Category: होम

दिनेश उघडे पुरस्काराने सन्मानित

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार राजीव चंदने मुरबाड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मुरबाड तालुका  अध्यक्ष दिनेश उघडे यांनी केलेल्या सामाजिक कार्यात असलेली उल्लेखनीय कामगिरी पाहता त्यांचा अनेक ठिकाणी सन्मान होतं असतो, अतिशय शांत संयमी स्वभावाचे, सतत सामाजिक कार्यासाठी धडपड करणारा व्यक्तिमत्व यांचा सन्मान गोवा राज्यातील साहित्य कला सांस्कृतिक भवन पणजी या ठिकाणी, डी.जी राठोड  फाउंडेशन व गार्गीज डी.आय.डी फाउंडेशन च्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ.शिवाजी शिंदे  यांच्या अध्यक्षते खाली व उदघाटक डॉ. वैद्य गुंडोपंत सुतार, निसर्गपचार तज्ञ तसेच प्रमुख पाहुणे पोलीस उपअधीक्षक सदानंद संदाशिव  व गोवा प्रसिद्ध अभिनेत्री अमित्रा नायक सलत्री सह द्विगज मान्यवरांचे शुभ हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा पुरस्काराने त्यानां सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या समवेत आंबेडकरी चवळीतील नेते भगवान पवार, रामचंद्र थोरात,रमेश देसले,महेंद्र धनगर,पत्रकार संजय बोरगे, शंकर करडे, संतोष उघडे, लक्ष्मण पवार, जितू पंडित, केतन साटपे,जितू अहिरे,ह्या सोहळ्यास उपस्थित होते. तसेच उघडे यांना पुरस्कार प्रदान केल्या मुळे यांच्या वर मुरबाड तालुक्या सह सर्वत्र महाराष्ट्रातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

डॉ.मीनल जाधव हिचा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सत्कार

माथेरान : माथेरान मधील गव्हाणकर एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेतील शिक्षक विनोद जाधव यांची मुलगी मीनल हिने होमिओपॅथी मेडिकल मध्ये डॉक्टर पदवी प्राप्त केल्याबद्दल तिचा कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मीनलचे पालक शिक्षक विनोद जाधव आणि आई सीमा जाधव उपस्थित होत्या.मीनल जाधव हिचे चौथी पर्यंतचे शिक्षण आसल( कर्जत) इथे झाले त्यानंतर अकरावी,बारावी अभिनव ज्ञान मंदिर कर्जत आणि त्यानंतर केडीएमसी होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज शिरपूर (धुळे) याठिकाणी झाले. तिने डॉक्टर पदवी२९ मार्च रोजी प्राप्त केली आहे केल्या या तिच्या यशाबद्दल आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते नेरळ येथील छत्रपती शिवाजी मैदान जवळील हॉलवर भव्य सत्कार करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. मीनलच्या या यशाबद्दल सर्व स्तरातुन कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

संवाद मेळाव्याचे आयोजन

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसमवेत ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कळवा – मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना तसेच कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या प्रचार कामाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिवसेना राज्य समन्वयक, प्रवक्ते नरेश म्हस्के, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी, उमेश पाटील, राजेंद्र साप्ते, नरेंद्र शिंदे, जिल्हा महिला संघटक लता पाटील, प्रियंका पाटील अनिता गौरी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या कळवा – मुंब्रा शहरात गेल्या दशकभरात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. रस्त्यांचे काँक्रीटीकरण, आरोग्य सुविधा, वाहतूक सुविधा वेगवान करण्यासाठी उड्डाणपूल यांसह विविध सुविधा उभारण्यात आल्या. मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व विकासकामे पूर्णत्वास गेली तर अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. यामुळे या सर्व कामांचा लेखाजोखा आपल्याला नागरिकांसमोर अगदी सकारात्मक आणि प्रभावी पद्धतीने आता मांडायचा आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित रित्या काम करण्याचे सर्वांना यावेळी आवाहन केले. आपण केलेली जनहिताची कामे, विकास प्रकल्प तसेच शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेली अनेक कामे नागरिकांपर्यंत पोहचवा, असे आवाहनही यावेळी उपस्थित शिवसैनिकांना केले.

काँग्रेसची गॅरंटी ही चायना मालासारखी –  केशव उपाध्ये

अनिल ठाणेकर ठाणे : अनेक वर्षे देशाची सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने गरीबी हटाव सारखी अनेक आश्वासने दिली . मात्र यातले एकही आश्वासन पूर्ण केले नाही . अशा काँग्रेसने ५ गोष्टींची दिलेली गॅरंटी ही चायना मेड वस्तूंसारखी आहे, अशी टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी  गुरुवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन , प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी यावेळी उपस्थित होते. नक्कल करायलाही अक्कल लागते आणि ती अक्कल काँग्रेसकडे नाह हे मोदी सरकारची नक्कल करून काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी देशाला दाखवून दिले.केवळ एका घराण्याच्या विकासाची गॅरंटी देणाऱ्या काँग्रेसच्या नव्या गॅरंटीमुळे आता देशातील जनता पुन्हा फसणार नाही, उलट देशाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या मोदी सरकारच्या पारड्यात प्रचंड बहुमताने सत्तेचे दान टाकेल. गेल्या दहा वर्षांत प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी झिडकारल्यानंतरही पुन्हा एकदा जनतेच्या फसवणुकीसाठी मोहब्बत की दुकान सारखे फसवे मुखवटे घालून काँग्रेसी नेते जनतेकडे मतांची याचना करीत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशाला विकासाची गॅरंटी दिली. ती पूर्ण करून दाखवली. गरीब, युवक, महिला, शेतकरी या चारच जाती देशात असून त्यांच्या विकासाकरिता भाजप कटिबद्ध असल्याची गॅरंटी पंतप्रधान मोदी यांनी देशाला दिली आहे. गरीबी हटाव नारा देणाऱ्या काँग्रेसच्या काही मोजक्या नेत्यांची आणि पक्षाला वेठीस धरणाऱ्या गांधी घराण्याची गरीबी हटली,  देश मात्र अधिकाधिक गरीब होत गेला. शेतकरी कर्जबाजारी झाला.  शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीच्या नावाखाली बँकांच्या तिजोऱ्या भरून शेतकऱ्याच्या पदरात मात्र कर्जाचे ओझे कायमच ठेवण्याचा पराक्रम काँग्रेसी सत्ताधीशांनी केला, पंतप्रधान मोदी केवळ गॅरंटीच्या घोषणा करत नाहीत, तर गेल्या दहा वर्षांत त्यांनी दिलेली  प्रत्येक गॅरंटी पूर्ण केल्याचे देशाने अनुभवले आहे. देशातील २५ कोटी लोकसंख्येच्या कपाळावरील दारिद्र्यरेषा मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे कायमची पुसली गेली असून जगाने याची दखल घेतली आहे. मोदी सरकारने जाहीर केलेला प्रत्येक संकल्प पूर्ण झाल्याचे चित्र देशाने पाहिले आहे. कलम ३७० रद्द करणे , राम मंदिर उभारणी , औद्योगिक विकास, रोजगाराच्या संधी,  महिलांचे सक्षमीकरण, अशा प्रत्येक क्षेत्रातील मोदी की गॅरंटी खरी ठरते हे लक्षात आल्यावर आता त्यांच्या गँरंटीची नक्कल करत न्याय आणि विकासाच्या कागदी घोषणा करून काँग्रेस पुन्हा देशातील जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या प्रत्येक घोषणेतील पोकळपणा जनतेस माहीत आहे, याची जाणीव असूनही मोदी यांची नक्कल करताना काँग्रेसने आपली अक्कल एवढी गहाण टाकली, की मोदी मंदिरात गेले की यांचे नेते मंदिरांच्या पायऱ्या झिजवतात, मोदींनी गंगास्नान केले की यांचे नेते डुबकी मारतात, मोदी यांनी प्रचारयात्रा काढल्या की यांचे नेते देशात पदभ्रमणासाठी बाहेर पडतात. अशा नक्कल करण्याच्या हतबलपणामुळेच आता काँग्रेसने पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटी दिल्या आहेत. अशा पाच पंचवीस फसवणुकांतून जनता यापूर्वीही गेलेली असल्याने, आता नक्कल देखील कामाला येणार नाही, अशी खिल्ली प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उडवली.

महायुतीच्या नेत्यांनी उमेदवाराचे नाव घोषित करावे – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांनी उमेदवाराचे नाव घोषित करावे, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी महायुतीच्या मेळाव्यात बोलताना केली. बुधवारी सायंकाळी ठाण्यातील टीपटॉप प्लाझा येथील शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष (आठवले) व मित्रपक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी खासदार संजीव नाईक, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष ॲड. माधवी नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, रिपाईचे सुरेश बारशिंगे, भास्कर वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. उमेदवाराचे नाव घोषित केल्यावर कोणीही इकडे तिकडे जाणार नाही, शिवसेना मुख्य नेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, भाजप नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे तीनही नेते जो उमेदवार देतील त्याला निवडून आणू, यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांनी उमेदवाराचे नाव घोषित करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आपल्या भाषणात बोलताना केले. ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नरेंद्र मोदी हेच असल्याचे महायुतीच्या सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणात म्हटले होते, हाच धागा पकडून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले की, ठाणे लोकसभेत सन्मानजनक उमेदवार दिला जाईल. आघाडी कोणाची आहे, उमेदवार कोण आहे यापेक्षा नरेंद्र मोदीं यांना पंतप्रधान करण्यासाठी देशात ४०० पार व महाराष्ट्रात ४५ प्लस पार जागा निवडून आणुया, असे आवाहन उपस्थित महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ना. शंभूराज देसाई यांनी केले.

बाबासाहेबांप्रमाणे प्रकाश आंबडेकरांनाही काँग्रेस पराभूत करणार-देवेंद्र फडणवीस

अकोला : इतिहासामध्ये काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडून येऊ दिले नाही. त्याचप्रमाणे अकोल्यातून बाळासाहेब आंबेडकर यांनाही काँग्रेस निवडून येऊ देत नाही, अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे…

संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई- नाना पटोले

मुंबई  : महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या मुंबईतील सर्व जागा पडतील अशी भविष्यवाणी करणाऱ्या काँग्रेसच्या माजी खासदार संजय निरुपम यांच्यावर आज शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणूकीसाठी त्यांचे स्टार प्रचारकाच्या यादीत नाव होते…

कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून महिला उमेदवार रिंगणात

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या माजी नगरसेविका वैशाली दरेकर-राणे यांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. उमेदवारीच्या चर्चेत ठाकरे गटाकडून दरेकर यांचे…

तीन खासदारांचा पत्ता कट; आणखिन दोघांचाही गेम होणार

 एकनाथ शिंदे गटात भूकंप मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत भूकंप झाला आहे. लोकसभेच्या जाहिर झालेल्या जागांत आतापर्यंत तीन खासदारांचा पत्ता कट झाला आसून आणखिन दोन खासदाराचाही गेम जवळपास निश्चित झाला आहे. शिवसेनेतील…