Author: bittambatami.com

संविधान बदलू देणार नाही – उल्का महाजन

रमेश औताडे  मुंबई : सध्या जे देशभरात मनमानी राजकारण सुरू आहे ते पाहता संविधान बदलण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे सामान्य माणसाला भविष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे.भाजपला ४००…

आगरी-कोळी समाजात उल्लेखनीय काम करणार्‍या मान्यवरांचा सत्कार

ठाणे : चैत्र नवरात्र उत्सवात पहिल्या दिवशी देवीची स्थापना करून आरती नंतर संतोष चौधरी प्रस्तुत “दादुस आला रे” या कोळीगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून देवीचे दर्शन करून या कोळीगीत कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमामध्ये ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर क्षेत्रातील आगरी व कोळी समाजातील उल्लेखनीय काम करणार्‍या मान्यवरांचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले. सत्कार मूर्ती ठाण्यातील श्री. मनीष लीला चंद्रकांत वैती, श्री. दिलीप वसंत नाखवा, श्री. संदीप प्रभाकर कोळी, आनंदिता कुणाल कोळी, चैताली सुरेश नाखवा, डॉ. अंकित संतोष कोळी, सौ. शर्मिला दिनेश पाटील, सौ. करिष्मा केविन कोळी- नाखवा, श्री. अनंत पांडुरंग पाटील इत्यादी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी असलेल्या दादुस यांना सन्मानित केले.

मतदान यंत्र असलेल्या ठिकाणी २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवा-किसन जावळे

अशोक गायकवाड रायगड : मतदान यंत्रे ठेवण्यासाठीची व्यवस्था, सीसीटिव्ही यंत्रणा, अग्निशमन व्यवस्था यांची बारकाईने चाचणी करण्यात यावी, तसेच त्याठिकाणी २४ तास आवश्यक पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करावी तसेच या स्ट्राँग रूमच्या सुरक्षेची योग्य खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिले. रायगड लोकसभा मतदारसंघा अंतर्गत महाड, दापोली आणि गुहागर विधानसभा मतदार संघातील स्ट्राँग रुमला भेट देऊन जिल्हाधिकाऱी किसन जावळे यांनी पाहणी केली. जावळे यांनी महाड, दापोली, गुहागर, पेण या विधानसभा मतदार संघात विविध मतदान केंद्रभेटी देऊन पाहणी केली. तसेच मतदान साहित्य वाटप व स्वीकृती केंद्र आणि महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूमची पाहणी केली. तसेच स्टाँगरूम व्यवस्थापन, नियोजनाबाबत आढावा घेतला.मतदान यंत्रे ठेवण्यासाठीची व्यवस्था, सीसीटिव्ही यंत्रणा, अग्निशमन व्यवस्था यांची बारकाईने चाचणी करण्यात यावी, तसेच त्याठिकाणी २४ तास आवश्यक पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करावी निवडणुकीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्याकडे लक्ष द्यावे. कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्त आराखडा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात यावा. मतदान जनजागृती, अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबतही निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महाड डॉ. ज्ञानेश्वर बाणापुरे, माणगाव तहसीलदार विकास गारुडकर, महेश शितोळे, पोलीस निरीक्षक तडवी यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

९० हून अधिक लहान- मोठ्या नाल्यांमधील गाळ, माती, कचरा काढून सफाई – डॉ. पंकज पाटील

अशोक गायकवाड खोपोली : सर्व मोठी गटारे, जवळपास ९० हून अधिक लहान- मोठ्या नाल्यांमधील गाळ, माती, कचरा काढून सफाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी दिली.  अतिवृष्टीमुळे दरवर्षी शहरातील मुख्य गटारे, नाले तुडूंब भरत असल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असते. यावर्षी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नगर परिषदेमार्फत नालेसफाईच्या कामांना १ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. सर्व मोठी गटारे, जवळपास ९० हून अधिक लहान- मोठ्या नाल्यांमधील गाळ, माती, कचरा काढून सफाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी दिली.नगर परिषदेच्या आरोग्य आणि बांधकाम विभागाच्या माध्यमातून विविध प्रभागातील लहान-मोठी गटारे, नाले यांच्या सफाईचे काम दरवर्षी हाती घेतले जाते. यंदाही भानवज-शास्त्रीनगर येथून येणाऱ्या नाल्यामुळे भाऊ कुंभार चाळ, गुलशन अपार्टमेंट, विणानगर परिसर, शिळफाटा येथील डीसीनगर आदी भागांमध्ये पावसाचे पाणी सखलभागात साचून पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. या भागात असलेले नाले आणिमोठी गटारे यातील गाळ काडून पाण्याचा निचरा होण्यासाठी काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी ५० कर्मचारी काम करीत आहेत. छोटे नाल्यांच्या सफाईसाठी मनुष्यबळाचा,तर मोठ्या नाल्यांमध्ये जेसीबी, पोकलेन, डंपरचा वापर करून कचरा, गाळ उचलला जाणार आहे. साफसफाईच्या पाहणीनंतर मुख्याधिकारी डॉ. पाटील यांनी आरोग्य विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.मोठ्या नाल्यांमध्ये जेसीबी, पोकलेन,डंपरचा वापर करून कचरा, गाळ उचलला जाणार आहे. साफसफाईच्या पाहणीनंतर मुख्याधिकारी डॉ. पाटील यांनी आरोग्य विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

नफायुक्त वाढ हे टीजेएसबी बॅंकेचे ब्रिद आहे, भरोसेका बॅंक, भविष्यका बॅंक म्हणून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरेल !

टीजेएसबी बॅकेचा व्यवसाय २५ हजार कोटींवर जाईल – शरद गांगल अनिल ठाणेकर ठाणे : दोन ते तीन वर्षांत टीजेएसबी बॅंकेचा व्यवसाय २५ हजार कोटींवर जाईल, नफायुक्त वाढ हे टीजेएसबी बॅंकेचे ब्रिद आहे तेच आपले लक्ष आहे, तेच आपण फॉलो करत आहोत. टीजेएसबी बॅंक भरोसेका बॅंक, भविष्यका बॅंक म्हणून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरेल, अशी अपेक्षा टीजेएसबी बॅंकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. यावेळी बॅंकेचे उपाध्यक्ष वैभव सिंघवी, व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्बलक्ष्मी शिराली, तसेच सर्व संचालक, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सर्व सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कुठल्यातरी वाढीसाठी वाढ करायची आणि कुठला तरी मोठा नंबर दाखविण्यासाठी टीजेएसबी बॅंक कधीही काही करत नाही, आम्ही नेहमी हे पाहत असतो की, देशाची इकॉनॉमी जेव्हा वाढते त्याच्या एक दोन टक्के आपण इकडे तिकडे वाढलो की आपण सुरक्षित हातात आहोत. ठेविदारांचा इंटरेस्ट हा सर्वात महत्वाचा आहे. इथे सगळे मध्यमवर्गीय व गरिब लोकांचे पैसे आहेत. आपले लक्ष नफायुक्त वाढ हे आपले ब्रिद आहे तेच आपण फाॅलो करत आहोत. दोन ते तीन वर्षांत टीजेएसबी बॅंकेचा व्यवसाय २५ हजार कोटींवर जाईल अशी अपेक्षा आहे. टीजेएसबी बॅंक भरोसेका बॅंक, भविष्यका बॅंक म्हणून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरेल. वर्षभरात सव्वा दोनशे कोटीचे गृहकर्ज वाटप करण्यात आले. आरबीआयने रिअल इस्टेट कर्जावर रिस्टीक्शन असतात. जास्तीत जास्त वैयक्तिक गृहकर्ज देण्याचा आपला प्रयत्न असतो. पण त्याला १० टक्केची मर्यादा आहे. ही मर्यादा आपण फेब्रुवारी-मार्च मध्येच पूर्ण करतो.आपल्या गृहकर्जाचा व्याजदर सर्वात कमी आहे. गेल्यावर्षी २०९५४ कोटींचा व्यवसाय झाला तो यावर्षी २२४६३ कोटीचा झालेला आहे. गेल्यावर्षी डिपॉझिट १३७४३ कोटी होते ते यावर्षी १४५८८ कोटी झाले आहे. ढोबळ नफा २९१ कोटी होता तो २८० कोटी झालेला आहे. नेट प्राॅफिट १७३ कोटीवरुन २१६ कोटी झालेला आहे. स्वनिधी १५४९ कोटीवरुन १७१९ कोटी झालेले आहे. बँकेचे आरोग्य पहाणारा स्वनिधीचे शेअर कॅपिटल १०९ कोटी आहे.तर स्वनिधी १७१९ कोटीवर गेले आहे. रिझर्व्ह बॅंकेचे बारीक लक्ष असते तो कॅपिटल ॲडक्विन्सी रेषो, बॅंकेचे आरोग्याचे प्रमाण १६. ९३ टक्क्यावरुन १७.५७ टक्क्यांवर आलेले आहे.हे ऑडिटेट फायनान्शियल रिझल्ट्स आहेत. हा बॅंकेचा आर्थिक ताळेबंद आहे. रिझर्व्ह बॅंकेने फिनान्शली स्ट्राँग ॲण्ड वेलमॅनेज बॅंक म्हणून दर्जा दिल्याने ऑटोमोटिव्ह रुटने बॅंक शाखा आपण उघडू शकतो. यानुसार पहिली शाखा गोवा येथे तर उरलेल्या चार शाखांपैकी तीन एप्रिल शेवटपर्यंत उघडण्यात येतील तर एक शाखा जून मध्ये उघडण्यात येईल. पहिल्या तिमाहीत चार शाखा उघडण्यात येणार आहेत. यामुळे आपण पाच शाखांपैकी दोन शाखा कर्जत (रायगड) आणि वाळूज छत्रपती संभाजी नगरव येथे शाखा उघडण्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्य़ातील मोशी व बारामती येथे एक नागपूर येथे शाखा उघडण्यात येतील. कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या मदतीसाठी एटीएम टाकलेले आहे. नवीन तीन शाखांपैकी चौथी ठाणे शहरात घोडबंदर आनंद नगर येथे उघडण्यात येणार आहे. बॅंकेची वाढ अशीच चालू राहिल. बॅकेच्या मजबूतीसाठी काही भविष्यातील तरतुदी करुन ठेवलेल्या आहेत. ग्राॅस एनपीए कमी तर नेट प्राॅफिट वाढलेला आहे. बॅंक च्या १३९ शाखा, महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश येथे कार्यरत आहेत.उत्तर भारतातील नोएडा सारख्या परिसरात खूप मोठ्याप्रमाणात व्यवसायवृद्धी होत आहे. यामुळे जिथे बिझनेस असेल तिथे आम्ही जाणार आहोत. पूर्ण उत्तर भारत आमच्या नियोजनात आहे, असे मत टीजेएसबी बॅंकेचे अध्यक्ष शरद गांगल यांधी व्यक्त केले. चौकट टीजेएसबी बॅंकेला इंडियन बॅंक टॅक्स असोसिएशन कडून तीन पुरस्कार, बेस्ट बॅंक सेल्स, पेमेन्ट ॲण्ड एन्गेजमेंट, बेस्ट टेकटॅलेन्ट ॲण्ड ऑर्गनायझेशन, बेस्ट टेक्नॉलॉजी बॅंक ऑफ द ईअर असे प्रतिष्ठित पुरस्कार टीजेएसबी बॅंकेला प्राप्त झाले आहेत.

हिंदू नववर्ष स्वागतची शोभयात्रा

तिकीट चेकिंग परिवार मुंबईतर्फे माथेरान : नेहमीच कामाच्या तणावातून सुद्धा आपली धार्मिक परंपरा कायमस्वरूप अबाधित ठेवून सण हा एखादा उत्सवाप्रमाणे साजरा करण्यासाठी मध्य रेल्वेत मुंबई येतील तिकीट चेकिंग परिवारतर्फे गुडीपाडव्याच्या…

डोंबिवली शहर संघटकाचा मनसेला रामराम

राज ठाकरेंच्या सतत बदलत्या भूमिकांमुळे मनसे कार्यकर्ते संभ्रमात डोंबिवली : मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठींबा जाहीर केला. मनसे पक्षाच्या सततच्या बदलत्या भूमिकांमुळे येथील मनसेचे काही कार्यकर्ते…

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आतापर्यंत १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण

मुबंई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मतदारांकडून आतापर्यंत १४ हजार ७५३ इतक्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यांपैकी…

ठाणे ग्रामीण भागातील कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे सज्ज

ठाणे : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील गावे हागणदारी मुक्त करणे व ग्रामीण भागातील शहरालगतच्या ग्रामपंचायतीमध्ये कायमस्वरुपी स्वच्छता राखण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे विविध उपाययोजना राबवित आहे. शहरालगतच्या व हायवे लगच्या…

निवडणुकीच्या कामासाठी आता विद्यार्थ्यांचीही नियुक्ती

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवरील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी, तसेच मतदारांना मार्गदर्शन करणे, ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रांवर सहकार्य करण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. यामध्ये एनएसएस, एनसीसी, स्काऊट,…