Category: होम

उड्डाणपुलाजवळ हाईट बॅरियरला टेम्पोची धडक

नाशिक-मुंबई मार्गावर वाहतूक कोंडी ठाणे: नाशिक मुंबई पूर्व द्रूतगती मार्गावरील माजीवडा उड्डाणपूलाजवळ लोखंडी हाईट बॅरियरला एका टेम्पोने धडक दिल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात प्रविणकुमार अग्निहोत्री (३३, रा. इंदिरानगर, वागळे इस्टेट, ठाणे)  हा टेम्पोचालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या अपघातामुळे या मार्गावर अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त टेम्पो क्रेनच्या मदतीने बाजूला केल्यानंतर ही वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाशिक- मुंबई या मार्गावर  माजिवाडा ब्रिजजवळ नाशिक ते मुंबईकडे जाणाऱ्या रोडवर माजिवाडा ब्रिजजवळ असलेल्या हाईट बॅरियरला टेम्पोने धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक नियंत्रण शाखेचे…

कोल्हापूरकरांची पूर चिंता कायमची मिटणार

महायुतीच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांची घोषणा प्रकल्पासाठी ३५०० कोटींचा कृती आराखडा कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे कोल्हापूरात येणाऱ्या महापुराबाबत कायमस्वरुपी तोडगा काढणारा ३५०० कोटींचा कृती आराखडा राज्य सरकारने मंजुर केला असून त्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे कोल्हापूरकरांची महापुराची चिंता कायमची मिटणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदार संघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी आयोजित केलेल्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रिफ, मंत्री शंभुराज देसाई आदी महायुतीचे नेते उपस्थित होते. कोल्हापूर शक्तिपीठ महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी आहे. ही निवडणूक एका व्यक्तीची नाही आणि एका मतदारसंघाची देखील नाही तर ही निवडणूक देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी आहे. ही निवडणूक नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणारी निवडणूक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर आपण वेगळे लढत असलो तरी या निवडणुकीत राष्ट्रभक्ती आणि देशाचा विकास डोळ्यासमोर एकजुटीने लढायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्था केवळ मजबूत केली नाही तर ११ व्या क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर आणली. आता भारताला तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांमुळे जगभरात भारताचा मानसन्मान वाढला आहे. राज्यातील महायुतीचे सरकार झपाट्याने काम करत आहेत. हे सरकार घरात बसणारे, फेसबुकवरुन काम करणारे सरकार नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा, शासन आपल्या दारी असे अनेक निर्णय महायुती सरकारने घेतले. कोल्हापुरकर शब्दाला पक्के आहेत. ते महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पंचगंगेचे प्रदूषण थांबवल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी राज्य सरकारने ३२०० कोटींचा प्रकल्प तयार केला आहे. कोल्हापुरातील महापुर निवारण्यासाठी ३५०० कोटींचा आरखडा शासनाने मंजूर केला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विरोधक पंतप्रधान मोदींचा व्देषाने पिडीत आहे. २०१४ आणि २०१९ प्रमाणेच २०२४ च्या निवडणुकीत जनता विरोधकांचा सुपडा साफ करेल. संविधान बदलणार अशी ओरड करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री शिंदे यांनी परखड शब्दांत सुनावले. ६० वर्षे सत्तेत असताना काँग्रेसला कधी संविधान दिन साजरा करण्याचे सुचले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ पासून संविधान दिन सुरु केला. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोवर संविधान कधीही बदलणार नाही, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लोटला जनसागर कोल्हापुरात ४२ डीग्री तापमान असून देखील महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी कोल्हापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीचा अलोट महासागर आज कोल्हापुरकरांनी पहिल्यांदा बघितला असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कोल्हापुरातील मुख्य रस्ते, गल्ली, बोळ महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ओसंडून वाहत होते.

प्रचंड मतांनी कपिल पाटलांना निवडून आणू — आमदार किसन कथोरे

मुरबाड तालुक्यातील विरोधी पक्ष एकवटले मुरबाड : आगामी लोकसभा निवडणुकीत मुरबाड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देण्याचा निश्चय आमदार कथोरे यांनी महायुतीच्या मेळाव्यात केला आहे. केंद्रीय राज्यमंत्री व महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, भाजपाचे आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष गोटीराम पवार यांच्यासह मनसे व रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा भव्य मेळावा मुरबाड येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव, कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील, माजी आमदार कृष्णकांत तेलम, शिवसेनेचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत गोंधळी, सुभाष घरत, उल्हास बांगर, भगवान भालेराव, नगराध्यक्ष मुकेश विशे, माजी नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे, माजी सभापती दीपक पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश पवार, मनसेचे तालुकाध्यक्ष आशिष रत्नाकर, वैशाली घरत,  अनिल घरत, लियाकत शेख, देवेन जाधव, दीपक खाटेघरे, प्रतिक हिंदुराव, हरेश खापरे यांच्या सह आदीं  हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुरबाड तालुक्यातील नागरिकांचे अनेक दशकांपासून रखडलेले मुरबाड रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाले. केंद्रीय अर्थसंकल्पात मुरबाड रेल्वेमार्गासाठी तरतूद झाली असून, मुरबाड रेल्वेमध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना जादा नुकसानभरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. कल्याण-मुरबाड रेल्वे १०० टक्के होणार असल्याचे छातीठोकपणे सांगत असून, कल्याण-मुरबाड रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. बदलापूरपर्यंत मेट्रो निश्चितपणे येईल, अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी दिली. तर मुरबाड-शहापूर रस्त्याला अनेक वर्षांपूर्वी मंजुरी मिळाल्यानंतरही कंत्राटदारामुळे तेथील काम पूर्ण झालेले नाही, याकडे श्री. कपिल पाटील यांनी लक्ष वेधले. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा समावेश `एमएमआरडीए’ क्षेत्रात करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. मुरबाड विधानसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्य देण्याची क्षमता असल्याचे श्री. कपिल पाटील यांनी आवर्जून नमूद केले. मुरबाड विधानसभा मतदारसंघात दहा वर्षांत अनेक विकासकामे झाली. अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली. रस्ते व अन्य विकासकामांसाठी सर्वाधिक निधी मुरबाड मतदारसंघाला मिळाला. या विकासकामांमुळे भाजपासह महायुतीला मतदारांची पसंती मिळाली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मला मिळालेल्या मताधिक्यापेक्षा अधिक मताधिक्य मिळविण्यासाठी भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता मेहनत घेईल. महायुतीच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्याची नोंद होईल, असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला. या वेळी ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव, कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार आदींसह महायुतीच्या नेत्यांची भाषणे झाली. मुरबाड तालुक्याची राजकीय ताकद एकाच व्यासपीठावर! मुरबाड तालुक्यात स्थानिक पातळीवर भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमोद हिंदुराव, शिवसेनेचे सुभाष पवार यांची राजकीय ताकद मोठी आहे. मनसे व रिपब्लिकन पक्षाचेही मोठ्या प्रमाणावर समर्थक आहेत. महायुतीच्या आजच्या मेळाव्यात ही ताकद एकाच व्यासपीठावर पाहावयास मिळाली. यापूर्वीच्या स्थानिक निवडणुकीत आपण एकमेकांविरोधात लढलो असलो, तरी आगामी लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांनी व्यक्त केला.

आता अप्पर ठाण्यातही डॉग हाऊसची सुविधा

ठाणे : अप्प्पर ठाण्यातील श्वानप्रेमींना आता आपल्या श्वानांची काळजी घेणारे हक्काचे डॉग हाऊस उपलब्ध झाले आहे. अंजूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील माणकोली-अंजूरफाटा मार्गावरील रामनगर परिसरात नव्याने सुरु करण्यात आलेल्या डॉग हाऊसचे अलीकडेच उदयॊजक आणि समाजसेवक लालचंद्र रामचंद्र पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल हर्ष केनेल्सचे दुर्वास करावकर म्हणाले बालपणापासून मला श्वानाबद्दल प्रेम आहे. माझ्या बेला या श्वानाला विविध डॉग शोजमध्ये बक्षिसे मिळाली आहेत. अप्पर ठाण्यात श्वानांची काळजी घेणारे कुठलेही डॉग हाऊस नव्हते. हि कमतरता भरून काढण्याचा विचार मागील चार वर्षांपासून मनात घोळत होता. आता हि मनीषा प्रत्यक्षात अवतरली आहे. या डॉग हाऊसमुळे केवळ अप्पर ठाण्यातीलच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील इतर श्वानप्रेमींची अडचण दूर होईल. या हर्ष केनेलसच्या उदघाटन समारंभास सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील, लघु उद्योजक किशोर नाखवा, प्रतिभा पाटील, ज्योती नाखवा आदी मान्यवर उपस्थित होते. प्रल्हाद नाखवा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अशोक पाटील यांनी आभार मानले.

पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागले आहेत

श्रीकांत शिंदेंचा संजय राऊतांना टोला ठाणे : संजय राऊत यांच्या आरोपावर हसायचे  की रडायचे हेच समजत नाही. पत्राचाळ आरोपी आता पत्र लिहायला लागले आहे. असा टोला शिवसेनेचे कल्याणचे खासदार श्रीकांत…

ठाण्याच्या बाजारात पिवळा कलिंगड दाखल

ठाणे : उन्हाळा सुरू झाल्यावर रसाळ कलिंगडांना मागणी वाढते; परंतु बाजारात लालऐवजी पिवळी कलिंगडे दाखल झाली आहेत. ही पिवळी कलिंगडे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ही कलिंगडे चवीला गोड व…

जिजाऊ संघटनेचे कार्य शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा – निलेश सांबरे

वाडा : ठाणे, पालघर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण कोकणात गेल्या 15 वर्षात जिजाऊ या संघटनेने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा व या कामाला अधिक…

संयुक्त कृती समितीच्या २५ लाख सभासदांचा महाविकास आघाडीला पाठिंबा – डॉ. डी.एल.कराड

उद्धव ठाकरे यांच्या भेटीत दिले १५ मागण्यांचे निवेदन अनिल ठाणेकर ठाणे : कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने १५ मागण्याचे निवेदन महाविकास आघाडीचे नेते व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…

लोकसभा निवडणूक मतदान जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्यामार्फत आवाहन

नवी मुंबई : 25 ठाणे लोकसभा निवडणूकीचे मतदान दिनांक 20 मेला असून जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा यादृष्टीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून 14 एप्रिलला रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर…

मुंबई बंदरातील शहीद जवानांना गोदी कामगारांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई : मुंबई बंदरातील अग्निशमन सेवा केंद्रात उभारलेल्या स्मृतीस्तंभासमोर राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवसानिमित्त त्या सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी १४ एप्रिलला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील गोदी मध्ये उभ्या…