“एमएमआरडीए”चा अधिशेष अर्थसंकल्प
“एमएमआरडीए”चा अधिशेष अर्थसंकल्प स्लग- ४८,०७२.५७ कोटींचा आराखडा O आर्थिक परिवर्तन आणि पायाभूत सुविधांना गती O प्रकल्पांसाठी ८७% भरघोस तरतूद मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आज सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी रुपये ४८,०७२.५७ कोटींचा अधिशेष अर्थसंकल्प सादर केला…
म्हाडाच्या मुंबईतील ११८ सदनिकेसाठी १७ फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी
म्हाडाच्या मुंबईतील ११८ सदनिकेसाठी १७ फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर ११८ सदनिकांची विक्री जाहीर करण्यात आली आहे.…
सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा
सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा येत्या २६ फेब्रुवारीला होणार शिक्कामोर्तब राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय स्वाती घोसाळकर मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा होणार आहे. आज झालेल्या आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात…
विचार आयटी क्षेत्राचा
आयटी क्षेत्राने दिलेल्या संधींचा फायदा घेत भारतीय तरुणाईने यशाची नवी शिखरे सर केलीच, पण समृद्धीही मिळवली. आज हे भारताच्या प्रगतीच्या प्रवासातले महत्वाचे क्षेत्र ठरते आहे. देशाच्या अर्थकारणात या क्षेत्राची महत्वाची…
कौशल्याची दीडशे वर्षे…
कौशल्य म्हणजे काय हे बघायचे असेल तर आपल्याला या दीडशे वर्षे सुरु असलेल्या एका जपानी कारखान्यात जावे लागेल. आजही या कारखान्यात सगळे काम कारागीर आपल्या हातांनी करतात आणि त्यात जी…
माझी जीभ खुशाल कापा पण, भाजपाला एक्सपोज करणारच काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचे भाजपाला चँलेंज मुंबई : अदानी-अंबानी आणि अमेरिकेचे भले करणाऱ्या, संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला मी एक्सपोज करतो म्हणून भाजपाला माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी थांबणार नाही, भाजपाचा पर्दाफाश करतच राहणार असे चँलेंजच आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपाला दिले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भाजपा आमदार व नेत्यांनी “माझी जीभ कापून आणणाऱ्याला २ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे, माझी जीभ कापल्यानंतर जर भारतीय शेतकर्यांचे अमेरिकेतून होणार्या आयातीपासून संरक्षण होणार असेल, ही अन्यायकारक ट्रेड-डील रद्द होऊन शेतमालाला भाव मिळणार असतील, शेतकरी कर्जमुक्त होणार असेल, भाजप हिंदू-मुस्लिम द्वेषाला खतपाणी घालणार नसेल, चीनने बळकावलेला भूभाग परत मिळणार असेल तर माझी जीभ नक्की कापा. सपकाळ पुढे म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काहीही चुकीचे बोललो नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची किर्ती महान आहे, चंद्र जसा वाढत जातो तशीच महाराजांची किर्ती आणखी वाढत जावी, याबाबत दुमत नाही. परंतु भारतीय जनता पक्षाने माझ्या विधानाचा “ध” चा “मा” करून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न केला, दंगली घडवण्याचा प्रयत्न केला, यामागचे कारस्थान समजून घेतले पाहिजे. एपस्टिन फाईल्समध्ये बरंच काही दडलेलं आहे, त्यावरून जनतेचे लक्ष विचलित करणे हा एक भाग आहे तर अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारामुळे भारतातील शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्थ होणार आहे, महाराष्ट्रातही अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. या सर्व मुद्द्यावर भाजपा सरकारकडे उत्तर नाही म्हणून या प्रश्नांवर भाजपाला पडदा टाकायचा आहे, यासाठी हा सर्व खटाटोप सुरु आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
क्रांतिकारकांचे गुरू वस्ताद लहुजी साळवे
आज १७ फेब्रुवारी, स्वातंत्र्य संग्रामातील एक जहाल क्रांतिकारक तसेच क्रांतिकारकांरांचे गुरू वस्ताद लहुजी साळवे यांचा स्मृतिदिन. भारतमातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी लाखो ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी हौतात्म्य पत्करले त्यात वस्ताद लहुजी…
बांगला देशातील महिलांचे राजकीय शहाणपण
बांगला देशच्या निवडणुकीत तिथल्या जनतेने स्थैर्याला कौल दिला आहे. हसीना यांचे सरकार घालवण्यास जबाबदार असलेल्या मूलतत्तववादी पक्षांना बाजूला ठेवून त्यातल्या त्यात थोड्या बऱ्या आणि प्रशासकीय अनुभव असलेल्या पक्षाच्या हाती सत्ता…
अजित पवारांच्या अपघातग्र्स विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद ?
अजित पवारांच्या अपघातग्र्स विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद ? मुंबई : अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी सुरु असलेल्या चौकशीतून दरदिवशी संशयास्पद घटना उघडकीस येत आहेत. आता अजित पवारांच्या अपघातग्र्स्त विमानातील ब्लॅकबॉक्स बंद होता अशी माहिती पुढे येत आहे. विमानातील तांत्रिक अडचणींची माहिती देणाऱ्या ब्लॅक बॉक्सबाबतही अनेक खुलासे आता समोर येऊ लागले आहेत. अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला असल्याचा दावा काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. तसंच, तपासणीसाठी हे ब्लॅक बॉक्स आता विदेशात पाठवला जाणार आहे, असंही म्हटलं जातंय. दरम्यान, यावर रोहित पवारांनीही आता शंका उपस्थित केलीय. ते म्हणाले, “ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. अतुल लोंढे म्हणतात त्याप्रमाणे ब्लॅक बॉक्स बंद केला असेल तर खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून आता एक कारण लोकांमध्ये पेरलं जात आहे. ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही. पण ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे चौकशी करता येत नसेल तर मी म्हणतोय त्याप्रमाणे हा अपघात नव्हता, हा घातच होता हे क्लिअर होईल.”
