Author: bittambatami.com

मरीन लाईन्स ते वरळी कोस्टल रोडचे काम अंतिम टप्यात आहे. या कोस्टल रोडला समुद्राच्या लाटांची झळ  बसू नये म्हणून लाटाअवरोधक दगड कोस्टल रोडजवळ टाकण्याचे  काम सध्या जोरात सुरू आहे. छायाचित्र संतोष…

 भाजपाला धक्का

जळगावचे खासदार उन्मेष पाटील उद्धव ठाकरेंच्या सेनेत दाखल जळगाव : भारतीय जनता पार्टीमध्ये इनकमिंगची सवय झालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात आज नाट्यमय घटना घडलीय. जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा बुधवारी लोकसभा…

तैवानमध्ये महाभीषण भूकंप

तैपैई : गेल्या २५ वर्षात झाला नाही इतका महाभीषण भूकंपाने आज बुधवारी सकाळी तैवान हादरले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची ७.२ इतकी नोंद झाली आहे. या भूकंपामध्ये अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. तैवान…

कपिल पाटील यांनी घेतली आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट

भिवंडी : ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवदंडा येथे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी सचिनदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी, भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगरसेवक श्री. सुमित पाटील, श्री. राम माळी आदींची उपस्थिती होती.

दिव्यांग व्यक्तीला कमी समजू नका,  त्यांनाही समान संधी द्या – पूर्वेश सरनाईक

अनिल ठाणेकर ठाणे : सत्यम हा आमच्या विभागातला असून तो खूप हुशार आहे. दिव्यांग असल्यामुळे त्याला नोकरीसाठी अडचणी येत होत्या. त्याला नोकरी लावून देण्याचे आश्वासन मी दिले होते व ते पूर्णही केले. आज त्याचा पहिला पगार झाला असून त्याच्या यशामुळे तो आणि त्याचे कुटुंब खुश आहेत. त्याला भविष्यात तलाठी बनायचे आहे. त्यासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठीही मी त्याला मदत करणार  आहे. दिव्यांग व्यक्तीला कमी समजू नका त्याला समान संधी द्या असे युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले. ठाणे विभागात राहणारा सत्यम लिंगाळे याने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून दिव्यांग असल्यामुळे नोकरीसाठी त्याला अडचणी येत होत्या. त्याची समस्या युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांना कळताच त्यांनी त्याला नोकरी मिळवून दिली होती. सत्यमला नोकरीत एक महिना पूर्ण झाला असून त्याने आज पूर्वेश सरनाईक यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. युवा महाराष्ट्र मेळावा २४ फेब्रुवारीला पार पडला होता. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्यमला नियुक्ती पत्र देण्यात आले होते. युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सत्यमला नोकरी लावून देण्याचे वचन दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी ते पूर्ण केले. आज सत्यम आणि त्याची आई पूर्वेश यांना भेटायला आले होते. त्याचा पहिल्या महिन्याचा पगार झाला. तो त्याने पूर्वेश सरनाईक यांच्या हस्ते स्विकारत त्यांचे मनापासून आभार मानले. आज मला माझा पहिला पगार  मिळाला. हे सर्व पूर्वेश सरनाईक यांच्यामुळे शक्य झाले आहे. त्यांनी मला काही महिन्यापूर्वी  नोकरीचा शब्द दिला होता व तो पूर्णही केला असल्याचे सत्यम याने सांगितले. माझा मुलगा ही सर्वसामान्य लोकांप्रमाणे कामाला जात असून मला खूप आनंद होत आहे की, आज त्याच्या नोकरीला एक महिना पूर्ण झाला. पालक म्हणून आम्हाला खूप आनंद असल्याचे सत्यमच्या आईने सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० महत्वाची भूमिका बजावेल – कुलगुरू डॉ.कारभारी काळे

अशोक गायकवाड रायगड : आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत २०४७ करिता बहुआयामी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० महत्वाची भूमिका बजावेल, असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेचे कुलगुरू प्रा.डॉ.कारभारी काळे यांनी मंगळवार, (दि.२) रोजी येथे केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामार्फत १२ वी नंतर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षामाठी प्रवेश घेणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी शिक्षण व्यवस्थेमधील संभ्रम दूर होण्याच्या उद्देशाने कॉन्फरन्स हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे आयोजित एक दिवसीय स्कूल कनेक्ट कार्यशाळेच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेस परिसरातील एकूण २०० पेक्षा अधिक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सहभाग नोंदविला. ही कार्यशाळा दोन सत्रात आयोजित करण्यात आली असून पहिल्या सत्रात राज्यात राबविण्यांत येणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील शैक्षणिक बदलांबाबत जागृती, बँकेच्या शैक्षणिक कर्ज योजना, विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध शिष्यवृत्ती योजना, विद्यापीठात उपलब्ध शैक्षणिक सोई-सुविधा, विद्यापीठामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, रोजगार, इंटर्नशिप करिता विद्यापीठामार्फत सहाय्य इ. बाबत मार्गदर्शन करण्यात आले तर दुसऱ्या सत्रात विद्यापीठातील विविध विभागांना भेट आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेचे कुलगुरू प्रा.डॉ.कारभारी काळे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अरविंद किवळेकर, डॉ.एच.एस. जोशी, डॉ.ए.पी. शेष, डॉ.नीरज अग्रवाल, डॉ.एस.एम.पोरे आणि पदविका विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेचे प्राचार्य डॉ. मधुकर दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.कारभारी विश्वनाथ काळे यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधतांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील विद्यार्थी केंद्रित शैक्षणिक बदलांबाबत जसे मल्टीपल एन्ट्री मल्टीपल एक्झीट, बहुशाखीय विषय निवड पद्धत व लवचिक अभ्यासक्रम, नविन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाविद्यालयीन स्तरावर होणारे बदल, भारतीय ज्ञान परंपरा, अकँडमीक बँक ऑफ क्रेडीट, स्वयंम प्लँटफार्म वरील ऑनलायीन अभ्यासक्रम व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मुळे होणाऱ्या सकारात्मक परिणामाबाबत संवाद साधला तसेच विद्यापीठ अंतर्गत कार्यरत उष्मयान केंद्र व उपलब्ध सोई-सुविधा बाबत विद्यार्थ्यांना अवगत करून त्यांना उद्योजकीय प्रवाहात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्कृती विकसित होण्याकरिता विद्यार्थी व शिक्षकांकरिता विद्यापीठामार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणाचे आदान-प्रदान होण्यासाठी विद्यापीठ प्रशासन निधी उपलब्ध करून देईल अशी ग्वाही दिली. तसेच भारताला विश्वगुरु बनविण्याकरिता विकसित भारत २०४७ व आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी बहुआयामी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्वाची भूमिका बजावेल असे मत व्यक्त केले. या कार्यशाळेत डॉ.ए.पी.शेष इंग्लिश विभाग प्रमुख यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधतांना समग्र शिक्षण, जीवनावश्यक कौशल्य व माणुसकी याचे आपल्या शैक्षणिक जीवनातील महत्व विषद केले. करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे प्रमुख डॉ. नीरज अग्रवाल यांनी विद्यापीठात विद्यापीठामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, रोजगार, इंटर्नशिप, स्टार्टअप / उद्योजकता करिता विद्यापीठामार्फत सहाय्य इ.बाबत मार्गदर्शन तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महत्वाची भूमिका पार पेल असे मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ.मधुकर दाभाडे यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधतांना आपल्या भागातील संभाव्य उद्योग संधी लक्षात घेवून विद्यार्थ्यांनी उद्योग स्थापन करावे तसेच आपल्या परिसरात उत्तम दर्जाचे अभियंता निर्माण होतील या करिता विद्यापीठ सदैव आपल्या पाठीशी आहे अशी ग्वाही दिली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अरविंद किवळेकर यांनी विद्यापीठामार्फत उत्तम विद्यार्थी घडविण्याच्या दृष्टीने विद्यापीठामार्फत सुरु करण्यात आलेल्या विविध नवीन उपक्रमाबद्दल माहिती दिली. कार्यशाळेची प्रस्तावना डॉ.एच.एस. जोशी यांनी केली तसेच या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.रतिका जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.संप्रीत गौड यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ.संजय नलबलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नवीन खंडारे व विद्यापीठाचे अधिकारी/कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले.

निवडणूक प्रचाराच्या परवानग्यांसाठी ‘सुविधा’ पोर्टल उपलब्ध

अशोक गायकवाड रत्नागिरी : उमेदवार अथवा पक्षीयस्तरावर निवडणूक प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्यांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या ‘सुविधा’ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करुन परवानगी घ्यावी. आचारसंहितेचे तंतोतंत पालन होईल, याची कटक्षाने दक्षता घ्यावी. संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार अथवा पक्षीयस्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्यांसाठी सुविधा पोर्टल suvidha.eci.gov.in चा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सर्व नोडल अधिकाऱ्यांची आज आढावा बैठक झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड आदीसह नोडल अधिकारी उपस्थित होते. माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण, मतदार जनजागृती स्वीप, मनुष्यबळ, वाहने, टपाली मतपत्रिका, आचारसंहिता, इव्हीएम मशीन, मतदान केंद्र नियोजन, कायदा व सुव्यवस्था, निरिक्षकांची व्यवस्था, स्ट्राँग रुम व्यवस्था, दिव्यांग मतदार सुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी सविस्तर आढावा घेतला. संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. उमेदवार अथवा पक्षीयस्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्यांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या ‘सुविधा’ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करुन परवानगी घ्यावी. आचारसंहितेचे तंतोतंत पालन होईल, याची कटक्षाने दक्षता घ्यावी. संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात, असेही सिंह म्हणाले.

भाजपाचे ‘बुथ विजय’ अभियान बुधवारपासून सुरू

मावळ,रायगडमध्ये भाजपाचे उमेदवार नसले तरी महायुतीचे उमेदवार ताकतीने निवडून आणणार – अवधूत वाघ राज भंडारी पनवेल : मित्र पक्षांसहित देशात ४०० हून अधिक जागा भाजपा निवडून आणणार तसेच मावळ, रायगडमध्ये भाजपाचे उमेदवार नसले तरी महायुतीचे उमेदवार ताकतीने निवडून आणणार असल्याचे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पनवेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. ६ एप्रिल रोजी भाजपा आपला ४४ वा वर्धापन दिन साजरा करत आहे, त्यानिमित्ताने बुथ विजय अभियान या नवीन योजनेचा शुभारंभ आजपासून सगळीकडे केला आहे, या योजनेची माहिती प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते वसंतराव जाधव, पंकज मोदी, भाजपाचे रायगड जिल्हा सरचिटणीस माजी नगरसेवक नितीन पाटील तसेच प्रकाश बिनेदार उपस्थित होते. यावेळी माहिती देताना अवधूत वाघ म्हणाले, जगातील सर्वात मोठा पक्ष भाजपा आहे. बुथ विजय अभियानांतर्गत प्रत्येक बुथवर भाजपा कार्यकर्ता जाऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून केंद्र व राज्य सरकारने केलेली विविध कामे, विकास योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा, आंतरराष्ट्रीय ख्याती या माहिती सोबतच प्रत्येक घरोघरी विविध योजनांच्या लाभार्थींना भेटून घेतलेल्या सरकारी योजनांचा लाभ घेतल्याबद्दल आभार मानले जाणार आहेत. महायुतीच्या उमेदवाराला ५१ टक्के मते पडली पाहिजेत यासाठी बुथवर कार्यकर्ते मेहनत घेणार आहेत, अशी शेवटी प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. भाजपच्यावतीने ४०० पार चा नारा देणाऱ्या अजेंड्यावरून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाजपला गोचीत पकडले असून इंडिया आघाडीच्यावतीने भाजपकडून संविधान बदलविण्यासाठी ४०० पारचा नारा देण्यात येत असल्याच्या आरोपावरून अवधूत वाघ यांनी उत्तर देताना सांगितले की, गेल्या ७० वर्षांमध्ये अनेक बदल घडले आहेत, त्यानुसार घटनेमध्ये देखील बदल करणे गरजेचे आहे. लोकसभेत २/३ संख्याबळ असल्यामुळे तत्कालीन राजीव गांधी यांच्या नेतृत्वातील सरकारने देखील काही बदल केले होते. त्यानुसार पुन्हा काळ बदलत चालला आहे. या बदलत्या काळानुसार घटनेत काही तरतुदी करणे गरजेचे असल्यामुळे भाजपची देखील ती तयारी सुरू आहे. मात्र ज्या पद्धतीने विरोधकांकडून संविधान बदलण्याची खोट्या स्वरूपाची भाषा केली जात आहे, तर संविधान बदलण्याची कोणाच्या बापामध्ये हिम्मत नाही, असे उत्तर देत उपस्थित झालेल्या या प्रश्नाला अवधूत वाघ यांनी पूर्णविराम दिला.

सावधान ! सुर्यदेव कोपणार

मुंबई : हवामान बदलामुळे जगभरात तापमानाची वाढ नोंदविली जात असतानाच आता महाराष्ट्रातही येत्या तीन महिन्यातील तब्बल २० दिवस उन्हाचा जबरदस्त तडाका बसणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.सुर्यदेव कोपणार असून नागरिकांना…