Author: bittambatami.com

कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या

दैनंदिन खर्चाचा हिशोब तपासण्याच्या तारखा जाहीर – सुषमा सातपुते ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक खर्च संनियत्रण नियमावलीतील भाग बी १ व भारत निवडणूक आयोगाच्या १८ फेब्रुवारी २०१९ च्या पत्रानुसार खर्च निरीक्षकांनी दैनंदिन खर्चाचा हिशोब ३ वेळा तपासावयाचा आहे. या तपासण्यांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून उमेदवार प्रतिनिधींनी वरील तारखांना उपस्थित राहण्याचे आवाहन २४- कल्याण लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले आहे. खर्च निरीक्षकांनी खर्च तपासण्याच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत – तपासणीचे ठिकाण : खर्च निरीक्षक यांचे कार्यालय, २४ कल्याण लोकसभा मतदार संघ, क.डों.म.न.पा.जलतरण तलाव कार्यालय, वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, पेंढारकर कॉलेज जवळ, घारडा सर्कल, डोंबिवली पूर्व, ता.कल्याण, जि. ठाणे -४२१ २०३ खर्च तपासणीच्या तारखा :- ९ मे २०२४, १३ मे २०२४ व .१७ मे २०२४. तपासणीची वेळ :- सकाळी १०.०० वाजेपासून ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत. उमेदवार/प्रतिनिधींनी सर्व प्रकारच्या नोंदवह्या जसे की, दैनंदिन खर्च नोंदवही, रोख नोंदवही, बँक नोंदवही, संबंधित प्रमाणके/देयके (खर्चाच्या पावत्या), बँक पासबुक व इतर सर्व मूळ कागदपत्रांसह वरील नमूद ठिकाणी व दिनांकास विहीत वेळेत उपस्थित राहण्याबाबत जाहीर आवाहन करण्यात येत आहे. वरीलप्रमाणे नमूद दिनांकास उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांना  ई-मेलव्दारेही लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या वेळापत्रकात काही अपरिहार्य कारणांमुळे बदल झाल्यास तसे दूरध्वनी/ई-मेलने कळविण्यात येईल, असे २४- कल्याण लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले आहे.

कपिल पाटील यांच्या भव्य रॅलीतून मुरबाडकरांनी दाखविला महायुतीवर विश्वास

शहरासह ग्रामीण भागात प्रचार रॅलीला प्रतिसाद मुरबाड : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी काढलेल्या भव्य रॅलीला मुरबाड शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रॅलीच्या माध्यमातून मुरबाडवासियांनी महायुतीवर विश्वास दाखवत अलोट गर्दीत रॅलीचे स्वागत केले. या रॅलीमुळे मुरबाडमध्ये महायुतीचा माहौल तयार झाला आहे. अनेक वर्षांपासूनचे कल्याण-मुरबाड रेल्वेचे स्वप्न पूर्ण होणार असल्याबद्दल ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून मोदी सरकारचे आभार मानले गेले. महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्याबरोबरच भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुरबाड तालुक्यात बुधवारी रॅली काढण्यात आली. तालुक्याच्या सीमेवरून पोटगाव येथून निघालेली रॅली, तीन हात नाका, शिवळे, सरळगाव, टोकावडे, धसई, नारिवली, म्हसा, कान्होळ, सासणे येथे जमलेल्या गर्दीने वातावरण भारून गेले होते. या यात्रेला मिळालेला प्रतिसाद हा अभूतपूर्व होता. या रॅलीत शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील, शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल थळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उल्हास बांगर, सुभाष घरत, प्राजक्ता मोहन भावार्थे, ज्येष्ठ नेते रामभाऊ दळवी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष प्रतीक हिंदुराव, भाजपाचे तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद नार्वेकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेंद्र जाधव, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास देसले, मनसेचे शहराध्यक्ष देवेंद्र जाधव आदी उपस्थित होते. मुरबाड, टोकावडे, धसईबरोबरच विविध ठिकाणी उमेदवार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांनी ग्रामस्थांबरोबर संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर पोचविली. यापुढील काळात कल्याण-मुरबाड रस्ता आणि कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गामुळे तालुक्याची प्रगती होईल. भविष्यात कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे नगरपर्यंत विस्तारीकरण करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली आहे. पंतप्रधान मोदींकडे केलेली मागणी निश्चितच पूर्ण होते. त्यामुळे नगरपर्यंत रेल्वे धावेल, असे आश्वासन कपिल पाटील यांनी कॉर्नर मीटिंगमध्ये दिले. केंद्र व राज्य सरकारमुळे मुरबाड तालुक्याच्या विकासाची दिशा बदलली असून, गावागावांमध्ये विकासाची नांदी पोचली आहे. मुरबाड तालुक्याने महायुतीवर विश्वास कायम ठेवून भिवंडी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य मिळवून द्यावे, असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले. या वेळी शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील व कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांचीही भाषणे झाली. चौकट माळशेज घाटाच्या पायथ्याशी ‘चाय पे चर्चा’ माळशेज घाटाच्या पायथ्याशी टोकावडे परिसरात प्रचार करताना भिवंडी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी सहकाऱ्यांसमवेत टोकावडे नाक्याच्या टपरीवर चहा घेतला. तसेच प्रचाराच्या लगबगीतून वेळ काढत सहकारी नेत्यांसमवेत चाय पे चर्चा केली. या वेळी शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार आदी उपस्थित होते.

मतदानाच्या जागृतीसाठी ठाण्यात शनिवारी मिनी मॅरेथॉन

ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जिल्हा अॅथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीझन्स फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम ठाणे  : येत्या २० मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे याबद्दल जागृती करण्यासाठी ठाण्यात, शनिवार, ११ मे ला सकाळी मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले…

मतदाराला कुठल्याही प्रकारचा त्रास न व्हावा यासाठी मतदान केंद्रांबाहेर योग्य त्या सुविधा द्या–सुरेश म्हात्रे

राजीव चंदने मुरबाड : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असल्याने व मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान केंद्राबाहेर मंडप व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे  केली आहे. सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली असून तापमान ४० ते ४२ अंशापर्यंत पोहोचले आहे.२० मे रोजी भिवंडी लोकसभेसाठी मतदान होणार असून या काळातही तापमानात वाढ असणार असल्याने मतदारांना मतदान केंद्राबाहेर उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी व वाढत्या तापमानामुळे मतदानावर परिणाम होऊ नये यासाठी मतदान केंद्रानबाहेर मंडप, पिण्याचे पाणी, पंखे, खुर्च्या व खेळती हवा राहील अशी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी सुरेश म्हात्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे  केली आहे.

संघर्षपूर्ण राजकारणाची शक्यता

लोकसभा निवडणुकीला सुरूवात होऊन जवळपास निम्मा काळ लोटला आहे. सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान दोन ते तीन टक्क्यांनी कमी झाले आहे. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे या वर्षी उन्हाळा…

महाग आरोग्यविमा आणि बरंच काही…

अर्थनगरीतून महेश देशपांडे अर्थविश्वात सरत्या आठवड्यात लक्षवेधी बातम्यांची रेलचेल होती. यापैकी सामान्यांच्या दृष्टीने महत्वाची बातमी म्हणजे आरोग्य विम्याचा हप्ता महागणार आहे. याखेरीज विमानप्रवासात जादा सामान नेल्यास खिशावर अतिरिक्त भार पडणार…

‘बीएसएनएल’चा अस्तित्वासाठी लढा

‘बीएसएनएल’ही सरकारी दूरसंचार कंपनी सध्या संकटात आली असून आपले अस्तित्त्व टिकवण्यासाठी झगडत आहे. तसा दावा ‘बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन’ने केला आहे. या युनियनने केंद्र सरकारला थेट पत्र लिहून या समस्येकडे सरकारचे…

बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवणारे आधुनिक भगीरथ : कर्मवीर भाऊराव पाटील

दिन विशेष श्याम ठाणेदार बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवणारे आधुनिक काळातील भगीरथ रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज पुण्यतिथी. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज…

निवडणूकीनंतर अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील

मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात विरोधकांच्या गोटातील काही पक्षांची पुर्नरचना होण्याचे संकेत मिळत आहेत. पुढील दोन वर्षात विविध…