सत्तानाट्यामध्ये केजरीवाल यांचा ट्विस्ट
विश्लेषण राही भिडे आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना ‘ईडी’ने दारू घोटाळ्यात अटक केल्यनंतर विरोधी पक्षीय नेते आणि ‘आप’चे कार्यकर्ते त्रागा करत आहेत. मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर…
विश्लेषण राही भिडे आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना ‘ईडी’ने दारू घोटाळ्यात अटक केल्यनंतर विरोधी पक्षीय नेते आणि ‘आप’चे कार्यकर्ते त्रागा करत आहेत. मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर…
सध्या मुलांमध्ये स्टोन आणि कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सर सारख्या जीवघेण्या आणि असाध्य आजाराचे प्रमाण मुलांमध्ये वाढण्याचे कारण शोधण्यासाठी संशोधकांनी संशोधन केले. या संशोधनाचा अहवाल नुकताच बमेडमध्ये प्रकाशित करण्यात…
गजानन घुगे यांचा गुंडागर्दी आणि दहशतीच्या छायेत पक्षासाठी २० दिवस मोहम्मदाबाद विधानसभा क्षेत्रात (गाजीपुर) येथे कार्यकर्ता म्हणून प्रचार करताना आलेला अनुभव..! कालपासून टीव्ही, सोशल मीडिया मध्ये मुख्तार अंन्सारी त्याच्या कुकर्माने…
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर एक चारोळी टाकली आहे ती चारोळी अशी आहे…. आईला मिळाली उमेदवारी तर ताई ठेवा ना बाजूला तुतारी थोडी तुम्हालाही विश्रांती…
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरात काढण्यात आलेल्या रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी दाखल केल्यानंतर निवडणुकीत विजयाचा निर्धार करण्यात आला. अकोला लोकसभा…
मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांविरोधात ऑनलाईन पद्धतीने दंड वसुलीच्या कारवाईच्या पहिल्या दिवशी ७२ हजार रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाईत महानगरपालिका प्रशासनाकडून तंत्रज्ञानाचा…
मार्चअखेरपर्यंत ५४७१ पैकी ४३३२ प्रकल्प मंजूर! मुंबई : नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात मार्चअखेर महारेराने नवीन नोंदणीसाठी राज्यातून आलेल्या ५४७१ नवीन प्रस्तावांपैकी ४३३२ नवीन प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मंजूर केले आहेत. यात सर्वाधिक प्रकल्प पुण्याचे असून ही संख्या ११७२ आहे. या खालोखाल ठाणे (५९७), मुंबई उपनगर (५२८), रायगड (४५०), नागपूर (३३६), नाशिक (३१०) आदींचा समावेश आहे. राज्यातील प्रदेशनिहाय संख्या पाहिल्यास मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड हा मुंबईलगतचा भाग आणि कोकणाचा समावेश असलेल्या महाप्रदेशातील प्रकल्पांची संख्या १९७६ अशी सर्वात जास्त आहे. यानंतर पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, साताराचा समावेश असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील १४१५ प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळालेले आहेत. विदर्भातील ४३७ प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळाले असून त्यात नागपूरचे ३३६ प्रकल्प आहेत. उत्तर महाराष्ट्रातील ३४७ नवीन प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळाले आहेत. त्यात नाशिकचे ३१० प्रकल्प आहेत. मराठवाड्यातील १४९ नवीन प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळाले आहेत. त्यात औरंगाबादचे ११७ नवीन प्रकल्प आहेत. दादरा नगर हवेलीचेही आठ प्रकल्प आहेत. प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, घरखरेदीदारांच्या तक्रारी उद््भवू नये यासाठी महारेरा नोंदणी क्रमांक देताना प्रत्येक प्रकल्पाची वैद्यता, आर्थिक आणि तांत्रिक अशा त्रिस्तरीय पातळीवर कठोर छाननी करूनच नोंदणी क्रमांक मंजूर करते. याशिवाय कल्याण-डोंबिवली भागातील प्रकल्पांतील अनियमिततांच्या पार्श्वभूमीवर शासनाने नोंदणी क्रमांक देण्यापूर्वी संबंधित नियोजन प्राधिकरणांकडून ‘बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र’ त्यांच्या पदनिर्देशित ईमेल वरून महारेराच्या पदनिर्देशित ई-मेलवर पाठवणे बंधनकारक केले आहे. महारेराने गेल्या १९ जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याशिवाय नोंदणी क्रमांक दिला जात नाही. सुरूवातीच्या तुलनेत यात सुसूत्रता आलेली असली तरी प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी आवश्यक असलेले मंजुरीचे इमेल मिळण्यात काही प्रमाणात होणारा विलंब आणि प्रस्तावातील त्रुटींची संबंधित विकासकाकडून पूर्तता होऊ न शकल्याने ५४७१ प्रकल्पांपैकी ४३३२ प्रकल्पांना नोंदणीक् क्रमांक मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित ११३९ प्रकल्पांची छाननी सुरू आहे. संबंधित विकासकांनी त्रुटींचा पूर्तता केल्यानंतर त्यांना नोंदणी क्रमांक देण्यात येईल, असे महारेराच्या प्रवक्त्याने सांगितले.
प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली घोषणा… मुंबई : धाराशीव येथील अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान धाराशीव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्चना पाटील यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली. महायुतीच्या जागा वाटपामध्ये धाराशीवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. धाराशीव मतदारसंघातील एक वेगळेच चित्र आज इथे पहायला मिळाले आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, आमदार यांनी आज जाहीर होणाऱ्या उमेदवारासाठी एकत्रितपणे पत्रकार परिषदेला हजेरी लावली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रात जसे अभूतपूर्व यश महायुतीला मिळणार आहे. तसे यश धाराशीव मतदारसंघात अर्चना पाटील या मोठ्या फरकाने विजयी होतील असा विश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ चिन्ह वापरासंदर्भात आदेश दिला आहे मात्र ज्यांची मनोवृत्ती ढासळली आहे अशा लोकांची वक्तव्ये प्रसारमाध्यमांमध्ये ऐकली. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राहिल आणि घड्याळ चिन्ह वापरापूर्वी एखादी जाहिरात द्यावी त्याप्रमाणे वर्तमानपत्र आणि टिव्ही चॅनलवर ठळकपणे जाहिरात दिलेली आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाने हेही नमूद केले आहे की, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधिन राहून’ हे वाक्य लिहायला सांगितले आहे त्याप्रमाणे पालन होत आहे. याउलट तथाकथित शाहू – फुले – आंबेडकरांचे समर्थक म्हणवणारे एकमेव व्यक्तिमत्त्व आणि सतत लोकांची दिशाभूल करत असतात त्यांच्या ट्वीटबाबत सर्वोच्च न्यायालयाने टिका केली आहे असा टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला. शरद पवारसाहेबांचा फोटो लावण्याबाबत त्यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवारसाहेबांचा फोटो न लावता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा फोटो आम्ही वापरत आहोत. शिवाय महाराष्ट्रातील आमच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना घड्याळ चिन्ह वापराबाबत स्पष्टता सांगण्यात आली आहे. मात्र जाणीवपूर्वक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. या पक्ष प्रवेश आणि पत्रकार परिषदेला मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, धाराशीवचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील, भाजप आमदार अभिमन्यू पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले, भाजप आमदार राजाभाऊ राऊत, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक, प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव आदींसह पक्षाचे पदाधिकारी व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई : नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात मार्चअखेर महारेराने नवीन नोंदणीसाठी राज्यातून आलेल्या ५४७१ नवीन प्रस्तावांपैकी ४३३२ नवीन प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मंजूर केले आहेत. यात सर्वाधिक प्रकल्प पुण्याचे असून ही संख्या ११७२ आहे. या खालोखाल…
आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी कल्याण :कल्याण मधील पत्रीपूल ते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती दरम्यानच्या रहेजा गृहसंकुला समोरील काँक्रीट रस्त्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने गेल्या आठवड्यापासून सुरू केले आहे. या रस्ते कामामुळे एका मार्गिकेतून पत्रीपूल भागात वाहतूक होत असल्याने या भागात अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे. तीन वर्षापूर्वी पत्रीपुलाच्या नवीन उभारणीचे काम सुरू असताना नागरिक दीड वर्ष या भागात वाहतूक कोंडीत अडकत होते. हा त्रास पूल उभारणीनंतर संपला. गेल्या आठवड्यापासून पत्रीपूल ते रहेजा संकुलालगतचा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणारा रस्ता सिमेंट काँक्रीटच्या कामासाठी खोदण्यात आला आहे. त्यामुळे पत्रीपुलावरून वाहतूक एका मार्गिकेतून होत आहे. वाहनांचा चारही बाजुने भडीमार आणि एक मार्गिका यामुळे पत्रीपूल भागात दररोज एक ते दीड तास वाहतूक कोंडी होत आहे. दिवस, रात्र हा भाग कोंडीत अडकत असल्याने नागरिकांनी शिळफाटा, कल्याण पूर्व भागातून इच्छित स्थळी जाणे पसंत केले आहे. डोंबिवलीतून कल्याणला जाणारे प्रवासी लोकलने प्रवास करत आहेत. शिळफाटा रस्ता काँक्रीटीकरणाचे काम एमएसआरडीसीकडे आहे. या यंत्रणेने भिवंंडी वळण रस्ता, कोन ते दुर्गाडी ते शिळफाटा रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण केले आहे. पत्रीपुलाजवळील काँक्रीटीकरणाचे काम करण्यासाठी एक मार्गिका बंद ठेवून काम करावे लागणार असल्याने या कामाला वाहतूक विभागाकडून सण, उत्सव, परीक्षांचा हंगाम विचारात घेऊन लवकर परवानगी दिली जात नव्हती. गेल्या वर्षापासून हे काम रखडलेले आहे. येत्या पावसाळ्यात हा रस्ता आणखी खराब होण्याची शक्यता असल्याने एमएसआरडीसीने घाईने हे काम हाती घेतले आहे. शिळफाटा रस्त्याने, डोंबिवलीतून, कल्याण पूर्वेतून येणारी वाहने पत्रीपुलावरून कल्याणमध्ये प्रवेश करताना रहेजा संकुला लगतची रस्त्याची उजवी बाजू खोदण्यात आली आहे. ही वाहने एका मार्गिकेतून कल्याणमध्ये किंवा गोविंदवाडी दिशेने निघून जातात. वाहतूक सुरू असताना पोलीस दुर्गाडी किल्ला दिशेने पत्रीपूलमार्गे शिळफाटा, डोंबिवलीत जाणारी वाहने रोखून धरतात. ही वाहने सुमारे अर्धा ते पाऊण तास अनेक वेळा रोखल्याने दुर्गाडी किल्ला दिशेने वाहनांच्या रांगा लागतात. गोविंदवाडी वळण रस्त्याची पत्रीपुलकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी सुरू केली की शिळफाटा रस्त्याने कल्याणकडे येणारी वाहतूक रोखून धरली जाते. शिळफाटा रस्त्यावरील वाहनांची संख्या अधिक असल्याने या रस्त्यावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी दररोज होत आहे. ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक होत आहे. १५ ते २० वाहतूक पोलीस, सेवकांचा ताफा याठिकाणी तैनात असतो. रुग्णवाहिका, शालेय बस यांना कोंडीचा सर्वाधिक फटका बसला आहे. कल्याण पूर्व, पश्चिम भागातील अनेक विदयार्थी खासगी वाहने, शालेय बस मधून पूर्व, पश्चिमेतील शाळांमध्ये जातात. त्यांची या कोंडीने सर्वाधिक कोंडी केली आहे. आता परीक्षांचा हंगाम सुरू आहे. त्यात ही कोंडी सुरू झाल्याने पालक वर्ग अस्वस्थ आहे.