Author: bittambatami.com

 धर्मवीर क्रीडा संस्था बॅडमिंटन स्पर्धा २०२६ दिमाखात संपन्न

धर्मवीर क्रीडा संस्था बॅडमिंटन स्पर्धा २०२६ दिमाखात संपन्न अल्फी मेक्कदतचा दुहेरी मुकुट, जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंची चमकदार कामगिरी १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान शहीद तुकाराम ओंबळे बॅडमिंटन हॉल येथे पार पडलेली धर्मवीर क्रीडा संस्था बॅडमिंटन स्पर्धा  अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात यशस्वीरीत्या संपन्न झाली. ठाणे महानगरपालिकेच्या आश्रयाखाली ठाणे सिटी अँड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेला संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंचा मोठा प्रतिसाद लाभला. विविध वयोगटांतील १० गटांमध्ये सामने खेळविण्यात आले आणि तीन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवाने जिल्ह्यातील बॅडमिंटन वातावरण अधिक बळकट केले. स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरला अल्फी मेक्कदत याचा दुहेरी किताब. अल्फीने अंडर १३ मुलांच्या एकेरी गटात तसेच अंडर १५ मुलांच्या एकेरी गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुटावर आपले नाव कोरले. दोन्ही अंतिम सामन्यांमध्ये त्याने अत्यंत प्रतिभावान पियूष सुतारवर मात करत दोन उदयोन्मुख चॅम्पियनमधील थरारक आणि उच्च दर्जाच्या लढती प्रेक्षकांना अनुभवायला मिळाल्या. अंडर ९ मुलांच्या एकेरी गटात शिवांश चव्हाण विजेता ठरला तर विहान अनिखिंडी उपविजेता झाला. अंडर ९ मुलींच्या एकेरीत यश्वी कोरगावकर हिने विजेतेपद पटकावले आणि यम्मी मानोन हिला उपविजेतेपद मिळाले. अंडर ११ मुलांच्या एकेरीत योहान नायर विजेता ठरला तर वेद चव्हाण उपविजेता ठरला. अंडर ११ मुलींच्या एकेरीत नैरा पहारिया हिने बाजी मारली आणि सान्वी वागळे उपविजेती ठरली. अंडर १३ मुलींच्या एकेरीत शनाया तावटे हिने विजेतेपद पटकावले तर अद्विका मोरे उपविजेती ठरली. अंडर १५ मुलींच्या एकेरी गटात आर्या शिंदे विजेती ठरली आणि शुभ्रा कुलकर्णी उपविजेती ठरली. खुल्या गटातील मुलांच्या एकेरीत मंथन पाडेल विजेता झाला तर अर्णव सावंत उपविजेता ठरला. खुल्या गटातील मुलींच्या एकेरीत आर्या घाडगे हिने विजेतेपद मिळवले आणि गुंजन कोठारी उपविजेती ठरली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा वरिष्ठ बॅडमिंटनपटू व क्रीडाप्रेमी  उदय गायकवाड,  रामदास शिंदे आणि  सुनील सोपारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.  उदय गायकवाड आणि  रामदास शिंदे यांनी विजेत्या खेळाडूंना नैतिक मार्गदर्शन देत त्यांच्या भावी वाटचालीसाठी प्रेरणा दिली. स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून  नरेश गुंडले यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सामने पार पाडले. या भव्य आयोजनामागे संदीप कांबळे आणि प्राजक्ता रानडे-कांबळे यांचे विशेष परिश्रम मोलाचे ठरले. तसेच धर्मवीर क्रीडा संस्थेचे अध्यक्ष अशोक वैती आणि ठाणे महानगर पालिकेच्या क्रीडा उप-आयुक्त मीनल पालांडे यांचा देखील  या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात सिंहाचा वाटा होता. खेळाडूंना स्पर्धेदरम्यान सातत्याने मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक  श्रीकांत वाड तसेच प्रशिक्षक मितेश हाजीरनीस, फुलचंद पासी, एकेंद्र दर्जी, प्रसेनजीत शिरोडकर उपस्थित होते.  श्रीकांत वाड यांनी खेळाडूंसोबतच पालकांनाही योग्य मार्गदर्शन करत स्पर्धेच्या दर्जात भर घातली. धर्मवीर क्रीडा संस्थेच्या पुढाकारामुळे आणि ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली असून, ठाणे जिल्ह्यातील बॅडमिंटनला नवी दिशा देणारा हा क्रीडा महोत्सव ठरला आहे. भविष्यातही अशाच दर्जेदार स्पर्धांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना व्यापक व्यासपीठ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मुंबई : चौथ्या आरंभ स्पोर्ट्स तर्फे  आयोजित करण्यात आलेल्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५० पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी मॅक्स प्रोटीन व पटूक पॉलिटेक्निक ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास स्थानिक आमदार संजय उपाध्याय, नगरसेवक शिवानंद शेट्टी, डॉ. मीता सेटा, करुणाकर शेट्टी या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत पार्थ धारोड, सनया पवार या समता क्रीडा भवनच्या दोन्ही खेळाडूंची अनुक्रमे पुरुष, महिला गटात सर्वोत्तम मल्लखांबपटू म्हणून निवड करण्यात आली. पुरुष गटाचे सर्वसाधारण विजेतेपद विद्यामंदिर, दहिसर व दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन या दोन्ही संघांना विभागून देण्यात आले, तर महिला विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद समता क्रीडा भवन यांनी पटकावले. ही स्पर्धा मल्लखांब या पारंपरिक भारतीय क्रीडा प्रकाराच्या उत्कृष्टतेचा व शिस्तीचा गौरव करणारी ठरली.

डाटामॅटिक्स, सेंट्रल बँकेची विजयी घोडदौड

डाटामॅटिक्स, सेंट्रल बँकेची विजयी घोडदौड इन्श्युरन्स शील्ड टी-२० क्रिकेट स्पर्धा मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनची मान्यता असलेल्या इन्श्युरन्स शील्ड टी-२० क्रिकेट स्पर्धेत डाटामॅटिक्स संघाने बँक ऑफ महाराष्ट्र वर तर सेंट्रल बँकेने यजमान ओरिएंटल इन्श्युरन्स संघावर विजय मिळवला. डाटामॅटिक्स संघाने बँक ऑफ महाराष्ट्राचा ९ विकेट्स शिल्लक राखून धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना बँक ऑफ महाराष्ट्राला ९२ धावांपर्यंतच मजल मारता आली. रोहिदास कोयंडे आणि कल्पेश सावंत यांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या फलंदाजांना मैदानावर स्थिरावण्याची कोणतीही संधी दिली नाही. कल्पेश सावंतने १४ धावांत ४ तर रोहिदास कोयंडेने १३ धावांत ३ बळी मिळवले. त्यानंतर डाटामॅटिक्स संघाने ९.३ षटकांतच ९२ धावांचे आव्हान पार केले. भुवन पाटील याने ३० चेंडूंत केलेली ५० धावांची तर उपेंद्र यादवने २५ चेंडूंत केलेली ३६ धावांची खेळी डाटामॅटिक्सच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली. एलिट गटाच्या दुसऱ्या सामन्यात सेंट्रल बँकेने ओरिएंटल इन्श्युरन्सवर २५ धावांनी विजय मिळवला. सेंट्रल बँकेने प्रथम फलंदाजी करताना १५८ धावा उभारल्या. प्रथम परमार याने तडाखेबंद ५८ धावांची खेळी साकारली. त्याला उत्तम साथ देताना गौतम साठेने २३ चेंडूंत ३६ धावांचे योगदान दिले. हे उद्दिष्ट गाठताना ओरिएंटल इन्श्युरन्सच्या फलंदाजांनी ६० धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतरच्या फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही, परिणामी धावांची गती कमी झाल्याने त्यांना विजयासाठी २५ धावा कमी पडल्या. ओरिएंटलचा डावखुरा फलंदाज समीप मिसाळ याने ३१ चेंडूंत नाबाद ४१ धावा तर शंतनु तांडाले याने ४० धावा करत चांगला प्रतिकार केला. मात्र विजयासाठी त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. राजेश बोरकर याने दोन बळी मिळवत सेंट्रल बँकेच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. आता उपांत्यपूर्व फेरीचे सामने ६ मार्च रोजी खेळवण्यात येतील.

राज सिंग यांच्या नेतृत्वाखाली पदकांची लुटालूट

अबू धाबी ओपन मास्टर्स गेम्स २०२६ राज सिंग यांच्या नेतृत्वाखाली पदकांची लुटालूट पुण्याच्या अनुभवी बॅडमिंटनपटूंचे जागतिक स्तरावर वर्चस्व अबू धाबी, युएई – अबू धाबी ओपन मास्टर्स गेम्स २०२६ मध्ये भारतीय ध्वज अभिमानाने फडकवला गेला. अनुभवी भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत विविध वयोगटातील अनेक पदके पटकावली. पुण्याचे राज सिंग यांनी या मोहिमेचे नेतृत्व करताना आपल्या चिकाटीचा आणि कौशल्याचा परिचय देत तब्बल तीन पदकांवर आपले नाव कोरले. रौप्य पदकाची कमाई ६०+ पुरुष दुहेरी गटात अव्वल स्थानासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत राज सिंग आणि धनंजय देशपांडे या जोडीने रौप्य पदक पटकावले. संपूर्ण स्पर्धेत या जोडीने उत्कृष्ट समन्वय आणि रणनीतीचा वापर केला. अंतिम सामन्यात थोडक्यात सुवर्णपदक हुकले असले तरी, त्यांच्या खेळाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर भरभरून कौतुक झाले. ऐतिहासिक पदार्पण आणि कांस्य विजय या स्पर्धेत रेखा धुपर यांचे आंतरराष्ट्रीय पदार्पण स्वप्नवत ठरले. ६०+ मिश्र दुहेरी गटात राज सिंग यांच्यासोबत खेळताना या जोडीने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत मानाचे कांस्य पदक मिळवले. इतकेच नव्हे तर, राज सिंग यांनी आपल्या अष्टपैलू खेळाचे दर्शन घडवत ४५+ पुरुष दुहेरी गटात प्रताप मेकाला यांच्यासह खेळताना आणखी एक कांस्य पदक प्राप्त केले. या गटातील उपांत्य फेरीचा सामना अत्यंत चुरशीचा ठरला: पहिला गेम: सिंग आणि मेकाला यांनी १५-८ असा एकतर्फी विजय मिळवला. निर्णायक खेळ: दुसऱ्या सेटमध्ये १८-२० अशा अटीतटीच्या संघर्षानंतर, तिसऱ्या सेटमध्ये (९-१५) या जोडीने झुंजार खेळ करत कांस्य पदक निश्चित केले. जागतिक दर्जाचे नियोजन आणि सोयी-सुविधा मैदानातील खेळासोबतच, २०२६ च्या या स्पर्धेचे नियोजन आणि खेळाडूंना दिलेल्या सुविधांचे मोठे कौतुक झाले. आयोजकांनी खेळाडूंसाठी विशेष व्यवस्था केली होती. प्रवास सुविधा (Pick-up & Drop): खेळाडूंना निवासाच्या ठिकाणाहून मैदानापर्यंत नेण्या-आणण्यासाठी २४ तास वाहन सेवा उपलब्ध होती, ज्यामुळे खेळाडू वेळेवर आणि ताजेतवाने होऊन पोहचू शकले.…

मानवी रोबो दारात आलाय…

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आणि त्याअगोदर घरातील कामे घरचे पुरुष आणि महिला मंडळी करीत असत. केवळ काही कामासाठीच मोलाने काम करून घेतले जात असे. परंतु जगभरात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा डंका वाजू…

व्हॉट्सअप वाढदिवस!

आजचे युग हे सोशल मिडियाचे युग आहे आणि या सोशल मीडियाच्या युगात प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये अनेक मेसेजिंग ॲप्लिकेशन आहेत आपणही दररोज अनेक मेसेजिंग ॲप्लिकेशनचा वापर करतो. या मेसेजिंग ॲप्लिकेशनमध्ये सर्वाधिक…

कर्जउभारणीचा वाढता बोजा

भारत आज जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून ओळखला जातो. पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, संरक्षणक्षमता, सामाजिक कल्याण योजना आणि जागतिक स्तरावर वाढता प्रभाव या सर्व बाबींमुळे देशाच्या विकासाचा वेग अधोरेखित…

भविष्यवेधी परिषद

भविष्यवेधी परिषद भारताने नवी दिल्लीमध्ये 16 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ‌‘इंडिया ॒एआय इम्पॅक्ट समिट 2026‌’ या जागतिक स्तरावरील एका मोठ्या कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदचे आयोजन केले. त्यासाठी जगभरातून एआय…

  गांधारी रिंगरोडवरील भरधाव वाहनांवर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी

गांधारी रिंगरोडवरील भरधाव वाहनांवर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी उपविभाग प्रमुख कुणाल कुलकर्णी यांचे सहाय्यक पोलीस आयुक्तांना पत्र कल्याण: कल्याण पश्चिमेतील गांधारी वडवली रिंगरोड येथे वाहनचालक अतिवेगाने वाहने चालवत असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत असून या अपघाताला कारणीभूत असलेल्या भरधाव वाहनांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना विभाग उपप्रमुख कुणाल कुलकर्णी यांनी वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. गांधारी वडवली रिंगरोड हा रस्ता पूर्णत्वास आलेला नाही. या रस्त्यावर दिवसा व रात्रीच्या वेळी भरधाव दुचाकीस्वार व चारचाकी वाहन चालक आपल्या वाहनांची रेसिंग लावून इतर नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहेत. नुकताच काही दिवसांपूर्वी याठिकाणी अपघात होऊन एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव वाहनांच्या वेगामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी स्पीडगन, दुभाजक, गतिरोधक लावून ठोस कारवाई करण्याची मागणी शिवसेना उपविभाग प्रमुख कुणाल कुलकर्णी यांनी केली आहे. दरम्यान कुलकर्णी यांच्या पत्रानंतर वाहतूक पोलीस सतर्क झाले असून रिंगरोडवर बंदोबस्त लावून वाहनचालकांची तपासणी करत कारवाई केली आहे.

 कल्याण पश्चिमेतील गोविंद वाडी परिसराची महापौर हर्षाली चौधरी यांनी केली पहाणी

कल्याण पश्चिमेतील गोविंद वाडी परिसराची महापौर हर्षाली चौधरी यांनी केली पहाणी नागरिकांशी साधला थेट संवाद कल्याण : कल्याण पश्चिमेतील गोविंद वाडी परिसराची केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी यांनी स्वतः पायी फिरून पहाणी केली आणि तेथील रहिवाशी असलेल्या मुस्लिम बांधवांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी यावेळी सदर परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली.  गोविंद वाडी परिसरात ड्रेनेजचे पाणी तुंबत असल्याबाबत पालिका सदस्या समीना शेख यांनी केलेल्या तक्रारीवरून तेथील मलनिस्सारण व्यवस्थेची देखील त्यांनी  पाहणी केली आणि सदर तक्रारीचे  निराकरण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त रामदास कोकरे, मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद सखदेव, काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी त्यांच्या समवेत उपस्थित होत्या. यावेळी नवनिर्वाचित महापौरांचा सत्कार करण्यासाठी नागरिक पुढे सरसावले असता आधी तुमची कामे होऊ द्यात, नंतर सत्कार करा असे सांगत महापौरांनी आपल्या सहृदयतेने नागरिकांची मने जिंकली.