासी क्रांती सेना, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रतिष्ठान,व आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले यांनी राघोजी भांगरे यांचे स्मारक उभारण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून अखेर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या नुतनीकरणास मंजुरी मिळाली. त्यानुसार या स्मारकाचे बांधकाम सुरू झाले होते. आता हे काम पूर्णत्वास आले असून येत्या २ मे २०२४ रोजी राघोजी भांगरे यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी क्रांतिवीर राघोजी भांगरे यांना याच नूतनीकृत स्मारकात अभिवादन करण्यात येणार आहे, असे आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले यांनी सांगितले.

एकही गाव पाण्यावाचून वंचीत राहणार नाही – छायादेवी शिसोदे

ठाणे : सापगांव येथे वॉटर फिंडीग सेंटर मधून भरण्यात येणारे टँकर मधील पाण्याची शुध्दता त्यामध्ये असलेले टी. सी. एलचे प्रमाणाबाबत व पाण्याची प्रत्यक्ष पाहणी करताना  पाणी टंचाई काळात पाण्यापासून एकही नागरीक वंचीत राहणार नाही अशा सक्त सुचना .जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी शहापूर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपचांयत सारमाळ व बोरशेती येथे भेट देऊन राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान योजनेंतर्गत सुरु असलेल्या नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकामाची पाहणी केली. पंचायत समिती शहापूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत पंचायत) प्रमोद काळे, गट विकास अधिकारी पंचायत समिती शहापूर भास्कर रेंगडे, सहा. गट विकास अधिकारी पंचायत समिती शहापूर राजू भोसले तसेच आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक उपस्थीत होते. ग्रामपंचायत गोठेघर येथे भेट देऊन ग्रामपंचायतीचे कामकाजाची पाहणी केली, त्यानंतर सापगांव नदीवर वॉटर फिडीग सेंटर येथे भेट देऊन कामकाजाविषयी आढावा घेतला. सापगांव येथे वॉटर फिंडीग सेंटर मधून भरण्यात येणारे टँकर मधील पाण्याची शुध्दता त्यामध्ये असलेले टी. सी. एलचे प्रमाणाबाबत व पाण्याची प्रत्यक्ष पाहणी केली. पाणी टंचाई काळात पाण्यापासून एकही नागरीक वंचीत राहणार नाही, याबाबत सक्त सुचना देण्यात आल्या. टॅंकर चालकाच्या कामाविषयी चर्चा करण्यात आली तसेच पाणी टंचाई बाबत विस्तृत आढावा घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्र शेणवा येथे भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. तसेच शेणवा येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामाची पाहणी केली. ग्रामपंचायत बेडीसगांव येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान योजनेंतर्गत नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकामाची पाहणी केली.

जाहीरनाम्यांचा लेखाजोखा

नोंद तन्मय कानिटकर भाजपा आणि काँग्रेस या देशातील दोन महत्त्वाच्या आणि ताकदवान राजकीय पक्षांनी आपापला जाहीरनामा मांडून सत्तेत आल्यास आपली दिशा काय असेल, हे स्पष्ट केले आहे. त्यामध्ये भाजपाने गेल्या…

लोकशाही जपण्यासाठी मतदान केलेच पाहिजे

विशेष प्रविण डोंगरदिवे भारताच्या स्वातंत्र्यानंतर सर्व भारतीय महिला आणि पुरुष दोघांना एकाचवेळी मतदानाचा हक्क मिळाला.भारतीय लोकशाहीतील ही गोष्ट युरोपियन आणि अमेरिकन देशांपेक्षा अधिक प्रगल्भ मानली गेली. कारण युरोपियन-अमेरिकन देशात महिला,…

मोदींनी नेमके केलं काय?

ज्येष्ठ राजकीय भाष्यकार व लेखिका तवलीन सिंग यांचा समावेश इंग्रजी पत्रकारितेच्या आघाडीच्या संपादक पत्रकारांमध्ये करावा लागेल. गेली चाळीस एक वर्षे त्यांचे भेदक राजकीय भाष्य देशात वाचले जाते. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या…

बदलापूर, अंबरनाथमध्ये शुक्रवार, शनिवारी ‘पाणीबाणी’

तातडीच्या कामांसाठी बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र १२ तास बंद बदलापूर: बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीवरील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रात येत्या शुक्रवारी नवीन पंपिंग यंत्रणा आणि विद्युत पुरवठा सुधारणा करण्याच्या कामासाठी…

पत्राचाळवासीयांना खुशखबर !

जुलैमध्ये घरांचा ताबा मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसित इमारतींचे काम अंतिम टप्प्यात आहे. या इमारतींचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम मे अखेर पूर्ण करण्याचे…