Author: bittambatami.com

भिवंडीत गणेशोत्सवानिमित्त ६८० पोलिस तैनात

 गर्दीच्या ठिकाणी साध्या गणवेशातही पोलिस सज्ज भिवंडी, ता. १० (बातमीदार) : गणेशोत्सवासंदर्भात पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला आहे. शहरात ८० पोलिस अधिकाऱ्यांसह ६०० पोलिस तैनात ठेवले आहेत. याशिवाय सर्व प्रमुख चौक आणि बाजारपेठांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संशयास्पद व्यक्तींवर नजर ठेवण्यात येत आहे. शहरातील सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी साध्या गणवेशातील पुरुष व महिला पोलिसही तैनात आहेत. भिवंडीचे पोलिस उपायुक्त श्रीकांत परोपकरी यांनी अतिसंवेदनशील शहरात गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे नमूद केले आहे. १५ हजार गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना शहरात १५ हजार ८२६ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. यात १५९ सार्वजनिक गणपती मूर्ती आणि १५ हजार ६६७ घरगुती विघ्नहर्ता मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. त्यांच्या विसर्जनासाठी महापालिकेने व्यवस्था केली आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन केले. पाच दिवस गौरी गणपती आणि अनंत चतुर्दशीच्या गणपतींचे विसर्जन नदीनाका, वरळदेवी तलाव, भादवड, कशेळी, काल्हेरसह ३२ ठिकाणी केले जाणार आहे. 0000

कंत्राटी डॉक्टरांवर क्षयरोग रुग्णालयाचा भार

 वैद्यकीय अधिकारी, अतिदक्षता तज्ज्ञांची कंत्राटी भरती मुंबई, ता. १० : मुंबई महापालिकेच्या विविध विभागात कंत्राटी पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. आता आपत्कालीन सेवेत मोडणाऱ्या रुग्णालयातही कंत्राटी पद्धतीचा शिरकाव होणार आहे. पालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी अतिदक्षता तज्ज्ञ आठ पदे भरण्याचा निर्णय पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे, मात्र ही भरती कायमस्वरूपी नसून कंत्राटी पद्धतीने होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयाची जबाबदारी आता कंत्राटी डॉक्टरांच्या हाती असणार आहे. भविष्यात काही घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची असणार, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. नायर, सायर, केईएम, कूपर ही मुंबई महापालिकेची प्रमुख रुग्णालये असून १६ सर्वसाधारण रुग्णालये आहेत. स्वस्त व योग्य उपचार पद्धती यामुळे देशभरातील रुग्ण मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मोठ्या विश्वासाने धाव घेतात, मात्र गेल्या काही वर्षांत मुंबई महापालिकेच्या विविध विभागात कंत्राटी पद्धतीचा शिरकाव झाला आहे. पालिका रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांना योग्य उपचार देत लवकरात लवकर ठणठणीत करून घरी पाठवणे रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांचे कर्तव्य आहे, मात्र पालिका रुग्णालयात आता कंत्राटी पद्धतीचा बोलबाला असणार आहे.

लाडक्या बहिणीवरून महाभारत!

पुढच्यास ठेच मागचा शहाणा असे म्हटले जात असले, तरी हे राजकारण्यांना लागू होत नाही. त्यांना मतांसाठी अनेक ठेचा खाव्या लागतात. रिझर्व्ह बँकेचा सल्ला डावलून फुकटच्या योजनांचा निवडणूक जिंकण्यासाठी भडीमार केलेली राज्ये…

 गणेशोत्सव काळात राजकीय फलकबाजी

 न्यायालयाच्या आदेशांचा विसर मुंबई : सध्या राज्यासह मुंबईत गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जात असून सर्वत्र चैत्यन्याचे वातावरण आहे. लक्षवेधी सजावट आणि डोळे दिपवून टाकणाऱ्या आकर्षक रोषणाईने शहर उजाळून निघाले आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही नाक्यानाक्यावर, चौकाचौकात आणि गल्लीबोळात नेत्यांच्या शुभेच्छा फलकांनी शहराचे विद्रुपीकरण झालेले आहे. बेकायदेशीररित्या फलकबाजी करून शहराचे विद्रुपीकरण करण्यावर उच्च न्यायालयाने वारंवार खडसावूनही शहर नेतेमंडळींच्या फलकांनी भरून गेले आहे. ठिकठिकाणी फलकबाजी करून नियमांचे व आदेशाचे उल्लंघन झालेले पाहायला मिळत आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करून मतदारांना आकर्षित करण्याची संधी राजकीय मंडळी साधत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडप व प्रवेशद्वार, महत्वाचे चौक, नाका, कमानी आणि रस्त्याच्या दुतर्फा फलकबाजी करण्यात आली आहे. त्याला कोणताही पक्ष, गट-तट अपवाद नाही. राजकीय मंडळी, पदाधिकारी, आमदार व नगरसेवक होण्यास इच्छुक नेत्यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे छोटे – मोठे फलक ठिकठिकाणी लावून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय मंडळींसह विविध कंपन्या व उत्पादने आणि इतर विविध गोष्टींच्या जाहिरातबाजीचे फलक विविध ठिकाणी लागले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. थाटामाटात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची आर्थिक बाजू भक्कम असणे अत्यंत आवश्यक असते. वर्गणी, देणगी आणि राजकीय मंडळींकडून व विविध कंपन्यांच्या जाहिरातीच्या माध्यमातून मंडळांकडे देणगी जमा होत असते. त्यामुळे शुभेच्छांचे फलक गल्ली-बोळात दिसतात. कंपन्यांपेक्षा नेत्यांच्या जाहिराती मोठ-मोठ्या कंपन्या सणांच्या काळात रस्त्यावर कमानी उभारून जाहिराती करतात. त्यासाठी मंडळांना देणगी देतात. यंदाही कंपन्यांच्या त्यांच्या उत्पादनांच्या जाहिराती दिसत आहेत. मात्र, त्यापेक्षा यंदा नेत्यांच्या कमानींची संख्या अधिक दिसत आहे.

ऑक्टोबरमध्ये एसटीच्या डिझेल बस दाखल होणार

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या हजारो बस नादुरूस्त असून, या बसमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. नादुरूस्त बस अनेकदा रस्त्यात बंद पडून प्रवाशांचा खोळंबा होतो. त्यामुळे आता एसटीच्या ताफ्यात अशोक लेलँडच्या साध्या डिझेलवर धावणाऱ्या बस दाखल…

मैत्रीपूर्ण लढतीचा कोणताही प्रस्ताव नाही – प्रफुल्ल पटेल 

 मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने २५ मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढती करण्याचा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाला दिला असल्याची चर्चा मंगळवारी दिवसभर होती. मात्र, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी असा कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे  सांगितले. २५ मतदारसंघ असे आहेत…

चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा ‘मिस्टर इंडिया !

सहा गाड्या उडवूनही एफआयआरमधून गायब मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या भरधाव ऑडीने नागपूरच्या रामदासपेठेत एकामागून एक दुचाकीसह सहा वाहनांना धडक दिलीय. अपघातावेळी संकेत ड्रायव्हर सीटच्या मागे बसला होता…

महावाचन उत्सवात 5 हजाराहून अधिक विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी अधोरेखित केले पुस्तकांचे महत्व

नवी मुंबई : वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्वाचे साधन असून कोणत्याही व्यक्तीच्या विकासासाठी आणि समाजाच्या व राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचनसंस्कृती रुजविणे आवश्यक आहे हे लक्षात घेत राज्यातील सर्व शाळांमध्ये महावाचन  चळवळ राबविण्याचा निर्णय 16 जुलैला या शासन निर्णयानुसार घेण्यात आलेला आहे. शैक्षणिक वर्ष 2024 – 25 मध्ये राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव 2024’ हा उपक्रम उत्साहाने राबविला जात आहे. याकरिता इयत्ता तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते बारावी असे तीन गट करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासाव्यतिरिक्त मराठी साहित्य विश्वातील नावाजलेल्या साहित्यिकांचे विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या यांची निवड करून वाचन करीत आहेत व त्यावर विचार करून पुस्तकाचा सारांश लिहीत आहेत. हा सारांश महावाचन पोर्टलवर अपलोड केला जात आहे. या वाचन चळवळीचा एक भाग म्हणून ‘महावाचन उत्सव 2024’ अंतर्गत श्रीगणेशोत्सवाची सुट्टी लागण्यापूर्वी कोपरखैरणे गाव येथील नमुंमपा शाळा क्रमांक 36 येथे वाचनीय पुस्तकांचे ग्रंथालय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या ग्रंथालय प्रदर्शनामध्ये कोपरखैरणे परिसरातील 22 शाळा सहभागी झाल्या होत्या. या प्रदर्शनाप्रसंगी 97 मुख्याध्यापक, 71 पालक, 136 शिक्षक, 5143 विद्यार्थी अशा एकूण 5447 उपस्थितांनी या प्रदर्शनाला भेट देत ग्रंथसंपदेचा अनुभव घेतला. या ग्रंथालय प्रदर्शनाचे शुभारंभ शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी महानगरपालिका सचिव तथा कवयित्री श्रीम. चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी श्रीम. अरुणा यादव, कवी मोहन काळे उपस्थित होते. यावेळी श्रीम. चित्रा बाविस्कर व श्री. मोहन काळे यांनी विद्यार्थ्यांना सुंदर कविता ऐकवत वाचनाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी काही विद्यार्थ्यांनी कविता गायन केले. वाचन संस्कृती जपणुकीच्यसा दृष्टीने महत्वाच्या असणा-या या अभिनव उपक्रमात शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचा उत्स्फुर्तपणे सहभाग लाभला. काही पालकांनीही याप्रसंगी आपल्या मनोगतात वाचनाचे महत्व सांगितले. या महावाचन उत्सव उपक्रमाच्या माध्यमातून लहानथोरांनी एकत्रित येऊन पुस्तकांचे महत्व अधोरेखित केले.

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी केले महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांचे कौतुक

ठाणे : स्वतःचे कार्यालयाचे काम, घरची जबाबदारी सांभाळत ठाणे महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी आपली संस्कृती जपत, नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा मेळ साधत नाविन्यपूर्ण मंगळागौर सादर केल्याबद्दल सर्व महिलांचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांनी भरभरून कौतुक केले. ठाणे महानगरपालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सोमवारी महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिका कर्मचारी, मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी व ठाण्यातील सृजनसखी महिला यांनी मंगळागौर सादर केली. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या पत्नी प्रियांका राव, माजी नगरसेविका नम्रता भोसले, उपायुक्त मीनल पालांडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चेतना नितील, कार्यालयीन अधीक्षक रिमा देवरूखकर आदी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका कर्मचारी गणेशोत्सवाचे यंदाचे ४२ वे वर्षे आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गेली दोन वर्षे ठाणे महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी पारंपरिक अशी मंगळागौर सादर करतात. यंदाही ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा मेळ साधत नाविन्यपूर्ण अशी मंगळागौर सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी सर्व महिलांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या पत्नी प्रियांका राव यांच्यासह खेळात सहभागी होत मंगळागौरीचा आनंद लुटला.

मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी १७ सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार

जालना:  मनोज जरांगे हे येत्या १७ सप्टेंबरपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. मनोज जरांगे यांनी मंगळवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना ही घोषणा केली. मनोज जरांगे यांनी याआधी आपण २९ सप्टेंबरला…