Author: bittambatami.com

इंदोरच्या होळकर संस्थानकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवींवर नर्मदेच्या जलाभिषेकसाठी ठाण्याला मान

ठाणे: देशभरातल्या प्रमुख मंदिरांच्या जिर्णोद्धार  करणाऱ्या  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. धनगर प्रतिष्ठान व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात असलेल्या अहिल्यादेवी यांच्या मूर्तीवर नर्मदेच्या जलाने अभिषेक करण्यात आला. आहिल्यादेवी यांचे वंशज इंदोरच्या होळकर संस्थानचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांनी देशभरातील अहिल्यादेवी यांच्या प्रतिमांचे नर्मदेने जलाभिषेक व्हावा, यासाठी नर्मदा तीर्थ पाठविण्यात आले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जंयतीनिमित्त महेश्वर राजगादी येथून देशभरातील अहिल्यादेवींच्या प्रतिमांचे नर्मदेच्या तिर्थाने अभिषेक व्हावा, यासाठी नर्मदा तिर्थ पाठविण्यात आले होते. राज्यात सांगली, पुणे,माळेगाव बारामती, पंढरपूर, चौंडी, ठाणे,औंढा नागनाथ, अंबड आदी ठिकाणी हे तीर्थ पोहचले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दैनंदिन दिनश्चर्येत नर्मदा स्नानाचा उल्लेख सापडतो इतिहासातील हा सांस्कृतिक धागा पकडुन युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी नर्मदा तिर्थ धनगर प्रतिष्ठान यांना पाठवले असून यंदाची जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी झाली. ठाण्यातील मासुंदा तलाव येथे आहिल्यादेवीच्या मूर्तीवर शुक्रवारी सकाळी भाजपाचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष डॉ राजेश मढवी व माजी नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांच्या हस्ते नर्मदा तीर्थानने अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी ठाणे धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे,धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर उपस्थित होत्या.तसेच ठाणे महापालिकेच्या वतीने सहाय्यक आयुक्त सोपान भाईक,वार्ड ऑफिसर आनंद पाटील,विकास मोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हा जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष महेश गुंड,सचिव तुषार धायगुडे ,खजिनदार अनिल जरग,उपाध्यक्ष कुमार पळसे,राजेश वीरकर,प्रचारप्रमुख सचिन बुधे,उपखजिनदार सुरेश भांड,सल्लागार दिलीप कवितके, सूर्यकांत रायकर,मनोहर वीरकर,प्रसाद वारे,गणेश बारगीर,अविनाश लबडे,दीपक झाडे,संतोष बुधे,संतोष दगडे,उत्तम यमगर,अंकुश उघाडे,उद्धव गावडे,महेश पळसे,महिला मंडळाच्या उपाध्यक्ष संगीता खटावकर, सचिव गायत्री गुंड, खजिनदार भारती पिसे, उपसचिव सुजाता भांड, उपखजिनदार सुषमा बुधे, सल्लागर अर्चना वारे, मीना कवितके, शीतल डफळ, वंदना वारे, अमृता बुधे, सीमा कुरकुंडे, मनीषा शेळके, रंजना यमगर,स्मिता गावडे, शुभांगी उघाडे,षरिचा कुलाळ आदींसह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

रेल्वेच्या असहकारामुळे ठाण्यातील वारकऱ्यांची अयोध्यावारी हुकली 

ठाणे  : प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर देशातील रामभक्तांनी मोठ्या संख्येने अयोध्येला भेट दिली होती. श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी भक्तांसाठी रेल्वेने विशेष, जादा गाड्या सोडल्या होत्या. आता काही महिने उलटल्यावर श्री रामचंद्रांच्या…

तंबाखू,खैनी, गुटखा,खर्रा खाणं घातकच परंतु खावुन थुंकणे महाघातक

विशेष रमेश कृष्णराव लांजेवार संपूर्ण जगातील लोकांना तंबाखू पासून मुक्ती मिळावी व आरोग्य सुदृढ रहावे या उद्देशाने तंबाखू व धुम्रपान यापासून होणारा त्रास दुर करण्याकरीता तंबाखू निषेध दिवस साजरा केल्या…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

विशेष श्याम ठाणेदार आज ३१ मे, आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती. आजच्याच दिवशी म्हणजे ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी या गावी माणकोजी व सुशिलाबाई शिंदे…

‘भावनादूत’

विशेष सलमान पठाण ‘पोस्टमन’… सोशल मीडिया यायच्या आधी ही व्यक्ति आपल्या आयुष्यात खूप महत्वाची होती. सकाळी मनी ऑर्डर घेऊन आला की पैसे आल्याचा आनंद आणि एखादी तार घेऊन आला की…

संघ विचारांचा विटाळ का…?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी ए द्वितीय वर्षाच्या इतिहास विषयाच्या प्रश्नपत्रिकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले आहेत. या प्रश्नांना परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी…

1 जून ते 3 जूनर्यंत राज्यात जोरदार पाऊस मुंबई : मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. यानंतर आता महाराष्ट्रात 1 जून ते 3 जूनर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वांसाठी दिलासा…

बेकायदा पब-हुक्का पार्लरला यापुढे स्थानिक पोलीस ठाणे जबाबदार 

अनिल ठाणेकर  ठाणे : ठाण्यातील बेकायदेशीर पब, हुक्का पार्लर आणि डान्स बार प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांना जबाबदार धरण्यात येईल तसेच या अवैध व्यवसायांवर कारवाया करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याची…

भाविकांवर काळाचा घाला

पुंछमध्ये बस १५० फूट दरीत कोसळून २१ ठार जम्मू-काश्मीर : शिवखोरी येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर आज काळाने घाला घातला.भाविकांची बस १५० फूट कोसळून  २१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४० जण…