Author: bittambatami.com

अकोल्यात अमित शहांनी दिला ‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा

अकोला : राज्य निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना गीतातून जय भवानी शब्द हटवण्याची नोटीस बजावली असतानाच आज अकोल्यात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा यांनी जय भवानी, जय शिवाजीचा…

मुंबई उपनगर जिल्ह्यात पोर्टलवर ७९१४ तक्रारींची दखल

लोकसभा निवडणूक 2024  जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती मुंबई  : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने…

मुंबई उपनगर जिल्हा: मीडिया सेल मुंबई उपनगर जिल्हा माध्यम कक्षास माध्यम प्रतिनिधींनी दिली भेट

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या माध्यम कक्ष आणि माध्यम प्रमाणन व सनियंत्रण कक्षास विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनी भेट देवून पाहणी केली.

निवडणूक यंत्रणेची आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर नजर

 साडेपाचशेहून अधिक पथकांचे 24×7 काम सुरु जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती मुंबई  : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा 16 मार्च 2024 रोजी करण्यात आली. त्यानंतर तात्काळ आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी…

मीडिया सेल सी-व्हिजिल ॲपवरील तक्रारींची तत्काळ घेतली जातेय दखल

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने सी –व्हिजिल हे (cVIGIL) हे नवीन ॲप सुरू केले आहे. या ॲपच्या माध्यमातून मुंबई उपनगर जिल्ह्यात 16 मार्चपासून ते आतापर्यंत 245 तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. यातील 135 तक्रारींचा भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या मुदतीत निपटारा करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात घेण्याचे भारत निवडणूक आयोगाचे मुख्य उद्द‍िष्ट आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना थेट ऑनलाईन करता येते. या ॲपमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तक्रारी स्वीकारणे, या तक्रारीवर अवघ्या 100 मिनिटांत कार्यवाही करणे अपेक्षित असते. या पद्धतीने निवडणूक यंत्रणेने आणि सी-व्हिजिल कक्षाने कार्यवाही करून 135 तक्रारींचे निवारण केले. उर्वरित 183 तक्रारींचा मुदतीत निपटारा करण्यात आला. जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तेथील छायाचित्र काढावे आणि तत्काळ सी-व्हिजिल ॲपवर अपलोड करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे. सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त तक्रारींचे स्वरूप अंधेरी पूर्व-16, अंधेरी पश्चिम-8, अणूशक्तीनगर-7, भांडूप पश्चिम-5, बोरीवली-13, चांदिवली-26, चारकोप-14, चेंबुर-14, दहिसर-8, दिंडोशी-5, घाटकोपर पूर्व-3, घाटकोपर पश्चिम-2, गोरेगाव-10, जोगेश्वरी पूर्व-5, कलिना-8, कांदिवली पूर्व-8, कुर्ला-5, मागठाणे-24, मालाड पश्चिम -11, मानखुर्द शिवाजीनगर-1, मुलुंड -16, वांद्रे पूर्व-7, वांद्रे पश्चिम-8, वर्सोवा-3, विक्रोळी-16, विलेपार्ले-5 अशा एकुण 245 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

‘निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे’

निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांचे आवाहन मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करून जिल्हा प्रशासनाला राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन कोकण विभागाचे अपर विभागीय आयुक्त तथा 30-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांनी केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवारांनी पालन करावयाचे नियमांसह इतर आवश्यक बाबींची माहिती देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली नोंदणीकृत राष्ट्रीय व राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बप्पासाहेब थोरात, समन्वय अधिकारी तुषार मठकर, वरिष्ठ लेखाधिकारी राजू रामनानी, उपसंचालक (वित्त) चित्रलेखा खातू यांच्यासह विविध नोंदणीकृत राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रीया आणि व्यवस्थापनाबद्दल माहिती देताना श्री.पानसरे म्हणाले, 30-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाची निवडणूक पाचव्या टप्प्यात होत असून 26 एप्रिल रोजी निवडणूकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्या दिवसापासून नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यात येतील. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, निवडणूक खर्च नोंदी यासह इतर महत्वाच्या बाबींविषयी यावेळी श्री. पानसरे यांनी मार्गदर्शन केले. भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेल्या निर्देशांचे आणि आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे. नामनिर्देशन पत्रे भरण्यापासून प्रचार विषयक नियम, निवडणूक खर्च सादर करण्याबाबतचे नियम आदी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री.थोरात यांनी टपाल मतपत्रिकाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. श्रीमती खातू यांनी उमेदवारांनी निवडणूक खर्चाविषयी ठेवण्याच्या नोंदी आणि त्याबाबतच्या नियमांविषयी माहिती दिली.

उमेदवारांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे राजकीय वाहन कोंडी

कल्याण : कल्याण, डोंबिवलीत मागील काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीतील उमेदवार, त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते वाहने घेऊन शहरांमध्ये प्रचार करत आहेत. या प्रचारासाठी उमेदवार, पदाधिकाऱ्यांकडून अधिक संख्येने वाहने वापरली जात आहेत. ही वाहने कार्यक्रम स्थळी, प्रचार कार्यासाठी शहरात वाट्टेल तशी उभी करण्यात येत असल्याने कल्याण, डोंबिवलीत काही दिवसांपासून राजकीय कोंडी सुरू आहे. या राजकीय वाहनांच्या कोंडीने वाहतूक पोलीसही हैराण आहेत. कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाग आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवार आणि त्यांच्यामागे प्रचारासाठी ३० ते ४० वाहने असा ताफा दररोज शहराच्या विविध भागातून मतदार, ज्येष्ठ व्यक्तिमत्व यांच्या भेटीगाठीसाठी फिरत आहेत. ही वाहने उमेदवार, नेता ज्या ठिकाणी थांंबेल तेथे रस्त्याच्या कडेला थांंबवली जातात. उमेदवार, नेता तेथून पुढे जात नाही तोपर्यंत वाहनेही जागीच खोळंंबून राहतात. या कोंडीत मग मुख्य रस्त्यावरील प्रवासी वाहतुकीची रिक्षा, बस, खासगी वाहने अडकून पडतात. मागील काही दिवसांपासून कल्याण, भिवंडी, डोंबिवली शहरांमध्ये हे राजकीय वाहन कोंडीचे प्रकार सुरू असल्याने मतदान करू पण तुमचा वाहनांमधील प्रचार आवरा, असे नागरिक संतप्त होऊन बोलत आहेत. भिवंडी, कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार एकावेळी ३० हून अधिक वाहने घेऊन शहरांमध्ये प्रचारासाठी फिरत आहेत. ही वाहने प्रवाशांची मोठी डोकेदुखी झाली आहे. डोंबिवलीत सोमवारी एक उमेदवार प्रचार कार्यासाठी फिरत होता. पाठीमागे २५ हून अधिक वाहने होती. ही वाहने डोंबिवली पश्चिमेत भावे सभागृहाजवळ एका ज्येष्ठ व्यक्तीला भेटण्यासाठी थांबली, त्याचवेळी पाठीमागच्या सर्व गाड्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा उभ्या करण्यात आल्या. यावेळी याभागात अर्धा तास वाहन कोंडी झाली होती. उमेदवारांनी किमान संंध्याकाळच्या वेळेत प्रचारासाठी शहरात वाहने घेऊन फिरू नये अशी प्रवाशांंची मागणी आहे. नोकरदार वर्ग या वेळेत कामावरून घरी परतत असतो. त्याचवेळी प्रचाराची वाहने रस्त्यावर आली की अर्धा ते एक तास वाहने कोंडीत अडकतात, अशा तक्रारी आहेत. आम्ही या परिस्थितीला काही करू शकत नाही. आहे त्या परिस्थितीमधून मार्ग काढून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो, असे एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

आदर्श आचारसंहिताभंगाविषयक तक्रारी निवारणासाठी नियंत्रण कक्ष-डॉ. संदिपान सानप

अशोक गायकवाड रायगड : आदर्श आचारसंहिताभंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा समिती प्रमुख आदर्श आचार संहिता समिती ३२- रायगड लोकसभा मतदार संघ डॉ.संदिपान सानप यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि.१६ मार्च २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्याल आली आहे. ३२- रायगड /३३ मावळ लोकसभा मतदार संघामधील विधानसभा मतदार संघामध्ये नागरिकांकडून येणाच्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी पुढीलप्रमाणे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून या नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. विधानसभा मतदार संघ- १८८ पनवेल, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२२- २७४५२३९९, १८९- कर्जत, नियंत्रण कक्ष क्रमांक ९३७३९२२९०९, १९० -उरण, नियंत्रण कक्ष क्रमांक ९८९२५३८४०९, १९१-पेण, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२१४३. २५३०३२, १९२- अलिबाग, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२१४१- २२२०४२, १९३- श्रीवर्धन, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२१४७- २२२२२६/ ७३४९५७९१५८, १९४ -महाड, नियंत्रण कक्ष क्रमांक ७३८५८१५२१०, २६3- दापोली, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२३५२- २२६२४८,२६४- गुहागर, नियंत्रण कक्ष क्रमांक ०२३५६- २६४८८८ त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, रायगड यांचे कार्यालयात निवडणूकीसंदर्भात नागरिकांकडून येणाऱ्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा जिल्हा संपर्क केंद्र क्र. १९५० असा आहे. तसेच नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. ०२१४१- २२२०९७ हा आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा समिती प्रमुख आदर्श आचार संहिता समिती ३२- रायगड लोकसभा मतदार संघ डॉ.संदिपान सानप यांनी दिली आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी काँग्रेसच्या न्यायपत्राच्या एक हजार प्रती पोस्टाने पाठवणार’!

रमेश औताडे मुंबई :मोदी सरकारच्या मनमानी कारभाराच्या विरोधात काँग्रेसने रान पेटवले असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जर सत्तेत  आली तर सामान्य जनतेसाठी काय करणार आहे याची माहिती असलेली 50 पानाच्या एक हजार पुस्तिका मुंबई काँगेस मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष कचरू यादव यांनी दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयाच्या पत्यावर पोस्टाने पाठवणार असल्याची माहिती दिली. मंगळवारी दुपारी मुंबई विभागीय कार्यालयासमोर मागासवर्गीय सेल चे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोदी सरकाने केलेल्या मनमानी कारभारविरोधात निदर्शने करत या 50 पानी न्यायपत्राच्या  प्रती दाखवत राहुल गांधी संघर्ष करो हम तुम्हारे..काचरू यादव संघर्ष करो हम तूम्हारे साथ हे.. अशा घोषणा दिल्या. वाढलेली महागाई , शिक्षणाचा विभागाचा झालेला फज्जा , शेतकरी आत्महत्या , बेरोजगारी , महिलांची असुरक्षितता ,धर्माच्या नावाने सुरू असलेला मनमानी प्रकार , पत्रकारांची मुस्कटदाबी, कामगार आंदोलने, डबघाईस आलेले उद्योग व काही मोजकेच भांडवलदार यांना दिलेली साथ, पर्यावरणाकडे होत असलेले दुर्लक्ष या व इतर महत्वाच्या मुद्यावर मोदी सरकारने देश कसा मागे नेऊन ठेवला आहे व काँग्रेस च्या न्याय पत्रात जनतेसाठी काय असेल याचा सर्व लेखा जोखा या 50 पानी पुस्तिकेत दिला आहे. असे कचरू यादव यांनी यावेळी सांगितले. सामान्य माणसाला न्याय देत असताना त्यांच्यावर अन्याय  कसा होईल यासाठी भाजपा सरकारने काम केले आहे. पर्यावरण बिघडले असताना उन्हाचे चटके बसत आहेत आणि त्यात महागाईचे चटके बसू लागल्याने जनता होरपळून निघत आहे. राहुल गांधी यांनी देशभर पायी यात्रा काढत जनतेची मते जाणून घेतली जनता त्रस्त झाली आहे. आगामी निवडणुकीत जनता भाजपला पाडल्याशिवाय राहणार नाही असे काचरू यादव यांनी यावेळी सांगितले.

शुक्रवारी ठाण्याच्या काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार, २६ एप्रिल रोजी स. ९ ते शनिवार, २७ एप्रिल रोजी स. ९ वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे. या काळात ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतील पाणी पुरवठा सुरू राहणार आहे. या शट डाऊनच्या काळात, शुक्रवार, २६ एप्रिलला सकाळी ९ ते शुक्रवार रात्री ९ या वेळेत घोडबंदर रोड, साकेत नवीन पाईप लाईन या भागाचा पाणीपुरवठा बंद राहील. तर, शुक्रवार रात्री ९ ते शनिवार, २७ एप्रिलला सकाळी ९ या वेळेत ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, समता नगर, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा व कळवा येथील काही भाग यांचा पाणी पुरवठा बंद राहील. या शट डाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. या काळात नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.